* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MY FAMILY IS ALL I HAVE
  • Availability : Available
  • Translators : CHITRA WALIMBE
  • ISBN : 9788184980660
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 223
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE EXTRAORDINARY TRUE STORY OF HOW ONE BRITISH WOMEN WAS TRAPPED IN EASTERN EUROPE FOR FIFTY YEARS, FIRST BY THE NAZIS AND THEN BY COMMUNISM, BUT NEVER STOPPED TRYING TO GET BACK HOME...HELEN-ALICE DEAR WAS ONLY FIFTEEN WHEN SHE LEFT LONDON TO VISIT BULGARIA ON A FAMILY HOLIDAY IN 1937- JUST WEEKS AFTER HER ARRIVAL, SHE FOUND HERSELF UNABLE TO LEAVE AND STRUGGLING TO SURVIVE IN AN INCREASINGLY HOSTILE AND TERRIFYING ENVIRONMENT. HER MARRIAGE TO A BULGARIAN MAN BORE HER FOUR CHILDREN BUT THEY WERE OFTEN HOMELESS, COLD AND HUNGRY. DESPITE THESE HARDSHIPS, HELEN REFUSED TO GIVE UP HOPE AND BRAVELY MANAGED TO PROTECT AND RAISE FOUR HAPPY CHILDREN. WHEN THE BERLIN WALL FELL IN 1989, HELEN WAS FINALLY ABLE TO FULFILL HER DREAM OF RETURNING TO HER HOMELAND. HER BEAUTIFULLY WRITTEN MEMOIR IS A HEART-WRENCHING TALE OF COURAGE AND RESILIENCE, PROVING JUST HOW INDOMITABLE THE HUMAN SPIRIT CAN BE.
ही सत्यकथा आहे एका ब्रिटिश स्त्रीची! ती पूर्व युरोपात तब्बल पन्नास वर्षं अडकून पडली. पहिल्यांदा नाझींच्या दृष्टचक्रात आणि मग साम्यवादाच्या विळख्यात! पण तिनं स्वत:च्या घरी परत जाण्याचं स्वप्न उराशी घट्ट कवटाळून ठेवलं. १९३७ मध्ये कौटुंबिक सहल म्हणून लंडनहून बल्गेरियाला निघालेली हेलन फक्त पंधरा वर्षांची होती. तिथे पोहोचली आणि काळाचं चक्र निराळ्याच गतीनं फिरू लागलं. परिस्थिती गंभीर बनली. बल्गेरियातून बाहेर पडणं मुश्किल झालं. रोजचं जगणंही कठीण बनलं होतं. तिला बल्गेरिअन माणसाशी लग्न करणं भाग पडलं. त्याच्यापासून हेलनला चार मुलं झाली. भुकेल्या, थंडीनं गठाळलेल्या मुलांबरोबर सतत आसरा शोधत फिरणं नशिबी आलं. समोर कष्टांचा डोंगरच होता. हेलननं मात्र धीर सोडला नाही. परिस्थितीच्या तडाख्यांना तोंड देत तिनं मुलांना वाढवलं. १९८९ मध्ये बर्लिनची भिंत पडली. स्वगृही जाण्याचं हेलनचं स्वप्न पुरं होण्याची वेळ जवळ आली होती. तिनं लिहिलेल्या आठवणी हृदयद्रावक आहेत... पण ही गोष्ट आहे तिच्या धीराची, आशावादाची आणि पराभव अमान्य करणा-या तिच्या कणखर मनाची!
पुणे मराठी ग्रंथालयातर्फे उत्कृष्ट अनुवादासाठी कै.ना.ह आपटे पुरस्कार २००९
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MYFAMILYISALLIHAVE #MYFAMILYISALLIHAVE #मायफॅमिलीइजऑलआयहॅव #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #CHITRAWALIMBE #HELEN-ALICEDEAR"
Customer Reviews
  • Rating Starअविनाश मणेरीकर, पुणे

    `हेलन-अ‍ॅलीस डिअर` या ब्रिटिश स्त्रीच्या आयुष्याची, तिच्या कुटुंबाची ही हृदयद्रावक अशी कहाणी आहे. जवळपास साठ वर्षाहून अधिक काळ परक्या देशात तग धरुन राहिलेल्या स्त्रीची-तिच्या आयुष्यात आलेल्या विदारक जीवनप्रवासाची ही सत्यकथा आहे. १९३७साली पंधरा वर्षाची हेलन आपल्या परिवाराबरोबर लंडनहून बल्गेरिया येथे आजीला भेटायला जाते. तिथे गेल्यावर काही दिवसांमध्येच त्यांना सुरुवातीला नाझी राजवट, युद्धजन्य परिस्थितीमुळे बल्गेरियातून बाहेर पडणे अशक्य आहे हे समजते. त्यानंतर जगण्यासाठी त्यांना ज्या प्रतिकूल आणि घाबरवून सोडणाऱ्या परिस्थितीशी सातत्याने झगडावे लागते त्याची ही करुण कहाणी तिने वाचकांसमोर मांडली आहे. त्या देशात प्रथम नाझी व नंतर साम्यवादी राजवटीसमोर विदेशी असल्यामुळे सातत्याने संशयाच्या भोवर्‍यात अडकून, पोलीस, कौन्सिलर, सैनिक यांच्याकडून सतत मारहाण, धमक्या सोसत आणि आयुष्यभर सारखी घरे बदलत कसे जीवन व्यतीत करावे लागले, काय-काय आरोपांना, संकटांना तोंड द्यावे लागले, त्यासाठी किती संघर्ष वयाच्या १५ व्या वर्षापासूनच तिने झेलला याचे वर्णन वाचतांना आपल्या अंगावर काटा उभा राहतो. त्याचबरोबर तिच्या संयमी, शांत, कणखर वृत्तीने तिने भोगलेला हा सारा जीवनप्रवास आपल्याला थक्क करुन सोडतो. हेलनचे वडील लंडनहून कॅनडामध्ये नव्या नोकरीसाठी जातात. दोन वर्षांनी तिथे नवे घर घेतल्यावर ती, भाऊ ऑक्टेव्ह व आई रोझी यांनाही तिकडे बोलावतात. त्यापूर्वी व्हिएन्नात असणाऱ्या आईच्या आईला भेटण्यासाठी हे तिघे तिथे जातात पण तिची परोपकारी आजी बल्गेरियाला कुणां मैत्रिणीच्या मदतीसाठी गेल्याने ही तिघंही तिकडे पोहोचतात. पण तिथूनच त्यांच्या आयुष्याचा दशावतार सुरु होतो. जर्मन चाल करुन येत आहेत हे कळल्यावर ब्रिटिश दूतावासात जाऊन परत इंग्लंडला परतण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु होतो पण...... त्यानंतर तिच्या आजीचे दवाखान्यात सुईण म्हणून चालू असलेले काम, त्याबरोबर आईसुद्धा कुटुंब चालवायला दवाखान्यात नोकरी सुरु करते. परंतु जागोजागी हे कुटुंब सामान्य आयुष्य कंठत असतानाही फक्त विदेशी म्हणून सातत्याने संशयाच्या फेऱ्यात अडकत राहते. सतत दडपणाखाली जगण्याची लढाई करत राहते. त्यातूनच मोठा असलेला भाऊ लपून-छपून बोटीवर चढून पुन्हा लंडनमध्ये जातो. त्यानंतर आजी, आई व १५ वर्षाची हेलन त्या देशात अवहेलना, अपमान आणि पोलिसांचा ससेमिरा सोसत, मात्र धीराने, शांत पण कणखर वृत्तीने कसे आयुष्य काढतात, त्या सार्‍या विदारक अनुभवांचे हे कथन लेखिकेने मांडले आहे. यात पोलिसांकडून, सैनिकांकडून १५ वर्षाच्या हेलनला पुन्हा-पुन्हा चौकशीला बोलावून, तिच्याकडून शरीरसुखाची अपेक्षा करणं, ती हेर आहे या संशयाने मारहाण करणं हे सारं ती भोगत असते. युद्धजन्य परिस्थितीमुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, आईचं आजारपण त्यामुळे हेलनला लहान वयात लपून-छपून नोकरी करायला लागणं.त्यातून पोलिसांच्या अत्याचारापासून वाचण्यासाठी बल्गेरियातील नागरिकाशी लग्न केलं तर तिला इथलं नागरिकत्व मिळवतां येईल म्हणून तिच्यावर दबाव येणं, अखेर कंटाळून व्लादिमीर या २७ वर्षीय तरुणाबरोबर तिचा विवाह होतो. मात्र तरीही तिचा संघर्ष मात्र संपत नाही. या साऱ्या साधारण ६३ वर्षांच्या कालखंडात ती अनेक कष्टाच्या नोकर्‍या करते, दिवस-रात्र आपल्या कुटुंबासाठी अर्धपोटी, उपाशी राहून ती संसार चालवते. यादरम्यान तिच्या देखणेपणामुळे आणि कर्तबगारपणामुळे नवरासुद्धा सातत्याने तिच्यावर संशय घेत राहतो. तिला मारझोड करतो. या सार्‍या प्रवासात तिला तीन मुली व एक मुलगा होतो. त्यांनाही फार कष्टाने ती शिक्षण देते, परंतु हेही सारं तिला एकट्यानेच करावं लागतं. कारण आधी नवरा तिला बाहेरख्याली समजून मित्र, दारु यांच्या आहारी जातो आणि नंतर त्यालाही अनेक नोकऱ्या बदलाव्या लागतात, त्यातच अपघात होऊन तो अपंग होतो, आजाराने ग्रस्त होतो. त्याच्या व आईच्या आजारपणातही ती नोकरी, मुले, संसार सांभाळत त्यांची शुश्रूषा करते. त्यांच्या आजारपणातच तिला सातत्याने भक्कम आधार देणारी तिची आजी स्वर्गवासी होते. त्यानंतर काही महिन्यातच तिचा पतीही हॉस्पिटलमध्ये प्राण सोडतो. त्याचा अंत्यविधी करायलाही पैसे नसताना ती सारे दिव्य पार पाडते. या साऱ्या करुण नि बिकट परिस्थितीत तिला आईकडेही लक्ष देता येत नाही, तिचीही तब्येत खालावते, तिला दूरच्या दवाखान्यात भरती केलेलं असतं, तिथेच तीही प्राण सोडते. या साऱ्या प्रवासात हेलन आपल्या मुलांना शेजार्‍यांच्या, काही दयाळू लोकांच्या मदतीने शिकवते. तिच्या चारही मुलांनी बल्गेरियामध्ये आपापल्या क्षेत्रात नांव कमावलेलं ती पाहते. यथावकाश त्या मुलींची व मुलाचेही लग्न होते. ती याचं वर्णन करताना लिहिते की, "माझ्या मोठ्या मुलीला मुलगी झाली आणि चाळीस वर्षांची असतानाच मी आजी झाले." या सार्‍या घटनांमधूनच तिच्या वाटेला आलेलं खडतर आयुष्य आपण समजूं शकतो. लेखिकेच्या आयुष्यातील सारे चढ-उतार सांगणारे प्रसंग, तिच्या कष्टाच्या नोकऱ्या, त्यानंतर अनुवादक म्हणून कौन्सिलमध्ये मिळालेलं काम, त्यानंतर चोरुन घेत असलेली तिची इंग्रजी भाषेची शिकवणी या प्रसंगातून तिची जिद्द, जगण्यासाठीची धडपड आपण अंतर्मुख होऊन वाचतो.सततच्या संघर्षात, कष्टात जीवनाची गाडी हाकताना सतत आपल्या देशात इंग्लंडला कधी जातां येईल हा ध्यास मात्र सतत तिच्या मनाने घेतलेला असतो. या साऱ्या प्रवासात काही मोजकेच आनंदाचे, तिला मदतीसाठी धावून येणाऱ्या व्यक्तींचे प्रसंग ती सांगते. त्या समाधानाच्या, आनंदाच्या प्रसंगाचे अनुभव आजीने अनेकांवर केलेल्या परोपकारामुळेच मला मिळाले असं ती आवर्जून सांगते. अखेर 1१९८९ च्या मे महिन्यात दोनच दिवसांत बर्लिनची भिंत पडणार असल्याचे तिला कळतं. इंग्लंडहून आजीला भेटायला आल्याला पन्नासहून अधिक वर्ष झालेली असतात. इतकी वर्षं घरी जाण्यापासून रोखून ठेवणारे अडथळे एका रात्रीत जमीनदोस्त होणार यावर विश्वास ठेवणंही तिला कठीण जातं. त्यानंतर १९९६-९७ नंतर तिच्या मुलींना ब्रिटिश दूतावासातून इंग्लंडला जाणाऱ्यांना व्हिसा मिळतोय असे कळल्यावर त्या आईला परत मायदेशी जाण्यासाठी प्रयत्न कर सांगतात पण वयाच्या ऐंशीच्या घरात साऱ्या भयानक अनुभवानंतर ती थकलेली असते. पण मुलींच्या आग्रहाखातर ती ब्रिटिश दूतावासात जाते. तिथे प्रथमच बल्गेरियातल्या इतके वर्षांच्या दुःखद आठवणी नंतर तिला सन्मानाची, आदराची वागणूक मिळते. तिथल्या महिला अधिकारी तिला सर्वतोपरी सहाय्य करतात. सर्व कागदपत्रे तयार करुन तिला निवृत्तिवेतन मिळवून देतात.त्यानंतर खुद्द राजदूत व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत तिला सन्मानाने व्हिसा, विमानाची तिकिटे देऊन मायदेशी इंग्लंडला जाण्याची संधीही देतात. या प्रवासात अथक प्रयत्नानंतरही तिचे वडील, भाऊ वां काका, अन्य नातलग यांचा सुगावा मात्र अखेरपर्यंत लागत नाही. ती आपल्या एका मुलीसमवेत २००० सालानंतर लंडनमध्येच राहूं लागते. तिची मुले लंडन, बल्गेरिया, पूर्व जर्मनी अशा ठिकाणी असतात. अधूनमधून ती या ८० वर्षाच्या आपल्या कर्तुत्ववान, धैर्यशील, जिद्दी आईला भेटायला लंडनला येतात. पुस्तक एका बैठकीत वाचून खाली ठेवताना तिने लिहिलेल्या या हृदयद्रावक आठवणींनी मन हेलावतं, पण ही गोष्ट आहे तिच्या धीराची, असामान्य कष्टाची, आशावादी नि कृतार्थ आयुष्याची आणि पराभव अमान्य करणाऱ्या तिच्या कणखर मनाची हे वारंवार जाणवत राहतं.गुगल स्त्रोताच्या माहितीतून २००३ साली हेलन- अ‍ॅलीस डिअर यांचे निधन झाले. एक अप्रतिम जीवनचरित्र.....मन हेलावणारे असेच! ...Read more

  • Rating StarTeka Kulkarni

    खूप दिवसांनी पुस्तकाकडे वळले. दिवसभर लॅपटॉप च्या स्क्रीनकडे बघून डोळे नुसते भकभकून गेले होते. आणि नेमका तेंव्हाच वाचनालय चालू झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे लगोलग गेले आणि फार वेळ न घालवता जे हाताला लागले ते पुस्तक घेऊन आले. वाचताना अनेक वेळा बजूला ठेवले, आहेच ते असे डिप्रेसिंग. दुसरे महायुद्ध म्हणले की नाझी आणि त्यांच्या छळ छावण्या, त्यातून बचावले गेलेले नशीबवान यांची चरित्रेच काय ती आपल्याला ठाऊक. पण या युद्धाच्या सावलीचे सुद्धा किती भयानक परिणाम आजूबाजूला होत होते हे हे पुस्तक वाचताना अगदी प्रकर्षाने जाणवते. ती जेंव्हा इंग्लड ला पोचली तेंव्हा माझेच डोळे वहात होते... खूप बरे झाले मी हे पुस्तक वाचले, आपण लोकडाऊन च्या नावाने बोंबा मारत आहोत पण निदान घरात, खाऊनपिऊन सुखी आणि सुरक्षित आहोत हे काय कमी आहे, याची तीव्र जाणीव झाली हे पुस्तक वाचून. शिवाय लॅपटॉप कॅग्या अतीव व अपर्यायी वापराने कोरडे पडलेले डोळे या पुस्तकाने ओले नक्कीच केले. ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    1937 मध्ये कौटुंबिक सहल म्हणून इंग्लंडवरून हेलन आपल्या आजीला भेटायला आईबरोबर बल्गेरियाला आली .पण त्यानंतर परिस्थिती गंभीर बनत गेली . बल्गेरियातून बाहेरही पडता येत नाही आणि जगण्यासाठी रोजगार ही मिळत नाही .अश्या अवस्थेत आईने तिला सांभाळले.तिचा एक भाऊ ब्गेरियातून पळून गेला . परदेशी नागरिक म्हणून यांचा खूप छळ करण्यात आला . शेवटी यासर्व छळातून वाचण्यासाठी तिने नाईलाजाने बल्गेरियन मुलाशी लग्न केले . त्यापासून तिला चार मुले झाली .या चार मुलांना घेऊन गोठलेल्या थंडीत ती आयुष्यभर आसरा शोधत राहिली. दुर्दैवाने तिचा नवराही कुचकामी निघाला .त्यातच दुसरे महायुद्ध संपले आणि रशियनांनी बल्गेरियावर ताबा मिळवला.आधी नाझीवाद आणि आता साम्यवादाच्या दुष्टचक्रात ती भरडून निघाली . तब्बल पन्नास वर्षे तिने या देशात काढली . इंग्लंडला परत जाणाच्या आशा जवळजवळ नष्ट झाल्या होत्या . पण एके दिवशी 1989 ला बर्लिनची भिंत पाडली गेली.आणि तिचे स्वगृही जाणाच्या स्वप्नाला पुन्हा पालवी फुटली . खरेच गेली का ती परत स्वगृही .....??? एका स्त्रीची हृदद्रावक सत्यकथा .पण त्याचबरोबर जाणवतो आपल्या कुटुंबाबद्दल स्त्रीच्या मनात असलेली काळजी आणि जगण्यासाठी लागणारा कणखरपणा .तिने कधीच पराभव मान्य केला नाही . तिच्या असामान्य धीराची आणि सहनशील वृत्तीची ही कहाणी . प्रत्येक स्त्रीने वाचले पाहिजे असे पुस्तक. ...Read more

  • Rating StarVishal Mahangare

    नाझी आणि साम्यवादी राजवटीमध्ये साठ वर्षे केवळ आणि केवळ दुःखच पाहिलेल्या मनाने स्वगृही जाण्याचे 60 वर्षे उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण होतानाची ही हृदयद्रावक कहाणी........तिच्या धीराची, आशावादाची आणि लाढाऊ बाण्याची.

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more