* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHEATING DEATH
  • Availability : Available
  • Translators : GAURI GADEKAR
  • ISBN : 9788184989502
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 220
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN THIS RIVETING BOOK, DR. SANJAY GUPTA--NEUROSURGEON, CHIEF MEDICAL CORRESPONDENT FOR CNN, AND BESTSELLING AUTHOR--CHRONICLES THE ALMOST UNBELIEVABLE SCIENCE THAT HAS MADE THESE SEEMINGLY MIRACULOUS RECOVERIES POSSIBLE. A BOLD NEW BREED OF DOCTORS HAS ACHIEVED AMAZING RESCUES BY REFUSING TO ACCEPT THAT ANY LIFE IS IRRETRIEVABLY LOST. EXTENDED CARDIAC ARREST, "BRAIN DEATH," NOT BREATHING FOR OVER AN HOUR--ALL THESE CONDITIONS USED TO BE CONSIDERED INEVITABLY FATAL, BUT THEY NO LONGER ARE. TODAY, REVOLUTIONARY ADVANCES ARE BLURRING THE TRADITIONAL LINE BETWEEN LIFE AND DEATH IN FASCINATING WAYS. DRAWING ON REAL-LIFE STORIES AND USING HIS UNPRECEDENTED ACCESS TO THE LATEST MEDICAL RESEARCH, DR. GUPTA DRAMATICALLY PRESENTS EXCITING ACCOUNTS OF HOW PIONEERING PHYSICIANS AND RESEARCHERS ARE ALTERING OUR UNDERSTANDING OF HOW THE HUMAN BODY FUNCTIONS WHEN IT COMES TO SURVIVAL--AND WHY MORE AND MORE PATIENTS WHO ONCE WOULD HAVE DIED ARE NOW ALIVE. FROM EXPERIMENTS WITH THERAPEUTIC HYPOTHERMIA TO SAVE COMATOSE STROKE OR HEART ATTACK VICTIMS TO LIFESAVING OPERATIONS IN UTERO TO THE STUDY OF ANIMAL HIBERNATION TO HELP WOUNDED SOLDIERS ON FAR-OFF BATTLEFIELDS, THESE REMARKABLE CASE HISTORIES TRANSFORM AND ENRICH ALL OUR ASSUMPTIONS ABOUT THE TRUE NATURE OF DEATH AND LIFE.
‘अद्याप न जन्मलेल्या बाळाच्या हृदयात प्राणघातक दोष...‘नॉर्वेतील गोठलेल्या तलावात तासभर बुडालेली स्कीअर...डॉक्टरांनी `व्हेजिटेबल` ठरवलेला कोमातील रुग्ण...वीस वर्षांपूर्वी यासर्वांना वाचण्याची आशा नाही म्हणून मृत समजून सोडून दिलं असतं; पण अविश्वसनीय अशा नवीन वैद्यकीय प्रगतीमुळे हे सर्वजण आज जिवंत आणि धडधाकट आहेत. चित्त खिळवून ठेवणा-या या पुस्तकात न्यूरोसर्जन,सीएनएन चे प्रमुख वैद्यकीय बातमीदार आणि लोकप्रिय पुस्तकांचे लेखक डॉ. संजयगुप्ता, हे चमत्कार प्रत्यक्षात आणणा-या असामान्य विज्ञानाचं इतिवृत्त नोंदवतात. जेव्हा मृत्यूपासून बचावकरण्याचा प्रश्न येतो, तेव्हा मानवी शरीर ज्या प्रकारे कार्यकरतं, त्या विषयीच्या आपल्या समजुती, हे अग्रेसर डॉक्टर आणि संशोधक कशा बदलून टाकतात, त्याचे वास्तव जीवनातील केसेस वरआधारित असलेले थरारक वृत्तान्त डॉ. गुप्ता सादर करतात. पूर्वी जे रुग्ण मृत्युमुखी पडण्याची दाट शक्यता होती, त्या रुग्णांचं जिवंत राहाण्याचं प्रमाण दिवसेंदिवस का वाढत आहे, यावर ते प्रकाश पाडतात. पक्षाघात विंवाहृदयविकाराच्या झटक्यानंतर कोमात गेलेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी च्या रोगनिवारक हायपोथर्मिआच्या प्रयोगापासून ते गर्भाला जीवदान देणा-या शस्त्रक्रिया आणि रणांगणांवरील जखमी सैनिकांना वाचवण्याच्या उद्देशाने करण्यात येणा-या प्राण्यांमधील सुप्तनिद्रेच्या अभ्यासापर्यंतच्या या सर्व विलक्षण गोष्टी वाचून जीवन-मृत्यूच्या वास्तव स्वरूपा विषयीची आपली गृहीतवं पार पालटून जातात.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MRUTYUVARMAAT #CHEATINGDEATH #मृत्युवरमात #BIOGRAPHY&TRUESTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #GAURIGADEKAR #SANJAY GUPTA "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 12-01-2020

    कधीकधी एखादे पुस्तक किचकट विषयावर भाष्य करणारे असते ... वाचायला रटाळ वाटू शकते मात्र ज्ञानाचे भांडार असते.हे असेच एक पुस्तक.जन्म आणि मृत्यू ह्यात एका श्वासाच अंतर असतं.. असं आपण नेहमी म्हणतो. श्वास बंद झाले, हृदय थांबले की मृत्यू झाला मानले जाते... मत्र जिवंत असणे आणि प्रत्यक्ष मृत्यू ह्यातही बरेच काही असते... मृत म्हणून घोषित केलेल्या अनेक पेशंटला चमत्कृतीपूर्ण पद्धतीने जिवंत केल्याच्या वास्तव घटना आणि संशोधन ह्या पुस्तकात नमूद केले आहे. वैज्ञानिक संशोधनाची, शोधांची आवड असणाऱ्या वाचकांना नक्कीच आवडू शकेल. पुस्तकाची प्रस्तावना आणि मुखपृष्ठ आवडले... :- यशश्री रहाळकर ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    ऍना बागनहॉम नार्वेतील बर्फाळ शिखरावर स्कीईग करायला गेली आणि अपघातात सापडली .ती बर्फात एक तासांपेक्षा जास्त वेळ अडकली होती . क्लीनिकली ती मृत होती . माईक मर्ट्झ एका शाळेत बस ड्रायव्हर होता .एका अपघातात सापडला आणि त्याचे हृद बंद झाले . अफगाणिस्तानाती खिंडीत डोंगरात जखमी झालेल्याना भर युद्धात वैद्यकीय मदत कशी मिळेल. भरपूर रक्तस्त्राव होऊनही तो सैनिक कसा वाचेल??? त्याचे हृदयातचे ठोके थांबवून परत चालू करता येतील का ???? अजून त्या बाळाचा जन्मही झाला नाही पण त्याच्या हृदयात प्राणघातक दोष आहे . डॉक्टरांनी आशा सोडलेला कोमातील रुग्ण केवळ हृदयाचे ठोके बंद पडले आणि श्वास थांबला म्हणजे माणूस मृत झाला नाही . काही वर्षांपूर्वी अश्या रुग्णाची आशा डॉक्टरांनी सोडून दिली असती .पण नवीन वैद्यकीय संशोधनामुळे आज हे जिवंत आहेत तर धडधाकट ही आहेत . लेखक प्रसिद्ध न्यूरो सर्जन आणि लेखक डॉ. संजय गुप्ता विज्ञानाचा आधार घेऊन हे चमत्कार नोंदवतात . जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा मानवी शरीराची आत काय हालचाल सुरू असते ते सर्व आपल्याला हे डॉक्टर सांगतात. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 03-04-2016

    ‘अद्याप न जन्मलेल्या बाळाच्या हृदयात प्राणघातक दोष...’ ‘नॉर्वेतील गोठलेल्या तलावात तासभर बुडालेली स्कीअर...’ ‘डॉक्टरांनी व्हेजिटेबल’ ठरवलेला कोमातील रुग्ण... ‘वीस वर्षांपूर्वी या सर्वांना वाचवण्याची आशा नाही म्हणून मृत समजून सोडून दिलं असतं; पण अविशवसनीय अशा नवीन वैद्यकीय प्रगतीमुळे हे सर्वजण आज जिवंत आणि धटधाकट आहेत. चित्त खिळवून ठेवणाऱ्या या पुस्तकात न्यूरोसर्जन, सीएनएनचे प्रमुख वैद्यकीय बातमीदार आणि लोकप्रिय पुस्तकांचे लेखक डॉ. संजय गुप्ता, हे चमत्कार प्रत्यक्षात आणणाऱ्या असामान्य विज्ञानाचं इतिवृत्त नोंदवतात. जेव्हा मृत्यूपासून बचाव करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा मानवी शरीर ज्या प्रकारे कार्य करतं, त्या विषयीच्या आपल्या समजुती हे अग्रेसर डॉक्टर आणि संशोधक कशा बदलून टाकतात, त्याचे वास्तव जीवनातील केसेसवर आधारीत असलेले थरारक वृत्तांत डॉ. गुप्ता सादर करतात. ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT BELGAO 20-03-2016

    मृत्यूला चकवा दिलेल्या रुग्णांच्या कथा संजय गुप्ता एम. डी. असून ‘न्यूरोसर्जन’ म्हणून प्रक्टिस करतात. शिवाय अ‍ॅटलांटामधील ‘एमरी युनिव्हर्सिटी हॉस्पिटल’मध्ये ते साहाय्यक प्राध्यापक आहेत. सीएनएन आणि सीबीएसवरील कार्यक्रमातही त्यांच मोठं योगदान आहे. २००६मध्ये त्यांच्या आरोग्यविषयक रिपोटर्सना तीन पारितोषिके मिळाली. या व्यतिरिक्त ‘एमी’ ‘पीचडी’ आणि ‘द ड्यूपॉन्ट’ पारितोषिके मिळाली. २००४ मध्ये अ‍ॅटलांटा प्रेस क्लबने डॉ. गुप्तांना ‘जर्नलिस्ट ऑफ द इयर’ म्हणून गौरवलं. ‘द नॅशनल हेल्थकेअर कम्युनिकेटर्स’चं ‘गोल्ड अ‍ॅवॉर्ड’ आणि ‘द इंटरनॅशनल हेल्थ अँड मेडिकल मीडीआ’’चं ‘फेडी’ नावाचं पारितोषिकही त्यांना मिळालं आहे. ‘चेसिंग लाइफ’या त्यांच्या पहिल्या पुस्तकाला न्यूयॉर्क टाइम्सच्या ‘सर्वाधिक खपाच्या पुस्तका’च्या यादीत स्थान मिळालं आहे. डॉ. गुप्ता ‘द अमेरिकन असोसिएशन ऑफ न्यूरॉलॉजिकल सर्जन्स,’ ‘काँग्रेस ऑफ न्यूरॉलॉजिकल सर्जन्स’, ‘द कौन्सिल ऑफ फॉरिन रिलेशन्स’ अशा अनेक संघटनांचे सदस्य आहेत. डॉ. संजय गुप्ता ‘द लान्स आर्मस्ट्राँग फाऊंडेशन’चे बोर्ड सदस्य आहेत. ‘मृत्यूवर मात’ हे ‘चीटिंग डेथ’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. प्रतिकूल परिस्थितीशी झगडून रुग्णांची आयुष्य वाचवणारे डॉक्टर आणि त्यांचे वैद्यकीय चमत्कार’ पुस्तकात वाचायला मिळतात. हृदयाची धडधड थांबते, तो अंत नसतो. खरंतर ती फक्त संकटाची नांदी असते, असं आढळून आले आहे की, जीवन आणि मृत्यू हे फक्त काळ्या आणि पांढऱ्या रंगांच चित्र नाही. त्या दोन्ही रंगांच्यामध्ये एक करडा रंगही असतो. एक पुसटसा तटस्थ प्रदेश. तिथे माणूस धड मेलेलाही नसतो की, धड जिवंतही नसतो. यावर ताबा मिळवून मृत्यूला चकवण्यासाठी प्रथम आपल्याला ती प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. मृत्यूविषयी मृत किंवा जिवंत अशा ठाम शब्दांत विचार करायची आपल्याला सवय आहे. मॉनिटरवर वर खाली होणाऱ्या रेषा सपाट होतात. जीवन निसटून जायला काही मिनिटांचा कालावधीही पुरेसा आहे. हृदयाचे टोके थांबले की रक्तप्रवाह थांबतो. दोन मिनिटातच सगळं मंदावत. गंमत म्हणजे शरीराच्या आत चाललेल्या या प्रचंड उलथापालथीची आपल्याला जाणीवही नसते. रक्ता अभावी तडफडणारा, पहिला अवयव म्हणजे मेंदू, प्राणवायू अभावी दहा सेकंदातच मेंदूचे काम थंडावते. आकुंचन - प्रसरण बंद होते. अवयव ढासळू लागतात. मूत्रपिंडांच रक्त शुद्धीकरणाचे कार्य थांबते. शरीरातील पेशीमध्ये रासायनिक प्रक्रियांची गुंतागुंतीची शृंखला सुरू होते आणि त्यात त्या पेशी बळी पडतात. मरणाची प्रक्रिया ही अशी आहे. आपल्या हातात आहे, खळबळजनक आणि झपाट्याने बदलत चाललेल्या विज्ञानाच्या क्षेत्राचा शोध घेणारं, रोमांचक वैद्यकीय कहाण्यांच पुस्तक. याच्या पाना-पानातून जाणवेल. जीवन आणि मृत्यूमधील बारीकशी सीमारेषा आणि भेटतील सीमारेषेच्या अलिकडे रोग्यांना थोपवून धरण्यासाठी जीवाचं रान करणारे डॉक्टर. या सीमारेषेवर ‘तळ्यात-मळ्यात’ करून आलेल्या लोकांनी पाहिलेले- ऐकलेले त्यांचे अनुभव वाचून त्या सीमेविषयी अधिक माहिती मिळेल. आश्चर्यकारक आव्हानं स्वीकारणाऱ्या शास्त्रज्ञांशीही आपला परिचय होतो. आपल्याला अजून सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नसली, तरी कधी ना कधी ती नक्कीच मिळतील, असा विश्वास बाळगणारं निग्रही, आद्य संशोधक खरोखरच आशावादी आहेत. अगदी गर्भाशयापासून ते पार मृत्यूशय्येपर्यंत, जीवन मरणाच्या आपल्या समजाला छेद देणारे आधुनिक विज्ञानाचे असंख्य मार्ग या पुस्तकात आढळतील. लक्षात येईल की, आरंभरेषा आणि समाप्तिरेषा या काळ्या दगडावरील रेषा नसतात. त्या वाळूवर काढलेल्या रेषा असतात. वैद्यकीय ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रत्येक नव्या लाटेबरोबर त्या सरकत जातात. मृत्यूला जाणून घ्यायच्या आणि त्याला पुढे ढकलायचा मार्ग शोधण्याच्या या प्रवासात आपण जीवन आणि त्या पलीकडे जे काही आहे ते याच्यामधल्या करड्या, तटस्थ प्रदेशाचा थांग लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुस्तकातील निवेदन ८ भागात आहे. १. हिमडॉक्टर्स, २. हृदय थांबण्याचा क्षण, ३. अविश्वासाला स्थगिती, ४. मृत्यूच्या पलीकडे, ५. दो गज जमीन के नीचे, ६. मृत्यूला चकवा गर्भाशयातच, ७. काय हा चमत्कार, ८. वेगळा दिवस. ‘अद्याप न जन्मलेल्या बाळाच्या हृदयात प्राणघातक दोष,’ नार्वेतील गोठवलेल्या तलावात तासभर बुडालेली स्कीअर ‘डॉक्टरांनी व्हेजिटेबल’ ठरवलेला कोमातील रुग्ण...’ वीस वर्षांपूर्वी या सर्वांना वाचण्याची आशा नाही म्हणून मृत समजून सोडून दिलं असतं; पण अविश्वसनीय अशा नवीन वैद्यकीय प्रगतीमुळे हे सर्व जण आज जिवंत आणि धडधाकट आहेत. चित्त खिळवून ठेवणाऱ्या या पुस्तकात न्यूरोसर्जन, सीएनएन चे प्रमुख वैद्यकीय बातमीदार आणि लोकप्रिय पुस्तकांचे लेखक डॉ. संजय गुप्ता हे चमत्कार प्रत्यक्षात आणणाऱ्या असामान्य विज्ञानाचं इतिवृत्त नोंदवतात. जेव्हा मृत्यूपासून बचाव करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा मानवी शरीर ज्या प्रकारे कार्य करतं, त्याविषयीच्या आपल्या समजुती हे अग्रेसर डॉक्टर आणि संशोधक कशा बदलून टाकतात, त्याचे वास्तव जीवनातील केसेसवर आधारित असलेले थरारक वृत्तांत प्रत्यक्ष पुस्तकातच वाचणे उचित होईल. परीक्षणाच्या सीमारेषेत त्याला बांधणे अशक्यच नाही तर असंभवही आहे. अनुवादाचे काम अगदी उचित व योग्यच झालेले आहे. कुठेही वाचताना अडचण जाणवत नाही. शास्त्रीय संज्ञांचे सुबोध विवेचन आढळते. मृत्यूवर मात! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more