* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MEGHDOOT
  • Availability : Available
  • Translators : SHANTA J SHELAKE
  • ISBN : 9788177661392
  • Edition : 9
  • Publishing Year : FEBRUARY 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From SANSKRIT to MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE ORIGINAL `MEGHDOOT` IS AN EPIC BY THE FAMOUS SANSKRIT POET, `MAHAKAVI KALIDAS`. THE FIGURE OF SPEECH MAINTAINED THROUGHOUT THE EPIC IS `MANDAKRANTA`. EVERY LINE OF THE EPIC IS MEANINGFUL, REVEALING THE MEANING OF NATURE AND MIND, EXPLAINING THE BEAUTY OF NATURE AND MIND.ACTUALLY, EACH AND EVERY PART OF THE EPIC IS STRONG AND BEAUTIFUL ITSELF, BUT THE STRONGEST IS THE WAY HE HAS DESCRIBED THE HERO`S ANGUISH ON SEPARATION FROM HIS WIFE WHO IS ALSO HIS LOVER. BEFORE SHANTABAI SHELKE TOOK THE DIFFICULT TASK OF TRANSLATING THIS EPIC MANY HAD ATTEMPTED TO DO SO. HER STYLE IS SIMPLE, NOWHERE COMPLEX, HER STANZAS HAVE A RHYTHM AND A PARTICULAR FIGURE OF SPEECH IS MAINTAINED THROUGHOUT. WHILE DOING SO, SHE TAKES IMMENSE CARE TO KEEP THE ORIGINAL FORM AS IT IS. HER TRANSLATION IS SO PERFECT THAT AT TIMES WE FORGET THAT WE ARE READING THE MARATHI VERSION OF THE EPIC AND NOT THE ORIGINAL SANSKRIT ONE. THOSE TENDER AND SENSITIVE MINDS WHO ARE FANS OF THE EPIC `MEGHDOOT` WILL SURELY WELCOME THIS TRANSLATION AND THOSE WHO COULD NOT GO THROUGH IT FOR SOME REASON OR OTHER WILL ALSO LOVE THIS NEW `MEGHDOOT`.
आशयाला धक्का न लावता केलेली प्रतिकृती. महाकवि श्रीकालिदास याचे "मेघदूत" ही संस्कृत साहित्यातली एक स्वभावरमणीय अलौकिक कलाकृती आहे. "मन्दाक्रान्ता" सारखे रसोचित वृत्त, प्रत्ययकारी निसर्गवर्णने, वेधक स्थलचित्रणे, विरहाच्या पाश्र्वभूमीवर व्यक्त झालेला उत्कट प्रणयभाव आणि हे सारे समर्थपणे शब्दांकित करणारी कालिदासाची सुश्लिष्ट शैली यांमुळे "मेघदूता"ला अम्लान टवटवीत लावण्य लाभले आहे. मराठीत "मेघदूता"चे अनेक अनुवाद झाले आहेत. आता प्रसिद्ध कवयित्री शान्ता ज. शेळके या आपला अनुवाद रसिकांना सादर करीत आहेत. साधी सरळ निवेदनपद्धती, छंदोबद्ध प्रवाही रचना, मूळ काव्याच्या रसवत्तेला बाध न आणता किंवा आशयाला ढका न लावता केलेली त्याची प्रतिकृती हे शान्ताबाईच्या अनुवादाचे लक्षणीय विशेष आहेत. "मेघदूता"च्या रसलुब्ध प्रेमिकांना तर हा अनुवाद आवडेलच, पण स्वतंत्रपणे वाचणारांनाही तो आस्वाद्य वाटेल.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEGHDOOT #KALIDAS #SHANTASHELKE #TRANSLATIONINMARATHI
Customer Reviews
  • Rating StarMamatta Mungilwar

    ::मेघदूत:: * * आषाढास्य प्रथम दिवसे ** आषाढास्य प्रथम दिवसे,अशी सुरुवातच महाकवी कालिदास लिखित "मेघदूत " ह्या काव्याची. भारतीय मनाला नेहमीच भुरळ घालणार काव्य. महाकवी कालिदास यांचे मेघदूत हेसंस्कृत साहित्यातील एक अलौकिक कलाकृती आहे. मंदाक्रांता सारखे वृत्त , वेधक स्थळचित्र आणि पार्श्वभूमीवर व्यक्त झालेल्या उत्कट प्रणय भाव आणि हे सारे समर्थपणे शब्दांकित करणारे कालिदासाची शैली ....... प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीने ,,सरळ निवेदन पद्धतीने , मूळ काव्याचा रस व आशय वाचका पर्यंत पोहचवला आहे. || कुबेर सेवक यक्ष एक कुणी सेवे माझी आपल्या चुकला प्रिया वियोगे अधिकच दुस:ह वर्षाचा त्या शाप मिळाला जनक सुतेच्या स्नाना योगे पावन झाले जिथे जलाशय घनच्छाय त्या रामगिरीवर विविध आश्रमी घेई आश्रय|| एका यक्षाला त्याच्या कर्तव्यचुकीमुळे यक्षराज कुबेर ,एक वर्षाची हदपारीचा शाप ( शिक्षा )देतो. ते पण अलका नगरी पासून लांब अशा रामगिरी पर्वतावर राहण्याची. विरहात तळमळणारा हा यक्ष आकाशातल्या मेघाला पाहतो आणि दूत बनवून आपल्या पत्नीला निरोप पाठवतो. रामगिरी पासून ते अलकानगरी पर्यंत जाताना लागणारे, अवंती देश, विदिशा नगरी, ब्रह्मवर्त, कुरुक्षेत्र, गंगोत्री, दिमधवल पर्वत, त्यातील लागणारी नगरे आणि निसर्ग ह्याचे वर्णन तो मेघाला विस्तृत पणे सांगतो. ही झाली मेघदूतातली काव्यकल्पना. कालिदासाच्या प्रतिभा संपन्नतेला प्रणाम🙏 आणि शांता बाईच्या अनुवादाला सुद्धा प्रणाम. "पादा कुलाक" वृतांत अतिशय प्रवाहिपणे आपल्या डोळ्यासमोर चित्र कृती उभी राहते. Mamata`s विचार:: ढगातून निरोप देण्यावरून----- आज कालची पिढी म्हणे, आपले पर्सनल msg , डेटा, cloud मध्ये save करतात. हे पण प्रतिभावंत कालिदासाच्या प्रतिभेचं सत्य रूप का?? असंख्य प्रश्न?? ©️®️....... ममता मुनगीलवार ...Read more

  • Rating StarANK - FEB 2000

    महाकवी कालिदासाच्या सदाबहार मेघदूताचा रम्यमनोहर अनुवाद महाकवी कालिदास याच्या मेघदूत या खंडकाव्याला भारतीय साहित्यात एक विशेष स्थान आहे. आपल्या प्रियेपासून वर्षभरासाठी दूर जावे लागलेला कुबेर सेवक यक्ष तिला मेघदूतामार्फत संदेश पाठवत आहे अशी रोमँटिक कलपना या काव्याच्या केंद्रस्थानी आहे. रामगिरीच्या आश्रमातून आषाढाच्या पहिल्या दिवशी गिरिशिखरावर दिसलेला मेघाला तो आवाहन करतो, आणि आपल्या प्रियेला निरोप देण्यासाठी गळ घालतो. प्रियेकडे कोणत्या मार्गाने जावे, जाताना वाटेत काय काय दृष्टीस पडेल याचेही वर्णन करतो आणि कैलास पर्वताजवळच्या अलकापुरीत पोचल्यावर प्रियेला आपली खूण पटवून काय संदेश द्यावा याचेही विवरण करतो. मंदाक्रांता वृत्तातील १२० चतुष्पदींचे हे छोटेखानी काव्य प्रत्ययकारी निसर्गवर्णने, वेधक स्थलचित्रणे आणि विरहार्त प्रणयभावना यांचा त्रिवेणी संगम साधते. आतील स्थलचित्रणांची वास्तवता आजही रसिकांना मुग्ध करते. विमानातून मेघदूताच्या मार्गाने प्रवास केला तर कालिदासाने केलेल्या स्थलवर्णनांची अचूकता लक्षात येते. मेघदूताचे मराठीत भाषांतर, अनुवाद करणे हे आपल्या काव्यप्रतिभेला आव्हान आहे असे प्रत्येक संस्कृतच्या जाणकार कवीला वाटले. त्यामुळे मराठीत मेघदूताचे वीसबावीस अनुवाद उपलब्ध आहेत. कविवर्य कुसुमाग्रज, वसंत बापट, माधव जूलियन, बा. भ. बोरकर यांच्यासारख्या ज्येष्ठ कवींनीही मेघदूतला मराठी रूप दिले आहे. सी. डी. देशमुख, ‘सुश्लोक’ श्रीखंडे प्रभृती संस्कृत पंडितांनीही ‘मेघदूत’च्या निमित्तने आपल्या काव्यरचनेचा कस अजमावून पाहिला आहे. इ. स. १९९४ मध्ये शांता शेळके यांनी एके दिवशी सहजपणे मेघदूतातील काही आवडत्या श्लोकांचे मराठीकरण सुरू केले आणि संपूर्ण मेघदूताचा अनुवाद केल्यावरच त्या थांबल्या. झपाटल्यासारखे त्यांना जणू झाले होते. कॉलेजमध्ये अभ्यासलेल्या मेघदूतातील अनेक श्लोक मनात घोळवत राहण्याचा त्यांचा छंद. त्याची परिणती अशी अनुवादात सत्तरीच्या घरात आल्यावर झाली. शांताबाई प्रारंभीच्या निवेदनात म्हणतात, ‘‘मराठीतील अनेक कवींना, लेखकांना असा अनुवाद करून बघावा असे वाटले. हे सारे वाचन मी एका अनावर ओढीने, प्रेमाने करीत राहिले. त्यामुळे माझी मेघदूताची जाण कितपत सूक्ष्म वा प्रगल्भ झाली ते मला सांगता येणार नाही, पण मेघदूताचे आकर्षण अधिकाधिक वाढत गेले हे मात्र खरे... अशाच एका भारलेल्या मनाच्या अवस्थेत अगदी सहज, निर्हेतुक वृत्तीने मेघदूतातील काही आवडत्या श्लोकांचा मी अनुवाद केला... अनुवाद करून बघणे हा मूळ कलाकृत्तीचा अधिक उत्कटपणे रसास्वाद घेण्याचा एक सुंदर मार्ग आहे... माझा अनुवाद सरळ, साधा, पादाकुलकासारखा प्रवाही छंदात केलेला आहे. तो करताना मुळातील आशयाला, रसवत्तेला हानी पोचू नये याची मी शक्य तेवढी काळजी घेतली आहे. मुख्य म्हणजे माझ्या पदरचे त्यात काहीही, कुठेही घालण्याचे धाष्टर्य मी केले नाही.’’ शांताबार्इंच्या मेघदूताला आपला अंतरिक्षातून काढतानाही फारसे अवघड गेलेले नाही. जेट विमान देखील ढगांच्या गर्दीतून मार्ग काढताना कधी कधी वादळी हेलकावे घेते. तेव्हा कवितेच्या चरणांनीही थोडेफार गचके वाचकांना बसले तर त्यात काही विशेष मानण्याचे कारण नाही. आषाढाच्या पहिल्या दिवशी बघ तो शिखरी मेघ वांकला टक्कर देण्या तर भिंतीवर क्रीडातुर गज जणू ठाकला ! ।।२।। (आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टानुं वप्रक्रीडा परिणतगज प्रेक्षणीयं ददर्श) जन्मलास तू, घना, जाणतो, प्रथित पुष्करावर्तक वंशी इंद्राचा तू प्रधान सेवक, रूप हवे ते धारण करिशी म्हणून याचना तुझीच करतो वियुक्त जन मी प्रियेपासुनी क्षुद्रांच्या उपकारापेक्षा विफलही बरवी सुजन विनवणी ।।६।। जिवा तापल्या तूच निवविसी म्हणुनि याचितो मेघा तुजला धनपतिशापे विरहतापल्या निरोप माझा पोचव सखिला यक्षांची प्रिय अलकानगरी तिथेच आहे तुजला जाणे शिवमस्तकिंच्या चंद्रकलेचे जिथे पुâलतसे नित्य चांदणे ।।७।। अनिर्वेध तू जाता ऐसा, घना, पाहशील अपुली वहिनी एकएक दिन मोजुनियां ती काळ कंठिता असेल शिणली ललनाहृदये विगलित होती फुलांपरी ती कोमल जात्या आशा तंतू चिवट परंतु वियोगकाली सावरितो त्या ।।९।। असा हा यक्ष मेघदूताला आपल्या ‘भाभीच्या’ भेटीला निरोप देऊन पाठवत आहे; त्यामुळे वाचकांनाही त्याच्या विषयी आत्मीयता वाटणे स्वाभाविक ठरेल. अधूनमधून मूळ संस्कृत शब्द कमी जास्त फरकाने तसेच येतात. भ्रमरपंक्तिसम कटाक्ष तिरपे टाकतील तुजवरी कामिनी (नामोक्ष्यन्ते त्वयि मधुकरश्रेणिदीर्घान्कटाक्षान), मेघचन्द्रस्वर गंभीर गर्जित (मामन्द्राणां गर्जितानाम्) वामअंक मुकलासे जो आता माझ्या नखक्षतांना (वामाश्चाया: कररूहपदैमुच्यमानो मदियै मुक्ताजालं) अंगराग मिसळले जयातुन जलकेलीस्तव येता युवती अशा संस्कृत - मराठी मिश्रित ओळी या अनुवादात भरपूर दिसतात. स्वरामध्ये स्वर मिसळुन जाया सज्ज सदाही असती किन्नर रात्र घालवी तिथे, प्रियाही असेल शिणली तव लखलखुनी, सूय उगवता पुन्हा पहाटे प्रवास आपुला सुरू करी तू... गारांचा वर्षाव करूनिया दाणादाण करी तू त्यांची भलते साहस करू बघते जे, गत त्यांची तर हीच व्हायची ! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more