* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MORPANKHI SAVALYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788171619443
  • Edition : 7
  • Publishing Year : MARCH 1984
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 92
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE ALL KNOW RANJIT DESAI AS A VERSATILE WRITER HE GOT HIS NAME AND FAME BECAUSE OF THE NOVELS, STILL HE STARTED HIS CAREER AS A WRITER WITH SHORT STORIES. DURING THE EARLY YEARS, HE MAINLY FOCUSED ON THE RURAL LIFE AND THE REALITIES THEREIN. LATER ON, HE TRIED TO WALK ON THE PATH OF HISTORY GIVING US WONDROUS STORIES WITH MAJESTIC ENVIRONMENT. HE SKETCHED PICTURES OF WELL KNOWN PERSONALITIES IN THE FIELD OF MUSIC AND ART. LATER ON, HE SWITCHED OVER TO STORIES WITH MORE STRESS ON NATURE, STARS ETC. MORPANKHI SAWALYA IS A COLLECTION OF 15 STORIES OF DIFFERENT ANIMALS, USED TO THE NATURE. THE PECULIARITY OF THESE STORIES IS THOUGH THEY ARE WRITTEN BY A HUMAN NOT EVEN A SINGLE HUMAN BEING COMES INTO OUR SIGHT THROUGHOUT AFTER GOING THROUGH THE WONDERFUL NATURE PICTURED BY RANJIT DESAI, WE WILL ONCE AGAIN REALISE HIS GREATNESS.
रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत. कादंबरीलेखनामुळे त्यांनी दिगंत किर्ती मिळवली असली, तरी त्यांनी साहित्यिक कर्तृत्वाचा आरंभ कथालेखनानंच केला होता. सुरवातीच्या काळात त्यांनी कथांच्या माध्यमातून ग्रामीण वास्तवाचा वेध घेतला. त्यानंतर इतिहासाच्या गर्भरेशमी, अद्भुतरम्य वातावरणात नेणाNया मनोवेधक कथाही त्यांनी लिहिल्या. संगीतक्षेत्रात अलौकिक यश संपादन करणाNया काही कलावंतांची सुखदुःखही त्यांनी आस्थेवाईकपणे चितारली. पुढच्या काळात त्यांनी अत्यंत प्रवाही शैलीत काही निसर्गकथाही लिहिल्या, काही नक्षत्रकथाही लिहिल्या, काही रूपककथाही लिहिल्या. मोरपंखी सावल्या या त्यांच्या आगळ्यावेगळ्या संग्रहात निसर्गाच्या सावलीत वाढणाया प्राण्यांच्या पंधरा कथा साक्षेपानं एकत्रित केलेल्या आहेत. या सर्व कथांचं विलक्षण वैशिष्ट्य असं, की त्या पूर्णतः मानवविरहित आहेत. कथासूत्रात बांधलेली ही लालित्यपूर्ण निसर्गचित्र पाहून आणि अनुभवून, रणजित देसाई हा आपल्या काळातील केवढा थोर साहित्यिक आहे, याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarPrachi Kadam- Pustak Bistak

    श्रीमानयोगी,राधेय,पावनखिंड,स्वामी,लक्ष्यवेध या आणि यांसारख्या अनेक ऐतिहासिक पुस्तकांपेक्षा हे एक आगळं वेगळं निसर्गावर, त्याच्या सान्निध्यात राहणा-या प्राणी पक्ष्यांवर आधारित आणि विशेष म्हणजे मानवविरहित असं छोटसं पुस्तक. खरं तर मानवविरहित असलं तरी माणाच्या स्वभावाचं पुसटसं दर्शन घडवून जातं. वसंत आगमनाची चाहूल, पावसाच्या सरींनी तुडुंब भरून वाहणा-या वाहिनीचा आनंद, सागराच्या उन्मत्तपणाला मर्यादा आणू पाहणारी खडकाळी, उतार वयातही आपला स्वाभिमान डगमगू न देता आयुष्य संपवण्याचा निर्णय घेणारा गरूड, उन्हाने पर्णहीन आणि एकाकी झालेली सावर, खूप प्रयत्नांती खेकड्याची शिकार केलेल्या कोल्होबाचं सुख, अंधारातून प्रकाशाकडे झालेला ससोबाचा प्रवास आणि शेवट, कोंबड्याची पहाटेची बांग आणि प्राणी जगताची जंगलातील सकाळ, हुप्प्यांची,खारूताईची पळापळी, अशा मस्त कथांनी खिळवून ठेवणारं हे पुस्तक वाचायला निसर्गप्रेमींना नक्की आवडेल. ...Read more

  • Rating StarNEWS PAPAR REVIEW

    पशुपक्ष्यांचे अंतर्मन व्यक्त करणाऱ्या प्राणिकथा रणजित देसार्इंच्या कथालेखन प्रवासाला एक विशिष्ट वळण मिळाले ते ‘मोरपंखी सावल्या’मुळे. प्राणी जीवनावरील हा अनोखा कथासंग्रह १९८४ मध्ये वाचकांसमोर आला असून त्यात पंधरा प्राणिकथा आहेत. ‘‘या संग्रहातील कथा मझ्या आजवरच्या इतर कथांच्यापेक्षा जरा निराळ्या आहेत. मानवविरहित निसर्ग आणि त्या सावलीत वाढणाऱ्या या प्राणिकथा आहेत.’’ असे त्यांनी स्वत:च सुरुवातीला नमूद केलेले आहे. ग्रामीण समाजाला निसर्गाचे सान्निध्य सहज-सुलभ असते. निसर्गाशी जमवून घेत व प्रसंगी निसर्गाशी झुंज घेत ग्रामीण भागातील लोकांना जीवन व्यतीत करावे लागते. पशु-पक्षी-कीटक इत्यादींसह येणारा ग्रामीण जीवनातील निसर्गाचा घटक अपरिहार्यपणे स्वीकारावा लागतो. पर्यायाने याचे प्रतिबिंब मग इतर वाङ्मय प्रकारांप्रमाणेच कथेतही पडल्याचे दिसून येते. शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर यांच्या प्रमाणेच रणजित देसार्इंच्या कथांमधून निसर्गाची अशी रेखाटने पाहावयास मिळतात. रणजित देसार्इंच्या निसर्गकथांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कथांत निसर्गाला स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांचा निसर्ग जीवनाशी एकरूप झाल्यासारखा भासत नाही. कथांतील घटनांमधून निसर्ग डोकावण्याऐवजी निसर्गाच्या आधारेच घटना घडत राहते. एखाद्या पक्ष्याचा, प्राण्याचा किंवा किटकाचा उल्लेख येतो आणि ज्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडत असते, त्या निसर्गाचा आत्मस्पर्शी साक्षात्कार होऊन जातो. लघुकथा आणि लघुनिबंध यांच्यामधील सीमारेषा पुसट ठराव्यात, अशा प्रकारचे वर्णन या तीन निसर्गचित्रणामध्ये पहायला मिळते. कारण इतर कथासंग्रहांप्रमाणे कथानक, व्यक्तिचित्रण, प्रसंगवर्णन, वातावरणनिर्मिती इत्यादी घटकांद्वारे कथा फुलत न जाता ती निसर्गाच्या माध्यमातून विकसित होताना दिसते. पण प्रत्येक कथेत एखादा प्राणी आपल्या सर्व वैशिष्ट्यांसह वाचकांसमोर साकार होतो. वाघ आणि माकड यांच्यातील परस्पर संबंधांविषयीची जिज्ञासा ‘जिज्ञासा’ या कथेत आढळते. तर गरुडाचे जगणे, राजेपण, जगण्यातील आब, कालांतराने येणारे वार्धक्य, त्या जाणिवेने झोकून देण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय, हे सर्व ‘निर्णय’ या कथेत सूचक शब्दात चित्रित झालेले आहे. ‘कीड’मध्ये छोट्या आणि मोठ्या गव्यांतील रोमांचकारी संघर्ष चित्रित झालेला दिसतो. माणूस जसा नेहमी सुखासाठी धडपडतो, तसेच प्राणीही नेहमी सुखाची अपेक्षा करीत असल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या उक्तीनुसार एक जीव सुखासाठी दुसऱ्याच्या जिवावर अवलंबून असतो. ‘सुख’ या कथेतील कोल्हा खेकड्याची शिकार साधण्यासाठी अविश्रांत धडपडतो. नाना युक्त्या योजून आपले इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करतो. त्यांचा पाठलाग, खेकड्याचे सापडणे, निसटणे, शेवटचा रंगलेला अटीतटीचा सामना, बऱ्याच कष्टाने यशप्राप्ती झाल्याने कोल्ह्याला झालेला आनंद हे सर्व ‘सुख’मध्ये लेखक नाट्यपूर्ण रीतीने रंगवितो. वृद्धत्वाची सूचकता समर्थपणे प्रकट करणारी ‘पर्णहीन’, शिकार साधल्याच्या आनंदाची सूचना देणारी ‘अंधारातून उजेडाकडे’ किंवा हरिणांची प्रेमकहाणी असणारी ‘मृगजळ’ इत्यादी सर्व कथांतून झाडे, नदी, पाणी, ऊन, सावली, वारा, ओहोळ, झरा, वाघ, माकडे, कोल्हे, तरसे, चितळे, वाघळे, ससे, घुबडे, हरीण, मासे, कोंबड्या, गरुड, कावळे, कुत्री, चिमण्या यासारख्या निसर्गघटकांचे अस्तित्व पहायला मिळते. लेखकाच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीची आणि निसर्ग घटकांविषयीच्या चिंतनशीलतेची प्रचिती यातून येते. आटोपशीरपणा, प्रतिकात्मकता आणि सूचकता ही प्रमुख वैशिष्ट्ये यातील प्रत्येक कथेत आढळतात. लेखकाचा शिकारीचा नाद व त्याविषयीची जाण याचाही उपयोग प्रस्तुत कथालेखनासाठी झाल्याचे जाणवते. माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांच्या अंतर्मनात शिरुन त्याची उकल करण्याचे लेखकाचे कौशल्य या कथासंग्रहात पणाला लागलेले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more