* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SONIA GANDHI : AN EXTRAORDINARY LIFE, AN INDIAN DESTINY
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788184984965
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 370
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SONIA GANDHI`S STORY REPRESENTS THE GREATEST TRANSFORMATIONAL JOURNEY MADE BY ANY WORLD LEADER IN THE LAST FOUR DECADES. CIRCUMSTANCE AND TRAGEDY, RATHER THAN AMBITION, PAVED HER PATH TO POWER. BORN INTO A TRADITIONAL, MIDDLE-CLASS ITALIAN FAMILY, SONIA MET AND FELL IN LOVE WITH RAJIV GANDHI, SON OF FUTURE INDIAN PRIME MINISTER INDIRA GANDHI AND GRANDSON OF JAWAHARLAL NEHRU, WHILE STUDYING ENGLISH IN CAMBRIDGE. CRUELLY TESTED BY THE ASSASSINATIONS OF HER MOTHER-IN-LAW AND OF HER HUSBAND, SONIA GREW INTO A STRONG, AUTHORITATIVE BUT ALWAYS PRIVATE FIGURE, NOW PRESIDENT OF A COALITION RULING OVER A BILLION PEOPLE IN THE WORLD`S LARGEST DEMOCRACY. THROUGH EXCLUSIVE INTERVIEWS WITH MEMBERS OF SONIA`S PARTY, POLITICAL OPPONENTS AND FAMILY FRIENDS, RANI SINGH CASTS NEW LIGHT ON SONIA. IN THE FIRST MAINSTREAM BIOGRAPHY OF THIS INSPIRATIONAL FIGURE, THE AUTHOR’S COMPELLING NARRATIVE RETRACES THE PATH OF THE BRAVE AND BEAUTIFUL SONIA GANDHI, EXAMINING WHAT HER LIFE AND LEGACY MEAN FOR INDIA. SONIA MAINO WAS BORN IN A SMALL ITALIAN VILLAGE. HER EXTRAORDINARY JOURNEY THAT LED HER TO BECOME SONIA GANDHI IS NARRATED IN690~’S SONIA GANDHI: AN EXTRAORDINARY LIFE, AN INDIAN DESTINY. THIS BOOK BEGINS WITH THE TALE OF THE LOVE THAT BLOSSOMED BETWEEN SONIA AND RAJIV GANDHI WHEN SHE MET HIM IN A RESTAURANT IN CAMBRIDGE, WHILE THEY WERE BOTH PURSUING THEIR STUDIES IN ENGLAND. FAR FROM BEING A SMOOTH ROMANCE, THEY HAD TO ENDURE SEPARATION AND OPPOSITION FROM THEIR RESPECTIVE FAMILIES. HOWEVER, SONIA FINALLY MARRIED RAJIV AND MOVED TO NEW DELHI AT A TIME WHEN INDIRA GANDHI WAS THE PRIME MINISTER OF INDIA. THE FIRST PART OF THIS BOOK DESCRIBES THE PEACEFUL AND ALMOST IDYLLIC LIFE THAT SONIA LED WITH HER HUSBAND AND CHILDREN. HOWEVER, AS THE BOOK PROGRESSES INTO THE SECOND HALF, THE POLITICAL DYNASTY COMES CRASHING DOWN. WITH THE DEATH OF SANJAY GANDHI IN A PLANE CRASH, RAJIV IS COMPELLED TO TAKE HIS PLACE AS THE NEXT PRIME MINISTER. TRAGICALLY, INDIRA GANDHI IS ASSASSINATED BY HER BODYGUARD AND RAJIV GANDHI, AT THE AGE OF 40, BECOMES THE YOUNGEST PRIME MINISTER IN THE HISTORY OF INDIAN POLITICS. HOWEVER, THINGS DO NOT MEET ANY RESOLUTION AND SONIA’S LIFE IS THROWN INTO FURTHER DISARRAY WHEN RAJIV GANDHI IS ASSASSINATED. FAR FROM ESCAPING FROM SUCH TRAVESTIES, SONIA GANDHI ENTERS THE REALM OF POLITICS AND ESTABLISHES THE RAJIV GANDHI FOUNDATION IN MEMORY OF HIS LEGACY. ALL HER ENDEAVORS FROM THEN ON HAVE BEEN TO IMPROVE THE CONDITIONS OF THE COUNTRY, FROM EDUCATION TO MILITARY AND POVERTY. IN SONIA GANDHI: AN EXTRAORDINARY LIFE, AN INDIAN DESTINY, THE AUTHOR STRESSES ON SONIA’S POLITICAL PROWESS AND HER ABILITY TO HANDLE THE MOST ADVERSE SITUATIONS, WHICH HAS TURNED HER INTO A POLITICAL ICON FOR THE YOUNGER INDIAN GENERATIONS.
राणी सिंग यांच्या लेखणीतून उतरलेलं ‘सोनिया गांधी’ यांचे जीवनचरित्र हे एका अनन्यसाधारण व्यक्तिमत्वाच्या स्त्रीचे हृदयस्पर्शी चित्रण आहे. हे वाचकाला सोनिया गांधी यांच्या जीवनाकडे बघण्याची एक नवी अंतर्दृष्टी प्रदान करते... त्याचबरोबर ही एका वेदनामय जीवनाची, एका कुटुंबाची आणि प्रगतीपथावर वाटचाल करत असलेल्या एका राष्ट्राची कहाणी आहे. – हेन्री किसिंजर, माजी यु.एस. सेक्रेटरी ऑफ स्टेट जगातील काही मोजक्या, सामथ्र्यशाली स्रियांपैकी एक असलेल्या या स्त्रीच्या जीवनाची कवाडे राणी सिंग यांनी वाचकांसाठी खुली केली आहेत. आजवर त्यांच्या जीवनाविषयी लिखित स्वरूपात फारशी माहिती उपलब्ध नव्हती. – जॉन स्नो, इंग्लंड येथील बातमीदार राणी सिंग यांच्या सखोल आणि अभ्यासपूर्ण संशोधनातून हे चरित्र आकारास आले आहे. काही वर्षांपूर्वी अप्रसिद्ध असलेल्या सोनिया गांधींची गणना थोड्याच कालावधीत आशिया खंडातील आणि अर्थात संपूर्ण जगातील निवडक सामथ्र्यशाली स्रियांमध्ये होऊ लागली. सोनियांच्या परिवर्तनाची ही कहाणी राणी सिंग यांनी आपल्या चित्रदर्शी, हृद्य भाषेत कथन केली आहे. प्रसंगी कठोर तरीपण न्याय्य, समीक्षात्मक तसेच परिणामकारक अशा शैलीतील हे लेखन म्हणजे विद्वत्ता आणि शोधपत्रकारिता यांचा अभूतपूर्व मिलाफ आहे. – प्रणय गुप्ते, ‘अल् अरेबिया इंग्लिश ’चे मुख्य संपादक आणि ‘मदर इंडिया’ या इंदिरा गांधी यांच्या राजकीय चरित्राचे लेखक ‘हे चरित्र म्हणजे एका भिडणा-या जीवनकहाणीला सलाम आहे...! पृष्ठभागावरच्या प्रवाहापेक्षा भिन्न दिशेने वाहत असलेला पृष्ठभागाखालचा एक जलप्रवाह आहे... त्याने भारतीय राजकारणात खळबळ निर्माण केली आहे... त्याची ही कहाणी आहे.’ सोनिया गांधींच्या भारतीय राजकारणावर असलेल्या प्रभावाची ही कहाणी आहे. – जेम्स ब्य्रुअर, पत्रकार आणि ‘लॉईड्स लिस्ट’चे संपादक
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #लीना सोहोनी #RANISINGH #SONIAGANDHI #सोनिया गांधी : एक अनन्यसाधारण जीवनप्रवास #LEENASOHONI
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more