* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PARAMVEER
  • Availability : Available
  • Translators : JYOTSNA LELE
  • ISBN : 9788177666908
  • Edition : 3
  • Publishing Year : AUGUST 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘PARAMVEER’ - OUR HEROES IN BATTLE IS A BOOK WRITTEN BY MAJOR GENERAL IAN CARDOZO, IN ENGLISH. MANY FAMOUS MILITARY PERSONNEL, LIKE SIR WINSTON CHURCHILL, AFTER RETIRING FROM ACTIVE MILITARY SERVICES HAVE WRITTEN ABOUT THE ACCOUNT OF WARS THEY FOUGHT, BATTLE FIELDS, THE MILITARY STRATEGIES ETC. THEY ARE REALLY THE MASTERPIECES OF THE LITERATURE. IN INDIA, VERY FEW HAVE TRIED THEIR HANDS ON PEN, AFTER GUITTING THE SWORDS AND MAJOR GENERAL IAN CARDOZO IS ONE OF THEM. ‘PARAMVEER CHAKRA’ IS THE HIGHEST HONOUR, THE HIGHEST AWARD IN THE ORDER OF MILITARY AWARDS GIVEN BY THE GOVT. OF INDIA, FOR THE ACT OF VALOUR, AND PATRIOTISM. THE BOOK GIVES ACCOUNT OF 21 "PARAMVEER` MEDAL RECIPIENTS WHICH WERE AWARDED FOR THE WARS WAGED ON THE SOIL OF INDIA NAMELY, JAMMU-KASHMIR WAR 1947-48, INDIA CHINA WAR 1962, INDIA PAKISTAN WARS, 1965, 1971 AND RECENT KARGIL WAR 1999 AND ALSO UNITED NATION`S PEACE KEEPING EXPEDITION AND SIACHEN WAR, EACH RECIPIENT`S STORY UNFOLDS A BREATH TAKING EXPERIENCE OF THE COURAGE, BRAVERY AND VALOUR . THE DESCRIPTION OF THE SIGHT, THE DIFFICULTIES FACED BY THE INCUMBENTS, THE DETERMINATION TO FIGHT AGAINST ALL ODDS AND SUCCEED IS SO GRIPPING THAT YOUR HEAD BOWS IN GRATITUDE FOR THEIR BRAVERY. MANY RECIPIENTS LAID THEIR LIVES TO SAVE THIS COUNTRY. FOR OUR TODAY THEY HAVE SPENT THEIR YESTERDAY. FOR GETTING THE INFORMATION ABOUT THE FAMILY BACKGROUND, BUILDING OT THE CHARACTER OF EACH RECIPIENT, THE WRITER HAS TAKEN LOTS OF EFFORTS. HE CONTACTED ARUN BATRA`S (THE THEN YOUNGEST RECIPIENT WHO LAID HIS LIFE) FATHER. THE STORY NARRATED BY THE FATHER IS MOST TOUCHING AND ABSORBING. THE DESIGNER OF THIS MEDAL IS A LADY. NAMELY MRS. KHANOLKAR, WHO WAS NOT INDIAN BY BIRTH. THIS BOOK IS QUITE INFORMATIVE, THERE IS A LETTER WRITTEN TO PANDIT NEHRU BY SARDAR PATEL, READING THIS YOU GET TO KNOW SARDAR PATEL’S FORESIGHT AND ACUMEN, INSIGHT. THIS BOOK IS HEARTWARMING, IT ENRICHES YOUR MIND. NOW IT IS AVAILABLE AS A TRANSLATION IN MARATHI.
आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी पेटून उठलेल्या हिंमतवान भारतीय सैनिकांच्या या कथा आहेत. त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडूनही तसेच प्रोत्साहन मिळाले. युद्ध ही जरी राष्ट्राने हाती घेतलेल्या राजनीतीची पुढील पायरी असली तरी, रणधुमाळीत तोलले जाते ते सैनिकांचे नशीब! भारतीय सैनिक, ज्यांच्या गळी ‘स्वत:आधी सेवा’ हे तत्त्व पूर्णपणे उतरलेले असते, युद्धातील सर्व आव्हाने अंगावर घेतात, प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग शोधतात आणि अशक्यप्राय वाटणारे यश हसतमुखाने खेचून आणतात. फार थोड्यांचे शौर्य पदकाने सन्मानित होते. बाकीच्यांची दखल घेतली जाणे गरजेचे आहे. हे सर्व योद्धे, जे असे निर्भीड होते, ते कशामुळे झाले? त्यांना कोणी घडविले? भारतीय सैनिकांचे कर्तृत्व, त्यांची ध्येयधारणा, त्यांनी भारतीय सैन्याची आणि आपल्या देशाची केलेली सेवा वाचकांपर्यंत पोहोचवायचे काम या पुस्तकाने केले आहे. ज्या भारतभूमीसाठी या जवानांनी आपले रक्त सांडले, त्या भारताचे सर्वार्थाने रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे परम कर्तव्य आहे. या शूर योद्ध्यांना तीच खरी श्रद्धांजली आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #REFERENCE #PARAMVEERCHAKRA #BIOGRAPHY #JYOTSNALELE #MAJORGENIANCARDOZO
Customer Reviews
  • Rating StarRajiv Lute

    कश्मिर मध्ये काहीतरी होणार! अफवांचे पेव फुटले आहे.अनेकांना आज झोप येत नाही...आपल्या देशाचा गंभीर प्रश्न सुटावा असे प्रत्येकाला वाटते...भारतीयांना आपल्या सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. सरकारचा पाठिंबा असेल तर सैन्य काहीही करू शकते हा आतापर्यंत चा अनुभव आे...अश्याच महान परमवीर चक्र विजेत्या नाटकांची गाथा सांगणारे हे पुस्तक सर्वांना आवडेल! ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    लेखक स्वतः एक धाडसी अधिकारी म्हणून नावाजलेले आहेत .१९५७ च्या बांगलादेशातील सिल्हटच्या लढाईत त्यांचा एक पाय सुरुंगावर पडला तेव्हा त्यांनी स्वतः ची कुकरी काढून पाय तोंडाला .अपंग होऊनही त्यांनी पुढे सैन्यदलात राहून देशाची सेवा केली. परमवीर चक्र हा सैन्दलातील सर्वात श्रेष्ठ पुरस्कार समजला जातो .आतापर्यंत एकवीसजणांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे .त्या प्रत्येकाची माहिती आणि लढाईतील पराक्रम या पुस्तकात लेखकाने लिहिला आहे .इतकेच नव्हे तर परमवीर चक्राची माहिती . त्याचा इतिहास हेही लिहिले आहे .या पदकाचे डिझाईन एका स्त्रीने केले आहे हे विशेष आहे . पहिल्या पदकाच्या मानकऱ्यापासून ते कारगिल युद्धापर्यंत सर्वांचा इतिहास यात आहे .सर्वांनी आपल्या या शूरवीरांबद्दल वाचलेच पाहिजे ...Read more

  • Rating Starअरूण भट

    नुकतेच आपले ‘परमवीर च्रक’ हे अनुवादित पुस्तक वाचले व थरारून गेलो. मनोगतात लिहिल्याप्रमाणे मराठी वाचकांनी हे पुस्तक अवश्य वाचावे. सर्वसाधारण नागरीकांना सैन्याबद्दल कमी माहिती असते. सदर पुस्तके अधिक प्रमाणात आली तर सैनिक, आधुनिक युद्धे याबद्दल अधिक माहती वाचकांना मिळेल. पुस्तकाची छपाई, मुखपृष्ठ इत्यादी तांत्रीक बाबी उत्तम आहेत. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 29-10-2006

    परमवीर चक्र हे आपल्या देशातलं सर्वोच्च लष्करी सन्मानचिन्ह आहे. हिंदुस्थानच्या रक्षणासाठी अतुलनीय शौर्य, धैर्य, पराक्रम गाजवणाऱ्या रणमर्दाला राष्ट्रपतींच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात येतं. १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाल्याझाल्या पाकिस्तानी सैन्यानेपठाणी टोळीवाल्यांच्या वेषात काश्मीरवर आक्रमण केलं होतं. त्या युद्धापासून १९९९ सालच्या कारगिल युद्धापर्यंतच्या विविध समरप्रसंगात पराक्रम गाजवणाऱ्या एकूण २१ योद्ध्यांना आजवर परमवीर चक्राने सन्मानीत करण्यात आलेलं आहे. कोण आहेत हे २१ परमवीर? त्यांचीच नावं आणि त्यांच्या पराक्रमकथा प्रस्तुत ‘परमवीर चक्र’ या पुस्तकात तपशीलवार देण्यात आल्या आहेत. या कथा सांगणारा लेखक हा स्वत:देखील एक बहाद्दर सैनिक आहे. लेखक मजर जनरल (निवृत्त) इयान कारडोझो हे हिंदुस्थानी सैन्यात ‘५ गुरखा रायफल्स’ या पलटणीत सेवा बजावत असताना, एका लढाईत त्यांचा पाय शत्रूने पेरलेल्या सुरुंगावर पडला. ते जबर जखमी झाले. त्याही स्थितीत या बहाद्दराने स्वत:च्या कमरेची कुकरी काढली आणि आपला चिंधड्या उडालेला पाय सरळ स्वत:च कापून टाकला. अपंग बनल्यावरही त्यांना उच्च सेनाधिकाऱ्यांची सेवेतून काढून न टाकता, त्यांच्या शौर्याची कदर करून त्यांची सेवा पुढे चालू ठेवली, असे ते पहिले सेनाधिकारी होत. १९९३ साली हिंदुस्थानी सैन्यदलाच्या पूर्वेकडील कोअरचे चीफ ऑफ स्टाफ अशा उच्च पदावरून ते निवृत्त झाले. शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानेच गायिला, की तो श्रोत्यांच्या काळजाला अधिकच भिडतो. त्याचप्रमाणे मेजर जनरल कारडोझोनी लिहिलेली परमवीर चक्राच्या मानकऱ्यांची ही पराक्रमगाथा मोठी वेधक, प्रेरक उतरली आहे. युद्धात पराक्रम गाजवणाऱ्यांना सन्मानीत करून त्यांचा व सर्वच सैनिकांचा उत्साह वाढवण्याची प्रथा, परंपरा फार प्राचीन काळापासून जगभर सर्व देशांमध्ये आहे. आपल्याकडेही ती होतीच. महाराजा शिवछत्रपती आपल्या बहाद्दर सैनिकांच्या हातात सोन्याचे तोडे घालीत. त्यांना सर्जेराव, हंबीरराव, प्रतापराव, विश्वासराव असे मानाचे किताब देत. पालखी, हत्ती, नौबत, निशाण अशी मानचिन्हे देऊन गौरवीत. इंग्रजी अमदानीत हिंदुस्थानी सैनिकांना इंडियन ऑर्डर ऑफ मेरिट, व्हिक्टोरिया क्रॉस इत्यादी मानचिन्हे दिली जात. स्वतंत्र हिंदुस्थानात व्हिक्टोरिया क्रॉस या सर्वोच्च लष्करी सन्मानाला समकक्ष असं परमवीर चक्र हे पदक अस्तित्वात आणलं गेलं. मध्यभागी अशोकस्तंभावरील चार सिंह आणि चार बाजूंना इंद्राच्या वज्राची चार चिन्हं, असं हे पदक सावित्रीबाई खानोलकर या संस्कृत साहित्याची प्रकांड पंडिता असणाऱ्या महिलेने सुचवलं. मेजर जनरल विक्रम खानोलकर या मराठी सेनाधिकाऱ्याची ही पत्नी मूळची स्वित्झर्लंडची होती. तिची आई रशियन आणि वडील हंगेरियन होते. योगायोग पाहा. पठाणी टोळीवाल्यांचा हल्ला उधळून लावून पाकिस्तानी सैन्याला थोपवून धरण्याचा अतुल पराक्रम गाजवल्याबद्दल ज्या मेजर सोमनाथ शर्मांना स्वतंत्र हिंदुस्थानचं पहिलं परमवीर चक्र मिळालं, ते मेजर शर्मा सावित्रीबार्इंच्या मुलीचे दीर होते. अशा अनेक रोमांचक हकीकतींनी पुस्तक अत्यंत वाचनीय बनलं आहे. मांडणी, मुद्रण, निर्मिती, मुखपृष्ठ सुबक. जोत्स्ना लेले यांचा मराठी अनुवाद ठीक. -मल्हार कृष्ण गोखले ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more