* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MATIKHALCHI MATI
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983388
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 1965
  • Weight : 140.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ANAND YADAV HAS A SPECIAL PLACE IN THE MINDS OF MARATHI READERS. HE HAS NOT ONLY MASTERED THE SHORT STORIES BUT ALSO THE NOVELS. WE HAVE OFTEN COME ACROSS HIS SENSITIVE MIND THROUGH MANY OF HIS STORIES. HIS MIND NOTICES THE SMALLEST OR TINIEST FEELINGS IN THE MINDS AROUND. HE GIVES MEANING TO THE NEGLECTED FEELINGS OF THOSE DOWNTRODDEN PEOPLE. WE ALL KNOW THAT THE PLANTS THRIVE IN THE SOIL. BUT ARE WE ALL AWARE OF THE FACT THAT IT DOES NOT THRIVE BECAUSE OF THE OUTERMOST LAYER VISIBLE TO OUR EYES? ON THE CONTRARY, IT IS THE LAYER OF SOIL BENEATH THE OUTERMOST SOIL WHICH IS NOT ONLY HUMID BUT ALSO WARM, THUS BEARING THE BEST SUITABLE CONDITIONS FOR THE PLANT TO ROOT ITSELF WELL. THE STORIES INCLUDED UNDER THIS TITLE HERE ARE ALL RELATED TO THE LIFE OF VILLAGERS. THROUGHOUT, THE WRITING REFLECTS THE URGE THAT THE WRITER HAS FELT FOR THE WARMTH BENEATH THESE OTHERWISE DRYAPPEARING PEOPLE. IT IS THIS URGE IN HIM THAT MAKES HIM SEE BEYOND THE DAYTODAY LIVING AND BEARING OF THE VILLAGERS. HE REVEALS THE UNKNOWN SHADES OF THESE PURE MINDS WHICH MAY OTHERWISE APPEAR TO BE SELFISH. THE STORIES HELP THE READERS TO FIND THE WARMTH AND MOISTURE DEEP WITHIN WHICH INITIATES THE DAWNING OF SUPER SENSITIVENESS. THE RESULT… THIS BOOK ENHANCES US IN RETURN, IN TERMS OF HUMANITY.
ग्रामीण जीवनातील हे विविध दर्शन अस्सल शैलीतला हा आविष्कार. मातीवर उगवलेल्या कोवळ्या अंकुराइतकीच लेखकाच्या मनाला मातीतल्या गहिऱ्या थरांची ओढ लागली आहे. ही विविध व्यक्तिचित्रे संवेदनाशील मनाने टिपली आहेत. त्यातला प्रत्येक माणूस जिताजागता वाटतो... आणि त्यासोबत वाचकांच्या मनालाही अंकुर फुटतो. सभोवारच्या माणसांचेही ‘माणूसपण’ त्यांच्या मनाला जाणवू लागते. ती जाणीव मनातल्या मातीत रुजते, बहरते. असे हे जिवंत पुस्तक आणखीही खूपसे पालवून जाते!

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 02-01-1966

    ग्रामीण वास्तव जीवनाला नकळत झालेला स्पर्श... नाविन्यपूर्ण नावाने प्रकाशित झालेला हा व्यक्तिचित्रांचा संग्रह ग्रामीण स्वभावचित्रांचे विविध दर्शन घडविणारा आहे. ‘मातीखालची माती ओली आणि उबदार असते... तिच्या उबीतच पिकं जीव धरतात’ आईच्या एका सहज बोलून गेलल्या वाक्यांतून ह्या संग्रहाला वेदनाशील मनाचे अंकुर फुटले आहेत असं भासतं. हातबुडी आलेला शिवा, चव्हाणांचा आबामा, बापू, आक्कू मावशी, गडी, सखाराम, बाबाजी बल्लाळ, फुलाआत्ती, भाडेकरु दत्तू, पोरका दिन्या, तपस्विनी, धोंडबा खादाड्या, खुळा इठू आणि लंगडा गोपा अशा चौदा व्यक्तिरेखांतून दर्शन घेतलंसं वाटतं एका सलंग खेडे गांवाचं - जिथं उंस पिकतो आहे-तितक्याच शिव्याही पिकताहेत, उधळल्या जात आहेत. ग्रामीण जीवनांतील विविध कथा मराठी साहित्यांत चांगल्याच रुजल्या आहेत, ‘खेड्यांत चला’ ह्या ग्रामोद्धाराच्या संदेशापाठोपाठच ग्रामीण कथांना आगळे महत्व आलें. शहरातल्या यांत्रिक जीवनाला कंटाळलेल्या मुळच्या ग्रामीण मनाला मूळ गावच्या व्यक्तिचित्रांचा आठव सुखद गुदगुदल्या करून जाणे स्वाभाविक होतं. भोळ्या-भाबड्या शेतकरी कुटुंबाच्या कथा निसर्गरम्य परिसरांतून डोकावणाऱ्या निर्व्याज आनंदासारख्याच स्वागतार्ह झाल्या, परंतु कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की, त्याचा वीट येणे हेसुद्धा निसर्गप्राप्तच आहे. अशापैकी ‘खेड्यावल्ली माणसं’ ही कथा लक्षात रहाण्यासारखी लिहिली गेली. भोळी भाबडी म्हणवून घेणारी ही खेड्यावरची माणसं किती लबाड आणि संधिसाधू असतात ह्याच एक नमुनाच ह्या कथेने पेश केला होता. ग्रामीण कथा लिहिणे याचा एक सांचाच तयार झाल्यासारख्या ग्रामीण कथा पटापट निर्माण होत होत्या - त्यातूनच अनेक नवे नवे साहित्यिक उदयाला आले. ग्रामीण कथानके लिहिण्याची खास स्पेशेलिटी असलेला लेखक - वर्ग वरचेवर लक्षात भरु लागला. श्री. आनंद यादव यांनी ह्या कथासंग्रहांतून असेच एक स्थान अशा लेखकमालिकेत निर्माण केले आहे. जिवंत भाषा, स्वाभाविक वर्णन आणि पुष्कळशा शिव्यांचे हे ग्रामीण जीवन ‘जुनेरा’ चे जुणेर करते. घाटली, निवद असे विविक्षित अस्सल गांवठी शब्द घेऊन साकार होते. गावच्या मळ्यांचे शिवाराचे व वस्तीचें ओझरते दर्शनही वास्तवतेचे नाते सांगून जाते. ग्रामीण जीवनांतील - विशेषत: घाटावरच्या ग्रामीण जीवनांतील - दैनंदिन व्यवहार व काही विशिष्ट मनोवृत्तीच्या स्वभावरेखा ग्रामीण जीवनाचे यथार्थ वर्णन करणाऱ्या आहेत. त्यात नाही ग्रामीण मनाची केवळ तरफदारी किंवा केवळ त्यांच्या मागासल्या स्वार्थी मनाचें कौतुक - ! शब्दाशब्दांतून इथे निर्माण होते आहे - कींव, दारिद्र्यांच्या ह्या जगाबद्दल कणव. येथलं अज्ञान, दारिद्रय, उपासमारीच्या पोटी आलेली अगतिकता, किंवा केवळ कष्ट करायला नको हा वृत्तींनी चटावलेली लाचारता, चोरटी वृत्ती किंवा रामोशीपणा पाहून मन विषण्ण होतं. ग्रामजीवनाची केवळ कौतुकं पहायला सरावलेल्या साहित्याला वास्तव जीवन स्पर्श करून गेल्याचा भास होतो. कोल्हापूर, सातारा, कऱ्हाड टापूंतील कुठल्यातरी एका खेड्यांतील ऊसाच्या मळ्याचे, शेतकऱ्याच्या शेतीचे कष्ट ‘दिसाचा गोंडा उगवतीला मोहरत हुता, तवापून तो रातची चांदनी उगवून मिटायच्या वकतगत - आपण आखोदेखा हाल’ प्रमाणे पुन्हा अनुभवत आहोत, अशी भावना कुठल्याही घाटावरच्या व्यक्तीला होईल आणि मग ह्या व्यक्तिचित्र संग्रहांतील प्रत्येक व्यक्तिरेखा परिचयाची वाटू लागले. वऱ्हाड, कोंकण, मराठवाडा अशा महाराष्ट्राच्या विविध भूभागाची ग्रामीण वैशिष्टये आपण वाचली, अनुभवली. घाटावरची ग्रामीण चित्रे तर आपण सिनेमांतूनही अनेकदा पाहिली आहेत, पण त्यांतून दृश्य झालेल्या रगेल रंगेल जीवनाहून एक वेगळेच जीवन ह्या कथा संग्रहांतून पहायला सापडते. कष्ट, सुख-दु:खाचा खेळ हा मानवी जीवनाचा नित्याचाच भाग आहे, परंतु त्या सुख-दु:खाच्या विश्वालाही अनेक स्वभाव वैशिष्टयाचे पैलू असतात. प्रत्येक पैलूतून वेगवेगळे सप्तरंगी इंद्रधनुष्य हातांवर उमटतं - प्रकाशाचा किरण साधून मनाला हंसवतं - खुलवतं ! श्री. आनंद यादव ह्यांनी अशाच एका इंद्रधनुष्यांतून मानवी जीवनाचे स्वाभाविक रंग खुलवले आहेत. चौदा कथा घेऊन संग्रह मोठा करण्याऐवजी निवडक आठ दहा कथांनी तो छोटा केला असता, तर एका बैठकीत कथा संग्रह वाचन काढणाऱ्याला तो आटोपशीरही वाटला असता. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book