* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MY JOURNEY TRANSFORMING DREAMS INTO ACTIONS
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184985634
  • Edition : 5
  • Publishing Year : SEPTEMBER 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
  • Available in Combos :DR. A. P. J. ABDUL KALAM COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MY JOURNEY: TRANSFORMING DREAMS INTO ACTIONS IS THE LIFE STORY OF INDIA`S ELEVENTH PRESIDENT, DR. A. P. J. ABDUL KALAM, WHO STARTED OFF AS AN INSIGNIFICANT LITTLE BOY RAMESWARAM, BUT ENDED UP BECOMING THE PRESIDENT OF THE COUNTRY, BESIDES BEING A BRILLIANT SCIENTIST AS WELL. THE BOOK PORTRAYS THE STRUGGLE THAT DR. KALAM HAD TO ENDURE, AS HE CLIMBED THE LADDER OF SUCCESS IN LIFE. HE SPEAKS AT LENGTH ABOUT EACH AND EVERY INDIVIDUAL WHO IMPACTED HIS LIFE, DURING HIS FORMATIVE YEARS AS A CHILD AND EVEN WHEN HE WAS A YOUNG ADULT. HE SPEAKS ABOUT THOSE WHO WERE THE CLOSEST TO HIM, SUCH AS HIS FATHER, WHO LOVED GOD DEEPLY. HE ALSO TALKS ABOUT HIS MOTHER AND HER KINDNESS. APART FROM HIS PARENTS, HE SPEAKS ABOUT HIS MENTORS, WHO MOLDED HIS THOUGHTS AND DIRECTED HIS ACTIONS. MY JOURNEY: TRANSFORMING DREAMS INTO ACTIONS IS A BOOK THAT OFFERS YOU MANY EMOTIONAL ACCOUNTS BY DR. KALAM, WHICH SPEAK OF HIS LIFE IN A SMALL TOWN BY THE BAY OF BENGAL. HE TELLS HIS READERS ABOUT THE MANY TIMES WHEN HE WOULD FEEL DEJECTED IN LIFE AND WAS ON THE VERGE OF GIVING UP. HE MENTIONS THAT HE GAINED STRENGTH IN THOSE TIMES FROM SPIRITUALITY AND CERTAIN BOOKS. ALL IN ALL, THE BOOK GIVES YOU VALUABLE AND FIRST-HAND INFORMATION ON LIFE ITSELF.
देशातील नामवंत शास्त्रज्ञ व ज्येष्ठ विचारवंत डॉ. कलाम यांच्या जीवनयात्रेतील स्फूर्तिदायी आठवणी... रामेश्वरमच्या सागरतीरावरील अल्लडवयीन मुलगा ते भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणारा बुद्धिमान शास्त्रज्ञ व थोर विचारवंत... या दरम्यानची डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जीवनयात्रा म्हणजे दृढनिश्चय, धाडस, चिकाटी आणि सर्वोत्कृष्टतेचा ध्यास यांचा विलक्षण मिलाफ आहे. या जीवनयात्रेदरम्यानच्या आठवणी, भेटलेली माणसं, ठळक प्रसंग त्यांनी या पुस्तकातून वाचकांसमोर उलगडले आहेत. त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणार्‍या व्यक्ती, त्यांचे जिवलग, मार्गदर्शक, गुरू या सगळ्यांबद्दल त्यांनी अतिशय प्रेमानं व आपुलकीनं लिहीलं आहे. आयुष्यात या स्थानावर पोहोचताना त्यांनी केलेला त्याग, संघर्ष आणि जिद्द यांच्या वाटचालीची कहाणी वाचताना वाचक भारावून जातो. ही विलक्षण जीवनयात्रा मार्गदर्शक, स्फूर्तिदायी आणि प्रेरक आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #INDOMITABLE SPIRIT#A.P. J.ABDULKALAM #ADAMYAJIDDA #SUPRIYA VAKIL #सुप्रियावकील #अदम्य जिद्द #MAZI JIVAN YATRA# MY JOURNEY TRANSFORMING DREAMS INTO ACTIONS #TURNING POINTS #अंजनी नरवणे #ANJANI NARAWANE"
Customer Reviews
  • Rating Starसुनील वळसे-दुबई

    मित्रहो, अपयश हा यशाचा पहिला मार्ग आहे हें आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहोत. टॉम वॅटसन म्हणतात कि तुमचे प्रयत्न असफल होत असतील तर तुम्ही दुप्पट वेगाने प्रयत्न करा. प्रत्येक थोर व्यक्तींची कथा ही अपयशाचीही कथा असते. मग ह्या थोर लोकांचे वेगळेपण काय सते? ही माणसे प्रत्येक अपयशातून बोध घेऊन पुन्हा जोमाने उभी राहतात. माणसाला दोन गोष्टी हुशार बनवतात वाचलेली पुस्तके आणि भेटलेली माणसे. आज पहिल्याच पुष्पामध्ये मी परिचय करून देणार आहे माझ्या सगळ्यात आवडत्या पुस्तकाचे आणि ते म्हणजे डॉ.एपी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेले "माय जर्नी " या पुस्तकाविषयी. हे पुस्तक पहिले घेण्याचे कारण म्हणजे जेव्हा जेव्हा मी आयुष्यामध्ये नाउमेद झालो किंवा आपला ट्रॅक सुटतो आहे असे मला वाटायला लागले, त्यावेळी या पुस्तकाने मला नेहमी जगण्याची ऊर्जा आणि स्वप्न पाहण्याची ताकद दिली. आणि म्हणून हे पुस्तक मला नेहमी जीवनाचा साथीदार वाटते. लेखिका सुप्रिया वकील यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद खूप सुंदर भाषाशैलीमध्ये केलेला आहे. चला तर जाणून घेऊ, या पुस्तका विषयी. भारताचे अकरावे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे नाव अवघ्या जगाला सुपरिचित आहे. भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील आपल्या अतुल्य योगदानाद्वारे त्यांना जगाच्या क्षितिजावर नावारूपाला आणलं. “ माझी जीवन यात्रा “ हे एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवन चरित्र आहे. डॉक्टर अबुल पाकिर जैनुलब्दीन कलाम यांचा जन्म तामिळनाडूतील रामेश्वर येथे झाला. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी “एरोनॉटिकल इंजीनियरिंग” चा अभ्यास केला. भारताचा पहिला उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी चा प्रक्षेपक “SLV-3” तयार करण्यात त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली आणि त्या प्रक्षेपकाद्वारा १९८० मध्ये "रोहिणी" उपग्रह प्रक्षेपित केला. या त्यांच्या कामगिरीमुळे भारताचा "स्पेस क्लब" मध्ये प्रवेश झाला . त्यानंतर भारताची महत्वाची क्षेपणास्त्रे तयार करून ती कार्यान्वित करण्यात आली आणि १९९८ मध्ये भारतात अणू चाचण्या घडविण्यात ही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. देशातील अग्रणी शास्त्रज्ञ तसेच "टेक्नोलॉजी इन्फोर्मेशन आणि फॉरकास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिल"चे अध्यक्ष म्हणून पाचशे तज्ञांच्या मदतीने टेक्नॉलॉजी विजन २०२०, तयार करून एक प्रगत राष्ट्र म्हणून भारतामध्ये बदल घडवून आणण्यात त्यांचा पुढाकार होता. १९८१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने , १९९० मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. २५ जुलै २००२ रोजी डॉक्टर कलाम भारताचे राष्ट्रपती बनले, ते देशाचे अकरावे राष्ट्रपती होते. "माझी जीवन यात्रा" मध्ये अब्दुल कलाम यांनी त्यांच्या ऐंशी वर्षांच्या आयुष्यातील, अगदी बालपणापासून ते वयाचा ऐंशीच्या टप्पा पार करेपर्यंतच्या काळातील काही खास आठवणी जागवल्या आहेत. या सगळ्या प्रवासात अनुभवांचे हे सगळे खंड वेचताना मी एक महत्त्वाची गोष्ट शिकलो आणि ती म्हणजे प्रत्येकाने आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर स्वप्न उराशी बाळगली पाहिजेत आणि मग ती साकार करण्यासाठी कठोर मेहनत घेतली पाहिजे. असं केल्यास यश दूर नाही. अब्दुल कलाम सांगतात ही स्वप्न म्हणजे आपल्याला झोपेत पडतात ती नव्हेत ही स्वप्न अशी असली पाहिजेत जी आपल्याला झोपच येऊ देणार नाहीत. या पुस्तकात त्यांनी आयुष्यात आजवर न लिहिलेल्या छोट्या छोट्या फारशा परिचित नसलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांच्या आई वडिलांच्या आठवणी लिहिल्या आहेत. ते सांगतात, त्यांच्या आई वडिलांनी जी मूल्य व नीतिमत्तेची जाणीव रुजवली ती त्यांनी शेवटपर्यंत आत्मसात केली. एकदा अब्दुल कलाम यांचे स्नेही प्रोफेसर अरुण तिवारी यांनी त्यांना एक वेगळाच प्रश्न केला, कलाम साहेब तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रवास एका वाक्यात कसे सांगाल ? त्यांच्या या प्रश्नावर त्यांनी काही वेळ विचार केला आणि म्हणाले, माझ्या आयुष्याबद्दल म्हणता येईल की भरभरून प्रेम लाभले लहान मुल...... संघर्ष.... आणखी संघर्ष.... दुःखाचे कढत अश्रू ..... मग आनंदाश्रू ........ आणि अखेर सुंदर व सुफल आयुष्य ..... पूर्ण चंद्रबिंब उमटताना पहावं तसं..... ! या पुस्तकाचा शेवट करताना कलाम साहेब म्हणतात कठोर परिश्रम, निष्ठा, अभ्यास आणि ज्ञान उपासना अनुकंपा आणि क्षमाशीलता या गोष्टी माझ्या जीवनात पायाभूत आहेत. या वैशिष्ट्यांची कहाणी मी जगाला अगदी मुळापासून सांगितली आहे. खरंतर कोणाचेही आयुष्य इतरांना सांगणे म्हणजे विचार व भावना यांचा खजिना खुला करणं असतं, जीवन नामक आश्चर्याला हे विचार व भावना झळाळी देत असतात या प्रक्रियेमध्ये जर या गोष्टींनी माझ्या वाचकांना स्वप्नांना पंख दिले त्यांच्या मनात स्वप्नांचे स्फुल्लिंग चेतवले तर देवाने मला जे आयुष्य दिलं त्यातही माझी छोटीशी भूमिका मी बजावली असे मी समजेल. माझी खात्री आहे हे पुस्तक प्रत्येकाला त्यांची स्वप्न जाणून घेण्यास व ती साकार करण्यासाठी परिश्रम करण्यास भाग पाडेल, आणि हे स्वप्नच त्यांना जागृत ठेवतील. धन्यवाद .... ...Read more

  • Rating StarSachin

    This book was very that do our inspire

  • Rating StarNEWS PAPAR REVIEW

    सर्जनशील आणि चिंतनगर्भ दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या तीन पुस्तकांचा मराठी अनुवाद करण्याची संधी मिळाली. अनुवादाच्या निमित्ताने डॉ. कलाम यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व समजून घेताना आलेले अनुभव विलक्षण आनंददायी आणि तितकेच प्रेरणादायी ोते... सन २००८ मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचं Indomitable Spirit हे पुस्तक पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊस यांच्याकडून मराठी अनुवादासाठी माझ्याकडे आलं. डॉ. कलाम यांनी विविध प्रसंगी, विविध ठिकाणी केलेली भाषणे, संवाद, चर्चा यांचं हे संकलन वाचताना मी अतिशय भारावून गेले होते. रामेश्वराच्या सागरतीरापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाचं लख्खं प्रतिबिंब असणाऱ्या या पुस्तकात त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचे आणि चिंतनाचे सार आहे. या चिंतनशील विचारवंताच्या लेखणीतून उमटलेले शब्द मराठीत अनुवादित करणं हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचं असलं तरी त्यासोबत अर्थातच मोठी जबाबदारीही होती. विकसित भारताचे स्वप्न पाहणारा थोर द्रष्टा नेता, मूल्यप्रेमी, देशभक्त, सच्चा ज्ञानोपासक आणि कवीमनाचा शास्त्रज्ञ अशा अनेक रूपांत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम Indomitable Spirit या पुस्तकाच्या पानापानातून उलगडत गेले, भेटत गेले. त्यांचा साधेपणा, ऋजुता, त्याग, संघर्ष, जिद्द सारंच मनाला भिडत गेलं. त्यांच्या साध्या वाटणाऱ्या शब्दांच्या आशयघनतेमुळे आणि नेमकेपणामुळे अनुवादाचं काम अधिकच आव्हानात्मक होतं. त्यांच्या तळमळीच्या शब्दांना मी माझ्या कुवतीनुसार मराठीत आकार देत गेले आणि मराठी ‘अदम्य जिद्द’ तयार झालं. या पुस्तकाच्या आजवर सात आवृत्त्या झाल्या असून वाचकांचा या पुस्तकाला खूप चांगला प्रतिसाद लाभतो आहे. या पुस्तकासाठी वाचकांची बरीच पत्रे, फोन, मेसेज आले आहेत. अनेकजण प्रत्यक्ष भेटल्यावरही अभिप्राय देत असतात. अशावेळी त्यांचे भारावलेले शब्द ऐकले किंवा वाचले की डॉ. कलाम आणि मराठी वाचक यांच्यातील दुवा बनण्याचं भाग्य मला लाभलं आहे, याचा मला प्रत्येकवेळी नव्यानं आनंद होतो, अपार समाधान लाभतं. ‘अदम्य जिद्द’ नंतर २०१४ मध्ये त्यांचं ‘माय जर्नी’ हे दुसरं पुस्तक माझ्याकडं अनुवादासाठी आले. ‘अदम्य जिद्द’मुळं त्यांच्या लेखनशैली, विचारांशी आणि त्यांच्या कार्याशी परिचय घडलाच होता, त्यामुळे या अनुवादाला मी आनंदानं सुरुवात केली. सप्टेंबर २०१४ मध्ये ‘माझी जीवनयात्रा’, ‘स्वप्ने साकारताना’ या शिर्षकानं हे पुस्तक मराठीत आलं. डॉ. कलाम यांनी वयाच्या ऐंशीचा टप्पा पार करेपर्यंतच्या काळातील काही खास आठवणी या पुस्तकात जागवल्या आहेत. ‘या पुस्तकातील आठवणी माझ्या सर्व वाचकांना त्यांची स्वप्नं जाणून घेण्यास व ती साकार करण्यासाठी परिश्रम करण्यास भाग पाडतील. ही स्वप्नंच त्यांना जागृत ठेवतील’, असा त्यांना आशावाद होता. त्यांचं बालपण, तेव्हाची परिस्थिती, रामेश्वरम, सागराची गाज, आई-वडिलांची माया, बहिणीचं आणि तिच्या पतीचं निःस्वार्थी प्रेम, आईच्या हातचं साधंसं, पण अमृततुल्य भोजन, तिच्या हातची गुळगुळीत वाटलेली मऊ, मलईदार चटणी, चक्रीवादळाचं तडाखे, अभ्यासात रुंदावू लागलेल्या कक्षा, स्टार विद्यार्थी, आठव्या वर्षापासून सुरू झालेले कष्ट आणि त्यानंतर एकेक टप्पा पार करीत राष्ट्रपती पदापर्यंतची वाटचाल. हे सगळं वाचताना आपण भारावून नाही गेलो तरच नवल! ‘अदम्य जिद्द’मध्ये त्यांनी त्यांचे शिक्षक, स्फुर्तिदायीदायी व्यक्तित्वं याच बरोबर विकसित भारताची उभारणी, चिरंतन मूल्ये, सर्जनशीलता, सुजाण नागरिकत्व अशा अनेक विषयांना अभ्यासपूर्ण स्पर्श करत त्यांच्यातील रसिक कवीमनाचे आणि अत्यंत संवेदनशील मूल्यनिष्ठ व्यक्तीचे दर्शन घडवले आहे. त्यांच्या या तळमळीचा, उत्साहाचा आणि सकारात्मकतेचा आपल्यालाही स्पर्श घडतो. डॉ. कलाम ‘बोले तैसा चाले’ चे मूर्तिमंत उदाहरण आहेत, असं ही पुस्तकं वाचताना पानोपानी जाणवत राहतं. त्यांनी ‘माझी जीवनयात्रा’मध्ये म्हटलंय, ‘आपण जेव्हा अडथळ्यांवर मात करायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला आपल्यात दडून असलेलं धैर्य आणि लवचिकता लक्षात येते. तोवर कधीही आपल्याला आपल्यातलेच हे गुण कळलेले नसतात. ज्यावेळी आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो, त्याचवेळी आपल्यामध्ये हे गुण नेहमीच होते, हे लक्षात येतं. गरज असते ती फक्त हे गुण शोधण्याची आणि आयुष्यात पुढे वाटचाल करत राहण्याची!’ या दोन्ही पुस्तकात त्यांनी त्यांच्या यशापयशाची कहाणी, त्यातून शिकलेले धडे याबद्दल सांगताना विकसित भारताचं स्वप्नही रूजवलं आहे. अध्यात्म आणि विज्ञानाचा उत्तम मिलाफ घडवणारे चिंतनशील विचारवंत व शास्त्रज्ञ डॉ. कलाम या पुस्तकात म्हणतात ‘मी या सगळ्या गोष्टी का सांगतोय? माझा खूप वेगवेगळ्या विषयांशी व लोकांशी संबंध आला आहे. त्यामध्ये आयुष्याचा जवळपास प्रत्येक पैलू मी पाहिला आहे. हे मती गुंग करणारं आहे. कदाचित त्यामुळे हे सांगावं असं वाटत असेल की, मी या साऱ्यातून माझा रस्ता शोधला आहे आणि माझ्या या स्मरणयात्रेतून जर कुणा अशाच परिस्थितीतून जाणाऱ्या माणसांना जीवनातली लहरी वाटा-वळणं समजून घेण्यास मदत झाली, तर मला आपण फक्त स्वत:साठी जगलो असं न वाटता इतर असंख्य लोकांसाठी जगलो असं वाटेल.’ ‘माझी जीवनयात्रा’चा समारोप करताना त्यांनी म्हटलं आहे, ‘जर या गोष्टींनी माझ्या वाचकांच्या स्वप्नांना पंख दिले. त्यांच्या मनात स्वप्नांचे स्फल्लिंग चेतवले तर दैवाने मला जे आयुष्य दिलंय त्यामधली माझी छोटीशी भूमिका मी बजावली असं मी समजेन’ किती साधं, निगर्वी व्यक्तिमत्त्व आणि सर्वांनाच विचारप्रवृत्त करणारे व आदर्शवत असे अनमोल विचारधन! कलामसाहेब, तुमच्या कार्यातून, तुमच्या शब्दातून आणि विचारातून तुम्ही आमच्या मनात स्वप्ने, आदर्श आणि मूल्ये रूजवली आहेत. या साऱ्यातून तुम्ही सदैव आमच्यासोबत राहात असा मला विश्वास आहे. कलाम साहेब, सलाम!!! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more