* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PHERA
  • Availability : Available
  • Translators : MRUNALINI GADKARI
  • ISBN : 9788177661804
  • Edition : 5
  • Publishing Year : AUGUST 1996
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :TASLIMA NASREEN COMBO SET - 12 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KALYANI WAS BORN IN THIS UNDIVIDED NATION. INDIA SUCCEEDED IN DRIVING AWAY THE BRITISH, BUT AT THE COST OF ITS DIVISION. WHY DID THE HINDU GO OUT OF THEIR OWN COUNTRY WHILE SENDING AWAY THE MUSLIMS FOREVER FROM IT? THIS LAND NEVER BECAME THE MOTHERLAND OF THE MUSLIMS, IT ALWAYS REMAINED THE MOTHERLAND OF THE BENGALIS. THIS NATION WAS RAISED FROM THE BLOOD OF 30 MILLION PEOPLE. THE WAR AGAINST PAKISTAN IN THE YEAR 1971 TAUGHT A LESSON TO THAT COUNTRY WHO DIVIDED INDIA, WHO MADE BANGLADESH THE MOTHERLAND OF THE MUSLIMS, WHO WAS SO TREACHEROUS THAT MANY HAD TO LEAVE THEIR MOTHERLAND. THE WAR BROUGHT FORWARD THE TRUTH; THIS COUNTRY IS OF BENGALIS, NOT OF MUSLIMS. THE LANGUAGE IS IMPORTANT HERE, NOT THE RELIGION. KALYANI FELT LIKE STOPPING THE RICKSHAW AT ONCE. SHE WANTED TO SHOW AWAY THE SOIL STICKING ALL OVER HER BODY. THE LOVE FOR IT WAS NOT GOING TO ALLOW HER TO LOVE ANY OTHER LAND NOW. MAN LOVES ONLY ONE SOIL, IT IS SO OBVIOUS. KALYANI HAS COME TO HER MOTHERLAND. SHE WANTS TO FEEL THE SOIL, SMELL IT SHE WAS BORN FROM THAT SOIL, SHE WAS NOT BORN FROM ANY WOMB…..
.... या अखंड देशातच कल्याणीचा जन्म झाला होता. भारतानं ब्रिटिशांना हाकललं, पण स्वत:चे तुकडे करून हाकललं .... ह्या देशातून उर्दू बोलणाऱ्या मुसलमानांना हाकलताना हिंदूंना सर्व गाशा गुंडाळून स्वत:च्याच देशातून बाहेर का जावं लागलं? मुसलमानांची मायभूमी न होता, हा देश तर शेवटपर्यंत बंगल्यांचाच राहिला. तीस लाख बंगाल्यांनी स्वत:च्या रक्तातून हा देश उभं केलाय. ज्यांनी भारताचे तुकडे केले आणि या देशाला मुसलमानांची मायभूमी केली, ज्यांच्या दुष्टपणामुळे या देशातील लोकांना आपला देश सोडावा लागला, त्यांना एकाहत्तरच्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात चांगलीच चपराक बसली. हा देश बंगाल्यांचा आहे, मुसलमानांचा नाही; इथं भाषा महत्वाची आहे, धर्म नाही; हेच या युद्धानं सिद्ध केलं. कल्याणीला वाटलं, रिक्षा थांबवून खाली उतरावं, सर्व अंगावर माती माखावी. ह्या मातीचं प्रेम तिला दुसऱ्या कुठल्याच मातीत आपलं म्हणू देत नव्हतं. माणूस एकाच मातीवर प्रेम करू शकतो, तर! कल्याणी आज तिच्या जन्मगावच्या मातीचा वास घ्यायला आली होती. ह्या मातीतूनच तिचा जन्म झाला होता कोण स्त्रीच्या गर्भातून नाही, तर ह्या मातीतून.....
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TASLIMANASRIN #PHERA #NIRBACHITKALAM #NIRBACHI #LEENASOHONI #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOKS #MARATHIBOOKS#
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW 15-09-1996

    उत्कट अनुभूतीचा जिवंत आविष्काराचा फेरा... ‘लज्जा’ या कादंबरीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशझोतात आलेल्या तस्लिमा नासरिन या बंगाली लेखिकेची ‘फेरा’ ही लघुकादंबरी मानवी भावविश्वाचे प्रत्ययकारी चित्रण करण्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली आहे. मानवी भाभावानांच्या सूक्ष्म छटा या कादंबरीत समर्थपणे टिपलेल्या आहेत. मायभूमीपासून तुटलेल्या माणसाची जीवघेणी परवड, मायभूमीच्या मातीशी असलेले त्याचे नाते, त्या मातीची ओढ उत्कटपणे चित्रित करण्यात ही कादंबरी निश्चित यशस्वी ठरलेली आहे. फाळणीच्या पार्श्वभूमी या कादंबरीला आहे. मानवी मूल्यांचा होणारा ऱ्हास, धार्मिक विद्वेषांची माणसाच्या मनावर चढणारी पुटे, त्यातून लोप पावत जाणारी माणुसकी याचेही सुन्न करणारे दर्शन या कादंबरीतून घडते. माझ्या आवडत्या, सुंदर देशाची मूलतत्त्ववाद्यांनी केलेली भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक पातळीवरील अधोगती पाहून आक्रोशणारे लेखिकेचे मन वाचकांना अस्वस्थ करते. त्याचबरोबर अंतर्मुख होऊन विचार करायलाही प्रवृत्त करते. बांगला देशातील मयमनसिंह येथे (पूर्वीच्या अखंड भारतात) एका हिंदू कुटुंबात जन्माला आलेली कल्याणी ही या कादंबरीची नायिका आहे. ‘आनंद मोहन’ या महाविद्यालयात शिकणाऱ्या कल्याणीचे तिच्याच वर्गातील एका गावंढळ तरुणावर बादल) प्रेम बसते. आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या जातात. सुखी जीवनाची सुंदर स्वप्नं पाहण्यातच तिचे दिवस जात असतानाच तिच्या जीवनात भयंकर वादळ येते. भारत-पाकिस्तानची फाळणी होणार, येथे आपल्या कुटुंबाला जगणे कठीण होणार म्हणून एके दिवशी अचानकपणे कल्याणीचे वडील (हरिनारायण राय) आपल्या मुलांना कलकत्त्याला पाठविण्याचा निर्णय घेतात. आपले गाव, तेथील निसर्ग, जीवलग मित्र-मैत्रिणी यांना सोडून जाणे कल्याणीच्या जीवावर आलेले असते. ती दडून बसण्याचा प्रयत्न करते, पण तिला तेथून पाठविले जाते. ती आपल्या भावंडांसह मामा-मामीकडे कलकत्त्याला येते येथे तिला मोलकरणीसारखी वागणूक मिळते. नातेवाईकांच्या वासनेने बरबटलेल्या नजरांना सामोरे जावे लागते. तिथे ती घरची काम करून महाविद्यालयात शिक्षण घेते. खासगी नोकरी करते. कलकत्त्यामध्ये तिचा परिचय अनिर्वाण या भारतीय तरुणाबरोबर होतो. परिचयाचे रूपांतर प्रेमात होते. बादल आणि आपले गाव, तेथील ब्रह्मपुत्रा नदी, तळे, विविध फळांची झाडं, हे तिच्या संवेदनशील मनावर कोरलेलेच असते. ते विसरणे तिला अशक्य होते. मामा-मामींच्या जाचातून सुटण्यासाठी, नातेवाईकांच्या वासनांध नजरातून बचाव करण्यासाठी एक उपचाराचा भाग म्हणून कोर्टात जाऊन ती अनिर्वाणबरोबर लग्न करते. त्यांचा संसार सुरू होतो. मात्र तिच्या डोक्यातून आपला देश, आपला गाव, तेथील माती, मित्र-मैत्रिणी यांच्या आठवणी तीव्रतेने येत असतात. तीस वर्षे ती या आठवणीवरच दिवस ढकलत असते. तिला दोन मुलं होतात. दरम्यान तिचे आई-वडील दोघेही मरण पावतात. आता तेथे आपले कोणीही राहिले नाही याची खंत तिला दिवसेंदिवस अस्वस्थ करते. आपल्या मैत्रिणींकडे जावे, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, असा विचार करून ती कशीतरी पतीची परवानगी घेऊन सहा-सात वर्षांच्या दीपनला सोबत घेऊन तीस वर्षानंतर ती बांगला देशातील मयमनसिंहला येते. पूर्वीचे वैभव तसेच असेल, आपले धर, ब्रह्मपुत्रा नदी, तळो, नारळ, पेरू, जांभळाची झाडं, मैत्रिणी पाहायला मिळतील. आपल्या मातीत काही दिवस तरी विसावता येईल अशी कितीतरी स्वप्नं घेऊन ती आलेली असते. मयमनसिंहला आल्यानंतर मात्र तिची घोर निराशा होते. तिचे घर सरकारने जप्त केलेले असते. ते घर पाडून तेथे सिंमेटची इमारत उभी केलेली असते. झाडं तोडलेली असतात. नदी आटलेली असते. नदीचे रूपांतर नाल्यात झालेले असते. तिला तेथे कोणी ओळखत नाही. तिचे म्हणून तिथे काहीच नसते. आपले घर असलेल्या जागेवर ती व्याकूळ मनान रेंगाळते. मूठभर माती उचलून घेते. तिच्या घरासमोरचे जांभळाचे झाड मात्र अद्याप असते. असंख्य आठवणी दाटून येतात. ती त्या झाडाला कवटाळून ओक्साबोक्सी रडते. जमलेली माणसं वेडी म्हणून मिला हिणवतात. तिची टिंगल करतात. तिची बालमैत्रीण शरिफदेखील तिला ओळखत नाही. तिला भेटण्यासाठी तर ती एका देशातून दुसऱ्या देशात आलेली असते. तिच्या सर्व स्वप्नांचा चुराडा होतो. ब्रह्मपुत्रा नदीप्रमाणे या माणसांची मनंही आटलेली आहेत, असे तिला वाटते. ती हिंदू आहे म्हणून तेथील माणसं तिच्याकडे तिरस्काराने पाहतात. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी झपाटल्यासारखे ती तिच्या आवडत्या गावातून भटकते. ‘आनंद मोहन’ महाविद्यालयात आल्यानंतर तेथील सर्वच बदललेलं तिला दिसतं. तिचा प्रियकर बादल मुक्ती लढ्यात एक पाय घालवून अपंग झाल्याचे तिला समजते. बादलने आपल्या देशासाठी काही तरी केले याचा तिला अभिमान वाटतो. त्याचबरोबर त्याच देशाचा होणारा ऱ्हास पाहूनही ती खंतावते. तेथील लहान मुलांना, तरुणांना हिंदूद्वेषाचे आणि नमाजपठणाचे शिक्षण कसे दिले जाते. ते पाहून तिचे अंत:करण तीळ तीळ तुटते. पंधरा दिवसांसाठी आपल्या देशात राहायला गेलेली कल्याणी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच निराश मनाने आणि भरल्या अंत:करणाने परत येण्यासाठी निघते. या कादंबरीत लेखिकेने कल्याणीच्या भावजीवनाचे विविध छटांसह चित्रण केलेले आहे. हे भावविश्व त्या नायिकेपुरतेच मर्यादित राहात नाही तर मायभूमीपासून, मातीपासून तुटलेल्या माणसाचे ते प्रातिनिधक चित्रण बनते. मानवी भावभावानांचा जिवंत आणि ज्वलंत आविष्कार या कादंबरीचा गाभा आहे. सरळ, साध्या अंत:करणाला भिडणाऱ्या निवेदनामुळे या कादंबरीचा परिणामकारकता वाढते. आठवणीच्या रूपाने निवेदन तंत्र वापरल्याने कथानकात काही ठिकाणी अवरोध निर्माण झाल्यासारखे वाटते. लहान लहान उदाहरणांमधून लेखिकेने मानवी मनाच्या बदलांचे प्रभावी चित्रण केलेले आहे. लहान मुलांच्या मनावर हिंदू लोकांविषयी द्वेष कसा बिंबविला जातो. त्याचे अतिशय समर्पक उदाहरण लेखिकेने दिलेले आहे. काळ्या मुंग्या म्हणजे मुसलमान आणि तांबड्या मुंग्या म्हणजे हिंदू. काळ्या मुंग्यांना सोडून द्यायचे आणि तांबड्या मुंग्यांना मारायचे. या लहान मुलांच्या मुंग्या-मुंग्याच्या खेळाचे उदाहरण सूचकपणे आणि मार्मिकपणे दिलेले आहे. फाळणीमुळे केवळ भूप्रदेशच विभागला गेला नाही तर माणसा-माणसांची मनेही विभागली गेली आहेत, याचे विदारक चित्रण या कादंबरीत केलेले आहे. देश, प्रांत, प्रदेश येथील समानपणे बदलत जाणाऱ्या आणि वाह्यात बनत चाललेल्या तरुण पिढीसंबंधीचे वास्तव निरीक्षणही लेखिकेने स्पष्टपणे नोंदविलेले आहे. या कादंबरीतील नायिकेने उपस्थित केलेले, माणसांपेक्षा धर्म, देश, भाषा यालाच अधिक महत्त्व द्यावे का? माणूस धर्माचा गुलाम का बनतो? माणुसकीपासून दूर का जातो? यासारखे प्रश्न वाचकांना अस्वस्थ तर करतातच पण विचार करायलाही भाग पाडतात. उत्कट अनुभव आणि मानवतेला केंद्रस्थानी ठेवून घेतलेल्या बदलत्या वास्तवाचा वेध यामुळे या कादंबरीला कलात्मक उंची प्राप्त झालेली आहे. ही छोटीशी कादंबरी प्रांताच्या धर्माच्या, भाषेच्या आणि देशाच्या सीमा ओलांडून व्यापक मानवतेचा विचार करते म्हणूनच तिचे महत्त्व अनन्य साधारण आहे. या कादंबरीचा मृणालिनी गडकरी यांनी केलेला मराठी अनुवादही सहज ओषवत्या भाषेत आहे. हा अनुवाद लेखिकेच्या भूमिकेला, कथानकाला न्याय देणारा असाच झाला आहे. जेथे आवश्यकता आहे आणि आशयाची गरज आहे, तेथे तेथे मूळ बंगाली शब्द जसेच्या तसे ठेवलेले आहेत. त्यांचा मराठी अर्थही दिलेला आहे. त्यामुळे ही कादंबरी वाचनीय झालेली आहे. बदलते वास्तव प्रसंग चित्रणातून साकार करण्याचे लेखिकेचे कौशल्ये वाखाणण्यासारखे आहे या कादंबरीच्या अनुवादाने मराठी साहित्यात निश्चितच महत्त्वाची भर टाकलेली आहे. -प्रा. दादासाहेब मोरे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more