* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A BENCH, A TEMPLE, A VILLAGE, PEOPLE LIKE YOU OR ME AND A BLIND OLD MAN-THESE ARE SOME OF THE SET UPS IN MRS. SUDHA MURTY`S COMPILATION OF SHORT STORIES FROM PEOPLE ACROSS INDIA. THE OLD MAN AND HIS GOD: DISCOVERING THE SPIRIT OF INDIA IS A COLLECTION OF INDIVIDUAL ACCOUNTS GATHERED BY THE WRITER FROM PEOPLE WHO HAVE THEIR OWN STORIES TO TELL. THE STORIES ARE SUCH THAT THEY ARE VERY SIMPLE TO UNDERSTAND AND WRITTEN IN A SIMPLE WAY. THEY DESCRIBE THE INCIDENTS THAT ARE RECORDED BY MRS. MURTY DURING HER JOURNEY, WHICH SHE SUBSEQUENTLY SUMMARIZED IN HER EASY TO READ BOOK. HER STORIES ARE A PART OF THE VERY SOUL OF HUMAN BEINGS. FOR INSTANCE, THERE IS ONE ABOUT HOW AN OLD BLIND MAN GAVE HER SHELTER IN A STORM WHEN THERE WAS NOWHERE ELSE TO GO. ANOTHER STORY IS ABOUT HOW BROTHERS TURNED AWAY FROM EACH OTHER WHEN SOMEWHERE ELSE TWO PEOPLE, WHO WERE NOT EVEN RELATED BECAME CLOSER THAN BROTHERS. THERE ARE ALSO STORIES OF YOUNG PEOPLE TRYING TO MAKE A CAREER FOR THEMSELVES AND ALSO ABOUT THE OPPRESSION OF WOMEN WHO STRUGGLE FOR THEIR RIGHTS. MANY DIFFERENT LIVES TOUCHED THE HEART OF MRS. SUDHA MURTY AND ENTITLED HER TO WRITE THE OLD MAN AND HIS GOD. MRS. MURTY HAS EXPLORED THE SPIRIT OF INDIA WITH HER SET OF SHORT STORIES. THE SPIRIT OF INDIA IS IN THE PEOPLE, THEIR LIVES AND THEIR STORIES WHICH CAN IMPACT THE WAY OF THE WORLD. THE OLD MAN AND HIS GOD: DISCOVERING THE SPIRIT OF INDIA WAS PUBLISHED BY PENGUIN IN 2006. IT IS AVAILABLE IN PAPERBACK EDITIONS.
‘‘लोक मला अनेकदा विचारतात, ‘एवढ्या सगळ्या चित्रविचित्र गोष्टी नेमक्या तुमच्याच बाबतीत कशा काय घडतात?’ त्यावर त्या सर्वांना माझं एकच सांगणं असतं– जीवनाच्या या प्रवासात आपल्याला सर्वांनाच नानाविध माणसं भेटतात, कितीतरी अनुभवांना सामोरं जावं लागतं... त्यातले काही अनुभव आपल्याला स्पर्शून जातात, काही अंतर्बाह्य बदलूनसुद्धा टाकतात. तुमच्यापाशी जर संवेदनाक्षम मन असेल आणि तुम्ही या अनुभवांची नियमितपणे नोंद करून ठेवत असाल, तर तुमच्याही लक्षात येईल... तुमचं आयुष्य हासुद्धा एक विविध कथांचा खजिना आहे...’’ खेड्यापाड्यात जाऊन तेथील गोरगरिबांसाठी, झोपडपट्टीवासियांसाठी आणि सामान्य माणसांसाठी कार्य करत असताना सुधा मूर्ती, एक समाजसेविका, लेखिका आणि प्राध्यापिका– त्या सर्वांशी बोलतात, त्या लोकांचं म्हणणं त्या नोंदवून ठेवतात. या माणसांचा जीवनसंघर्ष, त्यांच्या आयुष्यात आलेले खडतर प्रसंग, त्यावर त्यांनी केलेली मात, कधीतरी त्या संकटांपुढे त्यांनी मानलेली हार... हे सगळं लेखिकेने आपल्या प्रवाही भाषेत या पुस्तकात मांडलं आहे. सर्वसामान्य माणसांच्या ठायी लेखिकेला दिसून आलेल्या असामान्य दातृत्वाच्या, नि:स्वार्थी वृत्तीच्या कथा यात आहेत. सुनामीसारख्या निसर्गाच्या प्रकोपाशी झुंज देणारी माणसं असोत, अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी उभ्या राहिलेल्या सबला असोत, स्पर्धेच्या युगात वरवर जाण्याची धडपड करणारे तरुण असोत– या सर्वांच्या गोष्टीतून मानवी स्वभाव आणि प्रवृत्तीच्या विविध पैलूंचं नेमकं चित्रण आपल्याला दिसतं. भारतीय समाजाचा आत्माच या पुस्तकाच्या रूपानं प्रतिबिंबित झाला आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarCA Priya Kulkarni

    लेखिके बद्दल: सुधा मुतीॅ या एक सामाजिक कार्यकर्त्या असून त्या इन्फोसिस या प्रसिध्द संस्थेचे सहसंचालक एन.आर.नारायण मुतीॅ यांच्या पत्नी आहेत. आपण सगळेच जण आपल्या दैनंदीन जीवनात खूप बरे वाईट अनुभव घेतच असतो आणी यातूनच आपण वेगवेगळ्या माणसांबद्दल, जागाबद्दल, विषयांबद्दल आपली मत बनवतो. सौ. सुधा मुतीॅ हे आपणा सगळ्यांच्या परिचयाच नाव आहे. इन्फोसिस फौंडेशेन या नावाने काम करत असताना त्यांना आलेले अनुभव या पुस्तकात आहेत. वाचताना जाणवतं की एखाद्या गोष्टी बद्दल आपली मत किती साचेबध्द असतात आणी वास्तवात गोष्टी किती वेगळ्या असतात. मोलमजूरी करून आपल्या पाच मुलांचा सांभाळ करणारी एक स्त्री जेव्हा परत एका बाळाला जन्म देते तेव्हा तिच्याकडे एक प्रस्ताव येतो ते बाळ एका मुलबाळ नसलेल्या श्रीमंत दांपत्याला दत्तक देण्याचा. बाळाच्या बदल्यात मिळणारे खूप पैसे तिचे आयुष्य सुलभ करणारे असतात पण जेव्हा ते दांपत्य ते बाळ घेऊन जाण्यास येतात तेव्हा पाच मुलं असून सुद्ध तिचं मन कातरतं आणी ती बाळाला अंतर देऊ शकत नाही. तर एकीकडे अशाच एका गरीब घरातली मुलगी वारंवार आपल्या आई बाबांना सांगत असते की मला डोळ्याला अंधुक दिसतं, पण अशिक्षीत आई वडील याकडे सतत कानाडोळा करत असतात. शेवटी एकदा ते तिला डाॅक्टरकडे घेऊन जातात. डाॅक्टर तिचे ॲापरेशन करावे असा सल्ला देतात, पण खर्चाचा आकडा खूप असतो. मग आई वडील तिला दवाखान्यातून बस स्टॅडवर घेऊन जातात. आई वडील आपापसात चर्चा करतात व मुलीच्या हातात एक बिस्कीटचा पुडा देऊन सांगतात, तू हे बिस्कीट खा, आम्ही पाच मिनिटांत येतो. बिस्कीटं संपतात, असाह्य, घाबरलेली मुलगी हाका मारू लागते...पण तिच्या हाकेला ओ देणारे कोणी येतच नाही! आता मी कधीकधी विचार करते...मातृत्व म्हणजे काय? खोट्या कॅन्सर ची माहिती सांगून आथिॅक मदत मिळवणारी एक व्यक्ती, तर दुसरीकडे मिळाळेल्या आथिॅक मदतीपेक्षा कमी खर्चात उपचार झाले म्हणून उरलेले पैसे फोैंडेशनला परत करणारे कुटंब... या आणी अशा अनेक अनुभवांची सफर आहे..पुण्यभूमी भारत! ...Read more

  • Rating Starशितल सुधाकर मुळे

    आदरणीय लीनाजी, स.न.वि.वि. मी इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थीनी आहे. मी तुम्ही अनुवाद केलेले ‘पुण्यभुमी भारत’ हे पुस्तक वाचून खूप आनंद झाला. मला मातृत्व ही गोष्ट खूप आवडली. या वेगवेगळ्या गोष्टीतून मला खूप काही शिकायला मिळालं. मला या पुस्तकातून खूप ्रेरणा मिळाली. या गोष्टीतून काहीना काही शिकण्यासारखं आहे आणि ते मी माझ्या अंगात सगळे गुण घेतले. हे पुस्तक मला खूप आवडलं आणि तुम्हाला पत्र पाठवण्याची इच्छा झाली. मी तुम्ही अनुवाद केलेली खूप पुस्तके वाचली आणि ती सगळी पुस्तके मला खूप आवडली. मला तुम्हाला आमच्या शाळेत वार्षिकउत्सव या कार्यक्रमात उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तुम्हाला हे पत्र पोहचले की आमच्या शाळेला फोन करा अशी माझी खूप इच्छा आहे. आणि आमच्या शाळेत येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, हीच विनंती. कळावे, आपली विश्वासू, शितल सुधाकर मुळे हरंगुळ, लातूर ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 18-11-2007

    अनुभवांचा इंद्रधनुषी शब्द आलेख... सुधा म्हणजे मध. मूर्ती म्हणजे प्रकट झालेले. जीवनातील मधासमान दृष्टी आणि अनुभव एकत्र होऊन शब्दरूपाने प्रकट होतात तेव्हा सुधा मूर्तीचे लेख जन्म घेतात. सुधा मूर्तींनी समाजात वावरताना आलेल्या अनुभवांचे, मधमाशीच्या मध गोा करण्याच्या वृत्तीने संकलन केले आहे. हे करताना त्या चांगल्या गोष्टींचे भरभरून कौतुक करतात तर चांगल्या गोष्टी दाखवून देताना त्यांच्यातील अनुकंपा आणि दया यांचे दर्शन होते. प्रत्येक लेखाला मानवी स्वभावाच्या विश्लेषणाचे अस्तर आहे. हे विश्लेषण कोरडे आणि शुष्क नाही; त्याला दयार्द्र दृष्टीचा ओलावा आहे. लेखिकेला आलेल्या अनुभवांचे चित्रण सर्वच्या सर्व खरंखुरं आहे... प्रामाणिकपणे जसंच्या तसं लिहिलं आहे... काही लोकांना त्यामुळे ते भावलं आहे... असं सुधा मूर्ती मनमोकळेपणानं सांगतात. मातृत्व, वात्सल्य, संतानप्रेम हे एकाच भावनेचे अनेक पैलू. निरनिराळ्या अनुभवातून त्याचे वेगवेगळे कंगोरे दिसून येतात. कधी आनंदाने मन उचंबळून येतं. तर कधी विदारक अनुभव वाचताना मन विषण्ण होतं. मानवी मनोव्यापाराचे विश्लेषण हेच या सबंध पुस्तकाचे मूलसूत्र आहे. नोकरी ही कहाणी अशीच आहे. मुलाखतीतून निरनिराळ्या उमेदवारांची मनोवृत्ती कळते. एक हुशार, सधन घरातली मुलगी, ‘मला स्वतंत्रपणे रहायचे आहे, कार ठेवायची आहे, तेव्हा जास्त पगार हवा’ असे सांगते, तर दुसरा हुशार, श्रीमंत डॉक्टरचा मुलगा मात्र ‘मला याच गावात दुसरं देखील काम होतं, मी आत्याच्या घरी उरतलो होतो’ असे कारण सांगून प्रवासभत्ता घेण्याचे नाकारतो. या संदर्भात ‘वाइज अ‍ॅण्ड अदरवाइज’ या सुधा मूर्तींच्या दुसऱ्या पुस्तकांतील एका हुशार पण बढाईखोर सॉफ्टवेअर इंजिनीयरची आठवण होते. धारवाडच्या इंजिनीअरींग कॉलेजात सुवर्णपदक मिळाल्याचे खोटंच सांगणाऱ्यांची मनोवृत्ती लेखिकेला आणि वाचकांनासुद्धा कोड्यात टाकते. परस्पर विरोधी घटना समोरासमोर उभ्या करून जणू वाचकांपुढे सुधा मूर्ती प्रश्न उभा करतात. त्या प्रतिपादनात कुठेही समस्या सोडविण्याचा अभिनिवेश असतं नाही पण वाचकांच्या मनात खळबळ मात्र जरूर निर्माण होते. हुशार दत्तक मुलीच्या शिक्षणासाठी स्वत:च्या सोन्याच्या बांगड्या गहाण टाकायला निघालेली लीलाम्मा बघून आनंद होतो. त्याच लेखात अमानुष रामप्पा या बापाचे वर्णन येते. रामप्पा स्वत:च्या लहान मुलाच्या कॅन्सरचे भांडवल करतो, लाखो रुपये चंदा गोळा करतो. मुलाच्या इलाजासाठी एक पैसाही खर्च करीत नाही. घर-वाहन विकत घेऊन मौज करतो हे वाचून मन खिन्न होते. फाटके कपडे घालून फुकट वैद्यकीय सेवेसाठी दोन गाड्यांची श्रीमंत मालकीण त्या पाहतात. गरीब वस्तीत ब्लँकेट वाटताना परत मागण्यासाठी पण श्रीमंतांची क्षुद्र वृत्ती आणि मनाची गरीबी त्यांना जास्त दु:ख देते. एका पाकिस्तान भेटीच्या वेळी, तेथील लोक, हिंदी सिनेमाच्या गाण्याची धून गुणगुणारा टॅक्सी ड्रायव्हर, मेजवानीतील चना-भटुरा, आलू पराठा, जिलेबी, सगळं सगळं कसं घरच्यासारखं वाटत होतं. त्या तक्षशीला येथे म्युझियम पाहायला जातात. तिथे परदेशी पाहुण्यांसाठी तिकीट जास्त आहे. आपण जणू भारतातच आहे असं समजून त्या विचारतात, ‘माझ्याकडून दोनशे का घेतले?’ तेव्हा ‘तुम्ही भारतीय म्हणजे परदेशी’ हे उत्तर त्यांना वास्तवाची जाणीव करून देते. दुसऱ्या एका भेटीच्या वेळी चेन्नईच्या मिसेस कपूर त्यांच्याबरोबर असतात. मिसेस कपूरचं बाळपण, खेळणं बागडणं सुरुवातीचं शिक्षण, फाळणीपूर्व पंजाबात झालं. त्यांची जन्मस्थानाला - पिंडीला भेट देण्याची अनावर ओढ, ते घर आता तिथे नसल्यामुळे व्यथित झालेल्या मिसेस कपूर, शेजारी डॉ. सलीम यांचे अगत्यशील वागणं, हे सगळं सुधा मूर्ती अत्यंत भावूकपणे वर्णन करतात. इन्फोसिस ही कॉम्प्युटर क्षेत्रातील फक्त भारतातील नव्हे तर जगातील अग्रगण्य व श्रीमंत कंपनी आहे. इन्फोसिस फौंडेशन ही त्या कंपनीची समाजिक आणि धर्मादाय कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेच्या प्रमुख या नात्याने सुधा मूर्तींचा विविध क्षेत्रातील संस्थांचा आणि व्यक्तींचा संबंध येतो. हिरालाल जैन हे व्यावसायिक नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर फौंडेशनला मदत पाठवित असतात. त्यांच्यानंतर दुसरी पिढी व्यवसायाची धुरा सांभाळते. नवीन व्यवस्थापन इन्फोसिस फौंडेशनला विचारते, आम्हाला या मदतीमुळे काय प्रसिद्धी मिळेल? बदलत्या व्यक्तिगत, सामाजिक आणि व्यावसायिक मूल्यांची चुणूक या लेखाद्वारे आपणास कळून येते. या पुस्तकातील प्रत्येक लेख एक आरसा आहे. प्रत्येकात वेगवेगळे प्रतिबिंब आहे. पण प्रत्येकात माणसांच्या वृत्ती प्रवृत्तींच्या वेगवेगळ्या रंगाचे दर्शन आहे, जणू भारत दर्शन आहे. या साऱ्या गोष्टी मनाला स्पर्शून जातात; सरळ सच्चेपणा भावतो. सगळ्याच लेखांचा परिचय देणे शब्दमर्यादेत बसत नाही. पण ‘तू शंभर मुलांची आई हो!’ हा त्यांच्या आजीचा आशीर्वाद त्यांनी वेगळ्या संदर्भात अनेकांना मदत करून सार्थ केला असे वाटते. कर्मठ आणि प्रगत विचारसरणी एकत्र नांदू शकतात याचा सुधा मूर्तींच्या आजीमध्ये सुंदर संगम आढळतो. असा आहे सुधा मूर्तींच्या अनुभवांचा इंद्रधनुषी शब्द आलेख! द ओल्ड मॅन अ‍ॅण्ड हिज गॉड (डिस्कव्हरींग द स्पिरीट ऑफ इंडिया) या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद लीना सोहोनी यांनी सरसरित्या केला आहे. तळमळीने लिहिलेले अनुभव आणि ओघवती भाषा यामुळे हाती घेतलेले पुस्तक केव्हा संपते ते कळतच नाही. उगाच नाही एकवीस भाषात भाषांतर झालं! कॉम्प्युटर युग माणसाला समाजापासून अलग करते आहे असं म्हणतात पण ही बाई तर पूर्णपणे समाजमय झाली आहे. लेखनाचे मानधन सुधा मूर्ती सामाजिक कार्याला अर्पण करतात. -मधुसूदन आदवाणीकर ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 13-05-2007

    समाजमनाची गमतीदार निरीक्षणे... सुधा मूर्ती या मूळच्या सुधा कुलकर्णी. म्हणजे मराठी नव्हे; कानडी भाषिक. इन्फोसिस या आंतरराष्ट्रीय ख्यातनाम संगणक कंपनीचे जनक नारायणमूर्ती यांच्या त्या पत्नी. आपण मराठी माणसं जरासं दक्षिणी वळणाचं नाव दिसलं की ‘मद्रासी’ कंवा ‘साऊथ इंडियन’ असा एक शेरा मारून मोकळे होतो. प्रत्यक्षात दक्षिण हिंदुस्थानात कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र आणि केरळ असे चार प्रांत आहेत. तिथल्या भाषा वेगवेगळ्या आहेत. किंबहुना कोटेकोरपणे बोलायचं तर आपला महाराष्ट्रही दक्षिण हिंदुस्थानातच मोडतो ही सगळी वस्तुस्थिती आपल्या गावीही नसते. तर सुधा मूर्ती या कन्नड भाषिक असून स्वत: अव्वल दर्जाच्या सॉफ्टवेअर इंजिनीयर आहेत. इन्फोसिसच्या उत्तुंग यशात आपल्या पतीइतकाच त्यांचाही वाटा आहे. अलीकडे त्या समाजकार्य आणि लेखनाकडे वळल्या आहेत. वेगवेगळ्या इंग्रजी नियतकालिकांमधून त्यांचे स्तंभ नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांचे लेखन लोकप्रिय आहे. श्रीमंताच्या बायकांना वेळ घालवण्यासाठी समाजकार्य करणं आणि इंग्रजीतून(च) लेखन करणं यात नवीन काहीच नाही. हा ब्रिटिश मडमांचा वारसा आहे. आपल्याकडे त्यांची ‘अतिविशाल महिला मंडळ’ म्हणून टिंगल होत असते. पण सुधा मूर्तीचे काम आणि लेखन या दोहोंची जातकुळी वेगळी आहे. एकतर त्या श्रीमंत नवऱ्याची कर्तृत्वशून्य बायको नाहीत. उलट प्रचंड गुणवत्ता आणि प्रचंड कर्तबगारी गाजवून आता त्या सामाजिक कार्यात उतरल्या आहेत. अशा लोकांचं लक्ष बहुधा कायम युरोप-अमेरिकेकडे लागलेलं असतं. तिथलं ते सगळं चांगलं नि इथलं ते सगळं टाकाऊ अशी त्यांची धारणा असते. सुधा मूर्तींची इथल्या समाजासाठी काहीतरी काम करण्याची भावना, तळमळ अस्सल आहे. त्या कामाला त्यांनी पाश्चिमात्त्य पद्धतीच्या शिस्तीची योजनाबद्धतेची उत्तम जोड दिल्यामुळे सोन्याला सुगंध लाभला आहे. या सामाजिक कार्यात सतत येणाऱ्या कडू-गोड गमतीदार अनुभवांवरच त्या सतत लिहित असतात. प्रस्तुत ‘पुण्यभूमी भारत’ हे अशाच अनुभवकथांचं अतिशय वाचनीय पुस्तक आहे. हिंदुस्थानला जगाचं लघुरूप (मिनिएचर ऑफ दि वर्ल्ड) म्हटलं जातं. जगातल्या सर्व प्रकारच्या वृत्ती-प्रवृत्ती इथे आढळतात. टोकाची बदमाशगिरी आणि टोकाचा प्रामाणिकपणा, आत्यंतिक श्रीमंती आणि आत्यंतिक दारिद्र्य, अस्सल साधू आणि पक्के भोंदू असे सर्व मानवी नमुने इथे सापडतात. सुधाबार्इंच्या अनुभवकथांमधून त्यांच्या स्वत:च्या सुंदर भाष्यासह ते आपल्यासमोर येतात. त्या भाष्यामधून आपल्या हेही लक्षात येतं की, लेखिकेची काही चिरंतन अशा मानवी मूल्यांवर दाट श्रद्धा आहे आणि काळ कितीही बदलला तरी ही मूल्यं अचल, अढळ, शाश्वत अशीच राहणार आहेत. ती मूल्यंच चांगलं जीवन जगू पाहणाऱ्यांना आत्मबळ देणार आहेत. हिंदुस्थान ही पुण्यभूमी असल्याचा हाच तर निकष आहे. -मल्हार कृष्ण गोखले ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHIKASANTVANAM
RADHIKASANTVANAM by MUDDUPALANI Rating Star
केदार मारुलकर

एक डॉक्टर काय काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या पुस्तक परिचयासाठी निवडलेल्या पुस्तकाचे लेखक (खरे तर अनुवादक) *डॉ. शंतनू अभ्यंकर.* पुण्याच्या बीजे मेडिकल मधून एमबीबीएस. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण. आयएमए तसेच इतर संघटनेत विविध पदांवर काम. अनक परिषदांमध्ये शास्त्रीय विषयावर शुद्ध मराठीत व्याख्याने. २५ वर्षाहून अधिक काळ ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा. लोकविज्ञान संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा संघटनांमध्ये काम. विज्ञान लेखक, भाषांतरकार, ब्लॉगर आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे समाजात सर्वसाधारणपणे *न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर लेखन* आणि प्रसंगी *प्रचलित समजाला तडा देणारे परखड भाष्य* करण्याची धमक. *पुस्तक परिचय* मुद्दूपलनी ही अठराव्या शतकातील राजे प्रतापसिंह यांची भोगपत्नी. अनुपम सौंदर्य, बुद्धिमत्ता, चातुर्य, शृंगारनिपुणता बहुभाषाकोविद अशी देवदासी स्त्री. राधिकासांत्वनमु हे तेलगू भाषेतील काव्य तिने रचले. परंतु नंतरच्या काळात अश्लील ठरवून त्यावर बंदी घालण्यात आली. देश स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा एकदा या काव्याला प्रकाशित होण्याचे भाग्य लाभले. गेल्याच वर्षी हे काव्य मराठीत अनुवादित करून डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी मराठी रसिकांना हा सांस्कृतिक ठेवा उपलब्ध करून दिला आहे. तंजावरच्या तत्कालीन मराठी राजवटीचं एक वेगळंच वैशिष्ट्य होतं. मराठी राजे आणि तमिळ प्रजा. या राज्याची प्रसिद्धी इतर कलांइतकीच कलावंतिणींसाठीही होती. देवदासी, देवरंडीयल, कलावती, गुडिसानी, भोगदासी, नगरशोभिनी, राजगणिका अशी, काही आज आपल्याला खळबळजनक वाटतील अशी, नावं होती. एक समृद्ध परंपरा होती. तिथे गणिकांनाही प्रतिष्ठा होती. अशीच एक गणिका-मुद्दूपलनी. तिची एक रचना म्हणजेच राधिकासांत्वनमु. तेलुगूमध्ये सांत्वन म्हणजे रुसवा काढणे. अतिशय शृंगारिक, भावनाप्रधान, बिनधास्त आणि प्रसंगी अश्लील म्हणावं असं हे काव्य. अर्थात श्लिलाश्लिलतेच्या कल्पना कालसापेक्ष असतात. राधा-कृष्ण आणि इलाची गोष्ट सांगतासांगता ती राजे राजवाड्यांच्या राज्याचीच नाही, तर स्त्रियांच्या अंत:करणाचीही दारे सताड उघडून दाखवते. मराठीमध्ये इतकं शृंगारीक काव्य लिहिलं गेलं नाही.त्यात शृंगारीक लेखन म्हणजे लिहिलंच तर पुरुषांनी लिहावं, असा अलिखित नियम. शृंगार आणि अश्लीलता याच्या सीमारेषेवर असलेलं हे काव्य एका स्त्रीने लिहावं हे म्हणूनच आगळंवेगळं ठरतं. राधा-कृष्णाच्या कथेने भल्याभल्यांना मोहात पाडले आहे. पण राधाकृष्णाची बहुतेक प्रेमकाव्ये कितीही सुंदर आणि शृंगारिक वर्णनांनी भरलेली असली तरी अखेरीस राधाकृष्णाचे मिलन म्हणजे; पुरुष आणि प्रकृतीचे मिलन, असा शोध लावून त्याला एकदम अध्यात्मिक रूप दिलं जातं. राधिका सांत्वनम् मध्ये कृष्ण आणि राधा, कृष्ण आणि या काव्यातील प्रेमत्रिकोणाचा तिसरा कोन- इला, यांचे नाते अगदी सर्वसाधारण स्त्रीपुरुषांसारखे रेखाटले आहे. आपली पार्श्वभूमी सांगून ही गणिका राधिकासांत्वनमची मुख्य कथा सुरू करते. राधा-कृष्णाच्या प्रणयलीला तर सगळ्यानाच माहीत आहेत. या काव्यातील प्रौढ राधा, तरुण कृष्णाचे आणि नुकत्याच यौवनात आलेल्या इलाचे लग्न लावून देते. कृष्ण इलेवर असा काही भाळतो की राधा रहाते बाजूला. आता राधेला पश्चात्ताप होतो. विरहाने पोळलेली राधा, कृष्णाला विनवून परत बोलवते. तो येतो. पण दुखावली गेलेली राधा त्याला फार महत्व देत नाही. त्याला राधेची आर्जवं करायला लागतात. तरीही राधा त्याला बधत नाही. मग कृष्ण आपले हुकूमी अस्त्र काढतो. आपल्या कामलीलांनी तिला घायाळ करतो, राधा पुन्हा आकृष्ट होते, दोघांचे मिलन होतं. इथे राधिकासांत्वन सुफळ संपूर्ण होतं, अशी ही काव्यरुप कथा. यातील दोन्ही नायिका अगदी मुद्दूपलनी सारख्याच आहेत. रुपगर्विता, हुशार तितक्याच हट्टी. इला नवथर तरुणी; तर राधा प्रौढ, प्रेमस्वरूप कृष्णसखी आणि दोघींचा नायक कृष्णसखा. पण सारा भर आहे तो ह्या दोन नायिकांच्या मनतरंगांवर. यातल्या दोन्ही नायिका कृष्णावर वर्चस्व गाजवणाऱ्या आहेत. प्रेमासाठी आसुसलेल्या आहेत. अनुभूती मोकळेपणानी व्यक्त करणाऱ्या आहेत. वयात येणे, विरह,असूया, प्रेम-द्वेष अशी भावनांची लपाछपी, असं बरंच काही हे काव्य उलगडून दाखवते आणि तेही एक स्त्रीच्या नजरेतून. हा नजारा थक्क करणारा आहे. हे शृंगारीक असलं तरी उत्कट आणि रसाळ काव्य आहे. या काव्याचा इंग्रजीतही अनुवाद झाला आहे. डॉ. शंतनू यांनी छंदोबद्ध भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. छंदोबद्ध असल्याशिवाय भाषांतर त्या काळातील वाटणारच नाही. मूळ छंद/वृत्त काय आहे याचा अंदाज अर्थातच इंग्लिश ओळी वाचून येत नाही. मग काही ओळी वाचायच्या, एखादी ओळ सुचेल तशी लिहायची आणि मग कारागिरी करत करत इतर ओळी जुळवायच्या; असा प्रकार करत भाषांतर केल्याचे मनोगतात लिहिले आहे. मराठीत हे सगळे काव्य लिहिताना पुणेरी भाषा वापरली असली,तरी त्यात दुर्बोधता नाही. अभंग, मंदाक्रांता, मालिनी, दिंडी, हरिभगिनी आणि लावणीसदृश ठेक्यात बसणाऱ्या काही चाली यात वापरल्या आहेत. काही ठिकाणी पद्यमय संवाद लिहिले आहेत. पुस्तक परिचय लिहिताना यातील काही ओळी उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. काव्याची सुरवातच राधेच्या बहारदार वर्णनाने होते. _थोरांनी नावाजली, गौरांगी सर्वांहुनी, शकुंतला, शुकभाषिणी, नंदाक्का राधा ही. आणि तिचे ते डोळे, नसते जर कृष्णकळे; का हरी कटाक्ष पुरे, चमकाया नयनदले?_ यानंतर षोडशा इलेचं वर्णन या शब्दांत _कृशांगा, नाजुकांगा, वेणीसंभार सोसवेना; मुखमोती दिव्य ज्योती, देवी इला, यौवना ही_ कृष्णावर भाळलेल्या इलाचे मनतरंग रेखाटताना म्हटले आहे- _लपंडावी डोळे झाकाया, फक्त मुरारी हवा इलेला. शिवशिवीचा खेळ रंगता,हिचे इशारे पळता पळता. नदीकिनारी साधून मौका, इला झोंबते हरीच्या अंगा. सदैव हरी-सह, हरीच सहचर, खेळ मिषे सुखस्पर्श अनावर. सख्यांस कौतुक सखिचे नवथर उधळून यौवन, धीट, खोडकर इला भाळली श्री कृष्णावर!_ कृष्ण आणि राधेचा प्रणय तिच्या नजरेतून सुटत नाही... _ओठ आरक्तही देता राधा, इला तुळीतसे ओष्ठ सौष्ठवा; दंतपंक्ती त्या सहज चमकता, फिके जाणी स्मित आपुले इला, शेजघरी ने कृष्णा, राधा; म्हणे ‘आले मी’, इला बाला!! मजेत हसती श्रीकृष्ण-राधा!_ राधेलाही इला मोठी होण्याची आतुरता, उत्सुकता आहेच... _कधी म्हणे विनोदे राधा, ‘ही मला सवत होई का?’ पण पाहताच इलेला, उरी उधाण ये मायेला, कुस्करी मग वारंवार, चुंबीते गोबरे गाल._ पण लग्नानंतर राधाने इलेला दिलेला संदेश आणि कृष्णाला दिलेला `दम` बहारदार आहे. इलेला संदेश _दे विश्वास अन् दे प्रोत्साहन. जाण असे तो प्रीत पुरुषोत्तम काम निपुण तो प्रेमिक उत्तम ...दे, कोमल तन, कोमल दे मन, प्रीत मनस्वी, तुझाच प्रीतम.’_ कृष्णाला `दम` _‘कठोर कांचन माझी काया, लता जणू ती, तनू कोमला, धिटाई हळू, बुजेल इला, सांभाळा तुम्ही गोपाळा!’_ काही ओळी मात्र आजही सर्वसामान्य पुरुषांनाही लागू पडतील की काय, इतक्या चपखल झाल्या आहेत. _नाही कशी मुळी लाज ;हवी मजा, वरती माज ; पुरूषांचे नीत्य काज ; बाईच्या मनीची आस कोणी ना पुसे त्यास_ चार भाग आणि ५८४ पदं असलेलं हे काव्य शृंगारीक असेलही, नव्हे आहेच. पण स्त्रीसन्मानाचा, प्रतिष्ठेचा आणि संवेदनशील मनाचा ठाव घेणारा तो एक ठेवा आहे. _इतिश्री शंतनूविरचितम् राधिका सांत्वनम् भावानुवादस्य केदारकृतपरिचयम् संपूर्णम् ...Read more

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/7120?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR06UVpU4k8DLSaBDkgmglzUuRMuX2XQ3OKxRAdL-tQo1-DZwHV7_Q3uLE4_aem_ATgHVeQrpR7vbtSsdHKWSXs5EHm0mPjS_5lEI-n3B5uorlbUPMjKGOX9doFKfROrOtk