* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NEELKANTH
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983302
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
STORIES REVEALING THE INTERWOVEN FEELINGS OF MEN, WOMEN AND DESTINY, ALL ALIKE, YET EACH ONE UNIQUE IN HIS OR HER OWN WAY. SPLENDID COLOURS OF THE COMPLICATED RELATIONS BETWEEN HIS AND HER. WE MEET SO MANY PEOPLE WHILE WE ARE TRUDGING ALONG THE PATH OF LIFE. MOST OF THE TIMES, IT IS DIFFICULT TO PENETRATE DEEP INTO THEIR MINDS, BENEATH THEIR PLAIN OR EXPRESSIVE FACES. THE RELATIONS BETWEEN HUMAN BEINGS ARE VARIED AND KNOTTY, AT MOMENTS, THORNY TOO. EACH ONE REFLECTS A DIFFERENT STYLE OF LIVING AND BEHAVING. THE SHOW OF FEELINGS AND THE REACTIONS IN ANSWER DISCLOSE LOTS OF RIPPLE ON MINDS. THIS BOOK AND THE WONDERFUL STORIES PRESENTS ALL THESE INTRICACIES OF LIFE FOR OUR PERUSAL. THE BASE OF IT IS THE RELATION BETWEEN A MAN AND A WOMAN, SUPERB YET THE MOST TRICKY, DEMANDING, CHALLENGING, AND YET AWKWARD AT TIMES. ‘LOVE’, JUST A WORD, BUT THE FEELINGS THAT IS REFLECTS HAVE END NUMBER OF SHADES. ‘LIFE’, ALL STUCK IN THE TRICKY AND COMPLEX MAZE OF DESTINY AND A HUMAN LIFE DEEP DOWN IN IT TOO. THE AUTHOR HAS IMMENSE SKILLS, SHE HAS AN OBSERVANT EYE, SHE HAS COLLECTED THESE VARIOUS SHADES, ASSORTED THEM AND THEN PRESENTED THEM ALL IN HER SKILLFUL HAND. SHE HAS SUCCEEDED IN COMBINING THE WORDS AND THE FEELINGS. EACH OF HER STORY INCREASES OUR INTEREST TO SUCH AN EXTENT THAT IT BECOMES IMPOSSIBLE TO KEEP THE BOOK DOWN TILL THE END. THESE STORIES WILL GIVE YOU A SERENITY, THESE WILL MAKE YOU WONDER ABOUT THE HUMAN NATURE AS WELL.
जीवनप्रवासाच्या नानाविध वाटांवर कित्येक माणसं भेटतात. निव्वळ चेह-यावरून तळातला खळाळ हाती लागणं तसं कठीणच! व्यक्ती-व्यक्तींमधले परस्परसंबंध, त्यांच्या वागण्याच्या विलक्षण त-हा, भावनांचे कंगोरे आणि कळत-नकळत उफाळणारे तरंग या सा-याचा मनोज्ञ वेध नीलकंठ कथासंग्रहातून प्रतीत होत राहतो. कायमचं अगम्य असं स्त्री-पुरुष नातं! प्रेम हा एकच शब्द, पण त्याच्याही अनंत छटा! नियतीच्या भोव-यात गटांगळ्या खाणारं आयुष्य आणि त्यात अडकलेलं अवघं मनुष्यजीवन! अशी सगळी घट्ट वीण अलवार उसवून दाखवण्याची लेखिकेची देखणी धडपड चैती, बळीचं तळं, वादळ, मेड फॉर इच अदर यांसारख्या कथांमधून जाणवत राहते. उत्कंठा जागवणा-या, आतला तळ ढवळून टाकणा-या, भ्रम आणि वास्तव यांच्या सीमारेषेवर रेंगाळायला लावणा-या या कथा म्हणजे एक तरल अनुभूती!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarSrikant Birajdar

    अप्रतिम पुस्तक

  • Rating StarLOKPRABHA 25-01-2019

    स्री-पुरुष आणि नियती यांचे रंग दाखवणाऱ्या कथा... ‘नीलकंठ’ या पुस्तकामध्ये स्नेहल जोशी यांनी तब्बल १७ कथा लिहिल्या आहेत. ‘नीलकंठ’, ‘चैती’, ‘एक सशा’, ‘फ्रॉड’, ‘अ‍ॅना कॅरनिना’, ‘किस्मत’, ‘भूक’, ‘बहिणी’, ‘रान्देव्ह्यू’, ‘वादळ’, ‘जाऐ तो जाए कहाँ’, ‘मेड फर इच अदर’, ‘रखवाली’, ‘बळीचं तळ’, ‘एक बुचाचे झाड’, ‘शंखशिंपल्यांची बाहुली’, ‘इंद्रधनूच्या बेटावरील डोडो’ इत्यादी. ‘स्त्री-पुरुष नात्यातले काही न सांगितले गेलेले, न बोलले गेलेले पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न स्नेहल जोशी यांनी केला आहे. त्यांच्या सर्वच कथांच्या नायिका या कुठल्या अर्थी नियतीला शरण गेलेल्या आहेत. ‘नीलकंठ’, ‘चैती’, ‘जाऐ तो जाऐ कहाँ’, रान्देव्ह्यू’ या कथांमध्ये नात्यांतला एक वेगळा अनुबंध दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर ‘एक सशा’, ‘फ्रॉड’, ‘अ‍ॅना कॅरनिना’, ‘किस्मत’, ‘भूक’, ‘बहिणी’, ‘वादळ’, ‘मेड फॉर इच अदर’, ‘रखवाली’, ‘बळीचं तळं’, एक बुचाचे झाड’, ‘शंखशिंपल्यांची बाहुली’, ‘इंद्रधनूच्या बेटावरील डोडो’ या साऱ्या कथांमध्ये मनुष्यवासनेची वेगवेगळी रूपे आपल्याला हैराण करतात. ...Read more

  • Rating Starभालचंद्र लेले

    उत्तम कथासंग्रह … आपला ‘नीलकंठ’ कथासंग्रह वाचनांत आला. या सर्वच कथा, आतापर्यंत न स्पर्श झालेल्या विषयांच्या आहेत. मांडणी अतिशय वाचनीय आहे. सर्व कथा काल्पनिक आहेत असे वाटतच नाही. प्रत्येक कथेचा विषयविस्तार सहजतेने उतरला आहे. त्यातील फ्रॉड, अ‍ॅना कॅरनना, भूक, बहिणी, रान्देव्हु, मेड फॉर..., रखवाली (या जमान्यातील पुरुष व्यथा), बळीचं तळे या कथा विशेष आवडल्या. आतापर्यंत अनेक कथा वाचनांत आल्या. पण श्री. शं.ना. नवरे यांच्या कथांना जसा अकल्पनीय विस्तार असतो त्याचप्रमाणे मानवी मनाची स्पंदने केव्हा कशी वळणे घेतील हे सांगता येत नाही व कळतही नाही. प्रत्येक कथा वाचनीय तर आहेच अशा कथा या अगोदर वाचनांत कधीही आलेल्या नाहीत. मुळात कथालेखन करणारेच कमी झाले आहेत आणि कथांची निवड करणे, मगच त्याचे वाचनमूल्य ओळखून कथासंग्रह काढणारे प्रकाशकही दुर्मिळ झाले आहेत. खूप वर्षांनी उत्तम कथासंग्रह वाचावयास मिळाला. मन:पूर्वक धन्यवाद. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more