* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NOBEL LALANA - PART 1
  • Availability : Available
  • ISBN : 9788190757423
  • Edition : 5
  • Publishing Year : NOVEMBER 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 212
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NOBEL PRIZE, THE HIGHEST CIVILIAN AWARD IN THE WORLD, HAS BEEN AWARDED EVERY YEAR, SINCE 1901, FOR THE OUTSTANDING ACHIEVEMENTS IN PHYSICS, CHEMISTRY, PHYSIOLOGY OR MEDICINE, LITERATURE AND FOR PEACE. THE NOBEL PRIZE IS AN INTERNATIONAL AWARD, ADMINISTERED BY THE NOBEL FOUNDATION IN STOCKHOLM, SWEDEN, IN MEMORY OF SIR ALFRED NOBEL, THE FOUNDER OF THE NOBEL PRIZE. EACH PRIZE CONSISTS OF A MEDAL, PERSONAL DIPLOMA, AND HARD CASH. THE NOBEL PRIZES ARE AWARDED IN ACCORDANCE WITH THE LAST WILL SIGNED BY ALFRED NOBEL ON NOVEMBER 27, 1895, IN PARIS. 35 OUT OF THE 801 ( ABOUT 4.4 % ) NOBEL PRIZES AWARDED TILL 2007, HAVE BEEN WON BY THE WOMEN. THESE 35 NOBEL PRIZES HAVE BEEN WON BY 34 WOMEN, AS MARIE CURRIE WON THE NOBEL PRIZE TWICE. ALTHOUGH 34 MAY APPEAR TO BE A SMALL FIGURE, CONSIDERING THE ENUMERABLE ODDS AGAINST WHICH THESE WOMEN HAD TO STRUGGLE AND THE IMPORTANCE OF THEIR WORK , THE REAL QUESTION WOULD BE WOW, HOW COME SO MANY? AND NOT WHY SO FEW HAVE WON THE AWARD SO FAR ?. NEVER BEFORE, SO FEW HAVE CONTRIBUTED, SO MUCH, UNDER SUCH TRYING CIRCUMSTANCES. EACH OF THESE 34 NOBEL WOMEN, HAS MADE IMMENSE CONTRIBUTION TO THE MANKIND BY THE VIRTUE OF HER SELFLESS, DEDICATED AND UNTIRING WORK, DESPITE UNSURMOUNTABLE ODDS. AS ENGRAVED ON THE NOBEL MEDAL ITSELF, THEY REALLY BETTERED LIFE ON THE EARTH. SO FAR, THERE WAS NO BOOK AVAILABLE IN ANY LANGUAGE, GIVING CONSOLIDATED DETAILS OF THE WORK DONE BY EACH OF THE 34 NOBEL WOMEN. NOT MANY KNOW ABOUT THESE 34 WOMEN, THE DIFFICULTIES THEY FACED AND THE IMMENSE CONTRIBUTIONS THEY MADE TO THE HUMANITY. COMMON KNOWLEDGE ABOUT THESE NOBEL WINNERS NORMALLY DOES NOT GO BEYOND A FEW LIKE MARIE CURIE, IRENE CURIE, PEARL BUCK AND MOTHER TERESA. THIS BOOK IS THE FIRST ATTEMPT TO BRIDGE THE WIDE GAP. A SINCERE ATTEMPT HAS BEEN MADE TO UNEARTH THE HIDDEN TREASURES IN THE LIVES OF THESE NOBEL WOMEN AND UNFOLD THE INTRICACIES OF THEIR STRUGGLES. IN FACT, THEY DID NOT WORK TO WIN THE NOBEL PRIZE, BUT THEY HONESTLY BELIEVED AND TRULY ENJOYED WORKING FOR THEIR CHOSEN CAUSE. THEIR DEDICATED, UNTIRING PERSEVERANCE WON THEM MANY ACCOLADES AND THE NOBEL PRIZE CAME THEIR WAY. THIS BOOK ATTEMPTS TO CAPTURE THE WORK OF EACH OF THE NOBEL WOMEN, ALONG WITH THEIR SOCIAL, POLITICAL, HISTORICAL AND ECONOMIC CIRCUMSTANCES PREVAILING THEM. OF THE 34 WOMEN 11 HAVE BEEN AWARDED THE NOBEL PRIZE FOR THEIR CONTRIBUTIONS IN THE FIELD OF SCIENCE. THIS BOOK BRINGS OUT HOW THEY WORKED DURING THE TIMES WHEN WOMEN WERE LOOKED DOWN, EVEN IN THE WESTERN COUNTRIES, WITH GREAT CONTEMPT AND SUSPICION ABOUT THEIR BASIC CAPABILITIES TO WORK IN THE SCIENTIFIC FIELDS WITH MATHEMATICAL & LOGICAL THINKING COMPETENCIES. THEY WERE DEPRIVED OF BASIC EDUCATION, RESEARCH AND FINANCIAL NEEDS. HOWEVER, DESPITE HEAVY ODDS, THEY STOOD OUT AND MADE SIGNIFICANT CONTRIBUTIONS, DEFINITELY BETTERING LIFE ON THE EARTH. OTHER 11 WOMEN HAVE BEEN AWARDED THE NOBEL PRIZE FOR THEIR CONTRIBUTIONS IN THE FIELD OF LITERATURE. MANY OF THEM DID NOT EVEN RECEIVE ANY PRIMARY EDUCATION. MANY FACED INNUMERABLE DIFFICULTIES AND VERY TRYING SITUATIONS TO OVERCOME ALL OBSTACLES DUE TO VARIOUS PREJUDICES AND DISCRIMINATIONS OF ALL KINDS. THIS BOOK DRAWS THEIR LIFE SKETCHES FOR THE BENEFIT OF THE PEOPLE TO DERIVE INSPIRATION FOR GOOD CAUSE. THE REMAINING 12 WOMEN HAVE BEEN AWARDED THE NOBEL PRIZE FOR THEIR CONTRIBUTIONS IN THE FIELD OF PEACE. THEY HAD TO WORK WITH GREAT COURAGE AGAINST TERRORISM, VIOLENCE AND BLOODBATH. THEY DID UNTIRING WORK IN SPITE OF MANY SETBACKS FOR THE HELPLESS AND DOWNTRODDEN OF THE MANKIND. THIS BOOK BRINGS OUT THEIR STRUGGLES FOR THE NEEDY AND DOWNTRODDEN, AGAINST THE INJUSTICE. THEY FOUGHT RELENTLESSLY, MANY TIMES EVEN DIRECTLY GOING ON THE BATTLE FIELDS. THEY NEVER LOST HOPES, NEVER GAVE UP, AGAINST DIFFICULT OBSTACLES. THEY WERE FULLY CONVINCED THAT LASTING PEACE CAN ONLY SAVE THE HUMANITY. THESE ARE 34 SELF RADIATING WOMEN, WHO WON THE NOBEL PRIZES BY VIRTUE OF THEIR NOBLE DEEDS. THEY STAND OUT THEIR, AS THE LIGHT HOUSES INSPIRING MANY OTHERS BY THEIR SELF RADIATING LIGHT. WHILE STUDYING THEIR LIFE SKETCHES THROUGH NUMEROUS NATIONAL AND INTERNATIONAL REFERENCES, I WAS TOTALLY ENGROSSED AND OVERWHELMINGLY IMPRESSED BY THESE GREAT WOMEN OF SUBSTANCE. THERE UPON, I FELT A VERY STRONG NEED TO BRING OUT THESE ADORING, SORE AND SWEET MEMORIES, HITHERTO UNKNOWN TO THE READERS AND THE DISCERNING CONNOISSEURS. IN THIS BOOK I HAVE MADE AN HONEST ATTEMPT TO CAPTURE AND BRING OUT THE GREAT WORK DONE BY THESE NOBEL WOMEN FOR THE PEOPLE. EVEN IF AT LEAST A FEW, ARE INSPIRED TO DO SOMETHING NOBLE, FOR THE BETTERMENT OF MANKIND, I WILL CALL THIS BOOK A REAL SUCCESS.
आपल्या अंतर्मनात लागलेल्या प्रकाशाच्या शोधाने उजळणाऱ्या या सर्व स्वप्रकाशरूपा. प्रत्येकीचे कार्यक्षेत्र वेगळे. परंतु कर्म हीच तृप्ती हा समाधानाचा मंत्र जपल्यामुळे आंतरिक शांती, आत्मविश्वास आणि आनंद त्यांतील प्रत्येकीलाच लाभलेला. जगातील सर्वोच्च समजला जाणारा नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला खरा; पण त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांकडे आणि ध्येयाकडे वाटचाल करणारा त्यांचा प्रवास कोणत्याही पुरस्काराच्या क्षितिजापार होता.
* खान्देशकन्या स्मिता पाटील साहित्य पुरस्कार २००९ * मीरा सिरसमकर यांना वीर महिला सौ. गीताबाई चारठाणकर पुरस्कार २०१०
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEERA SIRSAMKAR #SIR ALFRED NOBEL #MARIE PIERRE CURIE #BERTHA FELICITAS SOPHIE #FREIFRAU VON SUTTNER #JANE ADDAMS #SELMA OTTILIA LOVISA LAGERLOF #GRAZIA DELEDDA #SIGRID UNDSET #IRENE JOLIOT - CURIE #PEARL BUCK #GABRIELA MISTRAL #EMILY GREENR BALCH #GERTY CORI #NELLY SACHS #BETTY WILLIAMS #ALVA MYRDAL #AUNG SAN SUU KYI #TONY MORRISON #NOBEL LALANA - PART 1
Customer Reviews
  • Rating StarVijay Bhadane

    मी वाचलेले पुस्तक नोबेल ललना लेखिका :-- मीरा सिरसमकर प्रकाशक:--मेहता पब्लि.हाउस.पुणे ★★★★★★ तेजशलाका नोबेल ललना ग्रंथ संपदा भरपूर असलेल्या वाचनालयात एखादे जुने पुस्तक अचानक हाती पडते मात्र ते वाचनात आल्यावर काहीतरी ेगळे व सकस वाचल्याचा आनंद प्राप्त होतो.किस्त्रीम मासिकाच्या उपसंपादिका,लेखिका,कवयित्रीं,गणित,विज्ञान विषयतज्ञ श्रीमती मीरा सिरसमकर यांनी लिहिलेले व नोव्हेम्बर 2008 साली प्रकाशित झालेले " नोबेल ललना " हे अद्वितीय पुस्तक मला असाच वाचनानंद देउन गेले. जगदमान्य अशी ओळख असलेला अग्रमानांकित,सर्वश्रेष्ठ व सर्वोच्च असा नोबेल पुरस्कार विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याने प्राप्त झालेल्या जगातील 36 मान्यवर स्रियांवरील " नोबेल ललना" लेखिका मीरा सिरसमकर अतिशय परिश्रमपूर्वक लिहिला.सुरुवातीला 2006 पासून 2008 पर्यंत लेखिकेने स्त्री मासिकात लेखमाला या स्वरूपात काही नोबेल विजेत्या स्रियांची माहिती प्रसिद्ध केली.परंतु मेरी पीएर क्यूरी, त्यांची कन्या आयरिन क्यूरी,पर्ल बक,मदर तेरेसा या ज्ञात अशा मोजक्या नोबेल पारितोषिक विजेत्या व्यतिरिक्त उर्वरित सर्वच नोबेल विजेत्या स्रियांचे कार्यकर्तुत्व मराठी जनतेला ज्ञात व्हावे म्हणून लेखिकेने हे पुस्तक लिहिण्याचे ठरविले.त्यात अनेकांचे प्रोत्साहन,सहकार्य लाभले.लेखन करताना पाश्चिमात्य संदर्भ ग्रंथ वापरावे लागले.अहोरात्र वाचन,लेखन करत असताना इंटरनेटवरून माहिती गोळा करण्यात लेखिका व्यस्त होती.पाश्चिमात्य देशातील 1950 पूर्वीच्या सामाजिक,राजकीय संदर्भाचा अभ्यासमय उल्लेख या पुस्तकात आहे.त्या कालखंडात विविध क्षेत्रात अफाट कार्यकर्तुत्व केलेल्या या कर्तबगार महिलांच्या ज्ञानमय माहितीपट पुस्तकात शब्दबद्ध झाला आहे. आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःला झोकून देऊन,प्रतिकुलतेवर मात,करून,अविरत मेहनत घेउन आपले स्वप्न साकारणाऱ्या,ध्येय साध्य करणाऱ्या व त्यातून जगाचे कल्याण साधणाऱ्या या जिद्दी, बुद्धिवादी वीरांगनाचे कार्य इतके अमोल आहे की अनेकांना त्यापासून कृतीशीलतेची प्रेरणा,स्फूर्ती मिळावी. स्वीडनमधील स्टॉकहोम येथे 1833 साली दजन्मलेले जगदविख्यात रसायनशास्त्रज्ञ सर आल्फ्रेड नोबेल यांनी वैज्ञानिक संशोधनातून जी संपत्ती कमावली तिचा विनियोग नोबेल पारितोषिकात करण्याचे ठरविले.जगातील जात,धर्म,देश विरहित जे शास्रज्ञ,संशोधक,विचारवंत,साहित्यिक,शांतिदुत हे समस्त मानव जातीच्या विकास व कल्याणस्तव आपल्या क्षेत्रात भरीव कार्य करतील,त्यायोगे मानव जातीचा उद्धार होईल व वैश्विक बंधुभाव,सामंजस्य,शांतता प्रस्थापित होईल त्यांना दरवर्षी 10 डिसेंबर आल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीला हा पुरस्कार प्रदान केला जातो.रसायनशास्त्र,भौतिक शास्त्र,वैद्यकीय, शरीर शास्त्र,साहित्य,शांतता,व अर्थशास्त्र या क्षेत्रात अतुलनीय कार्य केलेल्यांना नोबेल पुरस्कार दिला जातो.2008 पर्यंत जगातील ज्या 36 महिलांना हा नोबेल पुरस्कार प्रदान झाला आहे त्यांची ओळख व त्यांनी केलेले कार्य त्याचा समावेश या पुस्तकात झाला आहे. विजय रघुनाथ भदाणे नाशिक ...Read more

  • Rating Starसौ. आभा राजेन्द्र घाणेकर, बुरुमतळी

    नोबेल ललना हे आपलं पुस्तक वाचून धन्य वाटलं. हे पुस्तक लिहिताना तुम्ही किती वाचलं असेल? अनेक ठिकाणांहून माहिती कशी मिळवली असेल? असे प्रश्न पडले. सह्याद्री वाहिनीवर तुमची मुलाखत पाहिली, ऐकली. हे पुस्तक लिहिण्यासाठी जे कष्ट घेतले ते अनमोल आहेत. या सगळया नोबेल ललनांचं कार्य-कर्तृत्व वाचून, मुख्यत: या पुस्तक लिखाणासाठी आपण घेतलेले कष्ट पाहून मनाला उभारी मिळाली. एक संदर्भ ग्रंथ म्हणून `नोबेल ललना` महत्त्वाचे आहे. ...Read more

  • Rating Starजया साहेबराव वाघमारे, अमरावती

    `नोबेल ललना` हे स्फूर्ती देणारे मूर्तिमंत असे आदर्श पुस्तक आहे. त्याहीपेक्षा पुस्तकातील शब्दरचना ही थेट हृदयाला स्पर्श करून स्फूर्ती देते. एक जगण्याची जिद्द, आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याची प्रेरणा यातून मिळते. पुरस्कार प्राप्त स्त्रियांनी जी काही ेहनत घेतली त्याचे इतके सूक्ष्म अध्ययन तुम्ही केलेत, त्याचेच मला आश्चर्य वाटते. ह्या स्त्रियांना इतके जवळून पाहताना मला मी स्त्री असल्याचा अभिमान वाटतो. मला कथा-कादंबऱ्यांपेक्षाही वास्तववादी व सत्य घटनांवरील पुस्तके वाचायला फार आवडते. कल्पनेत रमत बसण्यापेक्षाही वास्तवाचा सामना करायला व वास्तव जाणून घ्यायला मला फार आवडते. येणाऱ्या अनेक पिढ्यांना तुमच्या पुस्तकाचे वाचन करण्याचे भाग्य लाभो हीच देवा चरणी प्रार्थना करते. ...Read more

  • Rating Starसौ. विनया वाळिंबे, पुणे

    सौ. मीरा सिरसमकर यांनी नोबेल ललना हे पुस्तक अत्यंत नीटनेटके लिहिले असून आकर्षक आहे.

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more