* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KRAUNCHVADH
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666687
  • Edition : 28
  • Publishing Year : JANUARY 1942
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 244
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ONCE UPON A TIME, A COUPLE OF HERONS WAS ENGROSSED IN LOVEMAKING. SUDDENLY, A HUNTER CAME OVER THERE AND WITH HIS BOW AND ARROW KILLED ONE OF THE HERONS. THE BIRD WHICH WAS KILLED INSTANTLY COLLAPESED FROM THE TREE. UPON SEEING THIS, THE PARTNER OF THE BIRD GAVE OUT A LOUD OUT CRY. IT STARTED WAILING IN GRIEF. SO LOUD AND TRUE WAS THE SORROW THAT SAINT VALMIKI WAS TOUCHED BY THE IT. THE PAIN HE EXPERIENCED STARTED FLOWING OUT IN THE FORM OF "SHLOKAS`. A TRUE POETRY TAKES BIRTH IN EXACTLY THE SAME MANNER. V. S. KHANDEKAR HAS WRITTEN THIS NOVEL BASED ON THE SHLOKAS SO FORMED. EVEN TODAY THE INNOCENT COUPLES OF HERONS ARE KILLED EVERY NOW AND THEN, THESE INNOCENT COUPLES REPRESENT THE INNOCENT PEOPLE ALL OVER THE WORLD. THE HUNTER WHICH KILLED ONE OF THE BIRD WAS SINFUL, VERY VERY SINFUL, BUT SO ARE TODAY`S POLITICAL LEADER. THEY ALL ARE EQUALLY CRUEL, WICKED. SINCE THE DAY INTELLIGENCE AND POWER JOINED HANDS TOGETHER, THE KINDNESS OF THE HUMAN HEART HAS ABRUPTLY ENDED. THE DAY WHEN MAN STARTS RETHINKING ABOUT THE FEELINGS ALONG WITH INTELLIGENCE, THEN SUCH KILLING WILL BE STOPPED. IN THIS NOVEL, THE AUTHOR IS TRYING TO GIVE US THE MESSAGE THAT IF WE FOLLOW OUR HEAD AS WELL AS OUR HEART THEN THERE ARE STILL CHANCES FOR SURVIVAL.
क्रौंचपक्ष्याचे एक जोडपे सुखाने झाडावर प्रणयक्रीडा करीत बसले होते. एका पारध्याने बाणाने त्यातले एक पाखरू मारले. ते मरून खाली पडल्याबरोबर त्याच्या जोडीदारणीने जो आक्रोश केला, तो वाल्मीकी ऋषींच्या हृदयाला जाऊन भिडला. वाल्मीकींचा शोक श्लोकाच्या रूपाने प्रगट झाला. खरी काव्यनिर्मिती अशीच उचंबळून येते. उत्तररामायणातील या काव्याचा आधार घेऊन वि.स. खांडेकरांनी या कादंबरीची निर्मिती केली. अजूनही जगात क्रौंचवध सुरू आहे. दररोज, दर घटकेला. क्रौंचपक्ष्याचे जोडपे हे जगातल्या निष्पाप जिवांचे प्रतीक आहे. जगात क्षणाक्षणाला लाखो निरपराध जिवांची हत्या चालली आहे. पक्ष्यांच्या सुखी जोडप्याला दु:खी करणारा पारधी आणि आजच्या जगातील सत्तांध नेते हे दोघे सारखेच क्रूर आहेत. बुद्धी आणि सत्ता एकत्र आल्याने माणसाच्या सहृदयतेची हत्या झाली आहे. बुद्धीबरोबर माणूस भावनेचा विचार करू लागेल, तर हा क्रौंचवध नक्कीच थांबेल. हा संदेश वि.स. खांडेकर या कादंबरीतून देऊ पाहतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध
Customer Reviews
  • Rating StarAnil Rane

    नव्याने फुलू लागलेल्या प्रेमाची हि कहाणी कशाप्रकारे स्वतंत्रतेच्या चळवळीशी जोडल्या जाते.नायक नायिकेची आयुष्याबद्दलच्या अपेक्षा आणि त्यांची स्वप्ने या सर्वांची गुंफण म्हणजे वि.स.खांडेकर लिखित क्रौन्चवध !!

  • Rating StarVrushali Gawand

    नमस्कार मित्र मैत्रिणींनो, प्रेम आणि कर्तव्य यांच्यापैकी कुणा एकाचीच निवड करायची असेल तर अशा वेळी आपण काय करावं? खांडेकरांची क्रौंचवध वाचताना नेमका हाच प्रश्न प्रत्येक प्रसंगानंतर मला पडत गेला. आणि आज मी तुम्हाला याच कादंबरीबद्दलचा माझा अनुभव नि अभिपराय सांगणार आहे. हि कादंबरी अशी आहे ना कि म्हटली तर प्रेमकथा, म्हटली तर कर्तव्याची गाथा, पण कादंबरी वाचल्यावर वाचकांचे आपसूकच दोन गट पडतात यात वाद नाही. कुणाला वाटत यातली प्रेम कहाणी सफल व्हायला हवी होती. तर कुणाला वाटत नायकाने त्याच कर्तव्य पूर्ण केले तेच योग्य होत. शेवटी कोण योग्य नि कोण अयोग्य हेच आज मी तुम्हाला उलगडून सांगणार आहे. मी मनापासून प्रयत्न केलाय तुम्हाला तो आवडेल अशी अपेक्षा करते. तुमचे अभिप्राय नक्की कळवा. हि कादंबरी ज्यांच्याभोवती फिरते अशी दोन मुख्य पात्र म्हणजे दिनकर आणि सुलु. सुलु एका ध्येयवादी, बुद्धीने विचार करणाऱ्या माणसाची भावनिक, हळवी आणि संवेदनशील मुलगी. भाऊ-बहीण नसल्याने तिच्या आयुष्यात अचानक आलेल्या दिनकरलाच ती सर्वस्व मानते. ज्यावेळी तिची आई हे जग सोडून जाते, तेव्हा तिला सर्वात जास्त गरज असते ती तिच्या वडिलांच्या आधाराची. पण बुद्धिवादी वडील भावनेला महत्व न देता मनाची शांती मिळवण्यासाठी सुलूला एकटी सोडून स्वतः एकांतात राहणे पसंत करतात. अशा वेळी तिला आधार देतो तो दिनकर. अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींमधून तिचा दिनकरवरचा विश्वास वाढत जातो. दिनकर तिच्यासाठी तीच सर्वस्व होतो. एका गाईचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार झालेला राजा दिलीप, रघूच्या दुसऱ्या सर्गातली हि दिलीप राजाची कथा वाचताना सुलु कळत-नकळत त्या राजामध्ये दिनकरला पाहते, नि म्हणूनच दिनकरच नाव ती दिलीप ठेवते. जगासाठी असलेला दिनकर हा तिच्यासाठी दिलीप होतो. पण विरह नसला तर ते प्रेम कसलं असं म्हणतात. असाच एक विरह त्या दोघांच्याही वाटेला येतो. ज्यामध्ये दोघांच्याही वाटा वेगळ्या होऊन जातात. त्यांचं प्रेम हे अव्यक्तच राहत. पण कदाचीत नियतीला हे मंजूर नसावं. सुलूच लग्न होऊन जेव्हा ती सासरी येते तेव्हा तीच सासर नि दिनकरच गाव एकच असल्याचं तिच्या लक्षात येत. दुरावलेल्या वाटा पुन्हा जुळतात पण यावेळी दोघंही आपल्या आयुष्याच्या वाटेवरून बरीच पुढे चालून आलेली असतात. सुलु तिच्या संसाराच्या कर्तव्यांशी बांधली गेलेली असते तर दिनकर भारतमातेच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरलेला असतो. पण या सर्वातही सुलूच्या मनात दिनकर विषयी आपुलकी, माया, जिव्हाळा लपलेला असतो. तर दिनकरच्या मनात चालू असते ओढाताण. दोन नात्यांची ओढाताण. एकीकडे प्रेम तर एकीकडे कर्तव्य. सुलूविषयी असणार अव्यक्त प्रेम त्याला एकीकडे खुणावत असत तर दुसरीकडे भारतमातेची हाक त्याला बोलवत असते. दोन नात्यांच्या या द्वंद्व युद्धात विजय एकाच नात्याचा होणार असंही राहून राहून त्याला वाटत असत. दोघांच्याही मनात प्रेम आणि कर्तव्य या नात्यांचं युद्ध चालू असलं तरी दोघांसाठी या नात्यांची व्याख्या मात्र खूप निराळी असते. सुलूच्या मनात दिनकरविषयी असणार प्रेम, त्याची वाटणारी काळजी आणि नवऱ्याप्रती असणार तीच कर्तव्य यांची ओढाताण तर दिनकरच्या मनात सुलूविषयी असणार अबोल प्रेम तर दुसरीकडे मातृभूमीबद्दल असणार कर्तव्य असं द्वंद्व. आणि दोन नात्यांचा हा प्रवास मला उलगडला तो एका निराळ्याच वळणावर. दिनकरच्या मनात असलेलं सुलूबद्दलच प्रेम त्यानं शेवटपर्यंत तिच्याजवळ व्यक्त केलंच नाही. खूप जणांना याच वाईट वाटलं, अगदी मला सुद्धा एका क्षणापर्यंत हेच वाटत होत कि त्यांची प्रेम कहाणी सफल व्हावी, पण त्यामागे असलेली दिनकरची भूमिका लक्षात घेतली तर माझ्या खुज्या विचारांची मलाच लाज वाटली. भावनेला, पहिल्या प्रेमाला नि त्या प्रेमाच्या सफलतेला महत्व देणारे आपण आणि प्रेयसीच्या प्रेमापेक्षा ज्या भारतमातेला आपली जास्त गरज होती तिच्यासाठी प्राणार्पण करायला निघालेला दिनकर यामध्ये दिनकरच श्रेष्ठ ठरतो यात वाद नाही. पण असा त्याग करायला सुद्धा खूप मोठं मन, खूप मोठे विचार लागतात कदाचित हि आपल्यासारख्या सामान्य माणसांना जमणारी गोष्ट नाहीच. म्हटलं तर दिनकरला त्याच प्रेम व्यक्त करता आलं असत, सुलुशी लग्न देखील करता आलं असत. पण त्यानं तेव्हा विचार केला मातृभूमीचा, पारतंत्र्यात अडकून पडलेल्या त्याच्या बंधू-भगिनींचा. आपली परिस्थिती याहून निराळी नाही, आज जरा कुठे अन्याय झाला तर आपण काय करतो? TV वर बातम्या पाहून हळहळ व्यक्त करतो, whatsap वर, fb timeline वर post share करतो नि बस! आपलं कर्तव्य संपल्यात जमा करतो. आपल्यामध्ये १०० मधून एखादाच असा असतो जो या अन्यायाविरुद्ध लढतो, नि तोच दिनकरच आजच रूप आहे. क्रौंचवध मधलाच एक छोटासा प्रसंग चार शब्दात सांगतेय तुम्हाला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या देशभक्तांची सभा घ्यायचं ठरत. ज्यांचा नेता दिनकर असतो. त्या सभेत काहीतरी घातपात होणार अशी बातमी पसरते नि त्यात दिनकरला मारणार असल्याची वार्ता सुलूपर्यंत येते. दिनकर ला वाचवण्यासाठी सुलु ती आजारी असल्याचं सांगून दिनकरला भेटण्यासाठी घरी बोलावते, दिनकर तिच्या काळजीनं तिला भेटायला येतोही, पण सभेत दंगा व्हायचा तो होतोच. दंग्याच्या वेळेस दिनकर सुलूजवळ असला तरी हि गोष्ट सुलु, तिचा नवरा, आणि दिनकर यांनाच ठाऊक असते. बाकी कुणालाही हि गोष्ट माहित नसल्याने दिनकर वर सभा उधळवून दंगा पसरवल्याचा आरोप करतात नि त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. दिनकर निर्दोष असूनही फक्त सुलूची बदनामी टाळण्यासाठी तो गप्प बसतो. इतकी सहनशक्ती, आपल्या प्रेमावर बदनामीचे डाग पडू नयेत म्हणून केलेला त्याग केवळ अवर्णनीय आहे. मूळ क्रौंचवधाची कथा नि खांडेकरांनी मांडलेल्या दिनकराची कथा यात मला निश्चितच खूप साम्य आढळलं. क्रौंच पक्षाचे एक जोडपे झाडावर प्रेमालाप करीत बसलेले असते, पण एक भिल्ल येऊन त्यातल्या नरावर बाणाचा हल्ला करतो नि त्यात नर मृत्युमुखी पडतो. आपल्या जोडीदाराला गमावल्याचे दुःख सहन न होऊन मादी तिथेच आक्रोश सुरु करते. तिचा तो आक्रोश पाहूनच कि काय वाल्मिकी ऋषींना शोक अनावर होतो नि त्यांचा शोक एका श्लोकाच्या माध्यमातून प्रकट होतो. हि क्रौंचवध कथा नि दिनकरची कथा अगदी समरूप वाटली मला. खांडेकरांनी त्या वेळी दाखवलेली समाजातील विषमता आजही आढळते. अगदी भारताला स्वातंत्र्य मिळालं तरीही. आपल्या छोट्याश्या जगात सुखी असणारे जीव, म्हणजे आपला गरीब-मध्यमवर्गीय समाज. ज्यांच्या जीवनाकडून अपेक्षाही काही फार मोठ्या नसतात. पण काही सत्ताधारी लोकांना ते हि बघवत नाही. ते या ना त्या मार्गाने गरीब लोकांची अजून पिळवणूक करत राहतात. फक्त स्वतःचा स्वार्थ पाहतात नि स्वतःसाठीच जगतात, त्यांचं जग स्वतःच्या पलीकडे नसतंच. गरीब अजून गरीब होत जातात तर श्रीमंत अजून श्रीमंत. नि मग अशा अत्याचारांना कंटाळून कोणीतरी एक दिनकर या सर्वांविरुद्ध लढायला उभा राहतो. त्या वाल्मिकींच प्रतीक म्हणजेच दिनकर, फरक इतकाच कि वाल्मिकींनी शस्त्र न उचलता भिल्लाला शाप दिला, तर दिनकर सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढायला उभा राहिला. दिनकरन ज्या पद्धतींनी गरीब लोकांच्या समस्या समजून घेतल्या, त्यांच्या अडचणी जाणल्या, त्या पद्धतीनं जर आपण आज एकमेकांना समजून घेतलं तर एक निराळच जग तयार होईल. ज्यात जातीवाद, भेदभाव, गरीब-श्रीमंती नसेल. माणसाला माणुसकीच्या नजरेतून पाहता येईल. तो मरणाला घाबरला नाही कारण त्याला माहित होत त्याच्या मरणानं समाजात बदल घडून आला असता. क्रांतीची पूजा अश्रूंनी नाही तर भक्ताच्या रक्तानी करावी लागते. त्यातूनच नवे युग जन्माला येते. जस झाडाच्या फांद्या तोडल्या कि ते अधिक झपाट्याने वाढू लागते तसंच. जर वाल्मिकींसारखे महान ऋषी एका निष्पाप पाखराची हत्या बघून आपल्या साऱ्या तपश्चर्येवर पाणी सोडायला तयार होतात, तर आपली मन का मेली आहेत? आपण तर माणसं आहोत साधी. असे हजारो क्रौंचवध आपल्या आजूबाजूला होत असतात. आपल्यातल्या वाल्मिकीला पण आपण जाग करूयात ना! नि जे काही समाजाचं देणं लागतो ते देऊयात. नुसते गप्प बसून अन्याय सहन करण्यात काहीच अर्थ नाही, उद्या असं म्हणायची वेळ येऊ नये कि या स्वातंत्र्यापेक्षा ते पारतंत्र्य चांगलं होत. अश्रू, शब्द आणि रक्त या सर्वांचा जन्म माणसांपासूनच होतो पण तिघांचेही मार्ग वेगळे असतात, नि त्यातूनच माणसाची माणुसकी ठरते. जो अन्याय सहन करून मूक अश्रू गाळतो तो भावनाशील माणूस, त्याची माणुसकी भावनेतून जन्म घेते नि भावनेतच मृत्यू पावते. जो सर्व काही बघून फक्त स्वतःची मत मांडतो त्याची माणुसकी बोलण्यात नि मत मांडण्यात व्यर्थ जाते. नि तिसरा प्रकार जो मनुष्य अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो, अगदी लढून स्वतःचे रक्त सांडवायला तयार होतो तो खरा माणूस. ज्यांनी माणुसकी घडवून आणली, अशी माणसं फार कमी उरलीयत जगात. म्हणतात ना माणसे जन्माला येतात पण माणुसकी घडवावी लागते, त्रिवार सत्य आहे हे. सरतेशेवटी सर्वांच्या मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तर देतेय, कि कोण योग्य नि कोण अयोग्य प्रेम कि कर्तव्य? मला तर इतकंच वाटत कि सर्वजण आपल्या आपल्या जागी योग्य आहेत. दिनकरन त्याच कर्तव्य पूर्ण करूनच समाजात बदलावं आणला. सुलून तिच्या प्रेमाप्रती निष्ठा दाखवून दिनकरचा जीव वाचवला. दोघंही आपल्या जागी योग्यच आहेत, बरोबर आहेत. कारण काही काही प्रेमकथा अपूर्ण राहूनच अजरामर होतात. नि काही काही कर्तव्य पूर्ण होऊनच नवीन समाज घडवतात. आपल्याला जगायची प्रेरणा देतात. अधुरी प्रेमकहाणी असलेली पण कर्तव्यपूर्तीनं आपल्याला भारून टाकणारी, आपल्यात एक सामाजिक बदल घडवून आणणारी कादंबरी. सर्वानी अवश्य वाचावी अशी दिनकरची- आजच्या युगातल्या वाल्मिकीची कथा "क्रौंचवध". ...Read more

  • Rating Starविवेक वैद्य , तलासरी , ठाणे

    हि कादंबरी वाचली. वाचल्यावर खांडेकरांच्या लेखनातील शक्ती लक्षात आली. खूप सुंदर पुस्तक वाचल्याचा आनंद मिळाला.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more