* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SAMUDRANTIKE
  • Availability : Available
  • Translators : ANJANI NARAVANE
  • ISBN : 9788171616466
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 1997
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 140
  • Language : Translated From GUJRATI to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :DHRUV BHATT COMBO SET - 7 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT IS A FICTIONAL WORK BY DHRUV BHATT, IN THE FORM OF MEMOIRS OF A YOUNG CIVIL ENGINEER DEPUTED TO SURVEY AN ARID COASTAL PART OF SAURASHTRA. THE NOVEL HAS AT ITS CENTRE THE QUEST FOR A FINE BALANCE BETWEEN A TRADITIONAL, NON-SCIENTIFIC, FAITH-DRIVEN SOCIETY AND CYNICAL, PROFIT DRIVEN ECONOMY. WEAVING TOGETHER THE CHARACTERS, REAL AND IMAGINARY, EVENTS AND LEGENDS FROM THE FOLKLORE OF THE REGION, DHRUV BHATT HAS IMPARTED HIS OWN SENSITIVITY TO THE LEADING CHARACTERS AND AT THE SAME TIME NARRATED A GRIPPING STORY.
रात्री त्या शेतकर्‍याच्या कुटुंबात मी राहिलो. खुल्या आकाशाखाली काथ्याच्या खाटेवर पडल्या पडल्या मी विचार करत होतो. दोन-तीन दिवसांपूर्वी तर मी माझ्या परिचित वातावरणात माझ्या आप्तेष्टांबरोबर होतो. आज या अगदी नवख्या जागेची ओळख झाली. एका संध्याकाळच्या या ओळखीत असं काही अनुभवलं जे माझ्या आयुष्याचा न विसरणारा भाग बनून गेलं. छोटी जानकी माझी जणू खूप वर्षांच्या ओळखीची वाटू लागली! उद्या मी इथून पुढे जाईन, पुन्हा कधी
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#SAGARTEERI # DHRUV BHAT# ANJANI NARAVANE# SAMUDRA# BHARATI# KHADAK# SHANKHSHIMPALE# KHADI# KINARA# BANDAR# KHADAK# OHOTI# RETI# KHARAT# NARALI# DARIYA# SAGAR# DIVADANDI# SABUR# NOORABHAI# KRISHNA# SHYAMJI SARPANCH# HADABHATT# BANGALI BABAJI# AVAL
Customer Reviews
  • Rating StarRavindra Ogale

    સમુદ્રાન્તિકે या ध्रुव भट्ट यांच्या मूळ गुजराथी पुस्तकाचा अंजनी नरवणे यांनी केलेला मराठी अनुवाद - `सागरतीरी` - वाचला. त्याबद्दल थोडंसं. भट्ट यांनी विविध पुस्तकांतून गुजरातच्या निरनिराळ्या भागांचं, तिथल्या-तिथल्या समाजजीवनाचं अत्यंत प्रगल्भ दर्शन घवलेलं आहे. तत्त्वमसि, अकूपार या कथा अनुक्रमे नर्मदा खोरं आणि गीर अभयारण्याच्या परिसरात घडतात तर सागरतीरीमध्ये भट्ट आपल्याला सौराष्ट्राच्या दक्षिण किनाऱ्यावर नेतात. त्यांच्या या कादंबरींमध्ये काही समान दुवे आहेत. `सागरतीरी`तही कथानायकाचं नाव शेवटपर्यंत आपल्याला कळत नाही. या निनावीपणामुळे ती कथा प्रथमपुरूषातूनच वाचली जाते आणि vicariously ती कथा आपण आपोआपच जगतो. संपन्न अनुभव म्हणजे काय याचा प्रत्यय या कथा वाचताना येतो. ती कथा तुमची, माझी प्रत्येक वाचणाऱ्याचीच होऊन जाते. भट्टांच्या इतर कथांप्रमाणेच `सागरतीरी`तही ‌निसर्गाप्रति सदैव कृतज्ञता बाळगून, त्यातल्या समस्त जैवविविधतेसह आनंदानं एकत्र जगणाऱ्या, साध्या पण उदात्त, रूढार्थाने आर्थिकदृष्ट्या गरीब पण सुखासमाधानाच्या बाबतीत अतिशय संपन्न राहणीमान असलेल्या लोकांच्या आयुष्याचे फार जवळून आणि सुंदर दर्शन त्यांनी घडवलं आहे. अकूपारची सांसाई, तत्त्वमसिची सुप्रिया आणि सागरतीरीची अवल. मुक्त-निर्बंध, खंबीर, स्वाभिमानी, निःस्वार्थी आणि स्पष्ट विचारांची नायिका हेही भट्ट यांच्या कादंबरींचं लक्षण. अवल अशीच आहे, पुस्तकी शिक्षण थोडंफारच झालेली पण व्यवहार, धर्म, भावना, नैतिकता या साऱ्या गोष्टींची तिला व्यवस्थित जाण आहे. तसं पाहायला गेलं तर जेमतेम सव्वाशे पानांच्या या कथेत अवल मोजक्याच वेळी आपल्याला भेटते पण त्यातही तिचं पात्र लेखकाने इतकं सुबक रेखाटलं आहे की हिला तर आपण नीटच ओळखतो असा भास होत राहतो. त्यांच्या इतर कथांप्रमाणेच `सागरतीरी`तही नायक-नायिकेमध्ये असणारं एक अव्यक्त, गूढ, आदरणीय नातं दिसून येतं. म्हटलं तर ठसठशीतपणे जाणवणारं, नि काही प्रसंगात हळुवारपणे काळजाला हात घालणारं असं. या नात्याचं वर्णन इतकं प्रभावशाली आहे की अवल नि नायकाचा शेवटचा संवाद संपताना, हा अवलचा कथेतला शेवटचा सहभाग आहे हे जाणवत असल्याने हुरहूर लावून जातो. कथेची सुरुवात तिथल्या परिसराप्रमाणे थोडी रूक्ष (कथानायकाच्या त्यापरिसराप्रति सुरूवातीला असणाऱ्या भावनांमुळे कदाचित) भासते. पण जसजसे नायकाचे त्या परिसराशी, तिथल्या लोकांशी बंध जुळत जातात तसा वाचकही अलगद बांधला जातो. आणि हळूहळू चाललेली कथा शेवटच्या वादळाच्या प्रकरणात सुरेख वेग घेते आणि वाचकाला crescendo चा अनुभव होतो. आणि शेवटाला या वादळी अनुभवातून निसर्गाची, तिथल्या लोकांची, त्यांच्या जाणिवांची आणि या सगळ्यांच्या एकसामायिक जगण्याची नायकाला पटलेली ओळख व त्यातून आपणही इथलेच होऊन गेल्याची त्याची भावना अशा समतोलानं कथेचा शेवट करत लेखकाने हा काहीसा Ascending storytelling (which has a rather scholarly name of `Fichtean curve`) परिणाम फार सुंदर साधला आहे. बाकी सबूरिया, सर्वण, किष्ना तांडेल, बेली, मुखिया, हादाभट्ट, बंगालीबाबा आणि मुख्य `अनंतमहाराज` दर्या या लोभस पात्रांना भेटण्याकरता पुस्तक वाचा. सागरतीरी मूळ पुस्तक સમુદ્રાન્તિકે : ध्रुव भट्ट मराठी अनुवाद: अंजनी नरवणे जाता जाता: ध्रुव भट्ट हे गुजराथी साहित्याचा शाश्वत, पथदर्शी ध्रुवतारा आहेत. त्यांची तत्त्वमसि, अकूपार, अतरापि आणि आता हे सागरतीरी ही सगळी मराठीत अनुवादित पुस्तके वाचल्यामुळे त्यांचं इतर साहित्य वाचण्याची प्रबळ इच्छा होते आहे. पण इतर पुस्तके तिमिरपंथी, कर्णलोक, अग्निकन्या इ. मराठीत अनुवादित सापडत नाहीत. कुणाला कल्पना असल्यास कळवावे. अन्यथा गुजराथीतच वाचावी लागतील. ...Read more

  • Rating StarMANISH UGALE

    इंजिनिअर असलेल्या नायकाचं बोट पकडून आपण सौराष्ट्राच्या प्रवासाला निघतो. सागर किनाऱ्यावरच्या एका अत्यंत विरळ लोकवस्तीच्या मागासलेल्या प्रदेशात नायकाची नियुक्ती झालेली आहे. रासायनिक कारखाने उभे करण्यासाठी सरकारी जमिनींची मोजणी करायला तो आलाय. दूरवरच्याएका गजबजलेल्या शहरातून एकदम या वैराण प्रदेशात येऊन पडल्यावर तो काहीसा निराश आणि अस्वस्थ झाला आहे. या भूमीत पाऊल टाकल्यापासून जसा अभावग्रस्त जीवनाला तो सामोरा जातो आहे, त्याच जोडीला त्याला भेटत आहेत ती इथली अनोळखी माणसावर सुद्धा जीवापाड प्रेम करणारी माणसं. ज्यांच्या घरात खायला दाना नाही, अंगावर पुरेसे कपडे नाहीत, आरोग्याच्या सोयी तर सोडाच पण होड्या, गाढवं आणि एखादा घोडा याशिवाय वाहतुकीची साधनं नाहीत अशी वंचित माणसं इतकी आनंदी आणि उदार मनाची कशी? हे पाहून नायक चकित होतो. नायकाला रहाण्यासाठी आणि ऑफिस थाटण्यासाठी एक सरकारी हवेली मिळाली आहे. समुद्रकिनारी इतक्या उजाड परिसरात उभ्या असलेल्या या एकमेव वास्तूच्या पोटात अनेक रहस्यं दडलेली आहेत. हवेलीवर साहेबाला (नायकाला) मदत करण्यासाठी काही स्थानिक स्टाफ नेमलेला आहे. अफाट मेहनत करण्याची क्षमता असलेला नोकर सबूर, या वैराण प्रदेशात निगुतीनं वाढवलेल्या बाभळींवर आणि पक्ष्यांवर प्रेम करणारा जंगलअधिकारी नूरभाई, दर्यादेव येऊन राहतो त्या एका भेंसल्यावर की जिथे कोणीही जायची हिंमत करत नाही अशा ठिकाणी जाऊन येणारा शूर तांडेल किष्ना अशी काही इंटरेस्टिंग पात्रं साहेबाला या प्रदेशात भेटतात. सगळ्यात रोचक पात्रं आहेत ती म्हणजे बंगालीबाबा आणि अवल. किड्यामुंग्यांपासून समुद्रासोबत सुद्धा बोलू शकणारा बंगालीबाबा हा एक गूढ मनुष्य आहे. निसर्गाची भाषा त्याला अवगत आहे. अवल ही स्वाभिमानी आणि तत्त्वनिष्ठ स्त्री आहे, ती कोण आहे, हवेलीशी तिचा काय संबंध आहे हे जाणून घेणं फार रंजक आहे. स्थानिक जीवनाशी जुळवून घेताना साहेब हळूहळू इथलाच एक होऊन जातो. या भूमीवर, समुद्रावर आणि माणसांवर त्याचा जीव जडतो. ही भावनाशीलता त्याला `नेमून दिलेलं काम करू नकोस` असा आंतरिक साद घालू लागते. निसर्ग आणि मनुष्यजीवन यांचा सहसंबंध कथानकातून हळुवारपणे उलगडताना लेखकाने केलेलं सुरेख चिंतन या कादंबरीतून आढळतं. हे केवळ कथेसाठी कथा सांगणं नाही. घटनांतल्या `मधल्या` जागांतून जीवनाकडे बघण्याचा लेखकाचा व्यापक दृष्टिकोन आपल्याला दिसतो. काम पुढे नेऊ की राजीनामा देऊ या द्वंद्वात सापडलेला साहेब पुढे काय करतो? समुद्री वादळाबद्दल बंगालीबाबाने वर्तवलेल्या भाकिताचं पुढे काय होतं? साहेबाची गूढ भेंसल्यावर जाण्याची इच्छा पूर्ण होते का? कादंबरी वाचताना ही सारी रहस्ये उलगडत जातात. बुद्धी आणि मनगटाच्या जोरावर भव्य निर्मिती करण्याची महत्त्वाकांक्षा माणूसप्राणी बाळगून असतो. पण सर्वव्यापी, सर्वपोषी आणि सर्वनाशी क्षमता बाळगून असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर, त्याला समजून घेतल्यावर माणसाच्या वृत्तीत, विचारांत कसा बदल होत जातो याची ही गोष्ट आहे. थोर गुजराती लेखक ध्रुव भट्ट यांच्या `समुद्रान्तिके` या गुजराती साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीचा अनुवाद अंजली नरवणे यांनी `सागरतीरी` नावाने केला आहे. साहित्य अकादमी मिळण्यासारखं या कादंबरीत काय विशेष आहे हे ती वाचायला घेतल्यावर लगेचच लक्षात येतं. ध्रुव भट्ट हे गुजरातीतले फार महत्त्वाचे लेखक आहेत. कथासूत्राला व्यक्तीकडून समष्टीकडे नेण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. कथानक `प्रेडिक्टेबल` नसणं हे त्यांच्या लेखनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. आणखी गंमत तर यात आहे की ध्रुव भट्टांच्या कादंबरीतील नायकाचं नाव आपल्याला शेवटपर्यंत समजत नाही आणि तरीही तो आपल्याला आपल्यातलाच एक वाटत राहतो. आपल्याला माणूस म्हणून समृद्ध करणारी आणि जीवनाची भव्यता दाखवणारी ही कादंबरी आवर्जून वाचावी अशीच आहे. - मनीषा उगले (एका सन्मित्राने ध्रुव भट्ट यांच्या पुस्तकांची ओळख करून दिली, त्याच्या ऋणात रहायला मला आवडेल.) ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 20-07-1997

    अनवट वाटेवरचा अनुभव… गुजराती लेखक ध्रुव भट्ट यांची ‘समुद्रान्तिके’ ही लेखाकृती रुढार्थाने कुठल्याच साहित्यप्रकारात न मोडणारी. कथेचा एकजिनसी अनुभवतीत नाही आणि कादंबरीचं बहुआयामित्वही तीत आढळत नाही, त्यामुळेच असेल बहुधा सोय म्हणून तिला ‘कादंबरी’ प्रकरात समाविष्ट केलं गेलं आहे. ‘सागरतीरी’ या नावाने अंजली नरवणे यांनी तिचा मराठी अनुवाद केला आहे. ‘सागरतीरी’त सलग असं कथानक नाही. आहेत ते विलक्षण अनुभव आणि विविध व्यक्तिरेखांचे तुकडे ! ज्यांची कधी सुसंगत वाटणारी, पण बरीचशी विस्कळीत अशी सांधेजोड करण्यात आली आहे. इंजिनियरिंगची पदवी पदरात असूनही दोन वर्षे बेकारीत काढलेल्या एका तरुण, संवेदनशील इंजिनियरच्या वाट्याला आलेल्या अकल्पित अनुभवांचं हे संचित आहे. बेकारीने संत्रस्त झालेल्या या तरुणाला एके दिवशी अनपेक्षितपणे एका सरकारी प्रकल्पात काम मिळते. लाभ-हानीचा यत्किंचितही विचार न करता तो ही नोकरी स्वीकारतो आणि त्या बिंदूपासून त्याच्या आयुष्यातील एका अज्ञाताच्या प्रवासाची सुरुवात होते. सौराष्ट्राच्या किनाऱ्यावरील विरळ लोकवस्ती असलेल्या अत्यंत मागास प्रदेशात सरकारला एक रासायनिक कारखाना उभारावयाचा असतो त्यावर प्रकल्प अभियंता म्हणून त्यांची नेमणूक होते. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी करुन ती संपादन करणं आणि प्रकल्प अहवाल तयार करणं हे त्याचं काम असतं. शहरी संस्कृती, सोयी-सुविधांपासून शेकडो मैल दूर आणि पदोपदी येणाऱ्या असंख्य अडचणींचा सामना करत त्याला ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. याची जाणीव तिथे रुजू होण्यापूर्वीच त्याला होते. प्रारंभी तर, या अशा सर्व तऱ्हेच्या अभावांशी दोन हात करत आपण आपलं विहित काम कसं पुरं करणार, असा प्रश्न त्याला पडतो, त्यापेक्षा ‘नको हे काम’ म्हणून आपल्या जीवाभावाच्या माणसांत परतलेलं काय वाईट, असा टोकाचा विचारही क्षणभर त्याच्या मनात आपली बेकारीतील दोन वर्षे आठवतात आणि भरकटणारं त्याचं मन ताळ्यावर येतं. शहरी कोलाहलापासून दूर शांत निसर्गात, कोणतीही तक्रार न करता जगणारी तिथली आनंदी वृत्तीची माणसं पाहिल्यावर तर त्याचं कुतूहल भरलं मन मागे न फिरता पुढं पुढंच जायला त्याला भाग पाडतं. कळत-नकळत तोही त्यांच्यात गुंतत जातो. नोकरीवर रुजू होण्याचा प्रवासातच त्याला इथल्या प्रदेशाची, साध्या - सरळ जीवनपद्धतीची, वैचित्र्याचा परिचय देणाऱ्या माणसांची, त्यांच्या निरपेक्ष प्रेमाची ओळख होते. नंतर तीन वर्षांच्या तिथल्या वास्तव्यात त्याला माणसांचे असंख्य नमुने पाहायला, अनुभवायला मिळतात. कोणत्याही पाशांत स्वत:ला अडकवून न घेता काहीसं दिशाहीन आयुष्य जगणाऱ्या सबूरची एकमात्र इच्छा आहे ती - स्वत:च्या मालकीच्या (लहानशा का होईना) जमिनीच्या तुकड्याची ! पण तोही त्याच्या नशिबी नाही. या एकाच जीवनध्यासाने पछाडलेला सबूर कथनायकाकडून मिळालेल्या नापीक, ओसाड जमिनीच्या तुकड्यानेही कृतार्थ होतो. तीच गोष्ट नूरभार्इंची. जंगल खात्यातला हा माणूस ! सर्वार्थाने पशु-पक्ष्यांच्या जगातच ते वावरतात. त्यांच्याच भाषेत बोलतात. बंगाली बाबाजी ही आणखी एक वल्ली. निसर्गाशी त्यांची अतूट नाळ जोडली गेली आहे. त्यांच्या फटकळपणातूनही माणुसकीचा निर्मळ झराच वाहात असतो. बेटावरचा धाडशी खलाशी किष्ना हे तर अजबच रसायन. ‘भीती, अशक्य’ असले फालतू शब्द त्याच्या शब्दकोशात नाहीतच. तुफानाला सामोरं जातानाही त्याचं अप्रूप त्याला वाटत नाही. तो त्याच्या जगण्याचाच एक भाग आहे जणू ! इथले शामजी सरपंच हे या मातीतच घडलेलं एक धीरोदात्त व्यक्तिमत्व. इथल्या माणसांचं ते खरंखुरं प्रतिनिधित्व करतात. गावात सरपंच म्हणून प्रतिष्ठित जीवन जगणारे शामजी उन्हाळ्यात मात्र इतरांबरोबर मोलमजुरीसाठी वणवण भटकतात, त्यात त्यांना कोणताही कमीपणा वाटत नाही. ‘सागरतीरी’ त एक व्यक्ती मात्र प्रत्यक्ष अस्तित्वात नसूनही सर्वव्यापी होऊन राहिलीय. ती म्हणजे हादा भट्ट! संपूर्ण कथानकभर हादा भट्टांबद्दल जाणून घ्यायला आपण उत्सुक राहतो. तीच गोष्ट अवलची! या लोकविलक्षण स्त्रीचं वागणं-बोलणं-व्यवहार वाचकाचं कुतूहल जागृत करतं. ती नेमकी कोण, कुठली या आडगावात ती कशी रुजली, तिच्या या अलिप्त जगण्याचा मतलब काय, अशा असंख्य प्रश्नांचं मोहोळ वाचकाच्या मनात उठतं, त्याची उत्तरं जरी कादंबरीच्या शेवटी मिळत असली तरी ती मिळेपर्यंत उगीचच बेचैन व्हायला होतं. निसर्गाशी एकरुप झालेल्या या निरनिराळया मुशीतील वाटाव्यात अशा पण अंतर्यामी निर्झरासारख्या निर्मळ व्यक्तींचा कथानायकाला परिचय होत जातो. त्यांच्याशी वेळोवेळी झालेल्या संवाद-विसंवादातून आपणही हळुहळू अंतर्बाह्य बदलत चाललो आहोत, याची जाणीव त्याला होते. ‘माणूस’या शब्दाला अर्थ देणाऱ्या खऱ्याखुऱ्या माणसांना भौतिक प्रगतीच्या वरवंटयाखाली आपण उद्वस्त करायचं का, हा प्रश्न त्याचा पिच्छा पुरवतो. कामातलं लक्ष उडतं. मन द्विधा होतं. बंगाली बाबा त्याची मन:स्थिती ओळखतात. त्याचं वस्तुस्थितीकडे लक्ष वेधतात. त्यांच्याशी बोलल्यावर त्याच्या मनात घोंघावणारं वादळ शांत होतं आणि निश्चिंत होऊन तो आपल्या कामाला लागतो. चाकोरीबद्ध कथानकाची अपेक्षा ठेवून ‘सागरतीरी’ हाती घेणाऱ्यांच्या पदरी निराशाच येईल. कारण ‘सागरतीरी’ हा एक अनवट वाटेवरचा अनुभव आहे. कथानकच नसल्याने यातल्या व्यक्तिरेखाही अचानक येतात आणि गायब होतात. या व्यक्तिरेखा स्वतंत्रपणे मात्र मनावर ठसतात. अपरिचित प्रदेश, तिथली लोकसंस्कृती आणि विलक्षण माणसं यांचं दर्शन घडवणारी ‘सागरतीरी’ कोणताही पूर्वग्रह मनी न बाळगता वाचल्यास वाचकाला अनोख्या जगात निश्चितच नेईल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more