* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHOOT TO KILL
  • Availability : Available
  • Translators : DEODATT KETKAR
  • ISBN : 9788184980707
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 140
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SCOTT GRAHAM WAS A FORMIDABLE SAS SOLDIER. HE WAS DECORATED FOR HIS HEROISM IN NORTHERN IRELAND AND THE FALKLANDS, AND HE FOUGHT GUM BATTLES IN WHICH MORE THAN A DOZEN IRA TERRORISTS WERE KILLED. MAIREAD FARRELL WAS PETITE, YOUNG, DARKLY BEAUTIFUL AND SHE PLANTED BOMBS FOR THE IRA. TOGETHER SHARED A DEADLY AND TERRIBLE SECRET. FOR YEARS THEY LOVED ONE ANOTHER WITH A RELENTLESS PASSION, AGAINST ALL THE TABOOS OF BOTH THEIR ARMIES. THEIR CLANDESTINE LOVE AFFAIR REACHED ITS CRESCENDO WITH THE SHOOTING OF THREE UNARMED IRA TERRORISTS ON THE ROCK OF GIBRALTAR, ONE OF THE MOST CONTROVERSIAL INCIDENTS IN THE HISTORY OF THE SAS. SHOOT TO KILL IS SCOTT GRAHAM`S TRUE STORY OF THIS EXTRAORDINARY ROMANCE, AND OF THE KILLINGS THAT SHOCKED THE WORLD.
संकटाशी दोन हात करण्याची प्रेरणा देणाऱ्या कथांमध्ये ही कथा जितकी जास्त प्रेरक तितकीच अधिक शोकात्म आहे.` - न्यूज ऑफ द वर्ल्ड स्कॉट ग्रहम एक कसलेला `एसएएस` (स्पेशल एअर सर्व्हिस) सैनिक होता. उत्तर आयर्लंड आणि फॉकलंड मोहिमेबद्दल त्याला शौर्यपदक मिळालं होतं. `आयआरए` बरोबरच्या चकमकीत त्यानं कित्येक अतिरेक्यांना कंठस्नान घातलं होतं. मायरीड फॅरेल ही `आयआरए` साठी बॉंब पेरणारी एक लहानखुरी पण नितांत सुंदर तरुणी! या दोघांचं जीवघेणं आणि भयानक असं एक गुपित होतं. आपल्या पक्षाच्या आणि सैन्याच्या नियमांना बगल देत अनेक वर्षं ते एकमेकांवर उत्कट प्रेम करत राहिले. `आयआरए`च्या तीन नि:शस्त्र अतिरेक्यांना रॉक ऑफ जिब्राल्टरवर गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि स्कॉट आणि मायरीडच्या छुप्या प्रेमप्रकरणाचा शेवट झाला. `एसएएस`च्या इतिहासाला तो एक अतिशय वादग्रस्त प्रसंग ठरला. स्कॉट ग्रहमच्या असाधारण प्रेमाचं आणि जगाला हादरवून सोडणाऱ्या तीन हत्यांचं चित्तथरारक सत्यकथन - `शूट टू किल.`
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SHOOTTOKILL #DEODATTAKETKAR #SCOTTGRAHAM
Customer Reviews
  • Rating StarPrasad Raut

    ७-८ वर्षांपूर्वी शूट टू किल वाचलं होतं..... काय माहित नाही.... पण तेव्हापासून स्कॉट ग्राहम आणि मायरीड फेरेलची लव्हस्टोरी ही माझी ऑल टाईम फेव्हरेट लव्हस्टोरी झाली..... कर्तव्य, जबाबदारी या दोन भावना माझ्यासाठी प्रेमापेक्षाही मोठ्या असल्याने असेल काचीत..... पण हिर-रांझा, शिरीन फरहाद, लैला मजनू, रोमियो ज्युलिएट एक नंबरचे चुतीये वाटतात..... कोणी स्वतःच्या डोक्यात कुदळ घालून घेतोय तर कोणीतरी येडझव्यासारखं वाळवंटात भटकत राहतंय.... ही अशी चुतियागिरी अंगावरच नाही येत..... तर किळस येते त्यांची..... असो. तर आयरीश स्वातंत्र्ययोद्धा मायरीड फेरेल आणि ब्रिटनच्या एसएएस युनिटचा कमांडो स्कॉट ग्राहम यांची ही लव्हस्टोरी. दोघांच्या संघटना एकमेकांच्या हाडवैरी.... अशात या दोघांमध्ये प्रेम होतं.... फुलतं..... बहारतं...... मायरीडची IRA संघटना एका ठिकाणी बॉम्बस्फोट करायची जबाबदारी तिच्यावर देते.... आणि स्कॉटच्या खऱ्या रूपाबद्दल अनभिज्ञ असलेली मायरीड ही गोष्ट जेव्हा त्याला सांगते तेव्हा देशाचा एक सैनिक जे करेल तेच स्कॉट करतो..... मायरीड पकडली जाते.... दहा वर्ष तुरुंगवास भोगते.... त्यात भयानक हालअपेष्टा भोगते.... अठराव्या वर्षी तुरुंगात गेलेली अल्लड, संवेदनशील मायरीड अठ्ठाविसाव्या वर्षी बाहेर येते तेव्हा पूर्णपणे बदलून गेलेली असते..... बदलेलं नसतं ते तिचं स्कॉटवर असलेलं नितांत प्रेम..... त्यानंतर स्कॉट अनेकदा तिला तिथून बाहेर काढून अमेरिका किंवा युरोपमध्ये न्यायचा प्रयत्न करतो.... पण नियतीला ते मान्य नसतं.... कारण सटवाईने मायरीड आणि स्कॉटचं भविष्य आधीच लिहिलेलं असतं..... आणि तेच होतं..... रॉक ऑफ जिब्राल्टरमध्ये दोन दहशतवाद्यांची ओळख पटवायला स्कॉटला नेलं जातं... आणि तिथे तो ओळख कन्फर्म करताच त्याच्याच युनिटचे लोक त्या दोन दहशतवाद्याना गोळ्या घालून ठार मारतात.... त्यातली एक मायरीड होती..... मला ही स्टोरी आजही आवडते.... आणि पुढेही कायम माझी फेव्हरेट लव्हस्टोरी असेल.... कारण दोघांनीही आपलं प्रेम आपल्या कर्तव्याआड येऊ दिलं नाही..... IRA ची स्वातंत्र्ययोद्धा म्हणून मायरीड आपलं कर्तव्य करत होती आणि ब्रिटनचा SAS कमांडो आपलं कर्तव्य बजावत राहिला..... त्यांचं प्रेम त्यांच्या कर्तव्याच्या आड आलं नाही.... किंबहुना त्यांनी येऊ दिलं नाही..... ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 27-07-2010

    व्यासंग वाढवणाऱ्या साहित्यकृती… स्कॉट ग्रॅहॅम लिखित ‘शूट टू किल’ ही डॉ. देवदत्त केतकर यांनी अनुवाद केलेली कादंबरी मारेकऱ्यांदरम्यान फुलणाऱ्या जगावेगळ्या प्रेमाची कहाणी आहे. स्कॉट ग्रॅहॅम एक कसलेल्या ’एसएएस’ (स्पेशल एअर सव्र्हिस) सैनिक होता. उत्तर आय्लंड आणि फॉकलंड मोहिमेबद्दल त्याला शौर्यपदक मिळाले होते. ’आयआरए’ बरोबरच्या चकमकीत त्याने अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. मायरीड फॅरेल ही ‘आयआरए’ साठी बाँब पेरणारी एक लहानखुरी पण नितांतसुंदर तरुणी या दोघांचे जीवघेणे आणि भयानक असे गुपित असते. आपल्या पक्षाच्या आणि सैन्याच्या नियमांना बगल देत ते अनेक वर्षे एकमेकांवर उत्कट प्रेम करत राहतात. ‘आयआरए’ च्या तीन नि:शस्त्र अतिरेक्यांना रॉक ऑफ जिब्राल्टरवर गोळ्या घालून ठार करण्यात आले आणि स्कॉट आणि मायरिडच्या छुप्या प्रेमप्रकरणाचा शेवट झाला. ’एसएएस’ च्या इतिहासातला तो एक वादग्रस्त प्रसंग ठरला. स्कॉट ग्रॅहॅमच्या असाधारण प्रेमाचे आणि जगाला हादरवून सोडणाऱ्या तीन हत्यांचे चित्तथरारक सत्यकथन ‘शूट टू किल’ मधून घडते. हा अनुवाद आपल्याला वेगळ्या विश्वाची सफर घडवतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more