* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CALM AT WORK
  • Availability : Available
  • Translators : SUNANDA AMRAPURKAR
  • ISBN : 9788177666595
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 320
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
DO YOU FEEL THE STRESS AT WORK? DO YOU FIND IT VERY HARD TO FINISH THE DAILY TASKS? THEN THIS BOOK IS JUST THE RIGHT ONE FOR YOU. THE MAIN AIM OF THE BOOK IS NOT JUST TO DISCUSS YOUR PROBLEMS BUT TO PROVIDE YOU WITH SOLUTIONS FOR THE SAME. THE AUTHOR HERE WANTS TO ASSURE YOU OF THE WAYS TO MAKE YOUR DAILY BUSINESS A WONDERFUL EXPERIENCE. EACH AND EVERY PAGE OF THIS BOOK WILL REVEAL THE SECRETS OF FINDING PEACE AND ENTERTAINMENT IN THE ROUTINE WORK YOU WERE FINDING VERY BORING TILL TODAY. THIS BOOK WILL SUGGEST YOU THE WAYS TO MAKE YOURSELF MORE USEFUL FOR YOUR OWN BETTERMENT. HE HAS PENNED DOWN EVERYTHING VERY CAREFULLY, AFTER A LOT OF RESEARCH, STUDY, AND TESTS. WORK IN AN ENVIRONMENT WHICH IS POSITIVE AND WHICH IS ALSO TENSION FREE AND ENJOY THE PLEASURE OF BEING PEACEFUL.
कामाचा ताण जाणवतो? रोजचे काम तुम्हांला ओझ्यासारखे वाटते का? मग हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. पुस्तकाचा उद्देश तुमच्या प्रश्नांचा नुसता ऊहापोह करणे, हा नसून त्याची उत्तरे शोधणे हा आहे. तुमचा व्यवसाय करणे तुम्हांला आनंददायक कसे करता येईल, हेच लेखकाला सांगायचे आहे. त्याच त्याच वंÂटाळवाण्या कामात शांतता, समाधान मिळवण्याचे मार्ग तुम्हांला या पुस्तकाच्या प्रत्येक पानात दिसतील. काम करताना तुम्हांला स्वत:कडूनच अपेक्षित असलेली सर्व मदत कशी घेता येईल, याचे सोपे उपाय या पुस्तकात दिलेले आहेत. हे सर्व उपाय सर्वांगीण अभ्यास करून, संशोधन, चाचण्या करून मगच तुमच्यापर्यंत पोचवले आहेत. तणावरहित, सकारात्मक वातावरणात काम करा. आणि शांत होण्याचा आनंद अनुभवा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CALMATWORK #SUNANDAAMARAPURKAR #PAULWILSON #SHANTATENAKAAMKARA #सुनंदा अमरापूरकर #शांततेनं काम करा!
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL - 13-01-2007

    रोजच्या कामातून आनंदाची जाणीव… कामातून वेळ होत नाही, श्वास घ्यायलाही फुरसत नाही, अशी वाक्यं नेहमीच ऐकायला येतात. काळ-काम-वेग यांचे गणित प्रत्यक्ष व्यवहारात चुकतच जाते, असा सर्वसाधारण अनुभव असतो. ‘शांततेनं काम करा’ हे सुनंदा अमरापूरकर यांचे अनुवादित ुस्तक सर्वांनाच उपयोगी होते. पॉल विल्सन हे या पुस्तकाचे मूळ लेखक, त्यांनी कारकून, कंपनीचा मुख्य अधिकारी, सल्लागार मालक, तसेच ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करताना घेतलेल्या अनुभवांमधून हे पुस्तक लिहिले आहे. त्याचा ओघवता अनुवाद करण्याचे काम लेखिकेने केले आहे. रोजच्या कामांचा, व्यवसायाचा, तिथल्या घडामोडी, सहकारी यांचा परिणाम व्यक्तीच्या मनावर हात असतो. या साऱ्यातूनच प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व घडत-बिघडत असते. हे लक्षात घेऊन मनाचे आरोग्य सांभाळणारी चतु:सूत्री, कामाच्या ठिकाणी ताण देणारे सप्तरंग, स्वत:च्या आवडीनिवडी, सवयी, ताणमागची शारीरिक कारणं, ताणाला आमंत्रण देणारी जीवनपद्धती यांचा सोप्या भाषेतील परिचय पुस्तकात आला आहे. ‘शांततेच्या दिशेने पाहिले पाऊल’, ‘तुमची शांतता उपयांची फाईल’ आणि दीर्घकालीन शांततेसाठी अशा तीन विभागातील छोट्या-छोट्या प्रकरणांमधून पुस्तकाची मांडणी झाली आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये सर्वसामान्य वाचकाला मोलाच्या सूचना देणाऱ्या मार्मिक, नेटक्या चौकटी हे या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल्र कामातील कंटाळवाणा भाग, सहकाऱ्यांशी होणारा वाद-संवाद, स्वत:बद्दलच्या तुमच्याइतरांच्या अपेक्षा, स्पर्धा यांचा येणारा ताण या सर्वांकडे सकारात्मक नजरेने पाहिले पाहिजे. तसे करणे शक्य आहे, असा विश्वास आणि दिलासा या पुस्तकामुळे मिळतो. काम करताना येणारा ताण, होणारा मनस्ताप या साऱ्यांनाच आपण स्वत:च जबाबदार असतो. आणि या सर्व गोष्टींना ओलांडून, कामकाज, व्यवसाय आणि दैनंदिन कामातून आनंद मिळविण्याची जबाबदारीही आपल्यावरच असते, याची जाणीव हे पुस्तक करून देते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more