* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MALYACHI MATI
  • Availability : Available
  • ISBN : 9788171612642
  • Edition : 4
  • Publishing Year : 1978
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
LIKE SIMILES AND METAPHORS, YADAV’S POEMS SPEAK THE LANGUAGE OF IMAGERY. THENCE IS BORN A ROBUST POEM LIKE ‘SAPNA PADTYAAT’. CLODS OF EARTH FIND FEET, TURN THEIR BACKS AND START WALKING. THEY ACQUIRE EYES LIKE THE LUSTROUS, MOIST ONES OF BULLOCKS. WITHIN HIDES A STORY. THE CLODS CANNOT SPEAK, SO THEY SHED SILENT TEARS THROUGH SHUT EYES. YADAV’S POETRY DOES NOT REVEAL THE ANGST BROUGHT ON BY HARDSHIPS AND POVERTY; NOR HAS IT TAKEN BIRTH TO DISPLAY THE PENURIOUS AND POVERTYSTRICKEN VILLAGE LIFE FOR ALL TO SEE, IN THE NAME OF SOCIAL AWARENESS. RATHER, THE TRAVAILS AND TRAGEDIES OF THAT LIFE ARE AS MUCH A PART OF HIS EXPERIENCES, AS ARE THE BEAUTY OF THE LUSCIOUS, SWAYING FIELDS FULL OF GRAIN, AND THE FEELINGS AND LIVES OF THOSE HARDWORKING FOLK. AND THEREFORE ONE GETS A GENUINE AND PROPER INSIGHT INTO RURAL LIFE THROUGH THIS SMALL COLLECTION OF POEMS. ANURADHA POTDAR.
उपमारूपकांप्रमाणे यादवांची कविता प्रतिमांच्या भाषेत बोलू लागते. आणि मग ‘सपनं पडत्यात’ सारखी समर्थ कविता निर्माण होते. रानातल्या ढेकळांना पाय फुटून ती गुमान पाठमोरी होऊन चालू लागतात. त्यांनाही बैलाच्या पाण्याने भरलेल्या डोळ्यांसारखे डोळे फुटतात. त्यात एक कहाणी भरलेली असते. जिभा पुÂटत नाहीत म्हणून बापडी ढेकळंही डोळे मिटून पाणी गाळतात. खडतर दारिद्र्याच्या अनुभवानेही यादवांची कविता जशी विखारलेली नाही, तशीच सामाजिकतेच्या सहेतुक वाटेने, खेड्यातील दैन्यदारिद्र्याचं दुखणं वेशीवर टांगण्यासाठीही ती जन्मलेली नाही. शेतमळ्यातील तरारून वर आलेल्या पिकाच्या रसरसत्या सौंदर्याप्रमाणेच, त्यात जगणाऱ्या, राबणाऱ्या माणसांच्या भावभावना, सुखदु:ख आणि त्याचं दारिद्र्य हेही सारं त्यांच्या अनुभवाचं अविभाज्य अंग आहे. म्हणून या छोटेखानी संग्रहातही ग्रामीण जीवनाचं एक अस्सल आणि सम्यक्दर्शन घडत आहे. –अनुराधा पोतदार

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    अस्सल मराठी जीवनाचे चित्र... नुसत्या अनुकरणांतच अडकून बसलेल्या आणि वाढ खुंटलेल्या आजकालच्या अनेक कविता वाचताना मनाला जाणवणारा शिळेपणा आनंद यादव ह्यांच्या ताज्यातवान्या दमदार कवितेने क्षणार्धात दूर झाल्यावाचून राहणार नाही. एकाएकी शेतमातीच्या गंधाने गंगवून सोडणारी, बोराबाभळींन्या रानांतून भुलवत नेणारी त्यांची ग्रामीण कविता मळ्याची माती हे सार्थ नाव धारण करून नव संग्रहरूपाने एकत्रित झाली आहे. शेतात रात्रंदिस राबणारा, निढळाच्या घामाने काळी आई भिजविणारा, आपले इमान खडतर दारिद्र्यांतही सांभाळणारा शेतकरी, त्याची प्रेमळ, भोळी, कष्टाळू घरधनीण आणि त्यांच्या भोवतालचे हिरवे जग हेच आनंद यादव ह्यांच्या कवितेचे विश्व. त्यांची रांगडी बोली हीच यादवांच्या कवितेची भाषा. त्या बोलींतला खडेपणा त्यांनी जसाच्या तसा उचलून आपल्या कवितेसाठी एक मुक्त, धावती, पण लयबद्ध रचना स्वीकारली आहे. तिच्यांत गद्याचा कणखरपणा आहे आणि काव्यांतले माधुर्यही आहे. बोली भाषेतला जिवंतपणा गद्याचा कणखरपणा आहे आणि काव्यांतले माधुर्यही आहे. बोली भाषेतला जिवंतपणा आला आहे. इतका की प्रत्येक कविता जणु श्री. यादव स्वत: आपणाला ऐकवताहेत की काय असा भास व्हावा. प्रत्येक कविता तिला लाभलेल्या गतीमुळे, तिच्या आटोपशीरपणामुळे, तिच्यातल्या जिव्हाळ्यामुळे, वाचतांक्षणीच मनाचा ठाव घेणारी झाली आहे. श्री. यादव ह्यांना जे जीवन रंगवावयाचे आहे ते जीवन म्हणजे अविरत श्रमाची एक हृदयस्पर्शी कहाणी आहे. अर्धपोटी राहून पोराच्या पोटासाठी घाम काढून ठेवणाऱ्या कंगाल शेतकरी राजाचे ते जीवन आहे. तिथे धनी धनिणीला सांगतो- मला नगं अता भाकरी आताच प्यालोय मी पाणी तूंच खा पोट भरूनशान धानचं मूल हाय सोन्यावाणी गुढीपाडव्याच्या सणाला घरांत गोडधोड करायला गहू डाळ नसते. अशावेळी शेतातली वांगी चोरून ती भटा-बामणाच्या घरी विकायला धनी धनिणीकडे देतो आणि म्हणतो - ‘आज हाच गुडीचा पाडवा येतील त्या पैशांची आण गहू-डाळ कर हुतील त्या चार पोळ्या खाईल तेवढंच पोर-बाळ’ धण शेवटी आपण मात्र कणीकोंडाच खाऊन दिवस काढू असेही तिला सांगायला विसरत नाही. (आणि केलेल्या चोरीचा पस्तावाही व्यक्त केल्याशिवाय राहू शकत नाही.) शेतकऱ्यालाही वाटते की आपल्या मुलाबाळांना शिकवावे, ‘पर मागं पोटापाण्याचं सदा न कदा लागतंय पिस’ जो तो पोट भरायच्या कामी लागला म्हणजे तेवढीच चिंता मिटली. कारण ‘न्हेतावं दीस कसंतरी ढकलत आहो, आमच्या नशिबी शेणाचीच पाटी.’ आपला बाळ शिकला सवरला तरी त्यानं पटका धोतरच नेसावे असं शेतकऱ्याला वाटत असते. ‘कुळवाडी आम्ही लोक कशाला रं ते इजार ? थोडक्याच डोसक्यानं रूप दिसतंय मुंडरं’ गौरीच्या सणाला एखादा खण कारभारणीला घ्यायचा हवा असतो ती उरल्यासुरल्या पैशांचा हिशोब अण्याआण्याने करून नवऱ्याची विनवणी करून म्हणते, ‘असा हाय दीड रुपया ठेवल्याला उतरंडीला सोन्यासारखा सण आलाय चोळी एक घे ये दंडाला ! अशा आपत्तींतून दिवस ढकलीत नेत असतांना एकच वैभव ह्या दरिद्री शेतकरी राजाच्या झोपडीत शिल्लक उरलेले असते आणि ते म्हणजे नवराबायकोचे एकमेकांवरचे प्रेम. तेवढ्यातल्या तेवढ्यांत ती एकमेकांन जपत असतात. एकमेकांनी असेल तो कणीकोंडा पोटभर खावा म्हणून एकमेकींची आर्जवे करतात. धनीण धन्याला म्हणते - ‘हळूंच उचला तळची भाकर आणि तिच्या पापडाखालचं लोणी, सांडगं खावा अगुदर. -ठावं नाही कुणाला गुपीत’ त्या उभयतांच्या ‘गावरान’ प्रेमाचं वर्णन श्री. यादव किती मिठास शब्दांत करतात पहा- ‘पेंगणाऱ्या आंब्याच्या सावलीत घोंगड्यावर बसल्यात राजा-राणी दोघांच्या पुढ्यांत हाय पडल्याली धोतराच्या फडक्यांत भाकरी चटणी बसल्यात घेत जणू रामसीता वनवासातले मनाजोगे सूख जुंधळया-मिरचीच्या कोरड्या कोंढ्यांत तरण्या प्रीतीचं मिसळलेल अमृत’ ‘पानाचा इडा’, ‘पातळ’, ‘नाद मोटंचा ऐकून’, ‘उसटं पाणी’ ह्या कवितांतून असा प्रीतीचा गोडवा प्रत्ययाला येतो तर ‘व्रत’सारख्या कवितेंतून त्या प्रीतीच्या व्रतांतली आगही चटका लावीत जाते. ‘वाटंवरल्या जुंधळ्यांत’ ह्या कवितेंत आणीबाणीचा प्रसंग येताच पायाची वहाण उचलून कडाडत उठणारी बाणेदार शेतकरीण विजेसारखी चमकून जाते. ज्या हिरव्या जगाच्या पार्श्वभूमीवर श्री. यादव ह्यांचा कुळवाडी उभा आहे ते हिरवे जग कसे आहे ? ‘कसं हाय हे हिरवं जग ! किती दिसतंय गुलजार ! लांबनंच बघताना डोळं भरून जीव हुतोय सुखानं बेजार !’ पण त्या हिरव्या जगाची जोपासना शेतकऱ्यांना आपलं रक्त आणि घाम गाळून केलेली आहे हेही बजावून सांगायला ते विसरत नाहीत. ‘भूईमुगाच्या गार गार जाळया, ही रसरसलेली गाजरे ही पिकवितांना जाव्यात तोंडात मातीचं तोबरं’ कधी चांदणे पडते, कधी कणसे धरतात, कधी थंडीतली पहाट उगवते, कधी उन्हाळ्यांत जमीन सुकू लागते आणि शेतकऱ्याला पावसाची ओढ लागते - ते सारे दिवस श्री. यादव ह्यांच्या कवितेत मूर्तिमंत उभे राहिलेले दिसतात. पावसाच्या आणभाकेंतले कारूण्य आणि शेतं पिकल्यावर फुललेला आनंद ते सारख्याच सराईतपणे टिपून घेतात. त्यांचा निसर्गही शेतकऱ्याचे जीवन जगत असताना दिसतो. दमू घरी परत आलेली रात्र काळ्या पदराआडून चांदचिमणी आणते. मातीच्या घागरीतल्या गार गार पाण्यासारखी थंडी पडते आणि नदीकाठावर पांढरी पहाट धोतर नेसून न्हालेल्या गरतीसारखी उपसांत असलेली आढळते. हिरवी झालेली धरणी पावणा यायच्या वेळी ठेवणीतले लुगडे नेसल्यासारखी दिसते. थंडीच्या दिवसांतल्या एका टिपूर चांदण्या रात्रीचे वर्णन तर नुसते वाचतच रहावे. ‘ढामणं गत वाट पडलीया सरळ हिरव्या उंच गवतातनं काजूकड लिकलिकत्यांत चमचकीच्या ठिगण्यागत वरनं’ श्री. यादव ह्यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कवितेत निव्वळ कारूण्य किंवा निव्वळ आनंद नाही तर दोहोंची सरमिसळ होऊन संपन्न झालेले अस्सल जीवनाचे संपूर्ण चित्र उभं केलेलं दिसते. तेही अस्सल मराठी चित्र ! मराठी कवितेच्या वैभवात आनंद यादव ह्यांनी नि:संशय श्रेयस्कर भर घातली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more