* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MIRAGE
  • Availability : Available
  • Translators : SUNANDA AMRAPURKAR
  • ISBN : 9788184980202
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SET IN A CLOSED DESERT KINGDOM IN OUR OWN TIME, MIRAGE TELLS THE STORY OF SAYEED, A GOOD BUT UNEXCEPTIONAL MAN. HE FINDS, LOVE WITH A WOMAN WHO MIGHT HAVE BEEN BEYOND HIS REACH, HAD NOT WIDOWHOOD AND MISFORTUNE BROUGHT HER WITHIN IT. THE SCENE FOR SAYEED`S MARRIAGE IS SET WITH UNPRETENDING TENDERNESS: THE CITY HOSPITAL WHERE HE WORKS, THE SHANTY TOWN HE INHABITS, HIS BROTHER`S VILLAGE HOME, THE STRUGGLE TO MAKE A DECENT LIFE FOR HIS NEW WIFE AND HER CHILD. `WHAT MAKES THE BOOK SO COMPELLING IS ITS PERVASIVE AND OPPRESSIVE SENSE OF PLACE, DRAWING US IN TO THE HEAT, THE GRUBBINESS OF THE SHANTY TOWN WHERE SAYEED LIVES, AND THE UNCOMFORTABLE AND DISLOCATING CLASH BETWEEN ANCIENT TRADITION AND MODERN EXPECTATION` - INDEPENDENT . `YOU WOULD NEED TO SEARCH VERY HARD TO FIND A MORE LUCID AND BEAUTIFUL EXAMPLE OF CONTEMPORARY STORY-TELLING` TRIBUNE
मिराज म्हणजे मृगजळ. मैलोगणती पसरलेल्या रुक्ष वालुकामय प्रदेशात अतीप्रखर उन्हाचे वेळी, दूरवर दिसणारा पाण्याचा आभास. ज्याला खरं अस्तित्व नसतंय; पण असल्यासारखं वाटतं. लेखक बंडूला चंद्ररत्ना यांनी, वाळवंटी प्रदेशात घडणाऱ्या या कादंबरीला फार समर्पक शीर्षक दिलेलं आहे. खेड्यातल्या शांत, संथ वातावरणातून उपजीविकेसाठी नव्याने विकसित झालेल्या शहरातल्या धबडग्यात येऊन राहणाऱ्या दोन अश्राप जिवांची ही कथा. ते आणि त्यांची स्वप्नं यांची चित्तरकथा अंगावर शहारा आणते. सुख आणि स्वास्थ्य ही त्यांना शेवटपर्यंत मृगजळासारखी चकवत राहतात. पेट्रोडॉलर, उघड्यावर भरणारा सुवर्णबाजार यांच्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी आपण ज्या देशांविषयी ऐकतो, त्या तेल समृद्ध आखातील देशातलं हे दाहक आणि करून वास्तव. अत्यंत साधेपणाने सरळ, समोर आलेल्या त्या चकचकीत नाण्याची ही दुसरी बाजू. अक्षरश: जगातल्या सगळ्या देशातली माणसं जिथे पैसे कमवायला येतात, तिथल्या स्थानिक माणसांची काय गत होते याचं प्रभावी चित्रण यात वाचायला मिळतं. अशीच मोठी शहरं आपल्याही देशात आहेत. आसपासच्या खेड्यातून येणाऱ्या स्थानिक कुटुंबांची अशीच परवड होत असेल का? या विचाराने मला ही कादंबरी वाचत असताना झपाटलं आणि म्हणून मी ती अनुवाद करायला घेतली.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #MIRAGE #MIRAGE #मिराज #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNANDAAMRAPURKAR #सुनंदाअमरापूरकर #BANDULACHANDRARATNA "
Customer Reviews
  • Rating StarDoris Lessing

    a novel by Bandula Chandraratna... "A little masterpiece, beautiful, a testimony to decency and courage in the face of such oppression, such hardship." There is a simplicity to Mirage, this story of star-crossed lovers whose brief happiness is cu short, that belies the skill of its telling. Set in a closed Arab Kingdom in our own time, it has the timeless appeal and delicacy of a fairy tale, yet also the moral weight – and all the human sadness – of a novel by Thomas Hardy. It tells how Sayeed, a good but unexceptional Muslim, finds happiness with Latifa, a girl who might have been beyond his reach had widowhood and misfortune not brought her within it. The scene for Sayeed’s marriage is set with unpretending tenderness and in unerring detail : the city hospital where he works, the shanty town where he lives, his brother,s desert home, the peasant wedding, the struggle to make a decent life for his new wife and her child. Heat, dirt and squalor form the backdrop of a tragedy, one fueled by petty jealousy, sexual desire and religious fervor, with Latifa, a village girl unused to the ways of the city, its ultimate victim. Mirage was published in England in 1999 at the author’s own expense. It emerged from the year’s Booker Prize deliberations the unexpected favorite of a number of the judges, just missing the final shortlist. Boyd Tonkin, literary editor of the London Independent, chose it as his Book of the Year, saying “we need novels as lucid, moving and compassionate as this one.” ...Read more

  • Rating StarDAINIK DESHDOOT 03-01-2010

    मृगजळामागे धावणं... बंडुला चंद्ररत्ना यांची मिराज ही पहिली कादंबरी आहे. बुकर पुरस्काराच्या यादीत या कादंबरीचे नाव येऊ शकले नाही. ते थोड्यासाठी हुकले. परिक्षकांना या कादंबरीने भुरळ घातली. २००० साली लंडनच्या एका मोठ्या प्रकाशकाने या पुस्तकाची पेपरबॅक ्वरूपातली आवृत्ती काढली. ती त्या वर्षीची समीक्षकांच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट कादंबरी ठरली. याच कादंबरीचा दुसरा भाग ‘अ‍ॅन आय फॉर अ‍ॅन आय’ या नावाने प्रसिद्ध आहे. चकचकीत, उत्तुंग इमारती असलेल्या शहराचा चमचमता भाग आपल्या समोर असतो. त्याचा दुसरा अंधारा-काळोख कोपरा, त्यातल्या अडचणी कुणालाच माहीत नसतात. साधारण अशा प्रगतीच्या काळ्याकुट्ट दुसऱ्या बाजूचं वर्णन मिराज या कादंबरीत आलं आहे. तेलाने समृद्ध असलेल्या आखाती देशातल्या परिस्थितीचं वर्णन ‘मिराज’मध्ये लेखकानं केलं आहे. छोट्या, साध्या साध्या गावतून उपजीविकेसाठी आलेल्या सईद इथे मध्यावर्ती भूमिकेत आहे. वाळवंटात कसा पाण्याचा आभास निर्माण होतो म्हणजेच मृगजळ वाटसरूला फसवतं. तसंच काहीसं हे भव्यदिव्य शहरा सईदची निराशा करतं. स्थानिक माणसाची मानसिकता, त्याचे कष्ट व दुर्दशा यांचे अंगावर शहारे येणारे वर्णन प्रस्तृत कादंबरीत आल्याने कादंबरी अगदी वास्तव झाली आहे. सईदला लतिफा म्हणते, आपण गावाकडे जाऊन शेती करू, गुरं पाळू, सगळं हिररवंगार इथे झाडझुडप नाही. पाणीही नाही. थोडे कष्ट पडतील पण आपल्या माणसांत सुखी राहू.’ त्यावर ‘आपण गावाकडे जाऊ शकत नाही कारण कर्जाचा डोंगर फेडण्यासाठी ही नोकरी करणं ही भाग आहे. त्याला पर्याय नाही’ सईद म्हणतो. घाण, कचरा, उष्ट-खरकटं, लेंड्या आणि खोब्याच्या फाळ्यांनी बनविलेल्या खुराड्यासारख्या झोपड्या, कळस म्हणजे अतिशय लोभी, अप्पलपोटी माणसं. यात लतिफा सईदचं आयुष्य काळवंडून जातं. या कादंबरीच्या शेवटाने तर डोकं बधीर व्हायला होतं, कारण इथले कायदे कानून आणि तयांची अंमलबजावणी जराही मानवतावादी नाही. दृष्टिकोन नसलेली हुकूमशाही आहे. लतिफाला शेवटी दगडांनी ठेूचन मारण्याची शिक्षा होते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more