* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SAMBHAJI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666519
  • Edition : 20
  • Publishing Year : NOVEMBER 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 864
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Available in Combos :VISHWAS PATIL COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SAMBHAJI, THE YOUNG KING, THE SECOND MARATHA CHHATRAPATI WHO SUCCEEDED THE THRONE AFTER HIS FATHER THE GREAT SHIVAJI MAHARAJ, CONTINUOUSLY FOUGHT THE MUGHALS FOR EIGHT CONSECUTIVE YEARS, BUT DID NOT LET THE MOGHUL ARMY CAPTURE EITHER ANY OF THE MARATHA FORTS OR ANY OF THE SHIPS. HE OFFERED HIMSELF BUT DID NOT BOW DOWN IN FRONT OF THE MUGHAL EMPEROR; HE DIED A HERO`S DEATH AT A VERY YOUNG AGE, WHEN HE WAS JUST 32 YEARS OLD. FOR THE PAST 325 YEARS, SAMBHAJI WAS OFTEN PAINTED IN BLACK. HE HAD A POETIC MIND, HE WAS A VERY INTELLIGENT PERSON, HE WAS CONCERNED ABOUT HIS PEOPLE, HE WAS BRAVE, HE WAS A GREAT THINKER, BUT ALL HIS GOOD QUALITIES WERE OVER-LOOKED; HIS PERSONALITY WAS ALWAYS LOOKED UPON WITH SUSPICION. VISHWAS PATIL, THE MOST GIFTED AUTHOR TODAY, TELLS US MORE ABOUT SAMBHAJI RAJE, AS HE HAS SEEN HIM THROUGH THE REFERENCES IN HISTORY, AS HE HAS FOUND HIM IN THE VERY VALUABLE YET IGNORED DOCUMENTS, AS HE HAS HEARD HIM IN THE HILLY REGIONS OF SAHYADRI MOUNTAIN RANGES, AMONG THE CREEKS OF THE ARABIAN SEA. SAMBHAJI, SON OF SHIVAJI MAHARAJ, A NOVEL PERSONALITY WITH HIS EQUALLY IMPRESSIVE, BREATH-TAKING, SPECTACULAR, STORMY YET VERY TRUE STORY.
औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला विंÂवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी,कवी-राज्यकत्र्याची आणि पराक्रमी सेनानीची गाथासंशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती!आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांनासह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यांनी,सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांचीचित्तथरारक, वादळी, पण वास्तव गाथा!!
* सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार २००५ * कवी माधव पुरस्कार २००६ * अक्षरगंध पुरस्कार २००६

No Records Found
No Records Found
Keywords
#YESUBAI #SHIVAJI #PUTALABAI #RAJARAMSAHEB #SOIRABAI #EKOJI #DURGABAI #RANUBAI #HARJIRAJEMAHADIK #AMBIKABAI #GANOJISHIRKE #RAJKUNWAR #MAHADJINIMBALKAR# SAKAVRABAI #PILAJISHIRKE #HIROJIFARJAND #HAMBIRAOMOHITE #BALAJIAAWAJI #KHANDOJIBALLAL #MOROPANTPINGALE #KESOTRIMALPINGALE #NILOPANTPINGALE #KAVIKALASH #PRALHADNIRAJI #ANNAJIDATTO #SOMAJIDATTO #KAZIHAIDER #KONDAJIFARJAND #YESAJIGAMBHIRRAO #YESAJIKANK #KRUSHNAJIKANK #JYOTYAJIKESARKAR #DAULATKHAN #DADJIPRABHUDESHPANDE #AURANGZEB #DILERKHAN #SHAHABUDIKHAN #28TH NOV #SAMBHAJI(1.SAHAKAR MAHARSHI SHANKARRAO MOHITE PATIL PURSKAR 2005 2.KAVI MADHAV PURSKAR 2006 3.AKSHARGANDH PURSKAR 2006 ) #NOT GONE WITH THE WIND #BANDA RUPAYA #KRANTISURYA #NAGKESHAR #VISHWASPATIL #संभाजी(१.सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील २.कवी माधव पुरस्कार २००६ ३.अक्षरगंध पुरस्कार २००६) #नॉट गॉन विथ द विंड #बंदा रुपया #क्रांतिसूर्य #नागकेशर #विश्वासपाटील
Customer Reviews
  • Rating Starनवनाथ इंगोले

    पानिपत वाचून झाली होती. श्री. विश्वास पाटील लिखित संभाजी कादंबरी त्याच तोडीची असेल या हेतूने थोड्या दिवसांनी वाचायला घेतली. काय ते लिखाण... अद्भुत.. अद्वितीय.. अगदी वाचकाच्या बोटाला धरून ते त्या काळात ढकलून देतात. सर्व इतिहास जवळून पाहिला. फंद, फिूरी काय असते, स्वराज्य प्रेमाला काय म्हणतात, आणि, बेडर, मृत्यूला हसत हसत कसा धरायचा. भाऊबंद, पाहुणे रावळे, त्यांच्या आत्मघातकी चाली.. अतिशय भयावह.. एकदा वाचाच.. संभाजी : लेखक, विश्वास पाटील. माझ्या कडून टीप : ज्यांना ह्रदयाचा त्रास आहे किंवा ज्यांचं मन कमकुवत आहे त्यांनी हे पुस्तक हातातही धरू नये... ...Read more

  • Rating Starनवनाथ इंगोले

    पानिपत वाचून झाली होती. श्री. विश्वास पाटील लिखित संभाजी कादंबरी त्याच तोडीची असेल या हेतूने थोड्या दिवसांनी वाचायला घेतली. काय ते लिखाण... अद्भुत.. अद्वितीय.. अगदी वाचकाच्या बोटाला धरून ते त्या काळात ढकलून देतात. सर्व इतिहास जवळून पाहिला. फंद, फिूरी काय असते, स्वराज्य प्रेमाला काय म्हणतात, आणि, बेडर, मृत्यूला हसत हसत कसा धरायचा. भाऊबंद, पाहुणे रावळे, त्यांच्या आत्मघातकी चाली.. अतिशय भयावह.. एकदा वाचाच.. संभाजी : लेखक, विश्वास पाटील. माझ्या कडून टीप : ज्यांना ह्रदयाचा त्रास आहे किंवा ज्यांचं मन कमकुवत आहे त्यांनी हे पुस्तक हातातही धरू नये... ...Read more

  • Rating StarSuresh Phadnis

    विश्वास पाटील यांची छ्त्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी.मेहता publication.खूप छान कादंबरी,जणू इतिहासच समोर उभा राहतो.आजच वाचून संपली.फितुरी कशी असते याचे जवळचे उदाहरण.

  • Rating StarJyoti Kshirsagar

    विश्वास पाटील यांची *संभाजी*कादंबरी बऱ्याच दिवसापासून घरात होती ती वाचायची होती पण एवढी मोठी साडेआठशे पानांची कादंबरी केव्हा वाचून होईल असे वाटत होते, पण एक दिवस सुरुवात तर करू असे म्हणून ती हातात घेतली आणि वाचतच गेले, विश्वास पाटलांची ती भाषाशैली आण संभाजी राजांविषयी ते वर्णन भारावून गेल्यासारखे वाचन चालू झाले, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राज्यांच्या जाज्वल्य इतिहासाने मन भारावून गेले‌. शिवरायांनंतर सलग नऊ वर्ष औरंगजेबाच्या पाच लाख सैन्याविरुद्ध संभाजीराजे कसे लढले, पातशहा औरंगजेबाला कसे झुलवत ठेवले. रामशेज किल्ला घ्यायला औरंगजेबाच्या सैन्याला साडेसहा वर्षे झुंजावे लागले, संभाजी राजांपुढे औरंगजेब अक्षरश: हतबल झालेला होता. किती प्रयत्न केले परंतु शिवाचा हा छावा औरंगजेबाच्या हाती लागत नव्हता. परंतु घात झाला आणि फितुरीने हा छावा औरंगजेबाच्या हाती लागला संभाजी राजे पकडले गेले. पकडल्यानंतर संभाजी राजांची आणि कवी कलश यांची केलेली विटंबना वाचून मन सुन्न झाले. केवळ स्वराज्यासाठी आणि धर्म रक्षणासाठी संभाजीराजांनी औरंगजेबाचे हाल सहन करून मृत्यूला कवटाळले. परंतु त्याच्या पुढे झुकले नाही,अवघ्या 32 वर्षाच्या एका छत्रपतीला औरंगजेबाने हाल हाल करून मारले. स्वराज्यासाठी जगावे हे शिवरायांनी शिकवले तर आपल्या मातीसाठी कसे मरावे हे शंभूराजांनी शिकवले. संभाजीराजांबद्दल आदर होताच परंतु वाचनानंतर तो कैकपटीने वाढला. स्वराज्याचे धाकले धनी, दुसरे छत्रपती संभाजी राजे यांना मानाचा मुजरा.🙏🙏 ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more