* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WANDER WOMAN
  • Availability : Available
  • Translators : SUMITA BORSE
  • ISBN : 9788184986211
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 239
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AFTER YEARS OF COACHING HIGH-ACHIEVING WOMEN, MASTER COACH AND PERSONAL DEVELOPMENT EXPERT MARCIA REYNOLDS STARTED NOTICING SOMETHING TROUBLING: MANY OF THE CLIENTS WITH WHOM SHE WORKED WERE PLAGUED BY ANXIETY OVER THEIR OWN RESTLESS RESPONSES TO THE WORLD. THESE WOMEN WERE JUMPING JOBS REGULARLY, DEFINING AND REDEFINING THEIR RELATIONSHIP WITH THE MARKETPLACE, CONSTANTLY QUESTIONING THEIR ROLES AS WIVES AND MOTHERS AND SISTERS. DUBBING HER SUBJECTS "WANDER WOMEN," REYNOLDS FOUND THAT THE MENTORING AND PERSONAL DEVELOPMENT RESOURCES CURRENTLY AVAILABLE DON`T ADDRESS THIS AUDIENCE`S NEEDS. THEY DON`T WANT TO BALANCE THEIR LIVES; THEY WANT TO FIND PEACE OF MIND IN THE CHAOS. THEY DON`T NECESSARILY WANT TO LEARN HOW TO GAIN A SEAT IN THE BOARDROOM; THEY WANT PROJECTS THEY CAN RUN WITH OR BUSINESSES THEY CAN RUN ON THEIR OWN. THE PROBLEM ISN`T THEIR LEVEL OF STRESS; IT`S ABOUT KNOWING WHO THEY ARE AND WHAT THEY WANT TO ACCOMPLISH IN THIS ONE LIFETIME. WANDER WOMAN EXPLORES HOW GENERATIONAL SHIFTS AND CHANGING EXPECTATIONS OF WORKING WOMEN HAVE FOSTERED A NEW KIND OF RESTLESSNESS AMONG MANY. THROUGH REAL-LIFE STORIES SHE REVEALS THE HOPES AND DREAMS, DISAPPOINTMENTS AND CHALLENGES THIS GROUP OF HIGH-ACHIEVING WOMEN ARE FACING. AND, MOST IMPORTANTLY, SHE PROVIDES EXERCISES AND DEVELOPMENT STRATEGIES FOR READERS AS THEY MAKE THEIR JOURNEY TO PEACE AND FINALLY COME TO REST WITH A STRONG SENSE OF IDENTITY AND PURPOSE.
या प्रश्नांचा शोध घेताना मार्शिया यांच्या असं लक्षात आलं की, मुळातच या स्त्रिया त्यांच्या आत अशांत असल्याने त्या आतल्या कोलाहलातच धडपडत राहतात. त्यामुळे त्यांच्या तणावाचं व्यवस्थापन हा मुख्य प्रश्न नसून त्या कोण आहेत, आणि त्यांना आयुष्यात काय करायचं आहे, हे प्रश्न त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. या शोधातूनच या पुस्तकाची र्नििमती झाली आहे. या पुस्तकामध्ये अशा स्त्रियांच्या आशा-आकांक्षा-इच्छा यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच खरी उदाहरणं देऊन त्यांच्या आधारे, स्त्रीदेखील कशी यशस्वी होऊ शकते हे पटवून दिलं आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, आपल्या आतली शांतता आणि स्व-ओळख प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे मानसिक व्यायाम आणि प्रत्यक्ष करून बघायचे कृती-कार्यक्रमही यात दिले आहेत. त्यामुळे हे पुस्तक स्त्रियांना उद्देशून लिहिलं असलं, तरी ते पुरुषांनीही मर्मदृष्टी देईल, हे नक्की.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #NAVINYACHYASHODHAT #WANDERWOMAN #नावीन्याच्याशोधात #MEMOIRTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUMITABORSE #MARCIAREYNOLDS "
Customer Reviews
  • Rating StarPANJI, SUNDAY 19-07-2015

    उत्तम दिशादर्शक - वाँडर वूमन … कर्तबगार महिलांना शाप असतो अस्वस्थतेचा आंतरिक कोलाहलाचा. त्यांचे एक मन सतत कामाचा विचार करत असते, तर दुसरे सतत आपण नक्की कोण आहोत? आपली भूमिका, आपले महत्त्व, आपली किंमत घरात किती आहे या प्रश्नांवर झगडत असते. ‘वाँडर वून’ या मार्शिया रेनॉल्डस, लिखित व सुमती बोरसे यांनी त्यांच्या केलेल्या ‘नाविन्याच्या शोधात!’ या अनुवादात, लेखिकेने अनेक सत्ये उदाहरणे देऊन अशा अशांत स्त्रियांच्या आशा-आकांक्षा-इच्छा-प्रेरणा उद्देश यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. व्यक्तिमत्व विकास असे आपण ज्याला म्हणतो ते सर्व कार्यक्रम त्यात सामावलेले आहेत. हा ‘स्व’चा शोध काही सोपे काम नाही. अनेक आयामांतून या प्रश्नाकडे लेखिकेने पाहिले आहे. अनेक कर्तबगार स्त्रियांच्या मुलाखती, हकिकतीतून मिळवलेले हे ज्ञान उच्चपदस्थ पुरुषांसाठी, कंपन्यांच्या सीईओंसाठी अर्थपूर्ण व अत्यंत उपयोगी असे आहे. कॉर्पोरेट जगताच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या लिखाणात प्रशिक्षणतंत्र, मानसिक स्वाध्याय यांची रेलचेल आहे. कर्तबगार स्त्रियांसोबत काम करणाऱ्यांनी, कायम अतृप्त असणाऱ्यांसाठी आपली ऊर्जा मार्गी लावू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक एक उत्तम मार्गदर्शक ठरेल. यातील संशोधने सखोल व प्रामाणिक आहे. कुठेही उपदेशाचा आव आणला असे नाही, परंतु प्रत्येक कहाणी, अनुभवाचा, इच्छेच्या अंती एक-एक बोध दिला गेला आहे. कामाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांकडेच भव्यदिव्य स्वप्न व इच्छा असतात. वास्तवाशी सामना होताच पदरी अनेकदा केवळ निराशाच येते. परंतु स्वत:कडेच भिन्न दृष्टिकोनातून बघता यावे, म्हणून केलेली मदत असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. तुम्हाला काहीतरी शिकवणे हा या पुस्तकाचा उद्देश नसून, तुमच्यात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणे हा खरा हेतू त्यामागे आहे. आयुष्यात जे शिकलात त्यांची अंमलबजावणी कशी करायची. आयुष्यातील काळोख्या कालखंडातून बाहेर कसे पडायचे. संधीच्या खिडकीचा उपयोग कसा करायचा. बरोबर मार्गाची निवड कशी करायची... अशा सर्व प्रश्नांची यथा योग्य उत्तरे सोदाहरण इथे मिळतील. महिलांवर लिहिलेले हे पुस्तक फक्त महिलांकरताच मात्र नाही. अनेक उच्चपदस्थ महिलांची फौज आपल्या उद्योगात बाळगणाऱ्या सर्व पुरुषांनी देखील हे पुस्तक जरूर वाचावे असा लेखिकेचा आग्रह आहे. त्यामुळे पुरुषांना मर्मदृष्टी मिळेल असेही ती म्हणते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more