* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LALITKALECHYA SAHAWASAT
  • Availability : Available
  • ISBN : 9789353171537
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 188
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
    V.P. KALE BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PUROSHOTTAM SHREEPAT KALE (VAPU KALE’S FATHER), HAS WRITTEN THIS BOOK SOMEWHERE IN THE 1940-50S. HE WAS AN ARTIST BY NATURE. HE WOULD COLOUR THE DRAPES REQUIRED DURING DRAMAS, LOOK AFTER THE UPSTAGE, OFFSTAGE AND COSTUMES. HE WORKED WITH KESHAVRAO BHOSALE’S LALITKALADARSHA DRAMA COMPANY. THOUGH AN ARTIST, HE HAD EQUAL COMMAND OVER WORDS AND WRITING. PUSHREE, AS HE WAS FONDLY KNOWN AS, HAS ALSO PORTRAYED AN APT WORD-PICTURE OF MANY ARTISTS. HE HAD AN IMMENSE STORE OF STORIES AND MEMORIES OF THESE EMINENT PERSONALITIES. HIS INNOVATIVE STYLE HAS MADE THE CONTENT READABLE AND INTERESTING. IT ALSO ALLOWS US TO TAKE A ROUND THROUGH THE PAST OF DRAMA AND THEATER.
‘ललितकलेच्या सहवात’ हे पुस्तक पुरुषोत्तम श्रीपत काळे (‘वपुं’चे वडील) यांनी विसाव्या दशकाच्या पूर्वार्धात (४०-५० दशकात) लिहिले आहे. ते स्वत: चित्रकार होते. केशवराव भोसले यांच्या ‘ललितकलादर्श’ नाटक मंडळीत ते पडदे रंगविणे, नैपथ्यरचना अशी कामे करीत. चित्रकार असूनही शब्दांवर आणि एवूÂणच लेखनकलेवर त्यांची हुकमत होती, हे पानोपानी जाणवते. सुमारे ऐंशी वर्षांहून अगोदरच्या काळात मराठी भाषेवर संस्कृतचा प्रभाव होता. शब्दोच्चार आणि लेखनही अनुनासिक होते. अशा काळात लिहिलेले असूनही त्यांची शब्दरचना लालित्यपूर्ण आहेच, शिवाय आशयघन आणि वास्तवदर्शी आहे. हा ‘ललितकलादर्श’चा छोटेखानी इतिहासच म्हणता येईल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#LALITKALECHA SAHWASAT# PS KALE# BABURAO PENDHARKAR#BHALCHANDRA PENDHARKAR# #RAMKRUSHNABUVA VAZE# ANNA KIRLOSKAR# KESHVRAO SHITUT# NARAYANRAO RAJHANS (BALGANDHARVA)# LALITKALADARSH NATAK MANDALI# GANDHARVA NATAK MANDALI #ललितकलेच्या सहवासात# पु श्री काळे-#ललितकलादर्श नाटक मंडळी#गंधर्व नाटक मंडळी# केशवराव भोसले#बापूराव पेंढारकर# नारायणराव राजहंस (बालगंधर्व)# रामकृष्णबुवा वझे#अण्णा किर्लाेस्कर# केशवराव शितूत#भालचंद्र पेंढारकर# मानापमान# सौभद्र#राक्षसी महत्त्वाकांक्षा#सत्तेचे गुलाम#वधूपरीक्षा#श्री#शारदा# ऑपेरा हाउस...
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 12-04-2019

    ‘ललितकलादर्श’ इतिहासाचा धांडोळा... पुरुषोत्तम श्रीपती काळे (पु.श्री. काळे) हे उत्कृष्ट नेपथ्यकार म्हणून ओळखले जातात. नेपथ्यकार म्हणून त्यांच्या नावावर ४२ नाटके, २१ चित्रपट आणि असंख्य लॅण्डस्केप जमा आहेत. ‘ललितकलादर्श मंडळी’ या नाट्यसंस्थेसाठी आणि राकमल चित्रमंदिर या चित्रपट संस्थेसाठी त्यांनी नेपथ्यकार म्हणून काम केले होते. याच पुश्रींनी मराठी रंगभूमीच्या इतिहासात महत्त्वाचे योगदान असलेल्या ‘ललितकलादर्श’ या नाट्यसंस्थेच्या इतिहासाचा धांडोळा या पुस्तकात घेतला आहे. ‘ललितकलादर्श मंडळी’ची स्थापना हुबळी येथे १ जानेवारी १९०८ मध्ये झाली. सुरुवातीच्या मालकवर्गात गणेश विनायक वीरकर, मारुतीराव पवार-गोंधळी, बाळकृष्णपंत मादुसकर, कृष्णराव पवार, दत्तोपंत निईकर, केशव विष्णू बेडेकर, दत्तोपंत भोसले आणि केशवराव भोसले ही आठ मंडळी होती. सुरुवातीची अडीच-तीन वर्षे कंपनीने हुबळी, बेळगाव, सांगली, मिरज, कोल्हापूर या भागात दौरे केले. १९१० मध्ये कंपनीतील समान भागीदारीची योजना संपुष्टात येऊन फक्त केशवराव आणि दत्तोपंत भोसले हे दोघेच कंपनीचे मालक राहिले. ललितकलादर्शने सुरुवातीला सौभद्र, रामराज्यवियोग, मृच्छकटिक, शारदा, गोपीचंद, मुद्रिका आणि अक्षविपाक अशी सात नाटके सादर केली होती. १९१४ मध्ये जमखिंडीकर मंडळी संस्थेत काम करणाऱ्या व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर या अभिनेत्यांना केशवरावांनी ललितकलादर्शमध्ये बोलाविले आणि ‘शारदा’ नाटकातील नटीची भूमिका करून पेंढारकर यांनी ललितकलादर्शमध्ये कारकीर्दीस केलेली सुरुवात ‘ललितकलादर्श’च्या ‘शहाशिवाजी’ या नाटकासाठी पुश्रींनी दोन मोठे प्लॅटसीन आणि दोन कव्हरचे पडदे रंगविण्याचे केलेले काम, नावाप्रमाणे एक आदर्श कंपनी होण्यासाठी केशवराव भोसले यांनी केलेले प्रयत्न, नाट्यसंस्थेत नेपथ्य, गायन, अभिनय तसेच उत्तमोत्तम नाटके रंगभूमीवर आणण्यात त्यांनी घेतलेली मेहनत, संस्थेने सादर केलेली ‘हाच मुलाचा बाप’, ‘संन्याशाचा संसार’, ‘शहाशिवाजी’, ‘शिक्का कट्यार’, ‘वधुपरीक्षा’ आदी नाटके, ललितकलादर्शमध्ये कोणी नवा पाहुणा आला की त्याच्या नावापुढे लागणारी ‘मामा’ ही उपाधी, कंपनीतील वातावरण, ‘ललितकलादर्श मंडळी’चे संस्थापक आणि एक मालक केशवराव भोसले, भोसले यांच्यानंतर ‘ललितकलादर्श’चे उत्तराधिकारी बापूराव पेंढारकर आणि बापूरावांनंतर ‘ललितकलादर्श’ची धुरा सांभाळणारे भालचंद्र पेंढारकर आदींच्या आठवणींना काळे यांनी उजाळा दिला आहे. महात्मा गांधी यांनी १९२१ मध्ये एक कोटी रुपयांचा लोकमान्य टिळक स्वराज्य फंड जमा करण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी मुंबईतून ‘गंधर्व’ आणि ‘ललितकलादर्श’ या दोन कंपन्यांनी एकत्र येऊन ‘मानापमान’ या नाटकाचा संयुक्त प्रयोग सादर केला होता. मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासात गाजलेल्या या संयुक्त मानापमानचा प्रयोग ८ जुलै १९२१ रोजी मुंबईत बालीवाला थिएटर येथे झाला. नाटकात केशवराव भोसले हे ‘धैर्यधर’ तर बालगंधर्व ‘भामिनी’ झाले होते. रात्री साडेसात वाजता सुरू झालेला नाटकाचा प्रयोग रात्री अडीच वाजता संपला, अशी आठवणही काळे सांगतात. केशवराव भोसले यांच्या निधनानंतर ललितकलादर्शच्या ‘सत्तेचे गुलाम’ या नाटकाला मिळालेला प्रचंड यश आणि त्यानंतर ‘तुरुंगाच्या दारात’ला मिळालेले अपयशही ते मांडतात. पुस्तकातील परिशिष्टांमध्ये ललितकलादर्शमधील नटवर्ग आणि अन्य कलावंत, व्यवस्थापक, संवादिनीवादक, तबला वादक, रंगमंच व्यवस्थापक, संवादिनीवादक, तबलावादक, रंगमंच व्यवस्थापक, चित्रकार, लेखक, दिग्दर्शक, संगीत कलाकार, रंगपट आणि कपडेपट सांभाळणारी मंडळी याची माहिती देण्यात आली आहे. तसेच पुस्तकात केशवराव भोसले, वीर वामनराव जोशी, व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर, भा.वि. वरेरकर, नानासाहेब फाटक, कृष्णाजी प्रभाकर, खाडिलकर, काही नाटकातील देखावे यांची छायाचित्रे आहेत. नाट्य, चित्रपट, चित्रकला या क्षेत्रात यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली अनेक दिग्गज मंडळी पुश्रींच्या सहवासात आली. त्यांचे गुण-दोषही काळे यांनी परखडपणे मांडले आहेत. ‘‘ललितकलादर्श’ या नाट्य संस्थेचा इतिहास, आठवणी आणि किस्से आणि पर्यायाने मराठी रंगभूमीचा एक काळ या पुस्तकात उलगडला आहे. मूळ पुस्तक १९५६ साली प्रकाशित झाले होते. नुकतीच या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आल्यामुळे हा नाट्येतिहास वाचण्याची संधी वाचकांना मिळाली आहे. – शेखर जोशी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more