* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NIRBACHIT KABITA
  • Availability : Available
  • Translators : MRUNALINI GADKARI
  • ISBN : 9788177660306
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :TASLIMA NASREEN COMBO SET - 12 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A YOUNG LADY WHO WANTS TO BE A POET WRITES ROMANTIC POEMS BASED ON LOVE OR SADNESS IN LIFE. BUT TASLIMA IS DIFFERENT. AT THE SAME AGE, SHE WRITES ABOUT THE INEQUALITY AND DIFFERENCE IN THE LIFE OF MAN AND WOMAN. SHE WRITES ABOUT THE DECEIT IN THE NAME OF LOVE. SHE MENTIONS THE LUST IN RETURN OF TRUE LOVE. SHE THROWS A LIGHT ON THE DISDAIN IN RETURN OF SELFSURRENDER. HER POETRY IS BASED ON THESE TOPICS. SHE DOES NOT WRITE TO GAIN NAME AND FAME BUT SHE WRITES TO PROTEST THE WOMEN WHO HAVE BEEN SHUT UP BY THE SOCIETY. SHE WRITES WITH JUST ONE AIM, TO BRING EQUALITY TO MEN AND WOMEN. HER POEMS DO NOT SHOW ANY BITTERNESS, OPPOSITION OR HATRED. THEY HAVE PAIN, THEY HAVE DIGNITY, THEY ARE HUNGRY FOR LOVE MUCH HAVE BEEN WRITTEN ABOUT THE DECEIT THAT A WOMEN FACES, THE MALE CHAUVINISM, BUT TASLIMA`S BLUNTNESS IS NOT SEEN IN ANY OF THOSE POETRIES OR BOOKS. SHE VERY TRUTHFULLY WRITES ABOUT THE TORTURE THAT SHE WAS SUBJECTED TO IN A VERY ARTISTIC AND PERFECT LANGUAGE.
कवयित्री म्हणून नावलौकिक मिळवू इच्छिणारी युवती ज्या वयात गुलाबी प्रेमाच्या किंवा दु:ख व्यक्त करणाया अत्यंत रोमँटिक अशा कविता लिहील, त्या वयात तसलिमा नासरिन स्त्रीपुरुषांच्या जीवनांतील असमानता, प्रेमाच्या नावावर होणारी प्रतारणा, निखळ प्रेमाच्या बदल्यात मिळणारी भोगलालसा, आत्मसमर्पणाच्या बदल्यात वाट्याला येणारी अवहेलना अशांसारख्या विषयांवर कविता लिहिते. ‘अतले अन्तरीण’ किंवा ‘बालिकार गोल्लाछुट’ ह्यांतील कविता वाचल्यावर आपल्या लक्षात येते, की तसलिमा केवळ नावलौकिकाच्या लोभाने हातात लेखणी धरीत नाही, तर अतिशय सहिष्णू असणा-या आणि ज्यांचा आवाजच दाबून टाकला गेला आहे, अशा स्त्रीजातीच्या बाजूने उभी राहून, ती समाजाच्या विरोधात आपला निषेध नोंदविते, आपल्या कवितांमधून. स्त्रीपुरुषांत समानता आणणे हेच तिचे लक्ष्य आहे. ह्या लक्ष्यासाठीच तिला हातात लेखणी धरावी लागली आहे. असे असूनही तिच्या कवितेत फक्त संताप, विरोध किंवा कडवटपणा नाही. उलट, काही कवितांत वेदना आहे, काहींत आत्मसन्मानाची भावना आहे, तर काहींमध्ये प्रेमासाठी व्याकुळता आहे. जरी ती आपल्या एका कवितेत म्हणते, ‘पाहून पुरुषाची पराकोटीची अश्लीलता जळते मनातल्या मनात नरकाच्या आगीत पतिव्रता साध्वी स्त्री.’ तरी दुसया एका कवितेत ती म्हणून जाते, ‘एकदा जरी घातली साद एकदा प्रेम केल्यावर सर्व विसरून आसू ढाळते निष्पाप पोर.’ स्त्रीच्या वाट्याला येणारी फसवणूक आणि पुरुषांचे तिच्यावर असलेले वर्चस्व ह्यांसारख्या विषयांवर ह्याआधी काही कथा, कविता लिहिल्या गेल्या असल्या, तरी तसलिमाप्रमाणे अगदी उघडपणे, स्पष्टपणे कोणीही लिहिलेले नाही. स्वत:च्या शरीरावर झालेल्या अत्याचारांच्या कथा तिच्याइतक्या समर्पक शब्दांत, कलात्मक भाषेत कोणीही मांडलेल्या नाहीत, हेच तर आहे तिचे वेगळेपण.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TASLIMANASRIN #PHERA #NIRBACHITKALAM #NIRBACHI #LEENASOHONI #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOKS #MARATHIBOOKS#
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    परवा पुस्तकांच्या शोधात तसलिमा नासरिनचा काव्यसंग्रह ‘निर्बाचित कविता’ हाती आला. माझ्याकडे तिची सर्व पुस्तके तिच्या सहीने भेट मिळालेली आहेत, पण याच एका पुस्तकावर मात्र तिने स्वहस्ताक्षरात `With Love` अशी मोहर उठविलेली आहे. याचा इतकाच अर्थ आहे की, ते तचे आवडते पुस्तक आहे, बाकी काही नाही. ‘निर्बाचित’ शब्द बंगाली. मराठीत त्याचा अर्थ होतो ‘निवडक’. सन १९८० च्या सुमारास त्या कविता लिहू लागल्या. १९८२-१९९३ या दशकांत त्यांचे सहा काव्यसंग्रह प्रकाशित झाले. त्यांचे समग्र साहित्य म्हणजे स्त्रीत्वाचा घेतलेला शोध होय. तशाच कविताही! काहींना त्या पुरुषविरोधी वाटतात. वाटतं त्या सतत पुरुषास आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करतात. पण वस्तुस्थिती अशी आहे की, आजवर पुरुषाने स्त्रीस वस्तू, पशू, उपभोगाचे साधन म्हणून तिच्याकडे पाहिले आहे. तिची कविता स्त्रीस मनुष्य बनविण्याची विनवणी नसून मागणी आहे. तो जोगवा खचितच नाही. असेल तर अन्यायाला फोडलेली वाचा आहे नि ती स्त्री हक्काचा जाहीरनामा आहे. तो पुरुषी मानसिकतेविरुद्ध स्त्रीने पुकारलेला जिहाद आहे. ‘निर्बाचित कविता’ (१९९३) शिवाय ‘निर्बासित बहिरे अंतर’ (१९८९), ‘आमार किछु जाय असे ना’ (१९९०), ‘अतले अंतरिण’ (१९९०), ‘बलिकार गोल्लाछूट’ (१९९२) असे अन्य कवितासंग्रह आहे. प्रतिनिधिक कवितासंग्रह म्हणून ‘निर्बाचित कविता’ चे महत्त्व असून, प्रसिद्ध बंगाली मराठी अनुवादक मृणालिनी गडकरी यांनी या कवितांचा समर्पक मराठी अनुवाद केला आहे. या सर्व कवितांमधून स्त्रीची तगमग स्पष्ट होते. स्त्रियांवर होणारे अन्याय, स्त्रियांची होणारी प्रतारणा, कुचंबणा, घुसमट बंधने या सर्वांना या कवितांमधून वाचा फोडण्यात आल्याने सर्व स्त्रियांनी या कविता वाचायला हव्यात. ज्याला पुरुषाने स्त्री सुखाची संज्ञा दिली ते सुख नसून मतलबी शोषण आहे, याची जाणीव या कविता करून देतात. पुरुषांना त्या आपल्या अपराधांबद्दल अंतर्मुख करतात. म्हणून त्यांनी पण वाचल्याच पाहिजे अशा उभयपक्षी वाचन व्यवहारातूनच स्त्री-पुरुष ऐकमेकांना मनुष्य मानून व्यवहार करणार, करतील अशी आशा करीत तसलिमा नासरिन यांनी त्या लिहिल्यात, त्या विचारतात - ‘एखाद्याच्या सहवासात संबंध आयुष्य घालविलं, तरी खंरच माणूस ओळखता येतो का?’ ‘शुभ विवाह’ कवितेत त्या समजावतात विवाहाच्या नावावर हिडीस पुरुष एका जिवावर कब्जा मिळतात नि तिनं सोनेरी मेणबत्तीसारखं प्रेमात विरघळून जावं अशी अपेक्षा करतात. व त्यांची अपेक्षा असते स्त्रीनं पातिव्रत्य राखावं. पुरुषी पातिव्रत्याची हमी नाही का मागायची स्त्रीनं? सर्व पुरुष सभ्यच असतात, त्यांना नाही लागत पातिव्रत्याची सनद. पुरुषांनी स्त्रीला हरतऱ्हेने दुबळी करून ठेवले आहे. तिने मैदान ओलांडायचं नाही. तिने तळ्यात पोहायचं नाही. तिनं एकटीनं उंबरा ओलांडायचा नाही. तिला नाही का वाटत....चांदण्यात फिरावं, नौकाविहार करावा, पावसात भिजावं.... पण नाही. ती नाजूक, तिला सर्दी, तिलाच ताप. क्षणासाठी घराचा उंबरठा ओलांडू देत नाही कोणी स्वप्नात नाही तर जागेपणीच पहाते, विषारी साप, सुरवंट,राक्षसाचं घर आणि रानटी रेडा समाजात स्त्रीला घेरणारा फक्त पुरुष नाही. समजांनी तिच्याभोवती जात, धर्म, लिंग, भाषा, प्रांत अशी कितीतरी काटेरी कुंपणं उभा केलीत. शिवाय देवे, दैव भविष्याचं ललाट लेख सटवाईने लिहून ठेवलेले नि कर्म म्हणून आलेले ते वेगळेच. म्हणून ती प्रश्न करते - धर्मानं आवळलंय आपल्या पंजात अवघ्या जगाला एकानं विरोध करून किती मोडणार हाडं? आणि दूरवर पसरलेलं हे विषमतेचं जाळं, कितीसं तुटणार? फाटणार? स्त्री सौख्याची भुकेली असते. लक्ष लक्ष स्वप्नं उरी सांभाळत ती बोहल्यावर चढते. तीन दिवसांत हाका मारण्याचा प्रसंग येतो, नि अवघ्या तीन महिन्यांत तिनं सर्वस्व गमावलेलं असतं - स्त्रीला फसवून भोगल्याशिवाय, भोगाची तृप्ती नाही, तृप्तीचा सुवासिक ढेकर नाही भोगपूर्ण समाजानं स्त्रीचं विरुप वेश्या रुपात परिवर्तीत करून टाकलं. वेश्या फक्त स्त्रीच असते - सगळ्या वेश्या स्त्रियाच असतात, पुरुष कधीही वेश्या नसतात. अंस जळजळीत अंजन डोळ्यात घालणाऱ्या कविता आपणास आतून, बाहेरून उसवतात; विचार करायला भाग पाडतात आणि स्त्रीस माणूस म्हणून स्वीकारण्याचा संस्कार देतात म्हणून त्या वाचायच्या. पुरुषांना परकाया प्रवेश करण्यास भाग पाडणाऱ्या या कविता स्त्रीस तिचं सामाजिक स्थान दाखवून भानावर आणतात. जगात आजवर अनेक कवी, लेखक, कलाकार, विचारक यांनी असे मूलभूत प्रश्न विचारले नि समजांनी त्यांना बहिष्कृत ठरवलं. पूर्वी गॅलिलिओ, सॉक्रेटिसच्या पदरी तुरुंगवास, विष प्रयोग, क्षमायाचना त्यांच्या पदरी आली. आज अशांना बहिष्कृतांचं जीवन जगावं लागत आहे. तसलिमा नासरिन मूळ बांगला देशी. त्यांचं लेखन धर्मविरोधी मानलं गेलं नि त्यांना आपला देश सोडून युरोप, अमेरिकेत राहावं लागलं. सध्या त्या ‘बहिष्कृत’ विस्थापित होऊन भारताच्या आश्रयाखाली सुरक्षित जीवन जगत असल्या तरी एकटेपणा खायला उठतोय. मध्यंतरी त्यांना मानसोपचाराची गरज निर्माण झाली होती. दर तीन-पाच वर्षांनी त्यांना देशाकडे आश्रयासाठी याचना करावी लागते. जग प्रगल्भ केव्हा होणार? विचार स्वातंत्र्य केव्हा अजरामर होणार? जात, धर्म, लिंग, निरपेक्ष समाज मानव समाज, मानवधर्म कसा अवतरणार असा प्रश्न करणारी ही कवयित्री कवितांतून माणसांच्या मनात खरं तर ठाव घेऊ इच्छिते - पण नाही थांग एकाला दुसऱ्याच्या मनाचा, कोणाचं मन भराऱ्या मारतं, तर कोणाचा जणू बंद पिंजरा, कोणी झोपतं, तर कोणाला पडतो प्रश्न, झोपलेली रात्र सरायची कशी? ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 16-12-2001

    कवयित्री म्हणून नावलौकिक मिळवू इच्छिणारी युवती ज्या वयात गुलाबी प्रेमाच्या किंवा अत्यंत रोमँटिक अशा दु:ख व्यक्त करणाऱ्या कविता लिहिली, त्या वयात तसलिमा नासरीन स्त्री-पुरुषांच्या जीवनातील असमानता, प्रेमाच्या नावावर होणारी प्रतारणा, निखळ प्रेमाच्या बदलयात मिळणारी भोगलालसा आत्मसमर्पणाच्या बदलात वाट्याला येणारी अवहेलना अशासारख्या विषयांवर कविता लिहिते. ‘अतले अन्तरीण’ किंवा ‘बालिकार गोल्लाछुट’ यातील कविता वाचल्यावर आपल्या लक्षात येते की, तसलिमा केवळ नावलौकिकाच्या लोभाने हातात लेखणी धरीत नाही, तर अतिशय सहिष्णू असणाऱ्या आणि ज्यांचा आवाजच दाबून टाकला गेला आहे, अशा स्त्री जातीच्या बाजूने उभी राहून, ती समाजाच्या विरोधात आपला निषेध नोंदविते, आपल्या कवितांमधून, स्त्री-पुरुषांत समानता आणणे हेच तिचे लक्ष्य आहे. या लक्ष्यासाठीच तिला हातात लेखणी धरावी लागली आहे. असे असूनही तिच्या कवितेत फक्त संताप, विरोध किंवा कडवटपणा नाही. उलट काही कवितांत वेदना आहे, काहीत आत्मसन्मानाची भावना आहे, तर काहींमध्ये प्रेमासाठी व्याकुळता आहे. जरी ती आपल्या एका कवितेत म्हणते, ‘पाहून पुरुषाची पराकोटीची अश्लीलता जळते मनातल्या मनात नरकाच्या आगीत पतिव्रता साध्वी स्त्री. तरी दुसऱ्या एका कवितेत ती म्हणून जाते. एकदा जरी घातली साद एकदा प्रेम केल्यावर सर्व विसरून आसू ढाळते निष्पाप पोर स्त्रीच्या वाट्याला येणारी फसवणूक आणि पुरुषांचे तिच्यावर असलेले वर्चस्व यांसारख्या विषयांवर याआधी काही कथा, कविता लिहिल्या गेल्या असल्या तरी तसलिमाप्रमाणे अगदी उघडपणे, स्पष्टपणे कोणीही लिहिलेले नाही. स्वत:च्या शरीरावर झालेल्या अत्याचारांच्या कथा तिच्याइतक्या समर्पक शब्दांत, कलात्मक भाषेत कोणीही मांडलेल्या नाहीत, हेच तर आहे तिचे वेगळेपण. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 14-10-2001

    स्त्रीवादी लेखिका-कवयित्री म्हणून तस्लिमा नासरिनची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. धर्मांध मुस्लिमांविरुद्ध त्यांनी पुकारलेल्या लढ्यांमुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यांचा ‘निर्बाचित कविता’ हा १९९३मध्ये प्रकाशित झालेला कवितासंग्रह मृणालिनीगडकरी यांनी अनुवादित केला आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरूनच घराच्या चौकटीत बंधनात असलेली स्त्री हा कवितांचा विषय असल्याचे ध्यानात येते. स्त्री-सौख्य या कवितेत पुरुषाची स्त्रीशी ओळख झाल्यापासून तिचा उपभोग घेईपर्यंत प्रवास किती झपाट्याने होतो आणि प्रत्येक स्त्रीकडे उपभोग्य विषय म्हणूनच पाहिले जाते याविषयी संताप आहे. चाकोरी या कवितेत मर्यादांची चाकोरी सोडून पळून जाण्याची उर्मी येते. हातापायात बेडी असली तरी मनाला मात्र कुणी बेडी घालू शकत नाही याचे समाधान सोन्याची बेडीमध्ये आहे. ‘अभिमान’, ‘शरीरशास्त्र’, ‘स्वाद’, ‘पाणीच पाणी’, ‘प्रफुल्लचं घर’, अशा कवितांमधून तिचे अस्वस्थ मन, फाळणीचे विदारक वास्तव व्यक्त होते. यांतील कवितांमध्ये संताप, विरोध जसा आहे तसा स्त्रियांच्या सोशिकपणावरही ती हल्ला चढवते. ...Read more

  • Rating StarSAMANA 14-10-2001

    निर्बाचित कविता… स्त्रीवादी लेखिका-कवयित्री म्हणून तस्लिमा नसरीनची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. धर्मांध मुस्लिमांविरुद्ध त्यांनी पुकारलेल्या लढ्यांमुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यांचा ‘निर्वाचित कविता’ हा १९९३ मध्ये प्रकाशित झालेला कवतासंग्रह मृणालिनी गडकरी यांनी अनुवादित केला आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरूनच घराच्या चौकटीत बंधनात असलेली स्त्री हा कवितांचा विषय असल्याचे ध्यानात येते. स्त्री-सौख्य या कवितेत पुरुषाची स्त्रीशी ओळख झाल्यापासून तिचा उपभोग घेईपर्यंत प्रवास किती झपाट्याने होतो आणि प्रत्येक स्त्रीकडे उपभोग्य विषय म्हणूनच पाहिले जाते याविषयी संताप आहे. चाकोरी या कवितेत मर्यादांची चाकोरी सोडून पळून जाण्याची उर्मी येते. हातापायात बेडी असली तरी मनाला मात्र कुणी बेडी घालू शकत नाही याचे समाधान सोन्याची बेडीमध्ये आहे. ‘अभिमान’, ‘शरीरशास्त्र’, ‘स्वाद’, ‘पाणीच पाणी’, ‘प्रफुल्लचं घर’ अशा कवितांमधून तिचे अस्वस्थ मन, फाळणीचे विदारक वास्तव व्यक्त होते. यांतील कवितांमध्ये संताप, विरोध जसा आहे तसा स्त्रियांच्या सोशिकपणावरही ती हल्ला चढवते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more