* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MAI LEKARA
  • Availability : Available
  • ISBN : 9788171617432
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 1989
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 88
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘MAI LEKRA’ IS A POETRY COLLECTION BY ANAND YADAV. YADAV BROUGHT LITERATURE FROM VILLAGE IN LIMELIGHT . LIFE IN THE VILLAGE, POVERTY , CONDITION OF AGRICULTURE ARE THE PLATFORMS OF YADAV SIR’S WRITING. HIS POETRY ALSO CONTAINS THIS FEATURES.
दर्शनी स्वरूपात `मायलेकर` हा काव्यात्म संवाद आहे. शिक्षण संपवून घरी परतलेल्या मुलाला पाहून आनंदलेली आई आपली स्वप्न खरी होणार या अपेक्षेने मुलांपुढे मांडते आणि शहरी संस्कारामुळे नवी नजर घेऊन आलेला मुलगा आपली स्वप्नं भिन्न असल्याच सांगतो. उभयतांच्या स्वप्नाची परिभाषा बदलली असली तरी दोघांचा भावविश्व एकच आहे. वात्सल्यापोटी मुलाच्या सारया आठवणी आईच्या उरात दाटून येतात. ती त्यांना मुक्तपणे वाट करून देते. शिक्षणामुळे अंतरमुख झालेल्या मुलाला कुटूंबातील विदारक दैत्याची जाणीव होते. कष्टकरी समाज आणि त्याच्या जीवावर सुखासीन झालेला प्रस्थापित वर्ग याविषयीचे आकलन मुलाला विमनस्क करते. हि परिस्थिती बदलण्याचा निर्धारही तो व्यक्त करतो. माय लेकराचा हा संवाद केवळ व्यक्तिगत राहत नाही, तर त्यातून ग्रामीण समाजातील गांजलेल्या वर्गाची प्रातिनिधिक वेदना समोर येते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarEknath Marathe

    मायलेकर, आनंद यादव मेहता पब्लिकेशन ... गरीब शेतकरी कुटुंबातली आई, छातीवर धोंडा ठेवून आपल्या मुलाला शिकायला पाठवते. पुढे तो मुलगा शिकतच राहतो. पदवी, पदव्युत्तर शिक्षण. आईला वाटते की आता मुलाने शिक्षण पुरे करून घरी करत यावे, कारकुनी करावी, गावात घरचे नाव मोठे करावे. नातवाला मांडीवर खेळवत मग तिने समाधानाने देह सोडावा. आपल्या भावना आईने काव्यात मांडल्या आहेत. मुलाने त्याला तसेच काव्यात उत्तर दिले आहे. शिक्षणाचा महासागर त्याला साद घालतो आहे. त्याची स्वप्ने कारकुनी करण्याची नाही तर प्राध्यापकी करण्याची आहेत. कष्टकरी वर्गाला त्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यांना दास्यातून व दारिद्र्यातून मुक्त करायचे आहे. त्याला त्या साठी लग्नाच्या बंधनात सुद्धा अडकायचे नाही. जन्म दात्या आईने त्याला आता मायेच्या बंधनात बांधू नये व मोठ्या आईच्या मदतीला जाण्यास मुक्त करावे. ग्रामीण शब्द अगदी सहज वापरलेले हे काव्य आहे . काही शब्द लागत नाहीत पण अशा शब्दांचे अर्थ सुद्धा शेवटी दिले आहेत. नक्की वाचा, एक वेगळाच काव्यानुभव घ्या ! काव्य पुस्तकाला प्रस्तावना मूळ काव्या पेक्षा मोठी आहे ! नमनाला घडाभर पाणी ! ...Read more

  • Rating StarSandip Chavan

    #मायलेकरं` हे आनंद यादव यांचे दिर्घकाव्य आहे. शहरातून शिक्षण संपवून घरी आलेला मुलगा आणि त्याला पाहून हरकून गेलेली त्याची खेड्यात राहणारी आई या दोहोंचा काव्यात्म संवाद म्हणजे `मायलेकरं!` प्रतिकूल परिस्थितीत आणि नवरा अकाली गेल्यानंतर (मुलंमुली मिून) सहा मुलांना वाढवण्यासाठी आईला करावा लागलेला संघर्ष, मोठा वसंता शिक्षणासाठी बाहेर गेल्यानंतरच्या त्याच्या आठवणी, तो शिकून आल्यानंतरची तिने रंगवलेली स्वप्ने इत्यादी प्रसंग आईच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळतात. तर दुसरीकडे शिक्षणामुळे अंतर्मुख झालेल्या मुलाला कुटुंबातील विदारक दैन्याची झालेली जाणीव; कष्टकरी समाज आणि त्याच्या जीवावर सुखासीन झालेला प्रस्थापित वर्ग याविषयी त्याला झालेले आकलन; ही परिस्थिती बदलण्याचा त्याचा निर्धार तो काव्यातून व्यक्त करतो. आई-लेकराच्या स्वप्नांमधील भिन्नता आहे मात्र त्यांचे भावविश्व एकच आहे. मायलेकरचा हा संवाद केवळ व्यक्तिगत नसून त्यातून ग्रामीण समाजातील गांजलेल्या वर्गाच्या वेदना समोर येतात. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 25-06

    संवादात्मक प्रदीर्घ काव्य भावप्रधान… प्रा. आनंद यादव हे मराठी साहित्यिकांत बिनीचे सरदार मानले जातात. कथा, काव्य, कादंबरी, निबंध असे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी सहजपणे सादर केले आहेत. हे मराठी वाचकांना माहीत असणारच. समीक्षका म्हणूनही त्यांनी आपलेस्थान निश्चित केले आहे. ग्रामीण जीवनाचे भावदर्शन हा त्यांच्या साहित्याचा स्थायीभाव आहे. सोशित समाजाचे विविधांगी दर्शन त्यांनी घडविले आहे. प्रस्तुत ‘मायलेकरं’ हा काव्यसंग्रहही त्याच जीवनाच्या आशा-आकांक्षा दर्शविणारा ग्रामीण मायलेकारांचा मार्मिक संवाद आहे. ग्रामीण भावकाव्य ही कविता वास्तवधिष्ठित आहे. (मला तर ती आत्मनिष्ठच वाटते.) ह्या प्रदीर्घ कवितेचे दोन भाग आहेत. पूर्वार्धात ११ कडवी असून त्यामध्ये खेड्यातील आईचे आपल्या मुलाविषयीचे स्वप्न रंगविले आहे, तर उत्तरार्धात ११च कडव्यातून द्विपदवीधर होऊन आलेला तिचा मुलगा आपली स्वप्ने भिन्न असल्याचे सांगतो. आईची स्वप्ने, आकांक्षा, सुखाच्या कल्पना तेथील मातीशी बांधलेली आहेत. दैन्य, दारिद्र्य व दु:ख हा तिचा वारसा आहे. उलट मुलगा शहरातून शिकून. शहाणा होऊन आलेला त्याला सामाजिक विषमता बोचू लागलेली असते. तरीही तो कडवटपणा धारण करीत नाही. एक प्रकारचा समजूतदारपणा त्याच्या ठिकाणी जाणवतो. आपल्या बांधवांची परिस्थिती स्थितीशीलता तो समजून घेतो. पारंपारिक रूढींची वेढी एकदम तोडणे कठीण. पण प्रयत्न व्हायलाच हवेत म्हणून त्याची स्वप्ने वेगळी आहेत. ग्रामीण माय व विद्याविभूषीत मुलगा यांच्या दोन प्रवृत्तींचे प्रातिनिधक दर्शन आनंद यांदवांनी साक्षेपाने घडविले आहे. प्रेमळ आई सुरुवातीस शिकून आलेला मुलगा पाहून आईचे अंत:करण कौतुकाने भरून येते. त्याचे बालपण, शिक्षण, दारिद्र्य, वडिलांचा मृत्यू, मुलाची पुढील शिक्षणाची ऊर्मी, शहरात त्याला सहन करावी लागलेली परिस्थिती ह्या सर्वांचे चित्र तिच्या मनापुढे उभे राहते. आता मुलगा शिकून परत आला आहे. ती आनंदून जाते व म्हणते– तुझ्या वरतीला राजा सारं फुटलं रं गाव; तवा सुखाच्या सागरात माझी तरंगते नाव. त्याने आता इथंच राहून संसार, नोकरी (कारकुनाची) करावी असं तिच्या भाबड्या मनाला वाटतं. ह्या पूर्वार्धातून एक अशिक्षित ग्रामीण आई, तिचे मर्यादित विश्व, जीवनविषयक दृष्टिकोन जाणवतो. वाट्याला आलेली परिस्थिती निमूटपणे सहन करणारा हा गतानुगतिक दृष्टिकोन आहे. हे मृण्मय भावसत्य अस्वस्थ करून सोडते व करुणरसप्रधान पूर्वार्ध येथे संपतो. मुलाचा वैचारिक दृष्टिकोन मुलगा शिकला. त्याला प्राध्यापक, वकील व्हावं असं वाटणं साहजिक आहे. पण त्याला शहरात विपरित अनुभव आले व त्याचे मन त्याला गावाकडे ओढू लागले. माझा खेड्याचा सुदाम ती गं सोन्याची द्वारका नाही श्रीकृष्ण भेटला झालो पोरका पोरका. गावमातीच्या पाण्याची बर्फाला चव कशी येणार? नवीन यंत्रयुग आलं. खेडी उद्ध्वस्त झाली. त्यांच्या श्रमाने धरणं बांधली गेली. पण त्यांच्या अंगणात पाण्याचा थेंबही पडला नाही. खेड्यातील शेतकऱ्यांचे सावकारांनी शोषणच चालविले हे थांबले पाहिजे. श्रमिकांच्या श्रमाची योग्य किंमत मिळायला हवी. तुझ्या दामाचा नाही गं दाम तोलून मिळत अर्थ अनर्थाचे मूळ आई, नाही का कळत? आपलं हक्काचं मिळविण्यासाठी संघर्ष अटळ आहे. आई, रामोशी घेऊन कोना कोपरा धुंडीत तुझं लुटलेलं सोनं परतून मी आणीन. मुलगा म्हणतो की मी आता जनजागृतीसाठी माझी लेखणी (ज्ञान) वापरणार आहे. जात्यांची घरघर थांबली पाहिजे. गरीब शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबले पाहिजे. कारण श्रमदेवच महत्त्वाचा आहे. शेतकरी सुखी तरच समाज सुखी होईल. माझी माय आदिवेद घरघर तिची ऋचा पंडितांनो अनुभवा तिच्या आतड्याची वाचा. माझी माय आदिवेद कष्ट कष्ट तिचे सूक्त अहो पंडितांनो हुंगा घामगंध रक्तयुक्त. कवीने ग्रामीण बोलीचा, प्रतिमांचा कलात्मक वापर केला आहे. अष्टाक्षरी अक्षर छंद लोकसाहित्यातील लोकपरंपरेशी जुळता आहे. कवीने एक समर्थ वेदना परिणामकारक रीतीने ह्या ह्या दीर्घकाव्यात मांडली आहे. सामाजिक प्रश्नांवरील ही सुसृती टीकाच आहे. It is really a poetic criticism of life. -ग. वि. नेर्लेकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more