* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PRAYOG VANASPATI VIDNYANACHE
  • Availability : Available
  • ISBN : 9789386454973
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2024
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 100
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :D.S.ITOKAR COMBO SET-11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE ALL LIKE TO SEE THE GREENERY ALL AROUND US. SIMILARLY, MOST OF US WOULD LOVE TO UNDERSTAND MORE ABOUT THE PLANT KINGDOM AND THE SCIENCE BEHIND IT. ALL THE YOUNG READERS WOULD SPECIALLY LOVE TO KNOW ABOUT THE PLANTS VIA THE CONTENTS OF ‘PRAYOG-VANASPATI VIDNYANACHE’ (THE EXPERIMENTS TO UNDERSTAND PLANT SCIENCE). THE MANY ILLUSTRATIONS THROUGHOUT WILL HELP CHILDREN TO LEARN ABOUT PLANTS AND WILL ALLOW THEM TO DO SMALL EXPERIMENTS. THE BEAUTIFUL AND SIMPLE DRAWINGS WILL ENABLE THEM TO LEARN ABOUT THE VARIOUS PARTS OF PLANTS. A SEED, ITS STAGES, REPRODUCTION, GROWTH, ETC. ARE ALSO WELL EXPLAINED AND SUPPORTED WITH DIAGRAMS AND SIMPLE EXPERIMENTS. SPONGE FARMING IS A NOVEL CONCEPT INTRODUCED HERE. ‘POMATO’ WILL BE A COMPLETELY NEW CONCEPT WHERE A SINGLE PLANT WILL YIELD POTATO AS UNDERGROUND STEM AND TOMATO AS A FRUIT. THIS BOOK WILL HELP CHILDREN TO ENJOY VARIOUS EXPERIMENTS WITHOUT PURCHASING EXPENSIVE INSTRUMENTS OR SPENDING A LOT ON ANYTHING. THESE ALL CAN BE DONE OUT IN THE OPEN. A MUST BOOK FOR ALL THE GROWING YOUNGSTERS.
हिरव्या वनस्पती पाहणे कुणाला आवडत नाही? दृष्टीसुखाबरोबरच या वनस्पतींचे विज्ञान जाणून घ्यायला बाल दोस्तांना नक्कीच आवडेल. बालदोस्तांना हे विज्ञान सप्रयोग जाणून घेण्याची संधी मिळेल ‘प्रयोग – वनस्पती विज्ञानाचे’ या पुस्तकाद्वारे. वनस्पतींविषयी जाणून घेण्यासाठी त्यांचे प्रयोग कसे करावेत याचे सचित्र मार्गदर्शन या पुस्तकातून केले आहे. वनस्पतींचे अवयव आणि त्यांची रचना याविषयीची माहिती या पुस्तकातून मिळते. बियांचे पुनरुत्पादन असो किंवा बियांचे रुजणे किंवा त्यांचे अंकुरणे हे सगळे बाल दोस्तांना कळू शकते रंजक प्रयोगांतून. एक गंमत म्हणून स्पंज शेतीचा प्रयोगही या पुस्तकात सांगितला आहे. एकाच झाडाच्या मुळांना बटाटे आणि वरच्या भागाला टोमॅटो लागल्याचं नवल अनुभवायचं असेल तर ‘पोमॅटोचे झाड’ हा प्रयोग करा. असे अनेक प्रयोग या पुस्तकात समाविष्ट आहेत. हे सगळे प्रयोग करा महागड्या उपकरणांशिवाय आणि पर्यावरणाच्या खुल्या अंगणात. असे अनेक प्रयोग करण्यासाठी बालदोस्तांनी हे पुस्तक घेतलंच पाहिजे असं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PRAYOGVANASPATIVIDNYANACHE #PRAYOGVANASPATIVIDNYANACHE #प्रयोगवनस्पतीविज्ञानाचे #SCIENCE #MARATHI #ITOKARDS "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 15-04-2018

    वनस्पती विज्ञानाचे प्रयोग शालेय अभ्यासक्रमात अनेक विषयांसह केले जातात. भौतिक विज्ञानही मोठ्या प्रमाणात अभ्यासले जाते त्यात वनस्पतींची मुळे, खोड, पाने, फुले आणि फळे हे सारे घटक प्रयोगात असल्याने आपल्या आसपासच्या वृक्षवल्लरींचा उपयोग करून ज्ञान मिळवू शणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत आवश्यक आहे. मात्र हे सर्व प्रयोग रसायन शास्त्रप्रमाणे झटपट होत नाही उदाहरणार्थ बियांपासून पुनरुत्पादन. स्पंजवरील शेती, मुळे कशी वाढतात, बटाट्याने झाड वाढविणे, गाजराला कोंब फुटणे, पांढरे फुल रंगीत करणे, बोनसाय अशा प्रकारचे अनेक प्रयोग प्रत्यक्ष यशस्वी करण्यासाठी वाट पाहावी लागते. प्रतीक्षा करण्यासाठी मनाची तयारी हवी. लेखकाने आरंभी वनस्पतींचे वर्गीकरण करून, वनस्पतींचे अवयव आणि रचना सांगून एकूण प्रयोगांची व्यापकता समोर ठेवली आहे नंतर बिया कशा रुजतात, त्या कशा अंकुरतात. बियांची मुळे पाण्याकडे कशी वळतात, ती कशी वाढतात हे वाचल्यावर लक्षात येते की निसर्गप्रेमाची ही शिकवण फार गरजेची आहे. शालेय जीवनात ही दीक्षा मिळायला हवी, असे या पुस्तकावरून स्पष्टपणे जाणवते. याशिवाय प्रकाशाच्या गमती, प्राणवायू, रोपांच्या गमती, कलम करण्याचे प्रकार, नाकतोड्या, सुरवंट, फुलपाखरे आदींची माहिती मनोरंजक आहे. पाखरांची काळजी हा विषय तर रोजचाच आहे. -अरुण मालेगावकर ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 25-06-2017

    विज्ञानातल्या वेगवेगळ्या प्रयोगांबाबत डी. एस. इटोकर यांनी लिहिलेली ही पुस्तकं. विज्ञानाची तत्त्वं अतिशय छोट्या छोट्या प्रयोगाद्वारे त्यांनी समजावून दिली आहेत. काही प्रयोग तर अगदी घरात नेहमी सापडणाऱ्या वस्तूंचा वापर करून करता येतील. ‘प्रयोग वनस्पती वि्ञानाचे’ या पुस्तकात इटोकर यांनी वनस्पतींची मुळं, खोड, पानं अशा सर्व अवयावांशी संबंधित किंवा अनुषंगिक गोष्टींशी संबंधित प्रयोग दिले आहेत. पानाला असणारी छिद्रं, पाण्याकडं वळणारी बियांची मुळं, पानांचं ऑक्सिजन सोडणं अशा अनेक गोष्टी या प्रयोगातून माहीत करून घेता येतील. ‘विज्ञानातील रंजकता’ या पुस्तकात दृष्टीसातत्य, पृष्ठताण, गुरुत्वमध्य आदी तत्त्वांबाबतच्या प्रयोगांचा समावेश आहे. डोलणारा पक्षी, बाटलीतील पाणचक्की, वर चढणारा संकू, लाकडी नाव, हालचाल करणारं चित्र, चिकटणारं वर्तृळ, उडणारं बूच अशा अनेक गमतीदार वस्तूही तयार करून त्यांद्वारे विज्ञान शिकण्याची सुविधा या पुस्तकात उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more