* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SARTYA SARI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662627
  • Edition : 4
  • Publishing Year : MARCH 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 80
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
V. S. KHANDEKAR WAS BLESSED WITH THE RARE GIFT, HE WAS BLESSED WITH A SENSITIVE MIND. HE HAD THE ABILITY TO SEE EVERYTHING. HIS SIGHT REACHED THE PLACES WHERE EVEN THE SUN RAYS FAILED TO REACH.THIS BOOK IS THE COLLECTION OF HIS STORIES WHICH WERE NOT PUBLISHED. THESE WERE WRITTEN BETWEEN 19741976. THEY ARE SYMBOLIC, EMOTIONAL, PIOUS AND SUBTLE. THEY ARE FULL OF COMPASSION, SYMPATHY TOWARDS THE MANKIND. WRITER HAS SEEN THEM THROUGH HIS INNER EYES. THEY ARE NOT JUST WORDS PUT TOGETHER, THEY CREATE A CONSCIOUSNESS. THEY BRING THE BRIGHT LIGHT FOR THE LIFE BUT ALSO BRING THE PLEASANT MOONLIGHT. THESE STORIES HAVE AN ABILITY TO KEEP THE MARATHI LITERATURE ALIVE EVEN AFTER THE DEATH OF HUMANITY.
जे न देखे रवि..... अशी अलौकिक प्रतिभा लाभलेले कथाकार वि. स. खांडेकर. `सरत्या सरी’ हा त्यांचा असंकलित कथांचा अंतिम संग्रह. १९७४ ते १९७६ या उत्तर काळातील कथांत सांकेतिकता, भावुकता, तरलता नि जीवनलक्ष्यी वृत्ती दिसून येते. माणुसकीच्या गहिवरांनी ओंथबलेल्या या कथा लेखकानी प्रज्ञाचक्षूंनी जीवन न्याहाळत लिहिल्या. कथा केवळ शब्दप्रभू असता कामा नये, तर ती संवेदनगर्भ हवी, अशी प्रचिती आल्यानंतर लिहिलेल्या या कथा लेखकाच्या प्रतिभेच्या सरत्या सरी. त्या जीवनाचा विद्युत प्रकाश घेऊन येतात नि ढगाआडच्या चांदण्यांची शीतलताही ! या `सरत्या सरी’नी माणुसकीच्या नंदादीपाची सांजवात विझली, तरी मराठी शारदेचा गाभारा तिच्या विचार दरवळांनी मात्र नेहमीच सुगंधित राहील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #हिरवा चाफा #अश्रू #सरत्या सरी
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 08-06-2003

    मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक वि. स. खांडेकर हे यांच्या लघुकथांचा ‘सरत्या सरी’ हा शेवटचा लघुकथासंग्रह. विविध दिवाळी अंकांत पूर्वप्रसिद्ध असलेल्या या कथा डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी संपादित करून पुस्तकरूपाने वाचकांना उपलब्ध करून दिल्या आहत. पुस्तकाला दिलेलं शीर्षक खांडेकरांनीच सुचवलेलं. प्रस्तावनेत लेखकाने शीर्षकातलं लालित्य उलगडून दाखवलं आहे तसंच कथांचाही धांडोळा घेतला आहे. मुखपृष्ठही लालित्याच्या विवेचनाला साजेसं, प्रसन्न आहे. खांडेकरांच्या कथांत कलादृष्टीपेक्षाही अर्थगर्भ व सखोल जीवनानुभूती असते. त्या दृष्टीने त्यांच्या सर्वच कथा उद्बोधक आणि सांकेतिक आहेत. त्यातही ‘काजवा’ आणि ‘मुलाखत’ या कथा आजच्या स्त्री जीवनातील दाहक विसंगती टिपणाऱ्या असल्याने त्या लक्षात राहतात. मालतीबाई संस्कृत घेऊन पहिल्या वर्गात एम. ए. झाल्या पण लग्नानंतर चाकोरीतल्या स्त्रीच्याच आई, पत्नी भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या. माधवरावांच्या कारखान्याची भरभराट होण्यासाठी बड्या माणसांना खुश ठेवायला हवं! मग पाहुण्यांना आवडणारी पुरणपोळी बरोबर अकरा वाजता तयार हवी असं फर्मानं बायकोकडे सुटतं. नोकरचाकर वेळेवर हजर नाहीत, मुलाचे बालहट्ट वगैरे अडचणी पार होऊनही पाहुणे खुश होतात. पैसा हेच सर्वस्व मानणारा पुरुष आणि हवी-नकोशी कर्तव्ये पार पाडताना उच्चशिक्षित, संवेदनशील स्त्रीच्या मनाची होणारी बेफिकीर कुचंबणा हे सर्व हाताळतानाच पार्वतीबाई, सखुबाई अशा कष्टकरी स्त्रियांची आयुष्येही थोड्याफार फरकाने मालतीबार्इंपेक्षा वेगळी नाहीत. हे खांडेकरांनी कौशल्याने चित्रित केले आहे. ‘मुलाखत’ या कथेला आंतरराष्ट्रीय महिला वर्षाची पार्श्वभूमी असून ही कथा खांडेकरांनी टिकात्मक अंगाने विकसित केली आहे. दैनिक ‘सर्वोदय’च्या संपादकांनी यशस्वी स्त्रियांच्या मुलाखती घेण्याची योजना आखून पिंपळगावातील साखर कारखान्याच्या एका संचालकाच्या पत्नी यशोगाथा शब्दांकित करण्यासाठी एका नवख्या तरुण वार्ताहराची निवड केली. हा तथाकथित प्रकार आटोपला. वार्ताहराने परतीच्या सुरू केलेल्या प्रवासात स्वत:च्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संघर्षाशी दोन हात करणारी शिक्षिका तसेच लिंबोळ्यांवर चरितार्थ चालवणारी म्हातारी त्याला भेटते. त्याच वेळी दोन भिन्न प्रवाहांतील स्त्री जीवनातील विसंगतीची भीषण जाणीव आल्याला होते. ‘पोकळी’ ही अशीच स्त्रीजीवनातील तरल भावुकता टिपणारी कथा. कथानायिका माई या आडगावातील एका शाळेतल्या मुख्याध्यापिका. अनेक विद्यार्थीनींना घडविताना त्या कृतार्थ आयुष्य जगल्या. आपल्या ध्येयपूर्तीसाठी अविवाहित राहिल्या. निवृत्त होण्याचा, सत्कार होण्याचा दिवस उजाडतो. त्यावेळी सुखद गतस्मृतीत त्या जश रमतात तशा त्यांच्या भळभळत्या, उरी जपलेल्या जखमाही उबदार लागतात. चाळिशीनंतर हाडामांसाच्या जोडीदाराची भासलेली उणीव, एकटेपणाच्या वेदना त्यांना सैरभैर करत अखेरीस त्या म्हणतात, ‘आम्हा ध्येयवादी माणसांचा आयुष्यभर आटापिटा चालतो तो आपलं कच्चं मडकं पक्क ... हे दाखवण्याचा.’ माई हेही कबूल करतात. आपल्या पूर्वीच्या मोलकरणीच्या नातीला नोकरीच्या मिषाने आता मॅट्रिकपर्यंत शिकायला प्रवृत्त करूनही तिला नोकरी मिळवून देण्यात अयशस्वी ठरलो. मार्इंच्या मनातील भावतरंगांचे सूक्ष्म छटा खांडेकरांनी छायाचित्रकाराच्या कौशल्याने टिपल्या आहेत. मानवी स्वार्थाचे बरेच नमुनेही खांडेकरांच्या या संग्रहात येतात. काका हे स्वातंत्र्यपूर्वकाळ अनुभवलेले सार्वजनिक कार्यकर्ते, मोतीबिंदूंची व्याधी जडलेले पण लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याची हौस शिल्लक असलेले. १९७२ च्या महाराष्ट्रातील दुष्काळात सारंगपूरसारख्या भागात समाजकार्य करताना त्यांच्या उत्साहावरही ‘पाणी पडतं’, पुष्पाताई या ‘समाजकार्यकर्ती’ साही दुष्काळापेक्षा महिला मंडळाची सौंदर्य स्पर्धा व नियोजित साधुपुरष महत्त्वाची असते. पाळलेल्या कुत्रीची राजपुत्राप्रमाणे बडदास्त ठेवणारी ही मंडळी त्याचा मासिक वाढदिवस साजरा करते वगैरे. दुसरीकडे अशिक्षित खेडूत, गरीब लोक मात्र दुष्काळ निधीसाठी आपापल्या परीने हातभार लावतात. आपल्या सेनापतीच्या स्वार्थाचा बळी होऊन कांचनपूरच्या युवराजाला अंधत्व येते व अखेर जंगलात भटकणे नशिबी येते. अशावेळी देवळात मिठ्ठास सूर आळवणाऱ्या कुरूप वासंतीशी त्याचा परिचय होतो. ते ऐकमेकांत परस्परांचा आधार शोधू पाहत असता आणि एके दिवशी प्रसन्न होऊन आदीशक्तीने स्वप्नात येऊन तिला तिची मनोकामना विचारली. तिने आंधळ्या हेमंतला दृष्टिलाभ होण्याची विनंती केली. लगेच तिला आपण आपल्या स्वार्थ न पाहिल्याचा पश्चात्तापही झाला. दृष्टिलाभ होऊन हेमंत मात्र वासंतीकडे पाठ फिरवतो. वासंतीला मात्र ‘दृष्टिलाभ’ होतो. या कथेचे नाव आहे ‘दृष्टिलाभ’. खांडेकरांची घर’ ही कथा विस्थापिताची वेदना सांगते. .... ही रामायणातील प्रसंगावर बेतलेली पत्नीप्रेमाची सुंदर भावकथा आहे. सामान्य माणूस म्हणून जिव्हाळ्याचं अतूट नातं आपल्याला वाचनानंद देतो. खांडेकरांच्या कथा संपादक-प्रकाशकाने जशाच्या तशा छापल्या आहेत का नाही. मुद्रित-शोधनाच्या बऱ्याच चुका पुस्तकात आहेत. खांडेकरांचे लेखन जसेच्या तसे छापले असल्यास हे चुकीचे ठरेल. -उषा रामवा ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL (NASIK) 29-05-2003

    वि. स. खांडेकर यांचा सरत्या सरी हा असंकलित कथांचा अंतिम संग्रह १९७४ ते १९७६ या उत्तर काळातील कथांमध्ये सार्कतिकता, भावुकता, तरलता व जीवनलक्ष्मी वृत्ती दिसून येते. माणुसकीच्या गहिवरांनी ओथंबलेल्या या कथा लेखकाने प्रज्ञाचक्षूंनी न्याहाळत लिहिल्या. कथा ेवळ शब्दसंपन्न असता कामा नये, तर ती संवेदनगर्भ हवी याची प्रचीती आल्यानंतर लिहिलेल्या या कथा आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more