* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MARATHYANCHE SWATANTRYAYUDH
  • Availability : Available
  • ISBN : 9789387789210
  • Edition : 3
  • Publishing Year : JULY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 220
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
  • Available in Combos :DR.JAYSINGHRAO PAWAR & VASUDHA PAWAR COMBO SET- 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"AFTER THE DEMISE OF SHIV CHHATRAPATI, AURANGZEB DECIDED TO END THE MARATHA REGIME FOR ONCE AND ALL. WITH A HUGE ARMY HE ATTACKED THE MARATHAS. THIS LED TO THE FAMOUS ‘FREEDOM FIGHT OF MARATHAS’. UNDER THE ABLE LEADERSHIP OF CHHATRAPATI SAMBHAJI, CHHATRAPATI RAJARAM AND QUEEN TARABAI, THE MARATHAS FOUGHT FOR 26 LONG YEARS. IN THE END, THE ONCE GREAT MUGHAL EMPEROR WAS DEFEATED. HE HAD TO BE BURROWED IN THE SOIL OF MAHARASHTRA. DR. JAISING PAWAR, THE GREAT HISTORIAN, HAS TAKEN A REVIEW OF SOME EVENTS THAT TOOK PLACE DURING THIS FREEDOM FIGHT. A FEW TO NAME ARE: • CAPTURING CAPITAL RAIGAD- SURYAJI PISAL’S ROLE IN IT • CHHATRAPATI RAJARAM’S DANGEROUS JOURNEY TO JINJI • MARATHA’S VITALITY 1681 A.D. • MARATHA’S AMBITION TO WIN DELHI • THE TRAGEDY OF SENAPATI SANTAJI GHORPADE • THE SO-CALLED CROWN CEREMONY OF KING KARNA; CHHATRAPATI RAJARAM’S SON FROM A MAID • EVALUATION OF SWATANTRYA SAUDAMINI QUEEN TARABAI’S WORK • MARATHA’S FREEDOM FIGHT- A WIDE SEARCH AND UNDERSTANDING "
"शिवछत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेब बादशहा आपल्याअफाट लष्करी शक्तिनिशी मराठ्यांची सत्ता समूळ नष्टकरण्याच्या महत्त्वाकांक्षेने दक्षिणेत धावून आला आणि त्यातून इतिहासप्रसिद्ध ‘मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध’ सुरू झाले. छ. संभाजी, छ. राजाराम व महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मराठे २६ वर्षे लढले आणि अखेर बादशहास या मराठ्यांनी पराभूत करून आपल्या दफनभूमीचा शोध याच महाराष्ट्रात घ्यावयास लावला. अशा या स्वातंत्र्ययुद्धातील काही घटनांचा ज्येष्ठ इतिहाससंशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी घेतलेला हा शोध. या ग्रंथात आपण वाचाल... राजधानी रायगडचा पाडाव - सूर्याजी पिसाळची भूमिका छ. राजारामांचा जिंजीचा जीवावरचा प्रवास इ. स. १६८१ ची मराठ्याची मसलत मराठ्याची दिली जिंकण्याची महत्त्वाकांक्षा सेनापती संताजी घोरपडे याची शोकांतिका छ. राजारामांचा दासीपुत्र राजा कर्ण याचे तथाकथित राज्यारोहण स्वातंत्र्यसौदामिनी महाराणी ताराबार्इंच्या कार्याचे मूल्यमापन मराठ्यांचा स्वातंत्र्ययुद्धाचा शोध आणि बोध "

No Records Found
No Records Found
Keywords
# MARATHYANCHE SWATANTRA YUDHA# DR. JAYSINGRAO PAWAR# SHIVCHATRAPATI# SAMBHAJIRAJE# YESUBAI# RAJARAM# DHANAJI JADHAV# SANTAJI GHORPADE# #TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध# डॉ. जयसिंगराव पवार# शिवछत्रपती# संभाजीराजे# येसूबाई# राजाराम# धनाजी जाधव# संताजी घोरपडे# खंडो बल्लाळ# हंबीरराव मोहिते# रामचंद्रपंत# औरंगजेब# जुाल्फकारखान# अब्दुर्रहीमखान# रायगड# विशाळगड# सूर्याजी पिसाळ# जिंजी# देशमुखी# बखर# मसलत# गनिमी कावा #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarVijay Pawar

    #मराठ्यांचं_स्वातंत्र्ययुद्ध लेखक- डॉ.जयसिंगराव पवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात महाराष्ट्राने स्वराज्य स्थापनेचा सुवर्णकाळ अनुभवला , शुन्यातून सुरुवात करुन जगभरातील इतिहासकारांना दखल घ्यायला भाग पाडणार्या दैदिप्यमान स्वराज्याचा गाड डौलाने चालत होता पण अचानक नजर लागावी त्याप्रमाणे शिवाजी महाराज गेले आणि स्वराज्य पोरकं झालं , पण म्हणतात ना कार्यकर्तृत्वाचा वारसा हा एका पिढीतून दुसर्या पिढीत आपोआप जातो त्याप्रमाणेच थोरल्या महाराजानंतर एका वादळाच्या हाती स्वराज्याची कमान आली , एक कुटुंबप्रमुख , एक राज्यकर्ता , एक पालक म्हणून रयतेचा सांभाळ करणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजांनी अलौकिक कारकिर्दीने स्वराज्याला सर्वोच्च स्थानी पोचवलं , महाराजानंतर स्वराज्य तेवढ्याच ताकदीनं सांभाळलं , वाढवलं ! पण अवघ्या काही वर्षातच महाराष्ट्राला पुन्हा ग्रहण लागलं छत्रपती संभाजीराजांचा फितुरांनी घात केला आणि औरंगजेबाने महाराजांना कैद करुन अनन्वित छळ करत मृत्युलाही लाजवेल अशा दुर्दैवी पद्धतीने स्वराज्याच्या धाकल्या धन्याचा खून केला, शंभुराजांच्या वादळी कारकिर्दीत इतिहासाच्या पानापानांना अमरत्व बहाल केलं . छत्रपती संभाजी राजांच्या दुर्दैवी मृत्यूपासून ते औरंगजेबाच्या अंतापर्यंतच्या धगधगत्या अग्नीकुंडाची पुराव्यानिशी केलेली उकल म्हणजे डॉ.जयसिंगराव पवारांचं #मराठ्यांचं_स्वातंत्र्ययुद्ध` हे पुस्तक ! शंभुराजांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात माजलेली अनागोंदी मोडीत काढत महाराणी येसूबाई बाईसाहेबांनी अमोल त्याग करत स्वराज्याचा अमृतकलश राजाराम महाराजांच्या हाती सोपवला , त्यावेळी झालेली `मराठ्यांची मसलत` लेखकाने पुराव्यानिशी मांडली आहे. सुर्याजी पिसाळाची अतुलनीय अशी गद्दारी रायगडाने अनुभवली , लेखकाने हा प्रसंग जिताजागता उभा केला आहे. सुर्याजी पिसाळाची पुराव्यानिशी चिकीत्सा यापूर्वी निश्चीतच कधी झाली नसेल . राजाराम महाराजांचा जिंजी प्रवास , रायगडाने दिलेली लढत , महाराणी येसुबाई साहेबांची निर्णयक्षमता , स्वराज्यापुढे वैयक्तिक भावभावनेला दिलेली मूठमाती , बाळ शाहूराजांसह औरंगजेबाच्या कैदेतील काळ , जिवंत उभा केला आहे लेखकाने. अरजोजी गिरजोजी यादवांचा खटला , नागोजी मानेंचा स्वार्थीपणा , धनाजी संताजीच्या सुवर्णीय कारकिर्दीची वाटचाल , राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील पडद्याआड राहिलेल्या अमूल्य घटना ,राजकारण सारं काही डोळ्यासमोर घडतंय याचीच अनुभूती लेखकाच्या प्रत्येक वाक्यातून होते. संताजी धनाजींचा वाद , त्यातून स्वार्थी लोकांनी साधलेली वेळ, संताजी आणि राजाराम महाराज यांच्यात आलेले वितुष्ट त्यातूनच राजाराम महाराजाविरुद्ध संताजीने लढलेले युद्ध त्यातील महाराजांचा झालेला पराभव आणि त्यानंतर संताजीची झालेली मनस्थिती तसेच संताजी घोरपड्यांचा दुर्दैवी खून यावर लेखकाने केलेला उहापोह मनाला चटका लावून जातो. जिंजीला सात वर्षे दिलेला झुल्फिकारखानाचा वेढा त्यातून सुटून राजाराम महाराजांनी महाराष्ट्रात केलेला प्रवास आणि सिंहगडावर झालेल्या राजाराम महाराजांच्या अकस्मात मृत्यूनंतर राजा कर्णाच्या कहानीचा केलेला उहापोह वाचकांना नवी दृष्टी देतो. राजारामपुत्र द्वितीय शिवाजीराजे यांना गादीवर बसवून महाराणी ताराबाईसाहेबांचं राजकारण, धगधगती कर्तृत्व शैली , याचकाळात उफाळून आलेल्या तोतया शाहूराजांचा बिमोड , थोरल्या शाहूराजांची सुटका, त्यानंतर झालेली मराठा गादींची शकलं , या घटना पुराव्यानिशी लेखकाने मांडून त्यावेळची महाराष्ट्राची परिस्थिती जिवंत करून दाखवली. भद्रकाली ताराराणींच्या कारकीर्दीत स्वराज्याला मिळालेली नवसंजीवनी प्रत्येक मावळ्याच्या ह्रदयात मशाल पेटवून गेली आणि उभ्या महाराष्ट्राच्या तीन पिढ्यांना नडणार्या औरंग्याला इथंच कबर खोदावी लागली. शिवरायांनी स्थापन केलेल्या आणि वाढवलेल्या स्वराज्याला राजारामकाळात नर्मदेच्या पार पोचवण्यात आणि ताराराणी काळात तापीपार पोचवण्यात मराठा मावळ्यांना यश आले होते. मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध केवळ साम्राज्य वृद्धीसाठी नव्हते तर दीर्घकाळ चाललेली ती एक अस्मितेची लढाई होती. शिवशाही किंवा मराठ्यांचा इतिहास केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीएवढाच नाही तर त्यानंतरच्या इतिहासाची पुराव्यानिशी सांगोपांग चर्चा या पुस्तकाच्या माध्यमातून होते आणि इतिहास वाचकांना पुढच्या घडामोडींची ओळख या पुस्तकाच्या माध्यमातून होते. ...Read more

  • Rating StarRahul Kanakdande

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्य घशात घालायला आलेल्या औरंगझेबाला 25 वर्ष लढून मराठ्यांनी महाराष्ट्रातच गाडले, आधी राजाराम महाराज,मग त्यांच्या पत्नी ताराराणी यांच्या नेतृत्वात संताजी घोरपडे, धनाजी जाधव , रामचंद्रपंत अमात्य आणि बाक सर्व सरदार कसे लढले त्या काळातील उपलब्ध पत्रांच्या आधारे डॉ जयसिंगराव पवार यांचे `मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध` हे पुस्तक नक्की वाचा ...Read more

  • Rating StarPrashant Patil

    मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध - डॉ जयसिंगराव पवार शिवछत्रपतींच्या निधनानंतर आलमगीर बादशहा आपल्या अवाढव्य सेना सामर्थ्यानिशी हिंदवी स्वराज्य कायमचे उखडून टाकण्यासाठी दख्खनेत उतरला. या प्रचंड अशा मोगली वावटळी मध्ये कुतुबशाही आणि आदिलशाही पालापाचोळ सारख्या उडाल्या. पण मराठ्यांनी मात्र शिवरायांनी स्थापलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी प्रयत्नांची शर्थ केली. छत्रपती शंभुराजे, छत्रपती राजाराम व ताराबाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी तब्बल पंचवीस वर्ष लढा देऊन मोगल साम्राज्य खिळखिळे केले. औरंगजेबाला चिरविश्रांती घेण्यासाठी इथल्याच मातीत जागा शोधावी लागली. छत्रपती शिवरायांची स्वराज्य स्थापना व शंभूराजांचे बलिदान या तेजस्वी इतिहास समोर मराठ्यांचा हा लढा तसा झाकोळून जातो. प्रस्तुत पुस्तक हे याच कालखंडावर प्रकाश टाकते. पुस्तकात या लढ्याचा समग्र व सलग इतिहास मांडला नसून यातील महत्त्वाच्या घटनांवरचे स्फुट लेख आहेत. राजधानी रायगडचा पाडाव व त्यात सूर्याजी पिसाळ ची भूमिका; छत्रपती राजारामांचा जिंजी पर्यंतचा रोमहर्षक प्रवास; संताजी, धनाजी, रामचंद्रपंत व शंकराजी नारायण यांनी एकत्र येऊन केलेला सर्जाखानाचा दारुण पराभव; संताजी घोरपडे यांची शोकांतिका; मराठ्यांची दिल्ली जिंकण्याची महत्त्वाकांक्षा इत्यादी बऱ्याच विषयावरती रोचक माहिती या पुस्तकात वाचावयास मिळते. साधारण दोनशे पानांचे हे पुस्तक इतिहासप्रेमींना एका महत्त्वाच्या कालखंडाचा परिचय करून देते. ...Read more

  • Rating StarChetan Jivarak

    हे पुस्तक आज वाचून झालं खूप छान डॉ. जयसिंगराव पवार यांनी हे पुस्तक लिहल आहॆ. या पुस्तकात छत्रपती राजाराम महाराज , महाराणी ताराबाई यांनी दिलेला मोगलांशी लढा याच सविस्तर वर्णन केले आहॆ छत्रपती संभाजी महाराजचा हत्या नंतर 26 ते 27 वर्ष या भूमीत औरंगजेबला गनिमी काव्याचा युद्ध नीती ने छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांनी लढा देत राहिला. छत्रपती राजाराम महाराज यांची पहिली राणी जानकीबाई (सरसेनापती प्रतापराव गुजर याची कन्या) दुसरा राणी ताराबाई (सरसेनापती हंबीरराव मोहिते याची कन्या) तिसरी राणी राजसबाई व संभाजी महाराज राणी येसूबाई व मुलगा शाहू महाराज हे रायगड वर होते जेव्हा संभाजी महाराज कैद केली व पुढे बादशाही कैदेतच हत्या केली . दरम्यान, रायगडवर राणी येसूबाई यांनी राजाराम महाराज यांना सिंहासनारुड केले व स्वराज्यचे नवे छत्रपती घोषित केले . रायगड ला मोगलांनी वेढा दिला या वेढ्यातून राजाराम महाराज व ते त्याचा सहकार्ऱ्यानीशी गुप्तपणे बाहेर पडले त्यांचा बरोबर त्याचा पत्नी ताराबाई व राजसबाई या दोघी रायगडाबाहेर पडला . राजाराम महाराज पन्हाळा गडावरून जिजीकडे पलायन केले व पुढील 8 वर्ष स्वराज्यची राजधानी जिजी होती रायगडच्या पाडावानंतर राणी येसूबाई व मुलगा शाहू आणि राजाराम महाराज पहिली राणी जानकीबाई हे मोगलांच्या कैदी बनुन बादशाही छावणीत गेल्या . जिजीवरून महाराजांनी स्वराज्याची कामे 8ते 9 वर्ष बघितली त्यानंतर राजाराम महाराज पुन्हा स्वराज्यात आले पन्हाळा - विशाळगडास आले राजाराम महाराज स्वराज्यात आल्यावर राजधानी ही सातारा झाली साताऱ्याच्या तुलनेने विशाळगड हा फार सुरक्षित होता महाराजांनी आपला कुटुंब ला विशाळगड वर हलवले राजाराम महाराजाचा अकाली मृत्यू झाला त्यावेळेस त्याचे वय अवघे 30 वर्ष चे होते आता परत स्वराज्याची दशा ना छत्रपती ना राजा झाली होती त्यात वैधव्याचे दुःख बाजूस ठेवून ताराबाईंनी मराठ्यांच्या गादीवर आपला पुत्र शिवाजीराजे यास बसविले व लष्करी मोहिमेची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली महाराणी ताराबाई ने पुढे मोगलांशी 7/8 वर्ष आपल्या नेतृत्वाखाली संघर्षं देत राहिला महाराणी ताराबाई च्या कालखंडात मराठे नर्मदा ओलांडून मावळव्यात स्वारी करून खंडण्या वसूल लागले औरंगजेब 27 वर्ष स्वराज्यात लढ्यात राहिला पण त्याला हे स्वराज काबीज करता आलं नाही कारण हे स्वराज्य कोणी राजाच नव्हत हे स्वराज्य या रयतेचा होत 27 वर्ष चा युद्धाचा कालखंडात मराठ्यांचा राज्यात अशा तीन कारकिर्दी झाला :1 संभाजी कारकीर्द 2 राजाराम कारकीर्द 3 ताराबाई कारकीर्द यांनी औरंगजेब सघे युद्ध केले पण त्याला स्वराज्य पूर्ण काबीज करू दिले नाही ताराबाई चा नेतृत्वाखाली मराठ्याने माळवा ,गुजरात,कर्नाटक इ सुभ्यावर राजरोस प्रहार चालू ठेवला दिल्लीपती औरंगजेब बादशाह शेवटी याच महाराष्ट्रचा मातीत त्याने जगाचा निरोप घेतला ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHIKASANTVANAM
RADHIKASANTVANAM by MUDDUPALANI Rating Star
केदार मारुलकर

एक डॉक्टर काय काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या पुस्तक परिचयासाठी निवडलेल्या पुस्तकाचे लेखक (खरे तर अनुवादक) *डॉ. शंतनू अभ्यंकर.* पुण्याच्या बीजे मेडिकल मधून एमबीबीएस. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण. आयएमए तसेच इतर संघटनेत विविध पदांवर काम. अनक परिषदांमध्ये शास्त्रीय विषयावर शुद्ध मराठीत व्याख्याने. २५ वर्षाहून अधिक काळ ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा. लोकविज्ञान संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा संघटनांमध्ये काम. विज्ञान लेखक, भाषांतरकार, ब्लॉगर आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे समाजात सर्वसाधारणपणे *न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर लेखन* आणि प्रसंगी *प्रचलित समजाला तडा देणारे परखड भाष्य* करण्याची धमक. *पुस्तक परिचय* मुद्दूपलनी ही अठराव्या शतकातील राजे प्रतापसिंह यांची भोगपत्नी. अनुपम सौंदर्य, बुद्धिमत्ता, चातुर्य, शृंगारनिपुणता बहुभाषाकोविद अशी देवदासी स्त्री. राधिकासांत्वनमु हे तेलगू भाषेतील काव्य तिने रचले. परंतु नंतरच्या काळात अश्लील ठरवून त्यावर बंदी घालण्यात आली. देश स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा एकदा या काव्याला प्रकाशित होण्याचे भाग्य लाभले. गेल्याच वर्षी हे काव्य मराठीत अनुवादित करून डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी मराठी रसिकांना हा सांस्कृतिक ठेवा उपलब्ध करून दिला आहे. तंजावरच्या तत्कालीन मराठी राजवटीचं एक वेगळंच वैशिष्ट्य होतं. मराठी राजे आणि तमिळ प्रजा. या राज्याची प्रसिद्धी इतर कलांइतकीच कलावंतिणींसाठीही होती. देवदासी, देवरंडीयल, कलावती, गुडिसानी, भोगदासी, नगरशोभिनी, राजगणिका अशी, काही आज आपल्याला खळबळजनक वाटतील अशी, नावं होती. एक समृद्ध परंपरा होती. तिथे गणिकांनाही प्रतिष्ठा होती. अशीच एक गणिका-मुद्दूपलनी. तिची एक रचना म्हणजेच राधिकासांत्वनमु. तेलुगूमध्ये सांत्वन म्हणजे रुसवा काढणे. अतिशय शृंगारिक, भावनाप्रधान, बिनधास्त आणि प्रसंगी अश्लील म्हणावं असं हे काव्य. अर्थात श्लिलाश्लिलतेच्या कल्पना कालसापेक्ष असतात. राधा-कृष्ण आणि इलाची गोष्ट सांगतासांगता ती राजे राजवाड्यांच्या राज्याचीच नाही, तर स्त्रियांच्या अंत:करणाचीही दारे सताड उघडून दाखवते. मराठीमध्ये इतकं शृंगारीक काव्य लिहिलं गेलं नाही.त्यात शृंगारीक लेखन म्हणजे लिहिलंच तर पुरुषांनी लिहावं, असा अलिखित नियम. शृंगार आणि अश्लीलता याच्या सीमारेषेवर असलेलं हे काव्य एका स्त्रीने लिहावं हे म्हणूनच आगळंवेगळं ठरतं. राधा-कृष्णाच्या कथेने भल्याभल्यांना मोहात पाडले आहे. पण राधाकृष्णाची बहुतेक प्रेमकाव्ये कितीही सुंदर आणि शृंगारिक वर्णनांनी भरलेली असली तरी अखेरीस राधाकृष्णाचे मिलन म्हणजे; पुरुष आणि प्रकृतीचे मिलन, असा शोध लावून त्याला एकदम अध्यात्मिक रूप दिलं जातं. राधिका सांत्वनम् मध्ये कृष्ण आणि राधा, कृष्ण आणि या काव्यातील प्रेमत्रिकोणाचा तिसरा कोन- इला, यांचे नाते अगदी सर्वसाधारण स्त्रीपुरुषांसारखे रेखाटले आहे. आपली पार्श्वभूमी सांगून ही गणिका राधिकासांत्वनमची मुख्य कथा सुरू करते. राधा-कृष्णाच्या प्रणयलीला तर सगळ्यानाच माहीत आहेत. या काव्यातील प्रौढ राधा, तरुण कृष्णाचे आणि नुकत्याच यौवनात आलेल्या इलाचे लग्न लावून देते. कृष्ण इलेवर असा काही भाळतो की राधा रहाते बाजूला. आता राधेला पश्चात्ताप होतो. विरहाने पोळलेली राधा, कृष्णाला विनवून परत बोलवते. तो येतो. पण दुखावली गेलेली राधा त्याला फार महत्व देत नाही. त्याला राधेची आर्जवं करायला लागतात. तरीही राधा त्याला बधत नाही. मग कृष्ण आपले हुकूमी अस्त्र काढतो. आपल्या कामलीलांनी तिला घायाळ करतो, राधा पुन्हा आकृष्ट होते, दोघांचे मिलन होतं. इथे राधिकासांत्वन सुफळ संपूर्ण होतं, अशी ही काव्यरुप कथा. यातील दोन्ही नायिका अगदी मुद्दूपलनी सारख्याच आहेत. रुपगर्विता, हुशार तितक्याच हट्टी. इला नवथर तरुणी; तर राधा प्रौढ, प्रेमस्वरूप कृष्णसखी आणि दोघींचा नायक कृष्णसखा. पण सारा भर आहे तो ह्या दोन नायिकांच्या मनतरंगांवर. यातल्या दोन्ही नायिका कृष्णावर वर्चस्व गाजवणाऱ्या आहेत. प्रेमासाठी आसुसलेल्या आहेत. अनुभूती मोकळेपणानी व्यक्त करणाऱ्या आहेत. वयात येणे, विरह,असूया, प्रेम-द्वेष अशी भावनांची लपाछपी, असं बरंच काही हे काव्य उलगडून दाखवते आणि तेही एक स्त्रीच्या नजरेतून. हा नजारा थक्क करणारा आहे. हे शृंगारीक असलं तरी उत्कट आणि रसाळ काव्य आहे. या काव्याचा इंग्रजीतही अनुवाद झाला आहे. डॉ. शंतनू यांनी छंदोबद्ध भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. छंदोबद्ध असल्याशिवाय भाषांतर त्या काळातील वाटणारच नाही. मूळ छंद/वृत्त काय आहे याचा अंदाज अर्थातच इंग्लिश ओळी वाचून येत नाही. मग काही ओळी वाचायच्या, एखादी ओळ सुचेल तशी लिहायची आणि मग कारागिरी करत करत इतर ओळी जुळवायच्या; असा प्रकार करत भाषांतर केल्याचे मनोगतात लिहिले आहे. मराठीत हे सगळे काव्य लिहिताना पुणेरी भाषा वापरली असली,तरी त्यात दुर्बोधता नाही. अभंग, मंदाक्रांता, मालिनी, दिंडी, हरिभगिनी आणि लावणीसदृश ठेक्यात बसणाऱ्या काही चाली यात वापरल्या आहेत. काही ठिकाणी पद्यमय संवाद लिहिले आहेत. पुस्तक परिचय लिहिताना यातील काही ओळी उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. काव्याची सुरवातच राधेच्या बहारदार वर्णनाने होते. _थोरांनी नावाजली, गौरांगी सर्वांहुनी, शकुंतला, शुकभाषिणी, नंदाक्का राधा ही. आणि तिचे ते डोळे, नसते जर कृष्णकळे; का हरी कटाक्ष पुरे, चमकाया नयनदले?_ यानंतर षोडशा इलेचं वर्णन या शब्दांत _कृशांगा, नाजुकांगा, वेणीसंभार सोसवेना; मुखमोती दिव्य ज्योती, देवी इला, यौवना ही_ कृष्णावर भाळलेल्या इलाचे मनतरंग रेखाटताना म्हटले आहे- _लपंडावी डोळे झाकाया, फक्त मुरारी हवा इलेला. शिवशिवीचा खेळ रंगता,हिचे इशारे पळता पळता. नदीकिनारी साधून मौका, इला झोंबते हरीच्या अंगा. सदैव हरी-सह, हरीच सहचर, खेळ मिषे सुखस्पर्श अनावर. सख्यांस कौतुक सखिचे नवथर उधळून यौवन, धीट, खोडकर इला भाळली श्री कृष्णावर!_ कृष्ण आणि राधेचा प्रणय तिच्या नजरेतून सुटत नाही... _ओठ आरक्तही देता राधा, इला तुळीतसे ओष्ठ सौष्ठवा; दंतपंक्ती त्या सहज चमकता, फिके जाणी स्मित आपुले इला, शेजघरी ने कृष्णा, राधा; म्हणे ‘आले मी’, इला बाला!! मजेत हसती श्रीकृष्ण-राधा!_ राधेलाही इला मोठी होण्याची आतुरता, उत्सुकता आहेच... _कधी म्हणे विनोदे राधा, ‘ही मला सवत होई का?’ पण पाहताच इलेला, उरी उधाण ये मायेला, कुस्करी मग वारंवार, चुंबीते गोबरे गाल._ पण लग्नानंतर राधाने इलेला दिलेला संदेश आणि कृष्णाला दिलेला `दम` बहारदार आहे. इलेला संदेश _दे विश्वास अन् दे प्रोत्साहन. जाण असे तो प्रीत पुरुषोत्तम काम निपुण तो प्रेमिक उत्तम ...दे, कोमल तन, कोमल दे मन, प्रीत मनस्वी, तुझाच प्रीतम.’_ कृष्णाला `दम` _‘कठोर कांचन माझी काया, लता जणू ती, तनू कोमला, धिटाई हळू, बुजेल इला, सांभाळा तुम्ही गोपाळा!’_ काही ओळी मात्र आजही सर्वसामान्य पुरुषांनाही लागू पडतील की काय, इतक्या चपखल झाल्या आहेत. _नाही कशी मुळी लाज ;हवी मजा, वरती माज ; पुरूषांचे नीत्य काज ; बाईच्या मनीची आस कोणी ना पुसे त्यास_ चार भाग आणि ५८४ पदं असलेलं हे काव्य शृंगारीक असेलही, नव्हे आहेच. पण स्त्रीसन्मानाचा, प्रतिष्ठेचा आणि संवेदनशील मनाचा ठाव घेणारा तो एक ठेवा आहे. _इतिश्री शंतनूविरचितम् राधिका सांत्वनम् भावानुवादस्य केदारकृतपरिचयम् संपूर्णम् ...Read more

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/7120?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR06UVpU4k8DLSaBDkgmglzUuRMuX2XQ3OKxRAdL-tQo1-DZwHV7_Q3uLE4_aem_ATgHVeQrpR7vbtSsdHKWSXs5EHm0mPjS_5lEI-n3B5uorlbUPMjKGOX9doFKfROrOtk