* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MANDESHI MANASA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983630
  • Edition : 24
  • Publishing Year : JANUARY 1949
  • Weight : 170.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 41 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MANADESHI IS AN INSEPARABLE PART OF POSTINDEPENDENCE MARATHI LITERATURE. THE CHARACTER SKETCHES IN THIS COLLECTION ARE NOT ONLY TALES IN THE OLD MOULD, BUT ALSO HAVE THE MAGICAL QUALITY THAT TOUCHES UPON THE VERY ESSENCE OF LIFE. THE CHARACTERS ARE GENUINELY MARATHI IN NATURE, AND THEY HAVE BEEN DRAWN WITH THE EASE WITH WHICH DAWN TURNS INTO DAY OR A BUD BLOSSOMS INTO A FLOWER. WITH INNOCENCE, VYANKATESH MADGULKAR TELLS US ABOUT THE POVERTYSTRICKEN LIVES OF THE PEOPLE OF MANDESH AND THEIR SAGA OF NEVERENDING SORROWS. THEIR TRAGEDY IS MOVING. THE MIND IS FILLED WITH THE THOUGHT THAT WHILE MEN SEEK SOME HAPPINESS, THEIR LIVES WERE NEVER SCRIPTED TO FIND IT. THIS ESSENTIAL TRAGIC FACT IS TOLD BY MADGULKAR WITH THE DETACHMENT OF AN ARTIST. THIS RENDERS HIS CHARACTERS UNFORGETTABLE. OUR MIND IS DISTURBED EVERY TIME WE THINK OF THEM.
स्वतंत्र्योत्तर मराठी साहित्याने अक्षर गंध निर्माण झाले. त्यात माणदेशी माणसांचा समावेश होतो. या व्यक्तिचित्रात जुन्या कथेतील गोष्ट तर आहेच पण जीवनाच्या अस्सल गाभ्यालाच स्पर्श करणारी नक्कलकथेची किमयादेखील आहे. अंधारातून पहाट व्हावी, कळीचे फुलं व्हावे इतक्या सहजतेने रेखाटलेली हि चित्रे अस्सल मराठीच आहेत. सामान्य जीवनातील न संपणार दुःख निरागसपणे व्यंकटेश माडगूळकर सांगतात.

No Records Found
No Records Found
Keywords
#DHARMA RAMOSHI#JHELYA#RAMA MAILKULLI#NAMA MASTER#MULANYACHA BAKAS#BANYABAPU#KONDIBA GAIKWAD#SHIDA CHAMBAR#SHIVA MALI#TAMBOLYACHI KHALA#RAGHU KARKUN#BABAKHAN DARVESHI#GANA MAHAR#MAZA BAAP#BITAKAKA#GANA BHAPTYA#
Customer Reviews
  • Rating StarRaviraj Nagawade

    बकसची आणि माझी ओळख इथं झाली. एकदा असाच ऐन उन्हाचा चालून आलो आणि मुलाणकीत करंज्याच्या सावलीत बसलो. दमलो होतो. घामानं थबथबलो होतो.रानात उभं पीक नव्हतं.त्यामुळे आजुबाजुला कोणी नव्हतं.गार सावलीत जरा बरं वाटलं.वाळूत कलंडून इकडं -तिकडं पाहू लागलो. तेव्यात पलीकडची डगर उतरून बकस आला.माझ्या रोखानंच आला.फाटक्या अंगलटीचा बकस पायांतली सहा आणेवाली टायरांची पायताणं ओढत आला आणि फार दिवसांची ओळख असल्यासारखा हसून बोलला," बसला सावलीत?दमला असाल उन्हात.लई लागलं का ऊन?लई न्हाई तरी थोंड लागायचं." _ आणि गुडघ्यावर फाटलेला मुसलमानी चोळणा वर सरकावून खाली वाळूत बसला. माणदेशी माणसं,हा व्यंकटेश माडगूळकरांचा पहिला कथासंग्रह. धर्मा रामोशी,झेल्या,रामा मैलकुली,नामा मास्तर,मुलाण्याचा बकस,बन्याबापू, कोंडिबा गायकवाड,शिदा चांभार,शिवा माळी,तांबोळ्याची खाला,रघू कारकून,बाबाखान दरवेशी,गणा महार,माझा बाप,बिटाकाका, गण्या भपट्या. २८ ऑगस्ट तात्यांचा स्मरणदिवस.भावपूर्ण संस्मरण... ...Read more

  • Rating StarRahul Patil

    "माणदेशी माणसं" आज रविवार, त्यात लॉकडाऊन मग अधाशासारखं एका दिवसात "माणदेशी माणसं" संपवलं, आता इथली जाणती सवरती वाचकमंडळी म्हणतील की असं हावरटासारखं वाचणं चांगलं नव्हे, पण माफ करा काही पुस्तकं प्रेयसीच्या पत्रासारखी असतात, ती एका दमातच वाचायची नाहीर त्यातली "मजा" समजत नाही. माडगूळकरांचं एक मास्टरपीस म्हणावं असं पुस्तक, माडगूळकरांच्या लेखनशैली बाबत अगदी प्रथमदर्शनी जाणवणारी गोष्ट म्हणजे "भाषा" आणि कथेचा प्रवाह. पात्रागाणिक बदलत जाणारा गावबोलीचा ठसका किंवा पात्राच्या भावनेवर हिंदोळणारी लय दोन्ही तितकेच सहज. आणि सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे माडगूळकरांची संपूर्ण कथा एक बाजूला आणि त्या कथेच्या शेवटी असणारं एक वाक्य एका बाजूला, चर्रर्रकन काळजाचा वेध घेणारं, संपूर्ण कथेत चेहऱ्यावर अलगद स्मित येत असताना सपकन तलवार चालावी आणि घाव पडावा असा शेवट आणि त्या शेवटच्या वाक्यात जीवनच सार सांगून जाण्याचं कसब फक्त माडगूळकरांचं. "माणदेशी माणसं" वाचतांना अजून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते ती म्हणजे स्पष्ट पण हळुवारपणे मांडलेली खेडेगावातील कर्मव्यवस्था ("जातीव्यवस्था" म्हणालो तर बिघडायचं एखादं), आणि त्या कर्मव्यवस्थेवर आधारित वर्षानुवर्षे चालत आलेली त्या गावाची स्वतंत्र अशी अर्थव्यवस्था. कर्म-अर्थ असं गणित वर्षानुवर्षे चालवत चालवत गावं आता बदलली हे सुद्धा पुसटसं सांगून जातात ह्या कथा, आता चांगलं वाईट ह्या फंदात न पडता माडगूळकरांनी फक्त सत्यकथन केलंय, बाकी वाचकांनी आपली सद्सद्विवेक की काय ती बुद्धी वापरात ठेवावी. ...Read more

  • Rating Starअश्विनी सुर्वे

    #माणदेशी माणसं हा व्यंकटेश माडगूळकरांचा सर्वात पहिला कथासंग्रह. माणदेशातल्या साध्या, सरळ आणि कष्टकरी माणसांची ही शब्दचित्र इतकी हुबेहूब आणि सुंदररित्या रंगवली आहेत, की वाचताना ती आपल्यासमोर उभी राहतात. अगदी आजही. आता हा ‘झेल्या’च बघा. ‘बटन नसले्या कुडत्याला एक हातानं गळ्याशी धरून झेल्या बिथरल्या खोंडासारखा उभा होता. अंगानं किरकोळच. वयानंही फारसा नसावा. तेरा-चौदा एवढा. डोक्याला मळकट अशी पांढरी टोपी. अंगात कसले कसले डाग पडलेलं, मळलेलं, बाहीवर ठिगळ लावलेलं हातमागाच्या कापडाचं कुडतं; त्याला शोभेलशीच तांबड्या रंगाची चौकडी असलेली गादीपाटाची चड्डी! तिचे दोन्ही अंगचे खिसे फुगलेले. त्यांत बहुधा चिंचा भरलेल्या असाव्यात.’ आधीच्या मारकुट्या मास्तरांनी हिरवेनिळे वळ उटेपर्यंत मारल्यामुळे शाळेकडे न फिरकणारा व नवीन मास्तरांच्या प्रेमळ वागणुकीवर खुश होऊन नियमित शाळेत येणारा आणि त्यांना जीव लावणारा झेल्या किती सुंदर रेखाटला आहे. माडगूळकरांनी फक्त मानवी स्वभाव नाहीतर त्याकाळची सामाजिक परिस्थिती देखील उत्तम प्रकारे रेखाटली आहे. ती वाचताना कधी हसायला येतं, कधी राग येतो; तर कधी अजूनही परिस्थिती बदलली पण प्रवृत्ती तशीच आहे, याचं वाईटंही वाटतं. या माणदेशी माणसांची भाषा, राहणीमान, परिस्थितीचा बाऊ न करता तिला सामोरं जाणं, प्रामाणिकपणे कष्ट करणं आणि जगण्याची उमेद कायम ठेवणं अशा कितीतरी गोष्टींमुळे या व्यक्तिरेखा इतक्या वर्षानंतरही आपल्याला आकर्षित करतात. शनिवार रविवार घरी जाऊन आठवड्याभरासाठी भाकरी घेऊन येणाऱ्या ‘नामा’ मास्तराबद्दल लेखक लिहितात, की “खाण्यापिण्याचे हाल होतात म्हणून कुरकुरायला नामा पांढरपेशा थोडीच होता! जेवणाचे जास्त चोचले करायचे त्याला माहित नसावं.” किंवा एकटीच राहणारी, कुंकू-दातवण विकून जगणारी, कधी पडले तर तांब्याभर पाणी द्यायला कोणी नाही असं सांगणारी तांबोळ्याची ‘खाला’ ही म्हातारी लेखकाला सांगते की, “अरे गोडीगुलाबिने राहावं. चार माणसं आपली करावीत. भलेपणा मिळवावा. दुसरं काय मिळवायचं हतं?” परिस्थिती चांगली नाही म्हणून सोडून गेलेल्या बायकोबद्दल, “मी न्हाई केली वासपूस! आपल्याजवळ ऱ्हान्याची तिची जर विच्छा न्हाई, तर कशाला जोरा करायचा? जाऊदेल म्हणालो, कुटंबी सुकात असली म्हंजे झालं!” असं बोलणारा आणि शिक्षण नसल्याने आपली ही स्थिती आहे हे जाणून भाच्याला खूप शिकवण्यासाठी कष्ट करणारा रामा मैलकुली. आपल्या पुतण्याला नवीन कोट, खाऊ देण्यासाठी, त्याला एकदा बघण्यासाठी; साठ ते पासष्ट मैलांचे अंतर पायी तुडवून आलेले आणि भेट झाल्यावर पुन्हा आले तसे परत चालत नोकरीवर रुजू होण्यासाठी गेलेल्या बिटाकाकांचं प्रेम पाहून खरंच आश्चर्य वाटतं. तालुक्यात देवीची साथ आल्यामुळे मुलाला लस टोचण्याचा पत्र पाठवून आग्रह करणारे देशपांडे मास्तर आणि त्यांना ‘मी, माझा बाप, माझा आजा कोणीही टोचून घेतले नाही तरी आमच्यापैकी कुणीही साथीच्या रोगाने मेले नाही. सबब, माझा मुलगाही मरणार नाही. मी त्याचा बाप तो जास्त कसा जगेल हे बघीन. तुम्ही फक्त त्याला चार अक्षरे शिकवण्याचे करा.” असं सांगणारे वडील. या दोघांमध्ये शाळा सुटेल या भीतीने अडकलेला मुलगा आणि “शाळा शिकायची, तर सगळं सोसलं पाहिजे बाबा. मास्तर म्हणतात ते केलं पाहिजे.” असं म्हणत लस टोचायला नेणारी अशिक्षित आई. वरवर पाहता या व्यक्तिरेखा गरिबीने वेढलेल्या आणि दारिद्र्याने पिचलेल्या वाटतात पण जगण्याचं साधं सोप्प तत्वज्ञान आपल्याला शिकवतात आणि जगण्याची उमेद देतात. १९४९ साली या पुस्तकाची प्रथम आवृत्ती निघाली. स्वातंत्र्यानंतर मराठी साहित्यात जे अक्षर-ग्रंथ निर्माण झाले, त्यात ‘माणदेशी माणसं’चा समावेश होतो. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी सहित्याला अनोखे होते. मला तर हे वाचून आश्चर्य वाटलेलं, की हे पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा माडगूळकर फक्त २१-२२ वर्षांचे होते. तसं कल्पकतेला वयाचं बंधन नसतंच पण व्यंकटेश माडगूळकरांच फारसं शिक्षण नसतानाही त्या वयातील प्रतिभा, कल्पनाशक्ती , निरीक्षणशक्ती खरंच अवाक् करणारीच आहे. आणि या प्रतिभेतूनच आकाराला आलेल्या या १६ व्यक्तिरेखा. एकदातरी नक्की वाचा त्यांना. त्यांच्या दुःखामुळे थोडंस अस्वस्थ व्हाल. पण कधी निराश असताना त्यातील कोणीतरी एक आठवेल, तुमच्या चांगल्या परिस्थितीची जाण करून देईल आणि पुढे जायला प्रेरणा देईल. ...Read more

  • Rating StarAbhijeet Sontakke

    माणदेशी माणसं - व्यंकटेश माडगूळकर. ग्रामीण साहित्यातील हा अनमोल खजिनाच. सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळनं गंजलेला हा माणदेश म्हणजेच माण तालुका अगदी आटपाडी पर्यंतचा हा भाग. पिढ्यानुपिढ्याचा दुष्काळ, पाचवीला पुजलेली गरीबी, अज्ञानता, भोळ्याभाबड्या लोकांी ही कथा. माणदेशातील ही कथा आणि धर्मा रामोशी, झेल्या, बन्याबापू, कोंडिबा गायकवाड, शिदा चांभार, बबाखान दरवेशी, गणा महार, बिटा काका, गण्या भपट्या अशी काही विलक्षण पात्रं मन खिळवून ठेवतात. त्यांची ही करूण कथा मन व्यथित करतं. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more