* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PAHILI PHERI?
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669701
  • Edition : 2
  • Publishing Year : JULY 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"YASHWANTRAO IS AN EXCELLENT STRATEGIST AND A PROFOUND THINKER...` DR. MANMOHAN SINGH. YASHWANTRAO CHAVAN HAS NOTED THE DETAILS OF THE WAR BETWEEN INDIA AND PAKISTAN IN THE YEAR SEPTEMBER 1965 IN HIS DIARY. HE ACCEPTED THE MINISTRY OF DEFENCE AFTER THE DEFEAT BY CHINA IN 1962. AFTER ACCEPTING THE POST, HE TARGETED AT STRENGTHENING THE WILL POWER OF OUR ARMED FORCES. HE ALSO GAVE PREFERENCE TO INCREASE OUR ARMED FORCES. RAM PRADHAN DISCUSSES AND PRESENTS BEFORE US THE WAR TACTICS, THE EFFORTS BY YASHWANTRAO CHAVAN, THE EVENTS DURING THE WAR AGAINST PAKISTAN, AND ALSO THE POLITICAL EVENTS AFTER THE WAR IN THIS CURRENT BOOK. THIS ELABORATION IS DONE FROM THE NATIONAL AND INTERNATIONAL POINT OF VIEW AND WILL PROVE VERY USEFUL TO THE STUDENTS OF SOCIOLOGY AND THE COMMON MEN AS WELL.
... यशवंतरावजी उत्तम व्यूहरचनाकार व जाणते रणनिती विचारवंत होत... डॉ. मनमोहन सिंग १९६५ WAR INSIDE STORY या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात पाकिस्तानविरुद्ध सप्टेंबर १९६५ च्या युद्धातील कार्यवाहीची नोंद यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या रोजनिशीत केली आहे. चीनविरुद्धच्या १९६२ मधील युद्धातील पराभवानंतर संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी घेतलेल्या यशवंतरावांनी सैन्याचे बल व मनोधैर्य वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच पाकिस्तान युद्धातील घटना व युद्धानंतरच्या राजकीय घडामोडी यांचा ऊहापोह राम प्रधान यांनी या पुस्तकात केला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय या स्तरांवरून केलेले हे विश्लेषण समाजशास्त्रांचे अभ्यासक तसेच सामान्य वाचक यांना उपयुक्त ठरेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PAHILIPHERI #PAHILIPHERI #पहिलीफेरी #POLITICS&GOVERNMENT #MARATHI #RAMPRADHAN #राम #प्रधान "
Customer Reviews
  • Rating StarLOKSATTA 19-10-2008

    भारत-पाक युद्धाच्या प्रांजळ नोंदी… भारताचे माजी संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९६५ च्या भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या युद्धाच्या काळात दैनंदिनी लिहिली होती. त्या दैनंदिनीतील नोंदीवर आधारित राम प्रधान ांनी लिहिलेल्या ‘१९६५ वॉर - इनसाईड स्टोरी’ या पुस्तकाचे प्रकाश पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, भारत व पाकिस्तान युद्धासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयावर यशवंतराव चव्हाण यांचे काय विचार होते याचे दर्शन या पुस्तकातून होत आहे. यशवंतराव चव्हाण हे विचारवंत राजकारणी होते व विचारी व्यक्तींचे नेतृत्व ते करीत असत. महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला अमीट ठसा उमटविल्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात आले. पं. नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांना संरक्षणमंत्री केले. पं. जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण यांनी राजकारण, समाजकारणाच्या क्षेत्रात अजोड कार्य केले. भारत व पाकिस्तानमधील संबंध व जम्मू-काश्मीर प्रश्नासंदर्भात यशवंतराव चव्हाण यांनी व्यक्त केलेले विचार मननीय आहेत. जम्मू-काश्मीरचा प्रश्न लष्करी बळाचा वापर करून सुटणार नाही असे स्पष्ट मत यशवंतराव चव्हाण यांनी मांडल्याचे मला ‘१९६५ वॉर - इनसाईड स्टोरी’ या पुस्तकाच्या वाचनातून कळले. - पंतप्रधान मनमोहनसिंग सप्टेंबर १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यान जे युद्ध झाले, त्याच्या आठवणी आजही सर्वांच्या अंगावर रोमांच उभ्या करतात. याच युद्धाच्या संदर्भात तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या रोजनिशीत केलेल्या नोंदींवर आधारित असलेले ‘पहिली फेरी’ हे पुस्तक पुण्याच्या ‘मेहता प्रकाशन’ने प्रसिद्ध केले आहे. अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल व सनदी अधिकारी राम प्रधान यांचे हे पुस्तक म्हणजे जिज्ञासू वाचकांसाठी मेजवानीच आहे. यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री असताना त्यांनी १ ते २२ सप्टेंबर १९६५ या भारत-पाकिस्तान युद्धाच्या कालखंडातील आठवणी रोजनिशीत नोंदीच्या स्वरूपांत लिहिल्या होत्या. हे युद्ध इतिहासाला वळण देणारे होते, त्यामुळे आजही त्याची माहिती वाचायला सर्वांनाच आवडेल यात शंका नाही. १९६५ च्या या युद्धात २२ सप्टेंबरला शस्त्रसंधीची पूर्तता झाली, तोपर्यंतच्या नोंदी यशवंतरावांनी केल्या आहेत. लष्करप्रमुख पदासारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी त्यावेळच्या परिस्थितीचे केलेले सादरीकरण, मंत्रिमंडळ समितीच्या बैठका, संसदीय मंडळासमोर सादरीकरण, लोकसभेतील निवेदने या पाश्र्वभूमीवर अत्यंत कमी वेळ मिळत असूनही त्यांनी स्वत:वर असलेली वाढती जबाबदारी पार पाडतानाच या नोंदी केल्या आहेत. भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी पडद्यामागे नेमके काय घडले याचा लेखाजोखाच संरक्षणमंत्र्यांनीच मांडला आहे, हे या पुस्तकाचे वेगळेपण! यशवंतराव एके ठिकाणी म्हणतात, ‘५ सप्टेंबरला पाकिस्तानवर हल्ला करण्याची योजना आम्ही आखली, तेव्हा ती फिसकटली तर काय परिणाम होती, याचा विचारही मी करू शकत नाही, इतके दडपण माझ्या मनावर होते.’ या पुस्तकाचे लेखक राम प्रधान हे यशवंतरावांचे एक विश्वासू सहकारी होते. युद्धाच्या नोंदी यशवंतरावांनी त्यांच्या खासगी रोजनिशीत लिहिल्या. या सगळ्या नोंदी करण्यामागे यशवंतरावांचा उद्देश वा ऐतिहासिक घटनेबाबत स्वत:शी संवाद साधण्याचा असावा, असे दिसते. पाच सप्टेंबरला ते लिहितात, ‘ऐतिहासिक दिवस! सकाळीच भारतीय सैन्य दलांनी लाहोरकडे कूच केली. हवाई दलानेही चांगली सुरुवात केली. खरे सांगायचे तर भारत हा काही युद्धखोर देश नाही. त्याचा मला अभिमानच आहे. पण काही वेळा देशाच्या वाटचालीत असे क्षण येतात, की कुरापती काढणाऱ्यांना चांगला धडा शिकवणे क्रमप्राप्त ठरते.’ ज्यांना सरकार, संरक्षण दले, ऐतिहासिक घडामोडी यांची कल्पना नाही. त्यांना या नोंदी समजण्यास कदाचित जडही जाईल. पण राम प्रधान यांनी ही दरी भरून काढली आहे व तसे करताना वाचकांना पूरक माहिती दिली आहे. प्रशासनातील खाचाखोचा माहीत असल्याने तयंनी दिलेली पूरक माहिती महत्त्वाची आहे यात शंका नाही. नोंदीमध्ये जे अपुरे आहे ते भरून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न ते करतात. राम प्रधान यांचे यशवंतरावांशी १९६० पासून निकटचे संबंध होते. भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग जमू लागले तेव्हा ते ब्रुसेल्सहून तातडीने दिल्लीला परतले. १६ सप्टेंबरपासून ज्या महत्त्वाच्या घडामोडी झाल्या, त्यावेळी राम प्रधान त्याचे जवळून साक्षीदार होते. कारण त्या वेळी त्यांना यशवंतरावांनी मदतीसाठी बोलावून घेतले होते. प्रधान यांनी त्यांचे यशवंतरावांशी असलेले निकटचे संबंध, तल्लख स्मरणशक्ती यांचा फायदा वाचकांना करून दिला आहेच. शिवाय काही ठिकाणी तटस्थपणे परिपक्व मूल्यमापनही केले आहे. या पुस्तकात मूळ रोजनिशीतील इंग्रजी नोंदी जशाच्या तशा आहेत. १ व २२ सप्टेंबर रोजी यशवंतरावांनी स्वत:च्या हस्ताक्षरात केलेल्या नोंदीची फोटोकॉपी आहे. पहिल्या भागात युद्धाची ठिणगी पडण्याच्या वेळी काय परिस्थिती होती याबाबत माहिती आहे. त्यानंतर संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या नोंदींचे मराठी रूपांतरही आहे. त्यावेळी रणभूमीवर काय घडले, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर काय घडामोडी झाल्या, याचीही माहिती आहे. पुस्तकातील दुसरा भाग हा ‘भाष्य’ किंवा ‘टिप्पणी’ स्वरूपाचा आहे, त्यात राम प्रधान यांनी त्या काळातील घटना, त्यामागची कारणे, मुख्य व्यक्ती, व्यक्तिगत संबंध या सर्व मुद्यांचे मार्मिक विवेचन केले आहे. ज्या काश्मीरच्या मुद्यावरून हे युद्ध झाले तो प्रश्न १९७१ मध्ये पुन्हा युद्ध होऊनही कायम राहिला. त्यानंतरच्या कारगिल युद्धाचाही परामर्श प्रधान यांनी घेतला आहे. एकूणच या पुस्तकाचे स्वरूप लक्षात घेता काही नोंदींची पुनरुक्ती होणे अटळ होते, पण त्यामुळे वाचकांना पुन्हा मागची पाने चाळण्याची गरज पडत नाही. नोव्हेंबर १९६२ मध्येदेशाने साद घातल्यानंतर यशत्तंतराव मदतीसाठी धावून गेले. संरक्षणमंत्रिपदाची धुरा त्यांनी सांभाळली. चीन भारताला घाबरवत होता. भारताने अमेरिकेकडे मदत मागितली होती. भारतीय लष्कराचा आत्मविश्वास खचला होता, अशा कठीण काळात यशवंतरावांनी संरक्षणमंत्री म्हणून अतुलनीय कामगिरी केली. त्यांनी पाकिस्तानवरच्या हल्ल्याची योजना आखली व त्याला पंतप्रधानांची मंजुरी मिळविली. १ सप्टेंबरच्या दुपारी पाकिस्तानने अखनूर भागातील पूल तोडून काश्मीरचे दळणवळण रोखण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी यशवंतरावांनी हीच प्रत्युत्तराची योग्य वेळ आहे हे जाणले. त्यांनी लगेच पठाणकोट येथून हवाईहल्ले सुरू करण्याचे आदेश दिले व पुढचा अनर्थ टळला. लष्करणप्रमुख व लष्कराच्या इतर वरिष्ठ अधिकाNयांशी सल्लामसलत करताना यशवंतरावांनी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळेच नंतर भारतीय लष्करी दल व हवाई दल सर्वांसाठी अभिमानाचा विषय ठरले. राम प्रधान या पुस्तकात यशवंतरावांचे तत्कालीन लष्करप्रमुख, हवाईदल प्रमुख. नौदलप्रमुख यांच्याशी असलेले संबंध उलगडून दाखवतात. यात लष्करप्रमुख काहीसे भडक व चिंतातुर स्वभावाचे, हवाईदल प्रमुख नम्र व सतत मागे राहणेच पसंत करणारे, तर नौदल प्रमुख आपण ‘हे करू शकतो’ असे सांगत नेहमीच छोटेमोठे योगदान देणारे होते हे दिसून येते. चीनने केलेल्या पराभवामुळे अगोदरच खचलेल्या संरक्षण दलांना सांघिक भावनेने एकत्र बांधण्यात यशवंतराव यशस्वी झाले व उदयोन्मुख भारताच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला. त्या काळात सुरक्षाविषयक जे प्रश्न होते, त्याकडे पुस्तकात लक्ष वेधले आहे. संरक्षणतज्ज्ञांसाठी लक्षात घेण्याजोगी बाब अशी, की त्यातील काही समस्या आजही कायम आहेत. त्यातील एक उदाहरण येथे देता येईल. पाकिस्तानबरोबर युद्धाची घोषणा संरक्षणमंत्री यशवंतरा चव्हाण यांनी ६ सप्टेंबरला लोकसभेत केली, त्यावेळी त्यांना सदस्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चीनपासून असलेल्या धोक्याबाबत पंतप्रधानांनी जेव्हा निवेदन केले होते, तेव्हा मात्र त्याला थंड प्रतिसाद मिळाला. याचे कारण सरळ होते ते म्हणजे चीनच्या भीतीने सर्वांनाच ग्रासले होते. आजही परिस्थिती काही वेगळी नाही. २२ सप्टेंबरला यशवंतरावांनी भारताच्या राजकीय विजनवासाबाबत नोंद करताना पश्चात्तापाची भावना व्यक्त केली आहे. आज तरी भारताने भूराजकीय वास्तव लक्षात घेऊन चीनला सामोरे जाण्यासाठी समविचारी देशांची मोट बांधली आहे काय? की पुन्हा आपण पूर्वीच्याच पद्धतीने साचेबंद विचार करून सगळे काही छान आहे व चांगलेच घडेल या भ्रमात राहणार आहोत. राम प्रधान यांचे हे पुस्तक जिज्ञासू अभ्यासकांनी जरूर वाचावे, त्यांच्यासाठी तो माहितीचा खजिना आहे. या रोजनिशीतील नोंदी अतिशय प्रांजळ व सत्य आहेत. औपचारिक सादरीकरणातून काही बाबी वगळल्या होत्या, त्यांचेही स्पष्टीकरण त्यांनी केले आहे. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेले फार थोडे लोक आज हयात आहेत. त्यांच्या या युद्धाविषयीच्या आठवणींना या पुस्तकामुळे उजाळा मिळाला आहे. घुसखोरी करून आक्रमण करण्याची पाकिस्तानची सवय तशी जुनीच आहे. त्यावेळी त्यांना अपयश आले, कारण स्थानिक लोकांचा पाठिंबा नव्हता. पण त्यानंतर परिस्थिती बदलली खरी पण ती आणखी बिघडत गेली. १९९८ मध्ये या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित झाली, आता हे पुस्तक मराठीत आले आहे. ते सर्वांना आवडेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more