* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PURVASANDHYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788171615025
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 1996
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 92
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AFTER THE FIRST THREE POETRY BOOKS LIKE `GONDAN`, `ANOLAKH`, AND JANMAJANHAVI` THIS IS THE NEW POETRY BOOK BY SHANTA SHELKE. THE POEMS UNDER THIS COLLECTION MAKE US REALIZE THAT THE POETESS HAS ACCEPTED THE NEW TREND IN THE WORLD OF POETRY GRACEFULLY, SUCCESSFULLY; AT THE SAME TIME, NOWHERE SHE HAS FORGOTTEN THE AGEOLD TRADITIONS OF MARATHI POEMS. WHILE PRACTICING THE NEW STYLE, SHE GENUINELY GRASPS THE NEW ANGLES, NEW MEANINGS, NEW UNIVERSE OF THE CHANGED STYLE, YET DEEP INSIDE HER POEM REMAINS THE SAME SIMPLE AND CASUAL, SPONTANEOUSLY RELATING THE WORDS TO THE MEANINGFUL STANZAS, ONE AFTER OTHER; WITH THE SAME PASSION.
गोंदण, अनोळख, जन्मजान्हवी या कवितासंग्रहानंतर आता शान्ताबाईंचा `पूर्वसंध्या` हा नवीन कवितासंग्रह रसिकांसमोर येत आहे. मराठी कवितेच्या पूर्वपरंपरेशी असलेले आपले नाते जपत असतानाच शान्ताबाईंनि नव्या कवितेशीही सुजन रसिकपणाने अनुबंध जोडला आणि तिच्यातली स्वतःला भावलेली वैशिष्टे आत्मसात केली. भाषेची नवी वळणे, आशयसंपृक्तता, वेगळी प्रतीमास्रूश्ती हे सारे त्यांच्या कवितेने स्वतःत मुरवून घेतले, पण हे जुने नावे काव्यासंस्कर घेतानाही त्यांची कविता हि पुन्हा त्यांचीच राहिली. साधी, सरळ, सहजपणे आपले मनोगत व्यक्त करणारी आणि रसिकांशी मोकळ्या जीव्याल्याने बोलणारी....

No Records Found
No Records Found
Keywords
#आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating StarGeeta Soni

    "पूर्वसंध्या" , हा शांता शेळके यांचा कवितासंग्रह , हे पुस्तक , कोणत्यातरी वाढदिवसाला नवऱ्यानं `भेट` म्हणून दिलेलं, साहजिकच आजही खास `ठेवणीतलं` , आणि `शांताबाई शेळके` यांच्या कवितांचं म्हणून मनाच्या खूप जवळचं सुद्धा. कवितेसारख्या उत्कट साहित्य्रकाराबद्दल , त्यांतही , श्रीमती शांता शेळकेंच्या शब्दसंपन्न कवितांबद्दल अधिकारवाणीनं लिहावं अशी माझी योग्यता मुळीच नाही. मग तरीही या पुस्तकातल्या त्यांच्या कवितांमध्ये मला काय जाणवलं,भावलं, ते लिहिण्याचं धाडस मी कसं काय करत्ये? माहीत नाही. कदाचित शांताबाईंच्या कवितांतून जाणवणारी जिव्हाळ्याची झिलई , भावनांची हळुवार अभिव्यक्ती, त्या कवितांबद्दल माझ्या मनात आपुलकी निर्माण करत असेल का? "कविता" हा साहित्याचा एक गूढरम्य आविष्कार वगैरे असं म्हणतात खरं , पण शांताबाईंच्या आजवर वाचलेल्या कविता,( या पुस्तकातल्या कविता सुद्धा ), मला गूढ नाही, फक्त रम्य च वाटत आल्यायत कायम. किंबहुना ते तसंच असावं म्हणून तर त्यांच्या कितीतरी कविता, गेली अनेक दशकं गाणी होऊन आपल्या मनात रुंजी घालतायत. या संग्रहातली मला आवडलेली त्यांची कविता म्हणजे "तसे तर शब्द". शांताबाईंचं शब्दांवरचं प्रभुत्व आपण सर्व जाणतोच पण "तसेतर शब्द जिवाभावाचे सखेसोबती,श्वासोश्वासाइतके निकट क्षणोक्षणी", "मी तर कधीचीच शब्दांची, ते कधी होतील माझे?त्यांच्याशिवाय कुठे उतरू हृदयावरचे अदृश्य ओझे?" या ओळींतून मात्र शांताबाईंची "शब्दां"वरची हुकूमत नाही तर शब्दांप्रती असलेलं त्यांचं मैत्र, सौहार्द, समर्पण , स्वप्रतिभेवरचं विसंबलेपण मान्य करण्याइतकं , मनाचं निर्मळ मोठेपण लक्खपणे जाणवतं. याच संग्रहातली आणखी एक कविता "पाणी". वरवर पाहता निसर्ग कविता वाटावी अशी, पण शेवटाला येतायेता "सप्त सागरांमधून वेडे दिशादिशांतून फिरते कुमारिकेच्या नयनी केंव्हा आसू होऊन उरते" या शेवटच्या ओळीतला थेंबभर अश्रू आपल्या मनात नाना प्रश्न निर्माण करतो, कोणतं दुःख सलत असेल त्या कुमारिकेच्या मनात? वंचनेचं? पोरकेपणाचं? अडवणुकीचं? की आणखी कसलं? या एका ओळीने अगदी आताआतापर्यंत निसर्गकविता वाटणारी , ही कविता एकदम भावकविताच होऊन जाते. याच संग्रहातली "आता नकोसे वाटते" ही कविता , तुमच्याआमच्या जगण्याशी मिळतीजुळती, त्यातल्या शेवटच्या दोन ओळी तर खासच. "मीच का जुळवून येथे आणि तेथे घ्यायचे, सारखे होणे नवे आता नकोसे वाटते" रोजच्या आयुष्यात बऱ्याचदा आपलीही अशी अवस्था होतेच ना? मात्र नेमक्या शब्दांत व्यक्त होता येत नाही, आणि उमटते ती फक्त चिडचिड. या सर्वच कविता वाचताना जाणवते ती शब्दांची सहजता, त्यांचं हळवेपण , आणि उबदार आपलेपण. अशाच मनाला भिडणाऱ्या , आशयघन कवितांचा संग्रहं "पूर्वसंध्या" जमेल तेंव्हा नक्की वाचवा असा. गीता सोनी 6 जून 2020 कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more