* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: I AM MALALA
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184987256
  • Edition : 3
  • Publishing Year : MAY 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 316
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"I COME FROM A COUNTRY THAT WAS CREATED AT MIDNIGHT. WHEN I ALMOST DIED IT WAS JUST AFTER MIDDAY." WHEN THE TALIBAN TOOK CONTROL OF THE SWAT VALLEY IN PAKISTAN, ONE GIRL SPOKE OUT. MALALA YOUSAFZAI REFUSED TO BE SILENCED AND FOUGHT FOR HER RIGHT TO AN EDUCATION. ON TUESDAY, OCTOBER 9, 2012, WHEN SHE WAS FIFTEEN, SHE ALMOST PAID THE ULTIMATE PRICE. SHE WAS SHOT IN THE HEAD AT POINT-BLANK RANGE WHILE RIDING THE BUS HOME FROM SCHOOL, AND FEW EXPECTED HER TO SURVIVE. INSTEAD, MALALA`S MIRACULOUS RECOVERY HAS TAKEN HER ON AN EXTRAORDINARY JOURNEY FROM A REMOTE VALLEY IN NORTHERN PAKISTAN TO THE HALLS OF THE UNITED NATIONS IN NEW YORK. AT SIXTEEN, SHE BECAME A GLOBAL SYMBOL OF PEACEFUL PROTEST AND THE YOUNGEST NOMINEE EVER FOR THE NOBEL PEACE PRIZE. I AM MALALA IS THE REMARKABLE TALE OF A FAMILY UPROOTED BY GLOBAL TERRORISM, OF THE FIGHT FOR GIRLS` EDUCATION, OF A FATHER WHO, HIMSELF A SCHOOL OWNER, CHAMPIONED AND ENCOURAGED HIS DAUGHTER TO WRITE AND ATTEND SCHOOL, AND OF BRAVE PARENTS WHO HAVE A FIERCE LOVE FOR THEIR DAUGHTER IN A SOCIETY THAT PRIZES SONS. I AM MALALA WILL MAKE YOU BELIEVE IN THE POWER OF ONE PERSON`S VOICE TO INSPIRE CHANGE IN THE WORLD.
"निसर्गसौंदर्याचं लेणं लाभलेल्या स्वात खोऱ्याचा तालिबानने ताबा घेतला तेव्हा एका मुलीनं आवाज उठवला. ती मुलगी म्हणजे – मलाला युसूफजई. तिने तिच्या शिक्षणाच्या हक्कासाठी लढा द्यायचं ठरवलं... पण, मंगळवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०१२ रोजी तिला याची किंमत मोजावी लागली. शाळेतून बसने घरी परतत असताना, वाटेत तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. आणि एकाएकी तिचं आयुष्य जीवन-मरणाच्या खोल दरीत लोटलं गेलं... पण ती या हल्ल्यातून आश्चर्यकारकरीत्या वाचली, आणि तिच्या ध्येयासाठी त्याच निर्धारानं कार्य करत राहिली... ही आहे मलालाची कहाणी – एक कोवळा आवाजसुद्धा परिवर्तनाची पहाट जागवू शकतो याची साक्ष देणारी...!"
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुरस्कार २०१६-राधाबाई हरीभाई देशपांडे पारितोषिक
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MIMALALA #IAMMALALA #मीमलाला #AUTOBIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #MALALAYOUSAFZAI "
Customer Reviews
  • Rating StarHemant Thakut

    मी मलाला पुस्तक वाचले,अतिशय छान,एकदा वाचायाला हातात घेतले,आणि वाचून झाल्यावर खाली ठेवले, अतिशय सहज सुंदर ओघवती भाषा मनाची पकड घेते,कुठेही कंटाळवाण नाही,आपल्याला,आणि मलालाला पणभेटायला आवडेल,असेच लिहीत राहा,आणि आमच्या ज्ञानात भर टाका, पुन्हा एकदा अभिंदन हेमंत ठाकूर गोरेगाव,मुंबई ...Read more

  • Rating StarSANDEEP GAIKWAD

    या पुस्तकातून सविस्तर माहिती मिळाली. आपण छान अनुवाद केला आहे.

  • Rating Starकेदार धुमाळी

    कमल चिखलात जन्मले, म्हणून तसेच ते चिखलात पडून बसत नाही. ते आपल्या नैसर्गिक सौंदर्याने अनेकांचे मन प्रेमाने भरते. तशी मला मलाला वाटली. जग विसाव्या शतकात जगत आहे. प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क आहे. आज आमच्या रत्नागिरीत सर्व मुले व मुली खांद्याला खांदालावून शिकतात. आज मुलींचे क्षेत्र हे चूल आणि मूलपर्यंत मर्यादित न राहता, ते नभ ते जलापर्यंत व्यापले आहे. परंतु तुमचे पुस्तक वाचून समजले, की हा एक चश्म्याने जरी स्त्रियांच्या समस्या कमी झाल्या असल्या, तरी दुसऱ्या चश्म्याने पाहिल्यास आजही काही प्रदेशात समाज हा जुन्या पिढींना चिकटून बसला आहे. त्याचे उदाहरण म्हणून तुमचे अनुवाद केलेले पुस्तक. मलाला ही आजच्या प्रत्येक तरुण-तरुणींसाठी ‘आदर्श’ म्हणून पुढे आली आहे. बोलायला काय जातय. ‘मुलगी हवी’ पण ती जस-जशी मोठी होत जाते. तसे समाजाच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. त्यातूनच आज कितीतरी घटना आपल्याला पहायला मिळतात. प्रत्येक देशात असो वा धर्मात स्त्री ही दुय्यम मानली गेली आहे; परंतु इस्लाम धर्मात स्त्रियांवर अधिकच बंधने आहेत, पण मलाला त्यामधील नव्हती. त्याचे खरे श्रेय त्यांच्या वडिलांना दिलेच पाहिजे. जर एखाद्या मुलीच्या पाठीशी कुटुंब खंबीरपणे उभे असेल तर मुलगीदेखील मुलाइतकेच कर्तृत्व गाजवू शकते. हे मलालाने सिद्ध केले. का? फक्त मुलांनीच शिक्षण घ्यावे. मुलींनी फक्त चार भिंतीत राहून आधी आई-बाबांचे ऐकायचे नंतर आपल्या पतीचे. तिला स्वातंत्र्य आहे की नाही? त्यासाठी मलाला हे एक उदाहरण ठरेल. आपल्या हक्कासाठी तालिबानच्या गोळ्या झेलणारी मलाला व तिच्या मैत्रिणीच्या जिद्दचे व धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमीच! तुमचे पुस्तक वाचून मला सावित्रीबाई फुले यांची आठवण झाली. मॅडम तुमचे पुस्तक वाचून खूप आनंदही झाला आणि त्यामधून खूप काही शिकता आले. मॅडम तुम्हाला मिळालेल्या अनेक पुरस्कारांसाठी हार्दिक शुभेच्छा! पुढील वाटचालीसाठी ‘बेस्ट ऑफ लक’! मला तुमच्या पत्राची अपेक्षा राहीलच त्यापेक्षा तुमच्या पुढील पुस्तकाची प्रतिक्षा राहील. कळावे, आपला आज्ञार्थी, केदार धुमाळी ...Read more

  • Rating StarSandesh Thorave

    अप्रतिम पुस्तक आहे...

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more