* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHETI KARU FAYDYACHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661262
  • Edition : 4
  • Publishing Year : FEBRUARY 1996
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 300
  • Language : MARATHI
  • Category : TECHNOLOGY,ENGINEERING,AGRICULTURE
  • Available in Combos :KISAN DIWAS OFFER
Quantity
Buying Options:
  • Print Books:
FARMING IS A SCIENCE; IF WE PRACTICE IT SCIENTIFICALLY THEN IT WILL ALWAYS GIVE GOOD RESULTS. INDIAN FARMING IS DEPENDENT UPON THE RAIN AND THE WEATHER CONDITIONS. WE HAVE TRIED TO HANDLE ALL THE TOPICS RELATED TO FARMING RIGHT FROM PLOUGHING TO STORING THE PRODUCE. WE REQUEST YOU TO READ THIS BOOK AT LEAST ONCE AND STEP TOWARDS MAKING MAHARASHTRA SUJALAM, SUFALAM, WHILE PROMISING YOURSELVES TO THINK ABOUT THE MODERN TECHNIQUES OF FARMING AND ACCEPTING THE CHALLENGES IN FARMING.
शेती हे एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे शेती केल्यास ती फायद्याची ठरते. आपली शेती हवामानावर, पावसावर अवलंबून असते. त्यांचा विचार करूनच नांगरटीपासून धान्य-साठवणीपर्यंत सर्व विषय इथे हाताळले आहेत. नव्या शेतीचा विचार करून, नवीन आव्हाने स्वीकारून, शेती फायद्याची करून महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करण्याचा प्रयत्न प्रत्येक शेतकऱ्याने करावा, यादृष्टीने हे पुस्तक वाचावे, अशी विनंती आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA

    फायदेशीर शेतीसाठी मार्गदर्शक… शेती हा मानवी जीवनाशी निगडित असलेला विषय आहे. आपली शेती निसर्गावर अवलंबून असते. निसर्गाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्याचे जबरदस्त नुकसान होत असते. खरे तर शेती हे एक शास्त्र असून आहे त्या परिस्थितीत आहे त्या जमिनीतून शेतकरी ायदेशीर शेती करु शकतो. त्यासाठी त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. त्याच उद्देशाने आ. बा. पाटील यांनी ‘शेती करु फायद्याची’ हे पुस्तक लिहिले. लेखकाचे १९७३ पासून शेतीविषयक लेख विविध वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत आहेत. त्यांचे दै.‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेले लेख एकत्रितपणे पुस्तकाद्वारे आपणासमोर सादर केले आहेत. यात त्यांनी नांगरटीपासून धान्य साठवणीपर्यंतचे सर्व विषय हाताळले आहेत. शेतीत नुकसान दोन कारणांमुळे होऊ शकते. पहिले म्हणजे आपले शेतीकडे दुर्लक्ष किंवा जाणते-अजाणतेपणे आपल्याकडून होणाऱ्या चुका, तर दुसरे कारण बाहेरची प्रतिकूल परिस्थिती आहे. दुसरी परिस्थिती केव्हातरीच उद्भवत असते. त्यामुळेच लेखक पहिल्या कारणास फार महत्त्व देतो. यामध्ये उद्भवणारे दोष दूर करणे आपल्याच हातात असते. त्यात मशागत नीट न करणे, पेरणी वेळेवर व नीट न करणे, खते न देणे, रोगकिडींचा योग्य वेळी बंदोबस्त न करणे आदींमुळे शेतीवर परिणाम होत असतो. शेतीच्या धंद्यात होणाऱ्या चुका आणि इतर धंद्यातील चुकात फरक आहे. इतर धंद्यातील चुका लगेच दुरुस्त करता येतात; परंतु शेतीतील चुकीमुळे वर्ष वाया घालवावे लागते. लेखकाच्या मते यांत्रिक साधनांचा वापर केला म्हणजे ती सुधारलेली शेती होत नाही, तर ती करताना आपणाकडून होणाऱ्या चुका वेळीच जाणून घेऊन उत्पादन जास्तीत जास्त कसे वाढेल याकडे लक्ष दिले तरच ती सुधारलेली होऊ शकते, त्यासाठी लेखक अधिक उत्पादनासाठी विचारात घ्यावयाच्या विविध गोष्टींची आपणास माहिती करून देत आहेत. सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे माती परीक्षण करणे. पिकांच्या वाढीसाठी नत्र, स्फुरद व पालश ही अन्नद्रव्ये जमिनीतून द्यावी लागतात. यातील आपल्या जमिनीत किती प्रमाणात उपलब्ध आहेत व आपणास ती रासायनिक खताद्वारे किती प्रमाणात देणे आवश्यक आहे यासाठी माती परीक्षण महत्त्वाचे असते, तसेच या परिक्षणामुळे कोणती पिके चांगल्याप्रकारे घेऊ शकते हे तर कळतेच पण जमीन शेतीयोग्य नसल्यास त्यात सुधारणा घडवण्यास मार्गदर्शनही मिळते. तपासणीसाठी मातीनमुना योग्य तंत्रानेच घ्यावा लागतो. तो कधी व कशाप्रकारे घ्यावा याची माहिती लेखक आपणास करून देतो. सदर तपासणी शासकीय प्रयोगशाळेत विनामूल्य केली जाते. याचा शेतकऱ्यांनी जरूर लाभ घ्यावा. कारण माती परीक्षण हा शेती सुधारणेचा महत्त्वाचा पाया आहे. त्यानंतर लेखक मशागतीची सविस्तर माहिती देतो. पाऊस पडणे आपल्या हाती नसते. पाऊस कमी अथवा त्यास उशीर होत असेल, तर आपण काय करावे, कोणते उपाय योजावे, याबाबत अनेकांना प्रश्न पडतो. अशावेळी आपण पिकांना वेळेवर पाणी देऊ शकत नाही, त्यासाठी खुरपणी, कोळपणी व विरळणी महत्त्वाची आहे. खुरपणी, कोळपणीने जमीन हलवली गेल्यामुळे हवा खेळती राहते व बाष्पीभवन थांबते. पेरणी मग ती खरीप, रब्बी अथवा उन्हाळी असो, ती करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. निरनिराळ्या पिकांना निरनिराळ्या प्रकारची पेरणीसाठी योग्य जमीन लागते. बियांचे प्रकार व आकाराप्रमाणे पेरणीची खोली बदलते. तसेच लेखक सुचवतात की, पेरणी पूर्व-पश्चिम करण्याऐवजी दक्षिणोत्तर करावी. कारण यामध्ये पिकांना भरपूर सूर्यप्रकाश मिळून पिकांची वाढ चांगली होती. याबाबत अनेक शेतकरी अनभिज्ञ असतात. आपण कोणती पिके घेणार याचे आधीच नियोजन करून ठेवले पाहिजे, त्यासाठी लागणारे बियाणे खात्रीच्या ठिकाणावरून लवकर आणून ठेवले पाहिजे. सदर पुस्तकात ज्वारी, बाजरी, भात आदीच्या सुधारित जाती व त्यांच्या पेरणीची शास्त्रोक्त माहिती या पुस्तकात आहे. बियाणे निवडताना ते पेरल्यावर निरोगी निपजण्यासाठी त्यांची आधीच काळजी घेणे आवश्यक असते. कारण रोग आल्यानंतर त्यावर उपाय योजण्यापेक्षा तो येऊ नये म्हणून काळजी घेणे सर्वांत महत्त्वाचे असते. त्यासाठी विविध उपायांबाबत लेखक आपणास मार्गदर्शन करत आहेत. बियांना औषध लावणे, बी औषधाच्या पाण्यात बुडविणे किंवा बियाण्यावर उष्ण पाण्याची प्रक्रिया आदी उपाय करता येतात. बऱ्याच रोगांचे मूळ बियातच असते. बीजप्रक्रियेमुळे रोगकारक जंतू, बीजाणूंचा नाश होतो. निरनिराळ्या अन्नधान्यांच्या पिकांबरोबरच फळझाडांची लागवड आपण वाढविली पाहिजे. कारण महाराष्ट्रात सर्व प्रकारची फळझाडे चांगल्याप्रकारे येऊ शकतात. आंबा, फणस, पेरू, सीताफळ, नारळ आदी फळांच्या सुधारित जाती आणि त्यांच्या लागवडीच्या योग्य पद्धती दिल्या आहेत, तसेच या फळझाडांवरील विविध रोग व त्यांचा बंदोबस्त कसा करावा याची माहिती दिली आहे. सध्याचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग आहे. शेतीविषयक विविध क्रांतिकारक शोधांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी अशा पुस्तकांची आवश्यकता आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book