* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PIKPANI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662061
  • Edition : 5
  • Publishing Year : AUGUST 1989
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 60
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"THIS POEM; A PETRICHOR IN ITSELF; THE FRAGRANCE OF SOIL, AFTER THE FIRST RAINS; SOIL, WHICH HAS IMMENSE WAYS OF INNOVATION; PEOPLE WHO ARE YET ATTACHED TO THIS VERY SOIL THROUGH THEIR CHORDS; THIS POEM EXPRESSES THEIR JOYS AND SORROWS IN A UNIQUE WAY; SOIL WHICH GIVES HUMANS ‘LIFE’; HUMAN, WHO SHAPES HIS LIFE OUT OF THIS VERY SOIL; THIS POEM CASTS LIGHT ON THE AGE-OLD RELATION BETWEEN SOIL AND MAN; THE LANGUAGE THAT IS MARATHI, WITH ITS MANY SIMILES AND METAPHORS; THIS POEM REACHES THE ROOTS OF THIS DIALECT; THE SPONTANEOUS REACTION OF MARATHI SOIL AND A MARATHI PERSON IS THIS POEM; LEAVING MARKS ON THE SOIL TO INDICATE THE PATH THAT WILL BE TAKEN BY TOMORROW’S MARATHI POETRY IS THIS POEM. "
"ग्रामीण काव्य, ग्रामीण साहित्य वगैरे प्रयोग साहित्याच्या जगात सतत होत असतात; पण मातीशी अशी एकरूपता, त्या अलैकिक भावावस्थेतून निर्माण झालेली प्रतिमासृष्टी, भाषेचा अस्सलपणा, मातीशी गुंतलेल्या जीवांच्या सुख-दुःखाच्या क्षणांची नेमक्या शब्दांतून केलेली अभिव्यक्ती, हे सारं कवीच्या कवितांमधून अनुभवताना आपली सुखदुःखं चित्रमय ओव्यांतून फिरत्या जात्याला सांगणाNया बहिणीबार्इंची आणि त्याच कुळातल्या असंख्य अज्ञात बहिणींच्या ओव्यांची आठवण येते, असे श्री. पु.ल.देशपांडे यांनी म्हटले आहे. रचनेतली सहजता आणि जिव्हाळ्याच्या बोलीभाषेत वाचकाशी साधला जाणारा संवाद यामुळे ही जाणीवपूर्वक केलेली काव्यरचना न वाटता अनुभवाच्या बीजातून सहज पुÂललेल्या कोंभासारखी वाटते. तिला एक प्रकारचं स्वयंभूपण लाभलेलं आहे. अंकुरासारखे ऊन-पाऊस-मातीच्या संयोगातून पुÂटावे तसे पुÂटलेले हे धुमारे प्रत्येक कवितेतून विखुरले आहेत. या अलग करून निवडायच्या प्रतिमा नसून, ती अखंड कविता हाच एक धुमारा आहे. संग्रहातल्या पहिल्या पाच कवितांतच कवीने पोटच्या पोरापेक्षा शेताला अधिक जपणाNया शेतकरी बापाचं अगदी थोड्या ओळींत इतवंÂ प्रभावी चित्र उभं केलं आहे जसं १. उभी वाळली धीपली । जुन्या खौंदाची खपली तसा बाप हाडकुळा । मातीवानी काळा काळा फाटकातुटका जरी । कुवतीनं लई भारी उभारून दोन्ही हात । देतो जगा आशीर्वाद ३. बाप तुडवितो । शेता घालाया कुपाटे टाच्या पंज्याला कुरूप । कसा टिकावा हुरूप असा अंगोपांगी उले । आग देहभर सले "
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#PIKPANI#POEMS#BHALERAO INDRAJEET#इंद्रजित भालेराव# पीकपाणी# माझ्या कवितेतला यावा# गोऱ्या कुंभारानं केला# शिवारमाथा# आलं आलं हे आभाळ# नाही नदी नाही नाला# मेरुमणी# सुकलेल्या ओढ्यामध्ये# रानभर माणसं# आखारीतल्या मातीला# कोळप्याची पास# कोण गेला पुण्यवंत# आस्सी आली लम्हाणीन# आखाड कोपला बाई# मला हवी आहे जमीन# उदासल्या बेटावर# व्हल्याच्या गळ्याला# बारोमास खळाळणारया# माझं तुटलं माहेर# गाव पांढरी ओस झालीय# गाडग्यात केला# मायबाई बहिणाई# गुज बोल गुज बोले# सर्वांनाच बांधता यावेत
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more