* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: RESHIMGATHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662610
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 1999
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : MARATHI
  • Category : NON-FICTION
  • Available in Combos :KANCHAN GHANEKAR COMBO SET - 2 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS THE SECOND BOOK THAT I HAVE WRITTEN UNTIL NOW, THE FIRST BEING ‘NATH HA MAZA’, A MEMOIR OF MY BELOVED HUSBAND, THE LATE DR. KASHINATH GHANEKAR. THIS BOOK GAVE ME A DIFFERENT IDENTITY. TODAY, I AM ONCE AGAIN PRESENTING MY WRITTEN WORK, THIS TIME IT IS A COLLECTION OF SIXTEEN ARTICLES. EACH ARTICLE PORTRAYS A ‘SUBJECT’ INCLUDING JAYPRABHA STUDIO.MY SUBJECT FOR ONE OF THE ARTICLES IS MY ‘MOTHER’. IT IS BECAUSE OF HER THAT I AM WHAT I AM. THE SECOND PROMINENT PLACE IN MY LIFE GOES TO MY DEAR HUSBAND DR. KASHINATH GHANEKAR. THE REMAINING MEMBERS PORTRAYED HERE HAVE ENTERED MY LIFE AND HAVE LEFT A PERMANENT MARK ON MY MIND. THEY ALL ARE VERY NEAR AND DEAR TO ME. I EXPERIENCE BEING TIED TO THEM ALL WITH A STRONG YET DELICATE BOND. IT IS A BOND FROM WHICH I HAVE NO INTENTION OF FREEING MYSELF, TODAY OR TOMORROW. ALL THESE PERSONALITIES HAVE PROVED THEMSELVES IN THEIR RESPECTIVE AREAS FOR QUITE A LONG PERIOD. MY ARTICLES ARE NOT IN ANY WAY TO MEASURE THEIR SUCCESS OR VICTORIES. RATHER, MY WRITING JUST EXPRESSES MY INNERMOST FEELINGS FOR THEM AND THE IMPRESSION THEY ALL HAVE MADE UPON ME. EACH ARTICLE IS AN IMPULSIVE AND GENUINE EXPRESSION OF MY THOUGHTS AND SPIRIT TOWARDS EACH ONE OF THEM. ALL THESE EMINENT PERSONALITIES HAVE BEEN A BOON TO MY LIVING. THEY HAVE UNDOUBTEDLY SHOWERED UPON ME-THEIR LOVE, THEIR GOODNESS, THEIR CONCERN… I HAVE NO WORDS TO PAY GRATITUDE. RATHER, I PREFER TO REMAIN INDEBTED TO ALL OF THEM. WHAT I AM TODAY IS THE COMBINED EFFECT OF THEIR PRESENCE IN MY LIFE. THEY HAVE ENHANCED THE QUALITIES OF MY LIFE.
’नाथ हा माझा’ या चरित्रग्रंथामुळे कांचन घाणेकर यांची ओळख अवघ्या महाराष्ट्राला झाली. सुलोचनादीदींमुळे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांचा सहवास त्यांना लहानपणापासून लाभला. त्यामध्ये भालजी पेंढारकर, राजा परांजपे, चंद्रकांत, माई मंगेशकर, लता मंगेशकर अशा दिग्गज व्यक्तींचा समावेश होता. अशा सतरा दिग्गजांची भावचित्रं घाणेकर यांनी ’रेशीमगाठी’ या व्यक्तिचित्र संग्रहातून रेखाटली आहेत. त्या व्यक्तींशी कांचनजींचे जुळलेले भावबंध या संग्रहातून अधोरेखित होतात. सुलोचनाजी आणि काशिनाथ घाणेकर या त्यांच्या अत्यंत निकटच्या व्यक्तींंचं भावचित्रही त्यांनी रेखाटलं आहे. या संग्रहातून कांचनजींच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलूही उलगडत जातात. शिवाय या व्यक्तींशी त्यांच्या आणि सुलोचनाजींच्या असलेल्या भावबंधाचं हृद्य दर्शन घडतं. या दिग्गजांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल न बोलता त्यांच्या सहवासातील भावक्षणांचं स्मरण कांचनजींनी या संग्रहातून केलेलं आहे. ते स्मरण त्यांच्या ओघवत्या भाषेत वाचणं हा एक अविस्मरणीय अनुभव ठरावा. तेव्हा या अविस्मरणीय अनुभवासाठी ’रेशीमगाठी’ अवश्य वाचलं पाहिजे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"KANCHAN GHANEKAR#SULOCHANA#LEELA GANDHI#BHALJI PENDHARKAR#RAJA PARANJAPE #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #RESHIMGATHI #RESHIMGATHI #रेशीमगाठी #BIOGRAPHY #MARATHI #KANCHANGHANEKAR #कांचनघाणेकर "
Customer Reviews
  • Rating Starjoy nuth

    nice

  • Rating Starमहाराष्ट्र टाइम्स, ऑक्टोंबर १९९९ कै. वसंत सबनीस

    तुझे ‘रेशीमगाठी’ वाचले. आनंद वाटला. व्यक्तिचित्रे लिहिणे आणि ती आकर्षकपणे लिहिणे ही अवघड गोष्ट आहे. ज्यांचे आपले जवळचे संबंध असतात त्यांच्याकडे दुरून पाहणे कठीण असते. तसेच आपल्याशी जवळीक नसणाऱ्या माणसाकडे जवळून पाहणे ही अवघड असते. तू ही किमया करून दाविली आहेस. याबद्दल तुझे मन:पूर्वक अभिनंदन! ता. क. श्री. वासुदेव कामत यांची रेखाचित्रे फारच छान आहेत. त्यामुळे पुस्तकाचा दर्जा वाढला आहे. त्यांना ही अभिनंदन कळव. ...Read more

  • Rating Starनासिक सकाळ, फेब्रुवारी २००० मंगेश कुलकर्णी

    उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे विलोभनीय दर्शन… हे पुस्तक म्हणजे १६ व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. त्यातील वैशिष्ट्यपूर्ण चित्रण आहे ते जयप्रभा स्टुडिओचं. आजही अनेक चित्रपट कलावंत या स्टुडिओकडे मंदिर म्हणून पाहतात. इतक्या त्या वास्तुचा दबदबा होता. पुस्काचीबांधणी आकर्षक आहे. रेशमाच्या गाठी दाखवणारे अर्थपूर्ण मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांचे आहे. पुस्तकासाठी वापरलेला कागद पांढरा स्वच्छ आहे. प्रत्येक व्यक्तिचित्रणात वासुदेव कामत यांनी चित्रे रेखाटली आहेत. ही या पुस्तकाची तांत्रिक वैशिष्ट्ये आहेत. ही व्यक्तिचित्रे वाचल्यानंतर वाचकांचाही त्यांच्यावर स्नेह जडेल. ...Read more

  • Rating Starदैनिक पुढारी (कोल्हापूर), डिसेंबर १९९९

    निर्मळ भावबंधाच्या रेशीमगाठी… एकूणच ही व्यक्तिचित्रे मोठ्या माणसांची असली तरी कांचनतार्इंची ती सर्वजवळची माणसं असल्याने त्यांचा आपल्याला कौटुंबिक किंवा घरगुती पद्धतीनं परिचय होतो. या पुस्तकातील सुंदर रेखाचित्रे वासुदेव कामत यांची आहेत. पुस्तकाचे मुखृष्ठ सुंदर आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more