* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SANHAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668575
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :UMESH KADAM COMBO SET- 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
N/A
जर्मनीमध्ये दुसर्‍या महायुद्धादरम्यान लक्षावधी निरपराध ’ज्यू’ वंशाच्या लोकांचा आणि युद्ध कैद्यांचा अनन्वित छळ केला गेला. त्यापैकी बहुतांशी लोकांची हत्या करण्यात आली. ’ज्यू’ वंशाच्या या लोकांना वेगवेगळ्या छळछावण्यांमध्ये ठेवले जात असे. या छळछावण्यांपैकी एक ’ऑशवित्झ.’ मृत्यूचे माहेरघर अशी ओळख असणारे ’ऑशवित्झ’ आज स्मारक व संग्रहालय म्हणून पोलंड येथे जतन केले आहे. हिटलरचा उजवा हात असणारा क्रूरकर्मा ’रुडॉल्फ’ राईकमन हा ’ऑशवित्झ’ या छळछावणीचा प्रमुख हा या छळछावण्यांमध्ये युद्धकैदी जखमी आणि ज्यू यांची वाढणारी संख्या मोठी समस्या होती. अनेक ’अमानुष’ मार्गांचा अवलंब करूनही हे मार्ग तितकेसे पुरे पडत नव्हते. त्यावेळी ’राईकमन’ने या युद्धकैद्यांना आणि ज्यू लोकांना मोठ्या संख्येने आणि कमी वेळात मारण्यासाठी गॅसचेंबर्स तयार करवले. छळछावण्यात आलेल्या युद्धातून बचावलेल्या ज्यू लोकांना आणि युद्धकैद्यांना सुखी संपन्न जीवनाचे स्वप्न दाखवणारे भाषण राईकमन करीत असे. त्यांच्या आशा पल्लवित केल्यानंतर त्यांची रवानगी गॅसचेंबर्समध्ये केली जात असे. दारे, खिडक्या बंद करून झडपांमधून ’झिकलॉन-बी’ हा अत्यंत विषारी वायू सोडला जात असे. एकावेळी सुमारे पाचशे लोक या गॅसचेंबरमध्ये मावत असत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना ठार करण्याची ही कल्पना राईकमनचीच होती. त्याच्या या योजनेमुळेच तो हिटलरचा ’खास माणूस’ होता. युद्धसमाप्तीनंतर जर्मनीच्या पराभवानंतर राईकमन पळून गेला. आपली ओळख बदलून तो ब्राझिल येथे राहू लागला. इस्त्रायलच्या ’मोसाद’ या गुप्तहेर संघटनेने सापळा रचून त्याची पाळेमुळे खणून काढली. त्याला अत्यंत गुप्ततेने इस्त्रायलला आणले आणि फाशीची शिक्षा दिली.’रुडॉल्फ राईकमन’ या युद्ध गुन्हेगाराला त्याच्या शेवटापर्यंत पोहचवणारी ही उत्कंठावर्धक थरारक कथा वाचकांना शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SANHARSANHAR #संहार #FICTION #MARATHI #UMESHKADAM #उमेशकदम "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    क्रूरकर्मा… दुसरे महायुद्ध मित्रराष्ट्रांनी जिंकल्यानंतर हिटलरच्या आणि त्याच्या सहकारी क्रूरकर्म्यांच्या अमानुष कहाण्या प्रसिद्ध होऊ लागल्या, हिटलरसारख्या हुकूमत गाजविण्याच्या महत्त्वाकांक्षेनं झपाटलेला अन् वंशवादाच्या आंधळेपणात पृथ्वीवरून ज्यूंचं सूळ उच्छेदन करण्याच्या ईर्षेने वेडावलेला असा अनेक पुराव्यानिशी जगापुढे आला. मराठीतही ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’, ‘गुडबाय हिटलर’, ‘वॉर्सा ते हिरोशिमा’ सारखी पुस्तकं आली. तशी ज्यूंच्या आत्मकहाण्यांतूनही त्या अमानुष, काळ्या दिवसांचं चित्रण आलं. उदा. ‘डायरी ऑफ अ‍ॅना फ्रॅंक’, ‘ऑपरेशन डे ब्रेक’, ‘शिंडलर्स लिस्ट’ सारखे चित्रपटही त्यातील क्रौर्य अधोरेखित करतात. हिटलरच्या इच्छेनुसार काम करणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये रूडॉल्फ राईकमन या जर्मन सैन्यातील कर्नलन ‘ऑशविल्झ’ या छळछावणीमध्ये किती अमानुषप्रकारे ज्यूचं हत्याकांड केलं आणि हिटलरची मर्जी संपादली त्याचं वर्णन रक्त गोठविणार आहे. ज्यूंनी ‘इस्त्रायल’ची स्थापना केल्यावर त्यांच्या ‘मोसाद’ या गुप्तहेर संघटनेतील एका हुशार अन् कर्तबगार अधिकाऱ्यानं राईकमनचा किती कल्पकतेनं शोध घेतला आणि त्याला त्याच्या अतिअमानुश कर्माची शिक्षा दिली. याचा अत्यंत मनोवेधक आलेख उमेश कदम यांनी त्यांच्या ‘संहार’ या पुस्तकात काढला आहे. ज्यूचं हत्याकांड गॅसचेंबर्समध्ये करण्यामागे याच राईकमनचा मेंदू होता. त्याचं ज्ञान त्यानं विधायक कार्याऐवजी विध्वंसक आणि माणुसकीला काळिमा आणणाऱ्या कामासाठी वापरलं. जर्मनी युद्धात वरचढ होती तोपर्यंत राईकमनची कृष्णकृत्यं बिनबोभाट सुरू होती. पण जर्मनीचा पाडाव होऊ लागताच आणि मित्रराष्ट्राच्या सैन्याने ‘ऑशवित्झ’ला वेढा घालताच राईकमन शिताफीने पसार झाला. अन् लपत-छपत तो दुसऱ्या राष्ट्रात, आपली ओळख न देता दुसऱ्या नावानं एकाकी जीवन जगू लागला. पण ‘उपरवाले के पास देर है, अंधेर नही’ या उक्तीनुसार राईकमन केलेल्या अत्याचार गुन्ह्यांची शिक्षा त्याला याच जन्मात मिळाली राईकमनची शोधमोहीम आणि त्याला झालेलं शासन इथपर्यंतचा भाग ‘संहार’मध्ये येतो. उमेश कदम याचं हे पहिलच पुस्तक, पण हा सारा कथाभाग अत्यंत ओघवता, उत्कंठापूर्ण झाला आहे. चित्रपटाची पटकथा लिहावी, तसं ‘संहार’च लेखन, मांडणी झाली आहे. हे लिखाण मूळ इंग्रजीतून करून त्याचा अनुवाद मराठीत केल्यासारखे संवाद या कादंबरीत अधून-मधून डोकावतात तरीही प्रसंग उभारण्याचे त्यांचं कसब अथवा व्यक्तिमत्व फुलविण्यातील त्यांची शैली लक्षणीय यातील सारी पात्रं वाचकासमोर नेमकेपणा स्पष्ट होतात. उमेश कदम यांच्या लेखनाचेच यश आहे. ‘संहार’ हे दुसऱ्या महायुद्धातील एका क्रूरकर्म्यांचं अंगावर शहारे आणणारा कथानक माणुसकीला काळिमा फासणारा मानवजातीवर, माणुसकीवर प्रेम-श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक संवेदनशील वाचकानं ‘संहार’ असणाऱ्या प्रत्येक संवेदनशील वाचकांना ‘संहार’ अवश्य वाचायला हवं. चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ कल्पक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more