* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MARATHI BHASHA-UDGAM VA VIKAS
  • Availability : Available
  • ISBN : 9788190779142
  • Edition : 6
  • Publishing Year : JANUARY 1933
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 444
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
  • Sub Category : RESEARCH & INFORMATION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MARATHI LANGUAGE CAME INTO EXISTENCE DURING 500 A.D TO 700 A.D. IT EVOLVED THEREAFTER; IT IS A COMBINATION OF ALL THE PRAKRIT LANGUAGES BUT MOSTLY MAHARASHTRIYAN LANGUAGE AND THE CORRUPTED FORM OF MANY LANGUAGE IT IS BELIEVED THAT THE EVOLUTION IN THE SOCIETY, RELIGION AND LANGUAGE ARE BASED ON THE SAME FOUNDATION. PROFESSOR KULKARNI HAS STUDIED THE MARATHI LANGUAGE IN DEPTHS. HE HAS REVEALED THE SECRETS OF THE HISTORY OF MARATHI LANGUAGE. HE HAS INCLUDED THE BASIC PRINCIPLES OF LANGUAGE ALONG WITH THE HISTORY OF OTHER LANGUAGES SUCH AS PRE-VEDIC, VEDIC, SANSKRIT, PALI, PRAKRIT, APBHRANSH, ETC. HE HAS ALSO SHADE A LIGHT ON THE DIFFERENCES IN THE LANGUAGE DURING DIFFERENT ERAS, WITHIN VARIOUS TERRITORIES AND OTHER SUCH ASPECTS. HE EXPLAINS IN DETAILS THE VARIOUS FORMATS OF STUDYING THE LANGUAGE SUCH AS HISTORICAL, COMPARATIVE, DESCRIPTIVE, AND CONSTRUCTIVE. HE TRIES TO BRING THE IMPORTANCE OF LOCAL AND REGIONAL LANGUAGES TO OUR NOTICE. SURELY, PROFESSOR KULKARNI`S EFFORTS ARE VALUABLE FOR ALL THE SCHOLARS OF MARATHI.
‘मराठी भाषा सर्व प्राकृत भाषांच्या, त्यातल्या त्यात महाराष्ट्री व अपभ्रंश यांच्या मिश्रणाने इसवी सन ५००-७००च्या दरम्यान उद्भवली व उत्क्रांत होत गेली...’ ‘समाजक्रांती, धर्मक्रांती व भाषाक्रांती या समसामायिक असतात.’ प्रा.कृ.पां.कुलकर्णी यांनी या ग्रंथात मराठी भाषेचा ऐतिहासिक, संशोधनपूर्ण आणि सोपपत्तिक उलगडा करून दाखवला आहे. भाषाशास्त्राची सामान्य तत्त्वे; मराठी भाषेच्या उद्गमापूर्वीच्या पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या अवस्थांचे संशोधन; मराठीचे कालिक, प्रांतिक व इतर भेद यांचा समावेश प्रस्तुत ग्रंथात आहे. तसेच भाषाशास्त्राच्या ऐतिहासिक, तौलनिक, वर्णनात्मक, रचनात्मक अशा विविध अभ्यासपद्धती येथे विशद केल्या आहेत. निरनिराळ्या प्रांतिक व ग्रामिक बोलींचे महत्त्व जाणून त्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. प्रा.कृ.पां.कुलकर्णी यांचा हा ग्रंथ मराठी भाषाप्रेमी व मराठीचे अभ्यासक यांच्यासाठी एक उपयुक्त व परिपूर्ण संदर्भग्रंथ आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBHASHASHASTRA #PURVVAIDIK #SANSKRIT #PRAKRUT #UTPATI #KRUPAKULKARNI "#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MARATHIBHASHA-UDGAMVAVIKAS #MARATHIBHASHA-UDGAMVAVIKAS #मराठीभाषाउद्गमवविकास #REFERENCEANDGENERAL #MARATHI #K.P.KULKARNI "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 12-7-2009

    ‘मराठी भाषा: उद्गम व विकास’ या पुस्तकाची ही चौथी आवृत्ती. या आवृत्तीत लेखकाने बरीच सुधारणा केली आहे. भाषेच्या संशोधनाबाबत प्रत्यही पाऊल पुढेच पडत आहे. अभ्यासात सारखी प्रगती होत आहे. ही प्रगती अभ्यासकांच्या आवाक्यात आणून सोडण्याचा प्रयत्न येथे केला आह. पहिल्या प्रकरणात पोटभाषा व बोलीभाषा यासंबंधीची नवीन विचारसरणी समाविष्ट केल्यामुळे त्या प्रश्नाला एक प्रकारचे पूर्णत्व आले आहे. भाषा शास्त्राच्या ऐतिहासिक व तौलनिक पद्धतीबरोबरच वर्णनात्मक, रचनात्मक व इतर परस्परानुबंधी पद्धतीना महत्त्व आले आहे. अभ्यासाच्या या सर्व नव्या पद्धती एका स्वतंत्र प्रकरणात विशाद करून सांगितल्या आहेत. ‘मराठी भाषा सर्व प्राकृत भाषांच्या, त्यातल्या त्यात महाराष्ट्री व अपभ्रंश, यांच्या मिश्रणाने इ. स. ५००-७०० च्या दरम्यान उद्भवली व उत्क्रांत होत गेली. समाजक्रांती, धर्मक्रांती व भाषाक्रांती या समसामायिक असतात.’ प्रा. कृ.पां.कुलकर्णी यांनी या ग्रंथात मराठी भाषेचा ऐतिहासिक, संशोधनपूर्ण आणि सोपपत्तिक उलगडा करून दाखवला आहे. निरनिराळ्या प्रांतिक व ग्रामीक बोलीचे महत्त्व जाणून त्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. प्राकृत भाषांचा काळ हा लेखकाच्या मते भाषावैपुल्याचा काळ आहे. हा भाषिक क्रांतीचाच काळ आहे. मराठीच्या इतर भेदांमध्ये लेखकाने एका मजेशीर भेदाचा उल्लेख केला आहे. तो भेद म्हणजे स्त्रियांची भाषा. स्त्रियांची भाषा निराळी असा त्याला जुन्या काळातीलसुद्धा दाखला मिळतो. ही भाषा अशी निराळी होण्याची कारणेसुद्धा दिली गेली आहेत. थोडक्यात, प्रा. कृ. पां. कुलकर्णी यांचा हा ग्रंथ मराठी भाषाप्रेमी व मराठीचे अभ्यासक यांच्यासाठी एक उपयुक्त व परिपूर्ण संदर्भग्रंथ आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more