* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MY NAME IS ERIC
  • Availability : Available
  • Translators : SNEHAL JOSHI
  • ISBN : 9788184985627
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 204
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :REI KIMURA COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A "DOGOGRAPHY" WRITTEN FROM THE POINT OF VIEW OF ERIC, AN OUTSPOKEN AND MEMORABLE POMERANIAN. FROM HIS BIRTH ON A REMOTE DOG BREEDING FARM, DEEP INSIDE RURAL NEW SOUTH WALES, AUSTRALIA THROUGH HIS FORMATIVE YEARS IN SINGAPORE AND INTO OLD-AGE, YOU WILL GET TO KNOW, AND LOVE, ERIC AND THE FAMILY THAT RAISES HIM.
एक आठवणीत राहण्यासारख्या स्पष्टवक्त्या पॉमेरियन कुत्र्याच्या, एरिकच्या दृष्टिकोनातून लिहिलेले हे ‘कुत्र्याचे आत्मचरित्र’ आहे. ऑस्ट्रेलियातील साउथ वेल्स भागातील एक छोटे खेडेगाव आणि तेथील कुत्र्यांची निपज करणारे एक दूरवरचे शेत. तिथं जन्म झाल्यापासूून ते सिंगापूरला वाढत्या वयात येऊन म्हातारा होईपर्यंतचा एरिक. आणि ज्या कुटुंबात तो वाढला, ते कुटुंबही तुम्हाला कळेल आणि त्याबद्दल तुम्हाला प्रेम वाटू लागेल.रेई किमुरा ही टोकियोत जन्मली आणि तिथंच वाढली. आता ती सिंगापूरमध्ये राहते आणि तिथंच काम करते. ह्या लेखिकेने सिंगापूरमध्ये कायद्याचा अभ्यास केला, तसेच वृत्तपत्रीय शिक्षण ऑस्ट्रेलियात घेतले. एक वकील तसेच जमीन-जुमल्याचा व्यवसाय करणारी आणि खूप कादंब-या लिहिणारी ती एक लेखिका आहे. तिचे लिखाण डच, स्पॉनिश, टंगेरियन, रशियन, पॉलिश, हिन्दी, मराठी, थाई, इंडोनेशियन, कोरियन, जपानी, व्हिएतनामी आणि चायनिज अशा अनेक भाषांतून प्रसिद्ध झालेले आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #JAPANESEMAGNOLIA(MARATHI) #JAPANESEMAGNOLIA #जॅपनीजमॅग्नोलिया #FICTION TRANSLATED FROM ENGLISH TO MARATHI NIRMALA MONE निर्मला मोने REI KIMURA रेई किमुरा #JAPANESEORCHID(MARATHI) #AWAMARUTITANICOFJAPAN(MARATHI) #JAPANESEROSE #MIERIC #"
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 20-07-2018

    श्वानांच्या विचारांचे भावचित्र... खरे तर माणसाला तो सोडून निसर्गातले बाकीचे प्राणी सारखेच. तरीही काही प्राण्यांवर त्याचे जरा जास्त प्रेम असते. त्यातलाच एक प्राणी म्हणजे कुत्रा. कुत्र्याला माणसाचा मित्र असेच म्हटले जाते. श्वानप्रेमींवर आजवर अनेक साहि्यिकांनी लिहून झालेले आहे. श्वानप्रेमींची लक्षणे, त्यांचे नखरे, त्यांचा जिव्हाळा, ऋणानुबंध अशा अनेक गोष्टी साहित्यातून येऊन गेल्या आहेत. पण प्राणी स्वत:च स्वत:ची गोष्ट सांगतायत, असे थेट साहित्य फारसे वाचनात नसते. अर्थात अशा प्रकारचे चित्रपट आपण पाहिलेले असतात. कार्टून्समधून बोलणारे कुत्रे पाहिलेले असतात. तरीही एखादा कुत्रा स्वत:च स्वत:ची गोष्ट सांगताना कसे वाटेल? ‘मी एरिक’ या पुस्तकात असाच एक मस्त केसाळ पॉमेरियन त्याची गोष्ट सांगतो आहे. ‘माय नेम इज एरिक’ या रेई किमुरा यांच्या पुस्तकाचा अनुवाद आहे. मुळात पुस्तकाचा मूड मस्त खेळकर आहे. ती एका पाळीव कुत्र्याची गोष्ट आहे, त्यामुळे त्याचे लोभस नखरे, त्याच्या कुटुंबावरचे त्याचे प्रेम, किस्से असे सगळे काही आहे. पण हा खेळकर मूडमध्ये हसवणारा कुत्रा त्याच्या आयुष्यातील काही गोष्टी अशा सहजपणे सांगून जातो की आपल्या डोळ्यांत नकळत पाणी येते. अगदी सुरुवातच करायची तर पहिल्या प्रकरणात एका श्वान प्रजोत्पादन केंद्रामधील एका एरिकचे आयुष्य आणि आईपासून दूर होताना त्याची अवस्था, याचे वर्णन आपल्याला अस्वस्थ करते. पाळीव प्राण्यांच्या दुकानात गेल्यावर तिथले गोजिरे श्वान, गोबऱ्या मांजरी आपले लक्ष वेधून घेतात. पण आपल्या सुखासाठी या पिलांना त्यांच्या आईपासून वेगळे केले जाते, हे आपल्या लक्षातही येत नाही. ती गोष्ट ‘मी एरिक’चे पहिले प्रकरण सहज सांगून जाते. विमानातून या प्राण्यांची होणारी ने-आण, गैरसोय, त्यामध्ये त्यांना वाटणारी निसर्गसुलभ भीती, त्यांच्या मनाची द्विधा अवस्था सगळे काही एरिक आपल्याला सांगतो. पाळीव प्राण्यांच्या दुकानातून त्याच्या मालकाच्या म्हणजे जेनिफर आणि तानियाच्या घरी आल्यावर मात्र एरिकचे अच्छे दिन सुरू होतात. इथपासून म्हणजे प्रकरण तीनपासून एरिकच्या धम्माल कसरतींना सुरुवात होते आणि पुस्तकातील खेळकरपणा, गंमत परत येते. एरिकचा स्वभाव, त्याचे मालकिणीला म्हणजे त्याच्या भाषेत त्याच्या मानवी आईला आपल्या तालावर नाचवणे, घरातील इतर माणसांसोबतचे त्याचे नातेसंबंध, पिंजऱ्यातून घरी जाण्यासाठी त्याने श्वानसुलभ भावनेने घरच्या लेकीला लावलेला मस्का अशा सगळ्या गोष्टी मजा आणतात. एरिकचा आगाऊपणा, त्याचे कचऱ्याचे वेड, धुण्याच्या कपड्यांचा त्याने केलेला उकिरडा या गोष्टी या कुत्र्याबद्दल राग वाटू न देता त्याच्याबद्दलचे प्रेमच जागृत करतात. एरिकच्या अशक्य दंग्याला कंटाळून त्याला आज्ञापालन केंद्रात दाखल केले जाते. तिथला किस्साही धम्माल आणतो. एरिकचा शेजारी असलेल्या ‘कोल’ या जर्मन शेफर्डसोबतची त्याची खुन्नस, त्याचा कोलने काढलेला राग, एरिकला झालेला अपघात, श्वानसौंदर्य स्पर्धेत खट्याळ एरिकने घातलेला गोंधळ या सगळ्या गोष्टी हसू आणतात. एरिकचे सामर्थ्य आणि तथाकथित पुरुषार्थ दाखवणारे तसेच त्याच्या आगाऊपणामुळे त्याच्या पायाला झालेल्या दुखापतीचे प्रकरण वाचनीय आहे. दोन्ही प्रकरणांत एरिक आपल्या लहान असण्याची काळजी न करता उद्योग करून बसतो आणि मग त्याला त्याचे परिणाम भोगायला लागतात. पहिल्या प्रकरणात एरिक घरात शिरलेल्या चोराच्या पायाचा कडकडून चावा घेतो आणि त्याला पळवून लावतो. त्याच्या धाडसाचे खूप कौतुक होते; परंतु त्याला झालेल्या दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागते, तर दुसऱ्या प्रसंगात एरिक घरात कुणी नसताना हट्टाने उड्या मारतो आणि पायाचा घोटा दुखावून बसतो. मरणाच्या दारातून अनेकदा परत आलेला एरिक त्याच्या कुटुंबीयांना अधिकाधिक हवासा होत जातो तसाच आपल्यालाही. संपूर्ण पुस्तकात एक गोष्ट सतत येते, ती म्हणजे एरिकला त्याच्या ऑस्ट्रेलियन वंशाची, आईची येणारी आठवण. माणूस कुठेही गेला तरी त्याला त्याचे बालपण आठवतेच. तो ते विसरू शकत नाही. कुत्र्यांचेही असेच असेल का, अशी एक पुसटशी शंका यामुळे येऊन जाते. रस्त्यावर भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू नये म्हणून त्यांची नसबंदी केली जाते. अनेक पाळीव कुत्र्यांबाबतही मालक तोच निर्णय घेतात. कुत्र्यांचे खच्चीकरणही केले जाते. ही गोष्ट प्राणिमित्रांना पटत नाही, त्याबद्दल खरे तर फारसे बोललेच जात नाही. कारण जिथे मानवाच्या लैंगिकतेबद्दल बोलणेच कठीण तिथे प्राण्यांबद्दल कोण बोलणार? पण पुस्तकातला एरिक मात्र त्याच्या खच्चीकरणाच्या अनुभवाबद्दल सविस्तर लिहितो. त्यात शेवटी तो म्हणतो, हे होणे कुत्र्यांसाठी आणि त्याहीपेक्षा कुत्र्यांच्या जवळच्या मित्रासाठी म्हणजे माणसासाठी फार महत्त्वाचे असते. अशी वाक्ये विचारात पाडतात. श्वानप्रेमींबरोबरच इतरांनाही हे पुस्तक आवडू शकेल. कारण नुसतेच ‘आमचा टॉम्या बाई गुण्णाचा!’ असे भारावलेले हे पुस्तक नाही. त्याला कुत्र्याच्या मनातील प्रत्यक्ष विचारांची जोड आहे, अर्थात कल्पनेतल्याच. माणसांसाठी अनभिज्ञ अशा कुत्र्यांच्या विचारांचे भावचित्र रेखाटणारे हे पुस्तक एकदा वाचावे, असे नक्कीच आहे. स्नेहल जोशी यांनी पुस्तकाचा अनुवादही चांगला केला आहे. -स्वाती केतकर-पंडित ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 23 -11 -2014

    मेंदू शेंगदाण्याच्या आकाराचा असूनही मी पटपट शिकणारा आहे, असे आठवड्याच्या शेवटी जाहीर करण्यात आले, परंतु खरंच जर का माझ्या शेंगदाण्याच्या आकाराच्या मेंदूत ते डोकावून पाहू शकले असते, तर त्यांना हे कळले असते की, मी त्यांच्या मताप्रमाणे वागतोय, ते मी त्यंची आज्ञा पाळावी या जाणिवेने नव्हे; तर माझ्या सोईसाठी मला ते करावेसे वाटते म्हणून! .... विचार करणे, आठवून गोष्टी करणे, हृदयाला जाणवणे आणि प्रेम करणे.... यासाठी देवाने आम्हाला मेंदू दिला आहे. भले, तो मेंदू दुसऱ्यांच्या मेंदुपेक्षा थोडा लहान आहे!.... त्यामुळे ‘निव्वळ कुत्रा’ असे म्हणण्यामागे लोकांना काय अभिप्रेत असते?.....इति एरिक ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more