* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ROOPMAHAL
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666144
  • Edition : 9
  • Publishing Year : JANUARY 1952
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 104
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS COLLECTION INCLUDES THE SHORT STORIES BY RANJIT DESAI WHICH HE PENNED DOWN DURING HIS EARLY YEARS AS A WRITER. THESE STORIES WERE PUBLISHED IN STANDARD MAGAZINES LIKE MAUJ, SATYAKATHA, KIRLOSKAR, ABHIRUCHI, JANWANI ETC. RANJIT DESAI REVEALS HIS SECRET ABOUT THESE SHORT STORIES, WHATEVER COMES TO MY MIND TAKES FROM OF STORY. WHATEVER I WRITE IS WRITTEN WITH ALMOST HONESTY. THERE MIGHT BE MANY DRAWBACKS, MANY FAULTS, MANY A TIMES I MIGHT HAVE GIVEN MORE WEIGHTAGE TO RURAL LIFE THAN THAT COMPARED TO URBAN LIFE, BUT NO WHERE I HAVE BEEN DECEITFUL. I HAVE ONLY ONE REQUEST TO THE READERS, IF EVER YOU DECIDE TO CHECK THE TRUENESS OF MY STORIES, REMEMBER MY HONEST AND FRANKNESS.
रणजित देसाई यांनी अगदी आरंभीच्या काळात ज्या काही लघुकथा लिहिल्या, त्यांतील निवडक कथा या संग्रहात संग्रहित केल्या आहेत. या कथा ‘मौज’, ‘सत्यकथा’, ‘प्रसाद’, ‘किर्लोस्कर’, ‘अभिरुचि’ व ‘जनवाणी’ अशा दर्जेदार नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. या कथांविषयी लिहिताना स्वत: रणजित देसाई म्हणतात : ‘.... एक ‘गुजगोष्ट’ सांगावीशी वाटते, की मी जे काही लिहिले आहे, ते अगदी मनापासून लिहिले आहे. त्यात उणिवा असतील, दोष असतील, विस्तार कमीअधिक असेल, नागरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवनाचेच जास्त चित्रण असेल; परंतु त्यात अप्रामाणिकपणा मात्र खास नाही. माझ्या कथांना कसोटी लावलीच, तर ती ‘प्रांजलपणा’चीच लावावी, एवढेच ‘पसायदान’ मी वाचकांपुढे मागतो.’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA# SANCHIT# BHAIRAV# NANDA# MAIDAN# SEEMOLANGHAN# ROOPMAHAL# CHEI AGAD CHEI# ABAJI PATIL# DHANGARACHI JAAT# JEEVA-SHIVA# #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे – #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित# नाटक # भैरव# नंदा# मैदान# सीमोल्लंघन# रुपमहाल# चै आगद चै# आबाजी पाटील# धनगराची जात# जीवा-शिवा#
Customer Reviews
  • Rating StarAstana Pathan

    vachale he pustak.chhan aahe.

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    रणजित देसार्इंच्या कसदार ग्रामीणकथा… शालेय जीवनातच ‘भैरव’या कथेने लेखनाची सुरुवात केलेल्या रणजित देसार्इंचा पहिला कथासंग्रह १९५२मध्ये ‘रूपमहाल’द्वारे प्रकाशित झाला. त्यांच्या बहुतांश कथा ग्रामीण समाजजीवनावर आधारित असून काही ऐतिहासिक, प्राणिविषयक, संीतविषयक आणि विनोदी कथा त्यांनी लिहिल्या आहेत. ‘रूपमहाल’या पहिल्या कथासंग्रहात नऊ कथा असून त्यातील आठ ग्रामीण जीवनावरील तर एक कथा ऐतिहासिक स्वरूपाची आहे. विशेष म्हणजे ‘रूपमहाल’ ही एकच कथा ऐतिहासिक असूनही तिचे शिर्षक लेखकाने कथासंग्रहाला दिलेले आहे. यावरून ‘रूपमहाल’चे महत्त्व लक्षात येते. ग्रामीण समाजजीवन हा या कथासंग्रहाचा गाभा असून बैलांच्या शर्यती, हत्तीची साठमारी, कुस्ती, शिकार इत्यादी विषय त्यांनी हाताळले आहेत. प्रत्येक कथेत एका संघर्षाची योजना करून त्याभोवती पोषक अशा घटनांची व ग्रामीण वातावरणाची पाश्र्वभूमी त्यांनी कलात्मकरित्या रंगविली आहे. म्हणूनच या सर्व कथा वाचकांच्या मनाची पकड घेतात. भोवतालच्या रूक्ष व कृत्रिम वातावरणातून काहीशा अद्भूतरम्य सृष्टीत घेऊन जातात. नाट्यपूर्ण संघर्ष रंगवताना रणजित देसाईच्या भाषेच्या सामथ्र्याची आणि सूक्ष्म अवलोकनशक्तीची प्रचिती येते. मग ते ‘भैरव’मधील बैलांच्या शर्यतीचे रोमहर्षक वर्णन असो, ‘नंदा’मधील जीवघेण्या शिकारीचे वर्णन असो, ‘मैदान’मधील भैरू आणि शिद्दा यांच्यातील अटीतटीच्या निकाली कुस्त्यांचे वर्णन असो किंवा ‘चै आनंद चै’ या कथेतील साठमारीचे वर्णन असो; ही सर्व वर्णने वाचत असताना ते ते प्रसंग परिणामकारक रीतीने वाचकांच्या नजरेसमोर उभे करण्याचे शब्दसामर्थ्य दिसून येते. किंबहुना आकर्षक वर्णनशैली हेच या कथांच्या लोकप्रियतेचे रहस्य असल्याचे सतत जाणवते. संघर्षाचे परिणामकारक वर्णन करण्याबरोबरच प्रभावी समरप्रसंग हेही रणजित देसार्इंच्या कथालेखनाचे एक वैशिष्ट्य प्रस्तुत कथासंग्रहात पाहावयास मिळते. त्यांच्या कथेतील व्यक्ती किंवा प्राणी यांची वर्णने वाचकांच्या मनाला चटकन आकर्षित करून घेतात. हा पहिला कथासंग्रह असूनही यात पहिलेपणाच्या मर्यादा किंवा उणिवा अभावानेच व्यक्त होतात. कोल्हापुरातील संस्थानी वातावरणात वावरल्याच्या पाऊलखुणा यातून प्रकर्षाने जाणवतात. विशेषत: ‘भैरव’, ‘नंदा’, ‘चै अगद् चै’ यासारख्या प्राणिकथांतील जिवंत चित्रण पाहता लेखकाच्या संवेदनशील व्यक्तित्वाची आणि प्राणिविषयक जिव्हाळ्याची कल्पना येते. ‘रूपमहाल’विषयी प्रा.म.ना.अदवंत लिहितात, ‘‘घटना व व्यक्तिरेखन यांच्या जोडीला वातावरण निर्माण करण्याचे लेखकाचे कौशल्य विसरून चालावयाचे नाही. त्यासाठी अनेक सूक्ष्म तपशीलांचा त्याने उपयोग केला आहे. शकुनापशकुनाच्या कल्पना, जत्रेची व भेकनाची वर्णने, कुस्तीच्या फडाची वर्णने हा तपशील कथेत जिवंतपणा आणतो यात शंका नाही. थोडक्यात, अस्सल ग्रामीण जीवनाची प्रचिती देण्याचे सामर्थ्य या संग्रहात आहे व म्हणूनच त्यांच्या पुढील लेखनाबद्दल आशा वाटते.’’ प्रा. अदवंत यांची अपेक्षा सार्थ ठरावी अशाचप्रकारचे लेखन रणजित देसाईच्या हातून पुढील काळात झाले. नवकथा ऐन बहरात असताना कथालेखनाला प्रारंभ केला असूनही स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य त्यांनी दाखवून दिले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more