* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PARTNER
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664294
  • Edition : 38
  • Publishing Year : JANUARY 1976
  • Weight : 130.00 gms
  • Pages : 160
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Sub Category : HISTORICAL, MODERN & CONTEMPORARY FICTION
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"BY WHAT NAME SHOULD I CALL YOU? `PARTNER`; ACTUALLY WE HAVE NO NAME; THE NAME WHICH WE DISPLAY AS OUR OWN IS GIVEN TO THE BODY, NOT TO THE SOUL. A YOUNG LADY IS LIKE A COOL BREEZE; WHICH LINGERS AROUND US, TOUCHES US, GIVES US PLEASURE BUT WHICH CANNOT BE HOLD. WHAT IS HELL? IT IS THE COMPANY OF A THIRD PERSON WHEN MOST UNDESIRED. JUST REMEMBER FRIEND, BECAUSE YOU NEED ME, I TOO NEED YOU. AS YOU WRITE MORE AND MORE PERSONAL, IT BECOMES MORE AND MORE UNIVERSAL. "
"तुला मी हाक कशी मारू? पार्टनर ह्याच नावाने. आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठेवतात ते देहाचं. पोरगी म्हणजे झुळू्व. अंगावरून जाते. अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही. आपल्याला हवा तेव्हा. तिसरा माणूस न जाणे. हाच नरक! लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस. "

No Records Found
Original LanguageTranslated LanguageTranslated ByWebsite
MARATHIENGLISHDr.Shuchita Nandapurkar-Phadke  
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating Starसुशांत

    आणि शेवटी डोळे नकळत पाणवणार इतक्यात मी विचारात गुंग झालो-असा माझ्या आयुष्यात कोण आहे `पार्टनर`? आणि ती विचारांची माळ खंडीत झाली कारण माझ उत्तर मला क्षणार्धात मिळाल होत. पाणवणा-या डोळ्यातुन अश्रू अनावर झाले.अजाणते पणे भेटलेला पार्टनर हा महत्त्वाचा ऐज बनुन राहीला. अगदी कथेतल्या पार्टनर प्रमाणे ...Read more

  • Rating StarAniket Anil Apte

    तसं म्हणले तर आयुष्यात गरज अशी कुणाचीच लागत नाही अथवा कुण्या असण्या किंवा नसण्याने तसा फारसा काही फरक पडत नाही असे आपल्याला एकदा तरी वाटतेच. एखादा तरी पार्टनर असावा, मग तो कसा का असेना पण जीवाला जीव देणारा असावा, अडी अडचणीत साथ देणारा असावा... वैरे वगैरे सगळी फिलॉसफी वाटते खरी पण काही वेळा तथ्य असते. तुमचं अगदी बरोबर आहे, मी व. पु. काळेजींच्या पार्टनर या पुस्तकाबद्दलच बोलतोय. लाल कलरच्या बॅकग्रांऊंडवर अर्धा पत्त्यात राणीचे स्केच तर राहीलेल्या पत्यात राजा... असे कव्हर पाहिल्यावर अर्थातच पार्टनर म्हणजे संसाररूपी जीवनाचे कथानक आहे की काय वाटते पण जसे जसे पानं पलटत जातो तसतसे मित्र आधी पार्टनर बनतो आणि तो निस्वार्थपणे जीवनरूपी संसाराची घडी घालून देतो. सुरवात होते ते पार्टनरने सांगितलेल्या साहेबाच्या नाटकातली कथेने. मग पुढे नायकाला "किरण वर्तक" नावाची मुलगी भेटते. एकीकडे प्रेमाचे धडे गिरवत असताना भाऊ, वहिनी आणि आई यांना सांगून तिच्याशी लग्नाचे स्वप्न रंगू लागते. पार्टनर मदतीने नवा संसार नव्या जागी राजा राणी सारखा बहरू लागतो. पण रोज नवी लफडी करणारा पार्टनर मात्र आयुष्यातून दूर झालेला असतो... नेहमीप्रमाणे काही काही वाक्य मनाला भावणारी आहेत. "नरक म्हणजे काय?, आपल्याला हवं तेव्हा तिसरा माणूस न जाणं ", "गैरसमज हा कॅन्सर सारखा असतो, तिस-या अवस्थेत पोचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकट करतो." "आपल्याला खरं तर नावच नसतं, बारशाला नाव ठेवतात ते देहाचं". अगदी मोजक्याच म्हणजे दिडशे पानातच वपूंनी कथा मांडली आहे ती ही इतक्या प्रभावीपणे वाटते की जणू डोळ्यासमोर चित्रफितच चालू आहे.. ...Read more

  • Rating StarShailaja Bhaskar Dixit

    कादंबरी वाचताना आपण कादंबरीच्या नायकाच्या सोबत त्याच्या विश्वात आपोआप जात जातो. अतिशय ओघवती व सोपी घरगुती भाषा लेखकाने योजली आहे. नायकाचा टपोरी मित्र, ज्याला या कादंबरीत `पार्टनर` म्हणुन म्हटले जाते, तो फारच रंगेल व बिन्धास्त दाखवला आहे.नवनवीन पोरींबरोबर टाईमपास करणं, यात त्याला काहीही गैर वाटत नाही. नायक मात्र अतिशय सभ्य, सहनशील, भावनाशील असतो. दोघांचे स्वभाव अपोझिट असुनही दोघं जीवश्च कंठश्च मित्र असतात. नायकाच्या जीवनात अडचणी येताच पार्टनर त्याला खूप मदत करतो, उपाय सुचवतो. पार्टनरचं लाईफ थिल्लर वाटत असलं, तरी काही वेळा तो जीवनाचे तत्वज्ञान सांगतोय असे वाटते. नायक हा लकीही आहे, अनलकीही आहे. त्याला सर्वांची मैत्री, प्रेम, मदत, मिळते म्हणून तो लकी वाटतो. पण आईचे फक्त मोठ्या भावावरच प्रेम असणं, आईचं कधीकधी स्वार्थी वागणं, बाळाचा मृत्यू, या गोष्टी वाचताना तो अनलकी वाटतो. थोडक्यात काय, तर जीवन हे सुखदुःखाचे मिश्रण आहे. ते जसे असेल, तसे स्विकारून पुढे चालावेच लागते. ...Read more

  • Rating Starमानसी सरोज

    #पार्टनर एखाद्या क्षणी आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळावा किंवा आनंदाचा वर्षाव व्हावा आणि त्या क्षणी सगळ्यात आधी आपण पुकारा करत सुटावे आपल्या प्रिय माणसाचा तो असतो `पार्टनर`. मग ती आई, बायको, बहीण, वहिनी, लेकरू किंवा व. पु. काळे यांच्या पार्टर या कादंबरीतील देवधर! देवधरच्या औषधाच्या दुकानात काम करणारा श्रीनिवास..आयुष्यभर तडजोडी करत जगलेला...जेव्हा तेव्हा आई, भाऊ, वाहिणींची उपेक्षा मिळवलेला हा इसम आपल्या प्रत्येक सुखदुःखाचा साक्षीदार पार्टनर म्हणून ठरवताना अनेक प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहतात. एखाद्या प्रसंगात मावशी देखील देवसारखीच उभी राहते. अतिशय सोप्या भाषेत, ओघवत्या शैलीत मधेच गतीत जाणारे कथानक पण कुठेही अति रंजकपणा न जाणवणारी ही `पार्टनर` नावाची कादंबरी एका बैठकीत वाचून काढावी अशीच आहे. एक दोन ठिकाणी वापरलेल्या धक्का तंत्राने आपण बिथरतो कारण सगळं `गुडी गुडी` चालत असताना अचानक दुःख कोसळणे त्रासदायकच. अधूनमधून `वर्पूझा`चा चांदीचा वर्ख लिखाणावर लावलेला जाणवतो. उदाहरणादाखल घेतलेल्या उपमा मधेच विसंगत वाटत असल्या तरीही क्षणभर थांबून त्यावर विचार करायला भाग पाडतात.पात्रांच्या संवादाची फेक गतिमान असल्याने थेट मुद्द्यावर यायला वेळ लागत नाही आणि अशाने "पुढे काय?" ही उत्सुकता टिकून राहते. डायरी आणि पत्रे कथेचे वजन वाढवतात. संपूर्ण कथानक श्रीनिवास आणि पार्टनर भोवतीचंच आहे पण बायकोसोबतचे काही प्रियराधन प्रसंग अंगावर शहारा आणतात. काही प्रसंग आई आणि भावाचा उगाचच राग आणतात. पण थोडा वेगळा विचार करता आईचे दुसऱ्या मुलावर म्हणजे अरविंदवर जास्त प्रेम असले तरीही कायम तडजोडी करणाऱ्या आपल्या मुलाला म्हणजे श्रीनिवासला आपली अडचण नको या हेतूने कदाचित मुद्दामच आईचं दूर राहणं असावं असा विचारही मनात येतो. माई दांपत्य आणि शेवटी माईने श्रीनिवासच्या पत्नीची सेवा केल्याबद्दलचं कटू फळ जीवाला चटका लावून जातं. एकंदरीत आपण कितीही लोकांत राहत असलो तरी आयुष्याच्या प्रवासात शेवटपर्यंत पुरणारी शिदोरी म्हणजे सख्या, सोबती, प्राणप्रिय ` पार्टनर`. कादंबरीतील काही सुविचार आणि वैचारिक ओळी मनाच्या गाभाऱ्यात जागा करतात...इंग्रजीतून वापरलेली वाक्येसुद्धा अगदी योग्य ठिकाणी बसतात. जीवनात वयात आल्यापासून प्रस्थापित होईपर्यंतच्या काळात अनेकदा उमेद हरपली जाते पण अशा वेळी किमान एक `पार्टनर` असायला हवा जो आपला कुणीच नसतो. तो असतो फक्त डोळ्यांवरून झोपेचं पीस फिरवत "चिंता नको ..शांत झोप ...तोडगा काढू" म्हणणारा.. अशा आशयाचे हे पुस्तक आनंद, द्वेष, प्रणय, लोभ अशा सगळ्या रुपांचं प्रतीक आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही! ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more