* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MARATHESHAHICHE ANTARANG
  • Availability : Available
  • ISBN : 9789387789234
  • Edition : 4
  • Publishing Year : DECEMBER 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
  • Available in Combos :DR.JAYSINGHRAO PAWAR & VASUDHA PAWAR COMBO SET- 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"WHEN SAMBHAJI RAJE WAS ARRESTED WERE ANY ATTEMPTS MADE FOR HIS RELEASE? WHAT WERE THEY? IT IS SAID THAT THE FIRST QUEEN OF CHHATRAPATI RAJARAM MAHARAJ- DAUGHTER OF PRATAPRAO GUJAR- DIED IMMEDIATELY FOLLOWING MARRIAGE. BUT IN REALITY, SHE WAS ALIVE TILL 1719. IF SO, WHERE WAS SHE? A DESHMUKH LIKE GIRJOJI YADAV PLAYED MANY TRICKS FOR THE ‘WATAN’; WHAT WERE THESE? WHAT WERE THE WATANDARS DOING FOR THE WATAN? WHY DID DHANAJI JADHAV LEAVE TARABAI AND JOIN SHAHU MAHARAJ DURING THE BATTLE AT KHED? THE REVOLUTION ENDING THE REGIME OF MAHARANI TARABAI AND HER SON SHIVAJI RAJE TOOK PLACE ON PANHALGAD. WHO WAS BEHIND THIS ‘PALACE REVOLUTION’? HOW DID QUEEN JIJABAI OF KOLHAPUR PROTECT HER KINGDOM WHILE DEALING WITH THE PESHWAS OF PUNE? HOW DID THE INHUMAN SELLING AND BUYING OF FEMALE SLAVES TAKE PLACE DURING MARATHA REGIME? WHY DID THE REGIME OF SHIVAJI MAHARAJ’S DESCENDANTS COME TO AN END? THE FAMOUS HISTORIAN DR. JAISINGRAO PAWAR SEEKS ANSWERS TO MANY SUCH QUESTIONS. "
"या ग्रंथात- - संभाजी राजांना मोगलांनी कैद केल्यावर त्यांना सोडविण्यासाठीचे काही प्रयत्न झाले की नाही? झाले असल्यास ते कोणते? - छ. राजाराम महाराजांची पहिली राणी- प्रतापराव गुजरांची कन्या, ही लग्नानंतर लवकरच मरण पावली, असे इतिहासकार मानत आले. प्रत्यक्षात ती सन १७१९ पर्यंत जिवंत होती, मग ती होती कोठे? -गिरजोजी यादवासारखा एक देशमुख- वतनासाठी काय काय करत होता? वतनासाठी वतनदार काय काय खटपटी लटपटी करत? - खेडच्या लढाईत सेनापती धनाजी जाधव ताराबाईचा पक्ष सोडून शाहू महाराजांना का जाऊन मिळाला? -सन १७१४ मध्ये पन्हाळगडावर महाराणी ताराबाई व त्यांचे पुत्र शिवाजीराजे यांच्या राजवटीचा अंत घडवून आणणारी ‘राजवाड्यातील क्रांती’ कोणी व घडवून आणली? - पुण्याच्या पेशव्यांशी प्रसंगी मुत्सद्देगिरीने वागून, संघर्ष करून, कोल्हापूरकर राणी जिजाबाई यांनी आपल्या राज्याचे रक्षण कसे केले? - माणुसकीला काळिमा फासणारी मराठेशाहीतील स्त्रीगुलामांची खरेदी-विक्री कशी होत असे? - मराठेशाहीतील छत्रपती, शिवरायांचे वंशज यांची सत्ता का लयाला गेली? यांसारख्या मराठेशाहीच्या अंतरंगातील अनेक प्रश्नांचा शोध घेत आहेत प्रसिद्ध इतिहाससंशोधक डॉ. जयसिंगराव पवार. "

No Records Found
No Records Found
Keywords
" #मराठेशाहीचे अंतरंग# डॉ. जयसिंगराव पवार# छत्रपती संभाजी महाराजांस मोगली वैÂदेतून सोडविण्याचा एक अज्ञात प्रयत्न# इतिहासाच्या अज्ञातवासातील मराठ्यांची एक राणी# गिरजोजी यादव : मराठेशाहीतील एक कर्तबगार पण मतलबी मराठा# सेनापती धनाजी जाधव व गिरजोजी यादव यांचा तंटा# धनाजी जाधव : इतिहासाला कलाटणी देणारा सेनापती# मराठेशाहीतील एकमेव रक्तहीन राज्यक्रांती# महाराणी जिजाबाई आणि पेशवे माधवराव्# मराठेशाहीतील पाच कर्तृत्वशालिनी स्त्रिया# मराठेशाहीतील विजयादशमी आणि क्षात्र परंपरा# कुणबीण : मराठेशाहीतील स्त्रीगुलाम# मराठेशाहीतील छत्रपती हासाला का गेले? #MARATHESHAHICHE ANTRANG# DR. JAYSINGRAO PAWAR# CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJAS MOGALI KAIDETUN SODAVINYACHA EK ADYNAT PRAYATNA# GIRJOJI YADAV : MARATHESHAHITIL EK KARTABGAR PAN MATLABI MARATHA# MARATHESHAHITIL VIJAYADASHMI ANI KSHATRA PARAMPARA #KUNBIN : MARATHESHAHITIL STRIGULAM# MARATHESHAHITIL CHATRAPATI RHASALA KA GELE? #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more