* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KSHITIJSPARSH
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662771
  • Edition : 4
  • Publishing Year : NOVEMBER 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
TOUCH OF THE HORIZON THIS COLLECTION IS THE LATTER HALF OF V. S. KHANDEKAR`S METEORS. THE HARMONIOUS WEAVING OF NATURE AND HUMAN LIFE IS THE CHARACTERISTIC FEATURE OF A METEOR. THESE METEORS WILL OVERPOWER THE READERS WITH THEIR TECHNIQUE AND UNDERSTANDING. THEY WILL ENGULF THE READERS IN THEIR ARTISTIC THOUGHTS. EVERY SINGLE WORD IN THIS METEOR MIRRORS THE UNIVERSAL HOLY GATHERING. THEY ALL HAVE THE CAPACITY TO TOUCH THE HORIZONS OF HUMAN AUSPICIOUSNESS. EACH POSSESSES THOUSAND IMPULSES. EACH IS WILLING TO TOUCH THE HUMAN MORALS. EVERY SINGLE METEOR EVOKES THE ARDOUR TO LIVE, EVERY SINGLE METEOR EXPLAINS THE LIVING OF A HUMAN BEING AND EVERY METEOR IS ITSELF A"MAHAMANTRA` TO MULTIPLY THE ANXIETY FOR LIVING LIFE.
‘क्षितिजस्पर्श’ हा वि. स. खांडेकरांच्या रूपककथांचा उत्तररंग. निसर्ग नि मनुष्यजीवनाची सुंदर बांधणी हे रूपककथेचं आपलं असं वैशिष्ट्य असतं. खांडेकरीय रूपककथांचं तंत्र नि मंत्रप्रौढत्व घेऊन येणाया या कथा वाचकांना आपले विचार नि कलात्मकतेनं दिङ्गमूढ करतात. साया सृष्टीचं सुमंगल संमेलन प्रतिबिंबित करणाया या कथांत मानवी मांगल्याचं क्षितिज स्पर्शण्याच्या शतशत ऊर्मी शब्दागणिक प्रत्ययास येतात. माणसाचं जगणं समजावीत वाचकांत जगण्याची आस्था जागविणाया या कथा म्हणजे जीवन विकासाचा महामंत्रच!

No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #क्षितिजस्पर्श
Customer Reviews
  • Rating StarDAINIK NAVARASHTA - JANUARY 2018

    हस्तिदंती छोटा ताजमहाल... मराठी साहित्य क्षेत्रात असे अनेक साहित्यिक होऊन गेले ज्यांच्या लेखणीतून सकार झालेल्या साहित्यकृतींनी मराठी भाषेचे वैभव वाढविले. आपल्या या मराठी भाषेमध्ये शब्दरूपी रत्नांची खाण उधळून देणारे जे अनेक साहित्यिक आहेत त्यात वि. स खांडेकर यांचे नाव आदराने घेतले जाते. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे खांडेकर हे स्वत: एक मोठे शब्दांचे विद्यापीठ होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांनी प्रत्येक साहित्य प्रकारात विपूल लेखन केले आहे. वि. स. खांडेकर यांच्या रूपककथांचा ‘क्षितिजस्पर्श’ हा संग्रह नुकताच माझ्या वाचनात आला. एका मोठ्या साहित्यिकाच्या लेखनाची समीक्षा करण्याचा आजच्या लेखाचा हेतू नाही. तर जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे... इतकाच या लेखाचा हेतू. क्षितिजस्पर्श या पुस्तकात खांडेकर यांच्या पूर्वी विविध ठिकाणी प्रकाशित झालेल्या निवडक ४६ रूपककथांचा समावेश आहे. यातल्या अनेक कथा तर खूप छोट्या-छोट्या आहेत. पण आजही त्या वाचकाला खूप मोठा अर्थ समजावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. उदाहरणार्थ – खांडेकर यांची दोन प्रवासी की रूपककथा यात दोन प्रवासी अमावस्येच्या रात्री निर्जन मार्गाने चालले आहेत. यात पहिला प्रवासी तरुण आहे तर दुसरा प्रवासी वृद्ध आहे. तरुणाला आशा, स्वप्ने, प्रीती आणि यौवन वेगाने पुढे नेत होती. तो गीत गुणगुणत चालला आहे. तर वृद्ध प्रवासी निराशा, स्वप्नभंग, एकलेपण आणि वार्धक्य यांच्या भाराने वाकून तो ओणवा झाला होता. तो कण्हत इतकी मंद पावले टाकीत होता की, तो पुढे जात आहे की नाही हेच कळत नव्हते. पहिला तरुण एकदम थांबतो आणि मागे वळून म्हणतो की, ‘‘किती सुंदर मार्ग आहे. हा! नाही? जिकडंतिकडं चांदण्याच चांदण्या.’ मागे राहिलेला वृद्ध प्रवासी त्याला उत्तर देताना म्हणतो की, काय भयंकर रस्ता हा. जिथंतिथं काटेकुटें आणि खाचखळगे!’’ इथे ही कथा संपते. याच्यातून तुम्ही काय घ्यायचे आणि काय समजायचे हा निर्णय वाचकावर सोडलेला असतो. आता या कथेमधून निघाणारे अर्थ शोधायचे झाल्यास माणसाच्या दृष्टिकोनातला फरक ही कथा आपल्याला सांगते- हा झाला एक अर्थ. तर दुसरीकडे तारुण्य आणि वार्धक्य यावरही ही कथा भाष्य करते. ऐन उमेदीचा काळ आणि दुसरी मरणासन्न अवस्था जिथे जगण्याचा आधारच उरलेला नाही. कमी पण प्रभावी अशा शब्दांत वि. स. खांडेकर यांच्या रूपककथा आपल्याला खूप काही सांगून जातात. फक्त ते शब्दांच्या पलीकडले समजून घेण्याची वाचकाची वृत्ती हवी. खांडेकर एक उत्कृष्ट लेखक होते याचे दाखले आपल्याला त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीतून मिळत राहतात. नदी, चंद्र, इंद्रधनुष्य, सूर्य, समुद्र इत्यादी निसर्गप्रतिमांचे सुंदर वर्णन आणि शब्दांचा अचूक वापर करत एखादा प्रसंग सुंदर पद्धतीने लोकांसमोर मांडणे किंवा उभा करणे ही कला प्रत्येक लेखकाने शिकण्यासारखी आहे. रूपककथांना खांडेकर ‘हस्तिदंती छोटा ताजमहल’ का म्हणत असतील हे या पुस्तकावरून कळते. -साधना दीपक राजवाडकर ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 14-09-2003

    अंतर्मुख करणाऱ्या रूपक कथा... रूपक कथा हा काहीस दुर्लक्षित पण महत्त्वाचा साहित्यप्रकार आहे. मराठी साहित्यात या प्रकारात फार मोठे लेखन झालेले नाही. रूपक कथाकार असे स्वतंत्र बिरूद कोणी लेखक मिरवत नाही. लघुत्तम कथेच्या प्रकारासारखा हा लेखनप्रकार आहे. परा. प्र. ना. कवठेकर याला ‘ध्वनिकथा’ म्हणतात. रूपक कथा ध्वनिकथा जरूर आहेत. ध्वनी व ध्वन्यर्थ हे त्याचे महत्त्वाचे लक्षण आहे. अल्पाक्षरत्व हेही महत्त्वाचे लक्षण आहे. विष्णू शर्मा, इसाप, खलील जिब्रान, चॉसर, स्पेन्सर इत्यादींची परंपरा त्याला आहे. वि.स. खांडेकर यांचे वर्णन ‘हस्तिदंती छोटा ताजमहाल’ असे करतात. त्यांचा ४६ रूपक कथांचा संग्रह क्षितिजस्पर्श या नावाने डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी प्रकाशझोत केला आहे. प्रत्येक रूपक कथा हा खांडेकरांना घडलेला साक्षात्कार आहे. खांडेकरांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्शवाद त्यांच्या बहुतेक लेखनांतून स्पष्ट झालेला आहे. मानवी जीवनाचा मागोवा घेताना ते जीवनाचा अर्थ, नैतिक भूमिका, सामाजिक मूल्य, आध्यात्मिक अनुभव हे त्यांच्या चिंतनाचे विषय मानतात. त्यांच्या ‘ययाती’ या कादंबरीत हे चिंतन स्पष्ट आणि विस्तृत स्वरूपात प्रकट झाले. मला वाटते या कादंबरी लेखनाच्या पूर्वी त्यांनी हे सर्व चिंतन रूपक कथात प्रकट करण्याचा, सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ययाति’ हे या सर्व चिंतनाचे सार आणि उच्च बिंदू म्हटले तर ते वावगे न ठरावे. रूपक कथात जीवनाचा अनेक अंगावरचा, मानवी विचारांचा आलेख स्फूट स्वरूपात प्रकट होतो. समाज जीवनातील विविध आंदोलने आणि त्यात प्रकट होणाऱ्या मानवी कृती यांचा खोल विचार रूपक कथांतून ध्वनित होतो. प्रत्यक्ष उपदेश करणे किंवा प्रवचन देणे यापेक्षा ते ध्वनित केले तर त्याचा खोल ठसा मानवी मनावर उमटेल असे खांडेकरांना वाटले असावे. बहुतेक रूपक कथांचा विषय मानवी जीवनमूल्यांचा विचार ध्वनित करण्याचा आहे. त्यासाठी त्यांना सृष्टीतील कुठलीही सजीव वा निर्जिव वस्तू वर्ज्य नाही. दगडधोंडे, पशुपक्षी, झाडे, देव, दैव वा नियती, परमेश्वरसुद्धा त्यांच्या रूपक कथेत येतो. त्यांचा परमेश्वरावर फारसा विश्वास नसला तरी ‘श्रीकृष्ण’ त्यांच्या रूपक कथेत येतो. नारदमुनी, कुबेर यांसारख्या देवता येतात. पण सर्वांतून आशय प्रकट होतो तो मानवी जीवनाच्या चिंतनातून काढलेल्या नवनीताचा. एक छोटीशी रूपक कथा गगनाला गवसणी घालणारा आशय सूचित करते. खांडेकरांच्या भाषेचा विचार केला तर त्यांच्या उत्तुंग कल्पना, उपमा अलंकार यांनी अलंकृत होत जाणारी कथा हा एक अमोल ठेवा आहे. संपादन करताना लवटे यांनी खूप परिश्रम घेतले आहेत याचा प्रत्यय येतो. संशोधकांच्या वृत्तीने त्यांनी या कथा संपादन केल्या आहेत. खांडेकरांच्या एकूणच रूपक कथांचा आढावा घेत घेत त्यांनी अप्रसिद्ध अशा रूपक कथांना वाचकांसामोर आणले आहे. त्यांच्या कथांतून सूर्याला सल्ला देणाऱ्या घड्याळाचेही कौतुक वाटू लागते. तर बुद्ध, खिस्त, गांधी आज आले आणि त्यांनी आजचा समाज पाहिला तर काय होईल, त्यांना काय वाटेल, याची कल्पना अंतर्मुख करणारी आहे. प्रत्येक रूपक कथेचा ध्वनित आशय स्पष्ट करीत बसण्यापेक्षा त्या वाचकांनी प्रत्यक्षच वाचाव्यात. या ध्वनिकथांचा आशय स्पष्ट करण्यास विस्तृतच लिहावे लागेल. केवळ या रूपक कथा कालानुक्रमाने लावल्या तर खांडेकरांच्या मनात काय वादळे उठत होती याचा मागोवा घेता येईल. ते काम मोठ्या संशोधनाचे आहे. आहेत त्या क्रमाने जरी त्या कथा वाचल्या तरी त्यातूनही खांडेकर अखेर अखेर कसे अस्वस्थ होत होते याचे दर्शन होईल. सामाजिक मूल्ये ढासळताना आपण अगतिक आहोत याची जाणीव येथे सूचित होते. मानवी मंगळ ढासळत आहेत असे त्यांच्या अनेक कथांतून सूचित होते. यावेळी ते निराशावादी होतात की काय, अशी शंकाही येते. पण या रूपक कथा आपल्याला अंतर्मुख करतात हे नाकारता येणार नाही. ‘क्षितिजस्पर्शा’बरोबरच खांडेकरांच्या इतर रूपककथा वाचण्यास हे पुस्तक प्रवृत्त करेल. -डॉ. रोहिणी टकले ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more