* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MI KA NAHI ?
  • Availability : Available
  • ISBN : 9788184982565
  • Edition : 3
  • Publishing Year : JULY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 124
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE, AS A NORMAL HUMAN BEINGS, GET ALL THE FACILITIES AS A CITIZEN OF OUR COUNTRY, EVEN THESE TRANS GENDERS (HIJRA COMMUNITY) ARE ALSO HUMAN BEINGS AND CITIZENS OF OUR COUNTRY. BUT THEY ARE DEPRIVED OF MOST OF THE THINGS WHAT OUR CONSTITUTION AND SOCIETY HAS TO OFFER IN INDIA. THIS NOVEL BRINGS FORWARD THEIR GRIEVANCES IN FRONT OF SOCIETY AND IN DOING SO REQUESTS THE SOCIETY AND OUR CONSTITUTION TO ACCEPT THEM.
‘मी का नाही?’ हा प्रश्न विचारू धजणा-या तृतीयपंथी समाजाची ही कहाणी! या कादंबरीची नायिका असलेल्या नाझच्या वाट्यालाही हे दु:ख येते. पण तिचे वडील सोडून सगळे कुटुंब, विशेषत: तिची आई तिला भक्कम पाठबळ देते. या पाठबळाच्या जोरावर नाझ ‘हिजडा समाज’ स्थापन करते. यातून ती या समाजाला स्वावलंबी आणि सुसंघटित तर करतेच; पण प्रसंगी कठोर भूमिका घेऊन त्यांचे प्रश्नही सोडवते. हिजडा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एक चळवळ उभारते. समाजात पदोपदी होणारा अपमान, टिंगलटवाळी यांना दाद न देता निर्भीडपणे स्वत:च्या प्रश्नांसाठी न्यायालयापर्यंत धडक मारते. ‘मी का नाही’ हा एक शोध आहे. तो किती भेदक आहे, हे कादंबरी वाचताना उमगत जाते. त्याचे उत्तर शोधताना वाचक अस्वस्थ तर होतोच; पण निरुत्तरही होतो!
उत्तेजनार्थ लिओ टॉलस्टाॅय पुरस्कार २०११ .

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MIKANAHI #MIKANAHI #मीकानाही #FICTION #MARATHI #PARUMADANNAIK #पारूमदननाईक "
Customer Reviews
  • Rating StarPUDHARI 18-9-2011

    मी का नाही? `मी का नाही?’ ही कादंबरी तृतीयपंथी समाजाची संघर्षकहाणी आहे. नाझ ही या कादंबरीची नायिका आहे. पारु मदन नाईक यांनी लिहिलेल्या या कादंबरीतील हा उतारा....... नाझ आईच्या नजरेला नजर देत म्हणाली, `आई. तुझ्या मायेचा मी पमर्द करणार नाही. आजवर कधी तुझ्याशी खोटं वागले नाही आणि यापुढेही तुझ्याशी खोटं बोलायला मला जमणार नाही. आई, तुझ्या मनात माझ्याबद्दल ज्या शंका आहेत, त्या मी जाणून आहे. आई मी सांगते, अगदी खरं सांगते, तुझी शपथ घेऊन बोलते. फक्त तु मन शांत ठेव.’ क्षणभर नाझ थांबली. जवळच्या बाटलीतलं पाणी तिनं ग्लासमध्ये घेतलं. पाण्याचे दोन घोट घेऊन तिनं ग्लास परत ठेवला आणि आईच्या नजरेला नजर देत बोलली, `आई, मी हिजडा आहे हा माझ्या नशिबाचा भाग आहे; पण माझ्या हिजडेपणाची लाज तू बाळगली नाहीस. तुझ्या अधिकारातच ह्या घरादारानं कधी माझा दु:स्वास केला नाही, हे मी कधीच विसरु शकत नाही. आई, संपूर्ण दिवसभर मी वेड्यासारखी काम करते; पण जसा अंधार पडू लागतो तसा अंगावर काटा येतो गं! मनात एक अनामिक भीती वावरु लागते. मन सैरभैर होऊन जातं. आई, त्या परमेश्वरानं या शरीरात अनेक भावना पेरुन ठेवल्या आहेत. कोणत्याक्षणी कोणती भावना या शरीराचा ताबा घेईल, हे सांगता यायचं नाही. आई, तुझ्यापाशी मन मोकळंच करायचं आहे. तू समजून घेणारी आहे. मला दोष देणार नाहीस, अशी खात्री आहे. आई, घरामध्ये तुम्हा सर्वांचं जगणं बघते. मनात एक प्रश्न सारखा सतावतो. मला ??? कधी उपभोगायला मिळेल का? याचं उत्तर मला कधी मिळत नाही. मी अधिक बैचेन होते.’ नाझ आईच्या नजरेला नजर देऊन बोलत होती. नाझच्या शब्दांनी आईची नजर व्याकूळ बनली होती. नकळत नाझची नजर खाली गेली. नि:श्वास सोडून ती बोलू लागली, `आई, जनावरांनाही शरीराची भूक आहे. अनावरपणे कुठंही उघड्यावर ती आपल्या शरीराची भूक भागवतात. मानवाला विचारांची देणगी मिळाली आहे. आपल्या संस्कृतीचा पगडा त्याच्या मनावर आहे. धर्माचे संस्कार मनाची जडणघडण करत असतात. प्रकृती आणि विकृतींवर संस्कारांनी मात करुन संस्कृतीनं आपल्या जीवनाला लाख मोलाचं समाधान दिलं आहे. आई मलाही भावना आहे. प्रकृती आणि विकृतीच्या उफाळणाऱ्या भावना मी सिगारेटच्या झुरक्यानं जाळू पाहते. दारुच्या नशेच्या पुरात त्यांना बुडवू पाहते. तुला वाटलं, नाझ व्यसनात बुडत चाललीय.’ नाझनं आईकडे पाहिलं. आईची नजर झुकली होती. नाझ बोलायचं थांबली म्हणून आईनं नजर वर केली. ती डबडबलेली नजर पाहत असता नाझ पुढे झाली, तर मला समजून घे. तुम्ही मला शिक्षण दिलं, संस्कार दिले; माझं मन घडवलं. स्वत:च्या हिजडेपणाची लाज न बाळण्याइतकं शहाणपण मला आलं. कुणालाच दोष न देता जे आहे त्याचा मी स्वीकार केला. घराण्याची इज्जत राखण्याचा मी आटोकाट प्रयत्न करते; पण आई, शेवटी मी एक माणूस आहे. सामान्य माणूस आहे. भावनांवर विजय मिळवणारा मी कोणी योगी नाही. अनावर होऊन केव्हातरी भावनेच्या पुरात मी गटांगळ्या खाते. मनाला आवरु शकत नाही आई! खरंच आवरु शकत नाही. खूप यातना सहन करते गं ऽ ऽ आई! तू माझी फक्त आई नाहीस. जीवाभावाची मैत्रिणही आहेस. तुझ्यापासून काय लपवू? कसली लाज बाळगू? `आई, बरं-वाईट कळतं मला. पण परमेश्वरानं हे जे जीवन दिलंय, त्याबरोबर स्त्रीचं मनही दिलंय, नटावं वाटतं म्हणून मेकअप करते. दररोज चेहऱ्यावर रेझर फिरवायचं. चेहरा गुळगुळीत करायचा. पुरुषपणाचं चिन्ह दिसू द्यायचं नाही. लिपस्टिक लावायची. संपूर्ण स्त्री नाही काही असूनही स्त्री बनण्याचा अट्टाहास करायचा! `आई, तुम्ही मला कॉस्मॅटिक सर्जरीसाठी प्रवृत्त करायचा प्रयत्न केला. मी त्याला नकार दिला. मला माहीत होतं, डॅडीच्या ओळखीनं माझं लग्न झालं असतं. समाजात मी प्रतिष्ठेनं वावरले असते; पण ज्या घरात मी गेले असते त्या घराण्याला मी वारस देऊ शकले नसते. फसवणूक करुन आयुष्यभर मनाला बोचणी लावून जगण्यापेक्षा त्या वाटेला न गेलेलं बरं, नाही का? आई, ज्या समाजात आम्हा हिजड्यांची कुचेष्टा होते, त्याच समाजातील मोठेपणाची आव आणणारी, महागड्या गाड्या उडवणारी काही माणसं आमचा शोध घेत येतात. आमच्यावर हवा तेवढा पैसा उधळतात आणि....’ `बस्स कर नाझ!’ आई असह्य होऊन उद्गारली. `अगं, हे बोलवतं तरी कसं तुला?’ `का?’ नाझ हसली. `आई, सांगितलं ना तुला! तू माझी नुसती आई नाहीस, जीवाभावाची मैत्रीणही आहे. भयानक असलं तरी जे सत्य आहे, ते तुझ्याशिवाय कुणापुढे सांगायचं गं? आजवर मनात कोंडून ठेवलं. आज तूहून विषय काढलास, म्हणून हे कोंडलेलं सारं तोंडातून बाहेर पडलं. मला माहीत आहे, तुला हे ऐकवत नाही. तुझी लाडकी नाझ काय आहे हे तुला समजलं पाहिजे. हवं तर माझा तिटकारा येऊ दे तुला. रागानं दोन थपडा मारल्यास तरी मला काही वाटणार नाही.’ उसासा सोडून आई बोलली, `नाझ, खूप त्रास झालाय तुला. झोप. मलाही झोप आलीये.’ नाझला हसणं आवरलं नाही, डोळ्यांत पाणी येईपर्यंत ती हसत राहिली. ...Read more

  • Rating StarSAKAL SAPTARANG 23-10-2011

    `मी का नाही?’ याचं उत्तर द्यावेच लागेल! तृतीयपंथीयांच्या जीवनावर यापूर्वी शिवसेनेचे नेते कै. प्रमोद नवलकर यांनी लेखन केले आहे. तसेच इंग्रजीत या समाजाविषयी भरपूर लिखाण प्रसिध्द आहे. आता मदन पारु नाईक यांनी `मी का नाही?’ ही कादंबरी लिहिल आहे. वास्तविक ही कादंबरी नसून सत्य घटनेवर आधारित या समाजाच्या जीवनशैलीवर भाष्य करण्यात आले आहे. हा समाज पूर्णपणे उपेक्षित आहे. त्यांच्या जीवनाच्या काही सामाजिक, सांस्कृतिक जगण्याविषयीच्या ज्या समस्या आहेत, त्याकडे समाजाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचे मत प्रारंभीच लेखकाने नोंदविले असून, ते योग्यच आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची लोकसंख्या आज १.३० कोटींच्या घरात आहे. विविध जाती-धर्माचे आणि पंथाचे लोक या महानगरीत वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहतात. यामध्ये तृतीयपंथीयांचाही समावेश आहे. या शहरात तृतीयपंथीयांच्या शेकडो वसाहती आहेत. चर्चगेट ते विरार आणि व्हीटी ते उल्हासनगरपर्यंत कुठेना कुठे तृतीयपंथी समूहाने राहताना दिसतात. हे लोक बहिष्कृताचे जीवन आजही जगत आहेत. त्यांच्याकडे समाज सहानुभूतीने पाहत नाही. ते अत्यंत हलाखीचे आयुष्य जगतात. कायद्याने त्यांना कोणतेच अधिकार दिलेले नाहीत आणि हेच अधिकार मिळविण्यासाठी `नाज’ नावाचा तृतीयपंथी पुढाकार घेतो. व्यवस्थेशी संघर्ष करतो. हिजडा समाजानेही शिक्षण घ्यावे, नोकरी करावी, वैद्यकीय उपचार व्हावेत, सामाजिक कार्य करावे, अनिष्ट चालीरीतींना तिलांजली द्यावी, हावभाव बदलावेत यासाठी कादंबरीतील नायक नाज (पाळण्यातील नाव नरेंद्र) समाजाशी संघर्ष करतो. मंत्रालयात आणि न्यायालयात लोक हिजडा म्हणून टिंगलटवाळी करतात. `तुम्ही कुठे न्यायाची भाषा करता? हिजड्यांना कुठला आला अधिकार?’ असे प्रश्न करणाऱ्या माणसाची नाजला कीव येते. काही वेळा हतबल नाजला आधार देते ती त्याची आई. वास्तविक पारु नाईक यांनी या पुस्तकातून समाजाला महत्वाचा संदेशही दिला आहे. कोणी कुठे जन्माला यावे हे कोणाच्या हातात नसते. इतर मुलामुलींप्रमाणे कुणाच्या तरी पोटी हिजडे जन्माला येतात; मात्र त्यांच्यात भेदभाव केला जातो. म्हणून नाज आईला प्रश्न विचारतो; ``आई, परमेश्वरानं नारी जातीला मातृत्व दिलं आणि वात्सल्याची नाड जोडली. हे खरं असेल तर आमच्यासारख्यांना पाहून ही वात्सल्याची नाड कशी तोडली जाते?’’ त्यावर आई म्हणते, ``नाज, वात्सल्य लोपत नाही. सामाजिक कुचेष्टेचा क्रूर राक्षस आड येतो. त्याला दूर करायचं धाडस मोजक्याच माता दाखवतात. हे धाडस नसलेल्या माता आतल्या आत कुढत असतात. उपजत वात्सल्य कधीच लोप पावत नाही.’’ नाज आणि त्याचा एक भाऊ एकाच आईच्या पोटी जन्माला येतात. नाज हिजडा असूनही आईनं त्याला कधीच अंतर दिलं नाही. एका प्रसंगात सद्गदित होऊन नाज आईला म्हणतो, ``आई, जगातल्या अभागी जिवांना तुझ्यासारख्या खंबीर माता मिळाल्या असत्या, तर किती बरं झालं असतं!’’ नाज आणि आईमधील संवाद लेखकानं उत्तमप्रकारे मांडला आहे. आज हा समाजही बदलतो आहे. सरकारही दखल घेत आहे. न्याय मिळत आहे. तरीही नाज समाजाला काही प्रश्न करतो. तो म्हणतो, ``माणसासारखीच माणसं आम्ही; पण समाजानं आम्हाला कधीच जवळ केलं नाही. हिजडा, किन्नर, खोजा अशा नावाचं ओझं आम्ही कसं सोसतो हे समाजाला कसं कळणार? आमच्यातील बुध्दिवंतांची बुध्दी कुजवली जाते. त्याची खंत कोणीही बाळगत नाही. रस्त्यावर टाळ्या वाजवून लोकांना अडवणारे आमचे घोळके दिसतात; पण ते असं का करतात, याचा विचार कुणी केलाय? आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतो; मात्र तेथेही कुचेष्टाच होते.’’ ज्या समाजाचा आज लोक तिरस्कार करतात, त्या समाजाविषयी लेखकानं जिव्हाळा दाखविला आहे. पाच वर्षं या विषयासाठी खर्च केली आहेत. पुस्तकात कोणत्याही त्रुटी जाणवत नाहीत. एक ना एक दिवस हा समाजही बदलेल... मुख्य प्रवाहात येईल आणि आपल्या सर्वांची दृष्टी बदलेल, असं वाटतं. `मी का नाही?’ या प्रश्नाचं उत्तर मात्र एक ना एक दिवस समाजाला द्यावंच लागणार आहे. - प्रकाश पाटील ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more