* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PAVITRAM
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984545
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 204
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 16 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A FICTION BY THE RENOWNED AUTHOR SWATI CHANDORKAR, UNFOLDS A LIFE-STYLE BEFORE US, GIVING US AN OPPORTUNITY TO GO THROUGH IT, FEEL IT AND PONDER OVER IT.THIS STORY TAKES PLACE IN A SMALL VILLAGE WHICH IS AWAY FROM THE PROGRESS OF THIS NEW WORLD. WITH ITS VERY FEW HOMES, THE ATMOSPHERE IN THIS VILLAGE IS QUITE A CONSERVATIVE ONE. THE TYPICAL VILLAGE CULTURE BASED ON THE CASTE SYSTEM IS SKETCHED HERE. DATTU PUJARI IS A YOUNG BRAHMIN WHO LIVES IN THIS VILLAGE WITH HIS MOTHER, WIFE AND THE ONLY SON. A PERSON WITH NOBLE THOUGHTS AND CONCERN FOR ALL TEACHES HIS WIFE THE ASPECTS OF HUMANITY. HE IS THE ONLY PERSON WHO IS ABLE TO PERFORM THE LAST RITUALS WHICH HE CONSIDERS TO BE VERY HOLY. FOR HIM, DEATH IS AS SACRED AND BLESSED AS BIRTH. HENCE, HE PERFORMS THESE RITUALS WHOLE HEARTEDLY. HE IS PAID VERY LESS FOR THESE SERVICES BUT YET PREFERS TO CARRY ON DOING WHAT IS RIGHTFUL ACCORDING TO HIM. THERE IS ONE SMALL TEMPLE OF LORD GANESHA IN THE VILLAGE, AFTER WHICH THE VILLAGE IS NAMED AS GANESHPUR. DATTU PERFORMS THE POOJA IN THIS TEMPLE AS WELL. THE REMAINING 4-5 BRAHMIN FAMILIES DO NOT APPROVE OF DATTU PERFORMING POOJA AS HE IS PERFORMING THE LAST RITUALS FOR ALL DEVOID OF CASTE AND RELIGION. THEY TELL HIM TO STOP OFFERING HIS SERVICES TO THOSE PEOPLE, WHICH HE REFUSES. HE BELIEVES THAT WHEN DEATH DOES NOT DIFFERENTIATE ON THE BASIS OF CASTE THEN WHY SHOULD HUMAN DO SO? THE OTHER BRAHMIN FAMILIES START CRITICIZING HIM AT EVERY CHANCE. THE PATIL OF THE VILLAGE IS A VERY GOOD PERSON AT HEART. THIS CHILDLESS PERSON CONSIDERS HIS VILLAGE AS HIS CHILD AND LOOKS LOVINGLY UPON THE VILLAGE. HE STRIVES HARD FOR THE BETTERMENT OF THE VILLAGE. WITH THE HELP OF DATTU HE IMPROVES THE VILLAGE SLOWLY AND STEADILY. ELECTRICITY, SCHOOL, HEALTH CLINIC AND MANY OTHER FACILITIES REACH THE VILLAGE WITH THE JOINT EFFORTS OF THE PATIL AND DATTU. BUT WITH THESE FACILITIES ALSO ENTER MANY PEOPLE IN THE VILLAGE. DATTU’S POOJA IN THE GANESH TEMPLE IS BANNED SYSTEMATICALLY. HE AND HIS FAMILY ARE IGNORED BY ALL. HIS ONLY SON STARTS HATING HIM. YET, DATTU DOES NOT STOP OFFERING HIS SERVICES. HE IS ON THE VERGE OF LOSING HIS ONLY SON. HIS CONSCIENCE DOES NOT LEAVE HIM THOUGH.HOW DOES HE FACE THE HUMILIATION? WHAT MAKES HIM STICK TO HIS PRINCIPLES?‘PAVITRAM’, A FACET OF MANKIND DESCRIBED LIKE NEVER BEFORE.
‘‘सोडून देतो माझं काम. पण जसे जन्म होत राहतात, तसेच मृत्यूही. मग त्या कलेवरांचं काय करायचं? कोण दशक्रिया करणार, अग्नि देणार? कारण ही कलेवरं जर अग्निरहित राहिली तर रोगराई पसरेल. प्रेत खालच्या जातीतलं की वरच्या ह्यानं काय फरक पडणार? सडताना जात दिसत नाही.’’ सगळे स्तब्ध झाले. दत्तू पुजारी शांतपणे उठला.... कालिंदी म्हणाली, ‘‘तुम्ही योग्य तेच केलंत. आत्तापर्यंत प्रत्येक शुभकार्यात मला टाळण्यात आलं. हीन वागणूक देण्यात आली. आता नदीपलीकडच्यांनीहीR मला टाळावं? शेवंताकडे बारसं होतं. मला नाही बोलावलं. ही एवढीशी होती शेवंता. जेव्हा हिला कावीळ झाली, वैद्यांकडून पानं, पुड्या रोज घेऊन जात होते. वैद्य त्या वस्तीत यायला तयार नव्हते की तिला इथे आणलेलं त्यांना चालत नव्हतं. त्यांनाही आता पवित्र-अपवित्र जाणवू लागलं?’’ दाराआडून ऐकणारा गोिंवदा मात्र दुखावला. जो त्रास वर्गातली मुलं आपल्याला देतात, तसाच त्रास ही मोठी माणसं आईबाबांनाही देतात? मग त्यांच्याजवळ तक्रार ती काय करायची? ही कथा अंत्येष्टिविधी करणाNया दत्तूची, होरपळलेल्या गोिंवदाची आणि समाजमनात वसलेल्या जातिपातींची, अपवित्राची!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more