* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KHUMASDAR ATRE
  • Availability : Available
  • ISBN : 9789386745187
  • Edition : 4
  • Publishing Year : AUGUST 1997
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHYAM BHURKE COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"THIS BOOK IS A COMPILATION OF MANY MEMORIES REGARDING THE GREAT MARATHI HUMORIST, P.K. ATRE. HE HAD EXTENSIVELY WRITTEN IN THE ‘NAVYUG’. THIS BOOK PRESENTS SELECTIVE WRITINGS. ALONG WITH A FEW POEMS AND SMALL INCIDENCES THERE ARE MANY NOTES INCLUDED HERE. ATRE WAS AN EDITOR OF NEWSPAPER, BUT, HIS WRITING WAS NOT LIMITED BY IT. RATHER, HE WAS A VERSATILE LITTERATEUR. THIS BOOK TRIES TO FATHOM THE VASTNESS OF VARIOUS FORMS OF HIS WRITING. ‘NAVKAVINCHI TOLDHAD’, ‘OLAVA KAVITECHA’, ‘KAVICHE PIK’, ‘MIRZA GALIB’, ‘CHORANCHE SAMMELAN’, ETC. ARE A FEW OF HIS FAMOUS WORKS. THIS BOOK TELLS US MORE ABOUT THE DRAMAS WRITTEN BY HIM. THESE INCLUDE NOTES ON ‘NAMAN NATVARA’, ‘MARATHITIL PAHILE BOOKISH NATAK’, ‘MARATHI NATYSAMMELANE VA TYANCHE ADHYAKSH’, ETC. A FEW ARTICLES BASED ON THE CINE WORLD LIKE ‘NUTANLA ADVILE’, ‘TAPORYA DOLYANCHI HASARI NATI-MALA SINHA’, ‘GA DI MANNI LACH GHETALI’, ‘SANDHECHA SINHASHI SAMNA’, DAMUANNA MALVANKAR’, ETC. ARE INCLUDED HERE. ‘KON SUNDER? STREE KI CHANDRA?’, ‘STRI MHANJE RAMY KAVY’, ‘BAYKANCHI SHUDDH MARATHI’, ETC. ARE ARTICLES WRITTEN WITH WOMEN AT THE CENTRE. ATRE WAS FAMOUS FOR HIS LECTURES. A FEW OF THE ARTICLES INCLUDED HERE ARE BASED ON ‘PU LANCHE VYAKHYAN’, ‘ASE VAKTE ASHA SABHA’, ‘VAKTRUTVACHYA GAMTI’, ETC. WHERE LECTURE IS THE MAIN CONCEPT. A FEW ARTICLES ARE WRITTEN ON FAMOUS PERSONALITIES LIKE DURGA KHOTE, NATH MADHAV, NANA JAGANNATH SHANKARSHETH, FAMOUS OLYMPIC PLAYER MILKHA SINGH AND OTHERS. AS THESE ALL ARE NEWSPAPER ARTICLES, THERE IS A LOT OF VARIETY SEEN. ‘TAPAL SANSTHECHI TEENSHE VARSH’, ‘MUMBAITALA PAHILA BARF’, ‘SAATH SALATIL BHRASHTACHAR’, ‘AMBRASAT KOKANI KAVA’ ARE A FEW TO NAME. THE POEMS INCLUDED HERE ARE ‘SHETANICHE PREMPATR’, ‘KASHAS KAY MHANU NAYE’, ‘BHUPALI VINAKARYACHI’, ‘RABAR JINKACH’, ETC. SHIRISH PAI HAD INTERVIEWED LATA MANGESHKAR UNDER THE TITLE ‘TULSHICHI MANJIRI-LATA’. IT IS INCLUDED IN THIS BOOK. THE MANGALASHTAKA BY SOPANDEV CHOUDHARI, ESPECIALLY FOR SHIRISH PAI’S MARRIAGE ARE INCLUDED HEREIN. EXTENSIVE NOTES ON ‘ATRE-PHADKE VAAD’, ‘ATRE ANI MATE’ ARE INCLUDED HERE. PROF. KRUSHNAJI PANDURANG KULKARNI HAD PREPARED A LIST OF HUNDRED MOST IMPRESSIVE MAHARASHTRIANS FOR THE 1945 DIWALI EDITION OF NAVYUG. IT IS INCLUDED HERE. THIS BOOK IS THUS BECOME A KALEIDOSCOPE WITH THE MANY FORMS OF LITERATURE BY P. K. ATRE "
"‘खुमासदार अत्रे’ हे एक प्रसन्न संकलन आहे, म्हटलं तर इतिहासातील काही नोंदी आहेत. अत्र्यांच्या ‘नवयुग’च्या वीस वर्षांतील अंकांमधून वेचलेलं हे साहित्य आहे. या साहित्यातील छोट्या छोट्या टिपणांचा या पुस्तकात समावेश केला आहे. अर्थातच ही टिपणं विविधरंगी आहेत. काही कविता, एखादी सूची इ. बाबी संपूर्णपणेही समाविष्ट केल्या आहेत. अत्रे हे केवळ वृत्तपत्राचे संपादक नव्हते, तर त्यांच्या अनेक पैलूंपैकी एक अत्यंत सामथ्र्यशाली पैलू होता साहित्याचा. ते अष्टपैलू साहित्यिक होते. या वेचलेल्या साहित्यामध्ये साहित्यविषयक अनेक टिपणं आहेत. जसे ‘नवकवींची टोळधाड,’ ‘ओलावा कवितेचा,’ ‘कवीचे पीक,’ ‘मिर्झा गालिब’, चोरांचे संमेलन’ इ. नाटककार अत्रे हा अत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक प्रभावशाली पैलू. साहजिकच नाटक या विषयावरची अनेक टिपणं या पुस्तकातून वाचायला मिळतात. उदा. ‘नमन नटवरा’, ‘मराठीतील पहिले बुकीश नाटक’, ‘मराठी नाट्यसंमेलने व त्यांचे अध्यक्ष’ इ. सिनेसृष्टीविषयीची काही टिपणंही यात समाविष्ट आहेत. जसे ‘नूतनला अडविले’, ‘टपोNया डोळ्यांची हसरी नटी - मालासिन्हा’, ‘ग. दि. मांनी लाच घेतली’, ‘संध्येचा सिंहाशी सामना,’ ‘दामुअण्णा मालवणकर.’ इ. ‘कोण सुंदर? स्त्री की चंद्र?’, ‘स्त्री म्हणजे रम्य काव्य’, ‘स्त्री व विनोद’, ‘बायकांची शुद्ध मराठी’ असे स्त्रीविषयक लेख यात आहेत. अत्र्यांची व्याख्यानं हाही एक वैशिष्ट्यपूर्ण विषय. त्यामुळे व्याख्यानांबाबतचे ‘पु. लं.चे व्याख्यान,’ ‘असे वत्तेÂ, अशा सभा’, ‘वत्तृÂत्वाच्या गमती’ इ. लेख या पुस्तकात आहेत. काही व्यक्तिविषयक टिपणंही यात आहेत. जसे ‘दुर्गा खोटे’, ‘नाथमाधव’, ‘नाना जगन्नाथ शंकरशेठ’, ‘ऑलिंपिकपटू मिल्खासिंग’इ. अर्थातच ही वृत्तपत्रांतील टिपणं असल्यामुळे त्यात कमालीची विविधता आहे. ‘टपाल संस्थेची तीनशे वर्षे’, ‘मुंबईतला पहिला बर्पÂ’, ‘साठ सालातील भ्रष्टाचार’, ‘आंबरसात कोकणी कावा’ इ. अनेक प्रकारची टिपणं यात वाचायला मिळतात. ‘शेटाणीचे प्रेमपत्र’, ‘कशास काय म्हणू नये’, ‘भूपाळी विणकNयाची’, ‘रबर जिंकाच’ या कवितांचाही समावेश या पुस्तकात आहे. लता मंगेशकर यांच्या शिरीष पै यांनी घेतलेल्या मुलाखतीचं टिपण ‘तुळशीची मंजिरी लता’ या शीर्षकासह या पुस्तकात वाचायला मिळतं. तर शिरीष पै यांच्या लग्नासाठी सोपानदेव चौधरी यांनी रचलेल्या मंगलाष्टकाचाही या पुस्तकात समावेश आहे. ‘अत्रे-फडके वाद’, ‘अत्रे आणि माटे’ ही टिपणंही वाचण्यासारखी आहेत. येवढंच नाही तर प्रा. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांनी १९४५ सालच्या नवयुगच्या दिवाळी अंकात दीडशे वर्षातील शंभर कर्तबगार महाराष्ट्रीयन व्यक्तींची जी सूची दिली आहे, तिचाही समावेश या पुस्तकात आहे. तर हे पुस्तक म्हणजे विविधरंगी टिपणांचं, कवितांचं, लेखांचं, विडंबनांचं संकलन आहे."

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KHUMASDARATRE #KHUMASDARATRE #खुमासदारअत्रे #SHORTSTORIES #MARATHI #SHYAMBHURKE #श्यामभुर्के "
Customer Reviews
  • Rating Starलोकप्रभा ९/२/२०१८

    आचार्य अत्रे म्हणजे मराठी साहित्यातलं एक महत्त्वाचं नाव. त्यांनी मांडलेले विषय, विचार हे आजही तितकेच ताजे आहेत. त्यांच्या शैलीची वाहवा आजहा होतेच. अत्रे यांनी ‘नवयुग’ या साप्ताहिकात अनेक वर्षं लेखन केलं होतं. त्यांच्या या लेखनाचं संकलन म्हणजे ‘खुमासदर अत्रे’ हे पुस्तक होय. प्रा. श्याम भुर्के यांनी ‘नवयुग’ या साप्ताहिकाचे अनेक अंक चाळून, वाचून केलेला मधुसंचय म्हणजे ‘खुमासदार अत्रे’ होय. हे पुस्तक वाचून वाचकांना आचार्य अत्रे यांच्या उत्साहवर्धक आणि प्रसन्नतेनं बहरलेल्या सहवासाचा आनंद मिळेल हे निश्चित! ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 21-01-2018

    अत्रे यांच्या खुमासदार टिपणाचं अनोखे संकलन... श्याम भुर्के यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चीफ मॅनेजर, रिजनल मॅनेजर, ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य, तीन बँकांवर संचालक म्हणून काम केले. सध्या आझेलटेक प्रा. लि. पुणे आणि अमेरिका येथे संचालक आहेत. आतापर्यंत वििध विषयांवर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘खुमासदार’ ज्यातून त्यांनी आ. अत्रे यांच्या ‘नवयुग’ साप्ताहिकांचे अंक वाचून त्यातला खुशखुशीत भाग निवडला आणि तो पुस्तकात संग्रहित केला. या पुस्तकात अत्रे त्यांच्या लेखणीनं प्रसवलेला स्फोटक मजकूर तर आहेच, पण दत्तू बांदेकरांचे, मजेदार, विनोदी किस्से आणि वचनं आहेत. ‘नवयुग’च्या वीस वर्षांच्या आमदानीत जे जे लेखकाच्या दृष्टिकोनातून-लक्षणीय लेखन ‘नवयुग’मध्ये आले ते इथं वाचकांच्या भेटीला आले आहे. त्याची मांडणी खास श्याम भुर्केच्या शैलीतून आहे. हे पुस्तक वाचताना आ. अत्रे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आणि निष्णात संपादनाचा प्रत्यय तर येतोच, पण महाराष्ट्रातील वीस वर्षांच्या महत्त्वाच्या घटनांचा एक चित्रपटच डोळ्यांसमोरून सरकत जातो. नामवंत लेखकांच्या भेटीही या पुस्तकातून घडतात. त्यांची विशेष मौज वाटते. लेखकाला उत्तम विनोददृष्टी असल्यामुळे त्यांनी जे जे संग्रहित केलं ते निश्चितच ‘खुमासदार’ आहे. पुस्तकाचे वाचन करताना त्यातील विविधतेनं मन थक्क होते आणि क्षणभरही पुस्तक खाली ठेवावेसं वाटत नाही हे या सग्रहाचे खरे यश. ‘नवयुग’ने महाराष्ट्राच्या जीवनात एकमेद्वितीय स्थान सतत वीस वर्षे मिळवलं होतं. त्यांच्या यशात अत्रे यांच्या लेखणीचा सिंहाचा वाटा होता. पण दत्तू बांदेकरांचा खुसखुशीत विनोद, श्री. बाळ ठाकरेंची व्यंगचित्रे आणि महाराष्ट्रातले अनेक नामवंत लेखक ‘नवयुग’मधून उदयाला आले. ‘संयुक्त महाराष्ट्र आंदोलना’त तर या ‘नवयुग’ जी कामगिरी केली ती अजोड आहे. महाराष्ट्राचा सारा सामाजिक, राजकीय, साहित्यिक आणि सांस्कृतिक इतिहास म्हणजे ‘नवयुग’. एखाद्या विस्मृत बहारदार उपवनातून मधमाशीनं हिंडून हिंडून मध गोळा करावा तसं ‘नवयुग’चे वीस वर्षांचे असंख्य अंक बारकाईनं वाचून श्याम भुर्के यांनी त्यातून जो मधुसंचय केला त्याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन. काही खुमासदार उदा. ‘कोण सुंदर? स्त्री की चंद्र?’ हा वाद मिटवण्यासाठी परमेश्वराने एक मोठा सोन्याचा तराजू आणला. एका पारड्यात स्त्रीला आणि दुसऱ्या पारड्यात चंद्राला घातले. अन् तराजू वर उचलला तो काय? चंद्राचे पारडं वर गेलं. तो राहिला आभाळात आणि स्त्री पृथ्वीतलावर!’ ‘ओळंबा कवितेचा’- आ. अत्रे एकदा अनंत काणेकर यांना म्हणाले, ‘तुम्हाला एक गणित सांगतो या गणिताचे उत्तर तुम्ही बरोबर दिलंत तरच नवकाव्य तुम्हाला एकदम समजेल!’ ‘हे घ्या गणित, दोन पैशांना चार पेरू, तर फडक्यांच्या हौदात पाणी किती?’ अशा रीतीने नवकाव्यातल्या अर्थहीनतेची ते टर उडवीत. -डॉ. शैलजा यादवाड ...Read more

  • Rating Starसकाळ १९.११.२०१७

    प्र.के.अत्रे यांनी वेगवेगळ्या साहित्यप्रकारातून मांडलेल्या विनोदाचं संकलन प्रा. भुर्के यांनी केलं आहे. मंदस्मित करायला लावणाऱ्या विनोदापासून खदखदून हसायला लावणाऱ्या विनोदपर्यंत अनेक प्रकार अत्रे यांच्या लेखनातून दिसतात. भुर्के यांनी त्यातले नेमके आणिखुमासदार विनोद निवडले आहेत. कोणतही पान उघडावं आणि अत्रे यांच्या लेखणीतून उतरलेल्या विनोदाचा आस्वाद घ्यावा असं हे पुस्तक. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHIKASANTVANAM
RADHIKASANTVANAM by MUDDUPALANI Rating Star
केदार मारुलकर

एक डॉक्टर काय काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या पुस्तक परिचयासाठी निवडलेल्या पुस्तकाचे लेखक (खरे तर अनुवादक) *डॉ. शंतनू अभ्यंकर.* पुण्याच्या बीजे मेडिकल मधून एमबीबीएस. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण. आयएमए तसेच इतर संघटनेत विविध पदांवर काम. अनक परिषदांमध्ये शास्त्रीय विषयावर शुद्ध मराठीत व्याख्याने. २५ वर्षाहून अधिक काळ ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा. लोकविज्ञान संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा संघटनांमध्ये काम. विज्ञान लेखक, भाषांतरकार, ब्लॉगर आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे समाजात सर्वसाधारणपणे *न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर लेखन* आणि प्रसंगी *प्रचलित समजाला तडा देणारे परखड भाष्य* करण्याची धमक. *पुस्तक परिचय* मुद्दूपलनी ही अठराव्या शतकातील राजे प्रतापसिंह यांची भोगपत्नी. अनुपम सौंदर्य, बुद्धिमत्ता, चातुर्य, शृंगारनिपुणता बहुभाषाकोविद अशी देवदासी स्त्री. राधिकासांत्वनमु हे तेलगू भाषेतील काव्य तिने रचले. परंतु नंतरच्या काळात अश्लील ठरवून त्यावर बंदी घालण्यात आली. देश स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा एकदा या काव्याला प्रकाशित होण्याचे भाग्य लाभले. गेल्याच वर्षी हे काव्य मराठीत अनुवादित करून डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी मराठी रसिकांना हा सांस्कृतिक ठेवा उपलब्ध करून दिला आहे. तंजावरच्या तत्कालीन मराठी राजवटीचं एक वेगळंच वैशिष्ट्य होतं. मराठी राजे आणि तमिळ प्रजा. या राज्याची प्रसिद्धी इतर कलांइतकीच कलावंतिणींसाठीही होती. देवदासी, देवरंडीयल, कलावती, गुडिसानी, भोगदासी, नगरशोभिनी, राजगणिका अशी, काही आज आपल्याला खळबळजनक वाटतील अशी, नावं होती. एक समृद्ध परंपरा होती. तिथे गणिकांनाही प्रतिष्ठा होती. अशीच एक गणिका-मुद्दूपलनी. तिची एक रचना म्हणजेच राधिकासांत्वनमु. तेलुगूमध्ये सांत्वन म्हणजे रुसवा काढणे. अतिशय शृंगारिक, भावनाप्रधान, बिनधास्त आणि प्रसंगी अश्लील म्हणावं असं हे काव्य. अर्थात श्लिलाश्लिलतेच्या कल्पना कालसापेक्ष असतात. राधा-कृष्ण आणि इलाची गोष्ट सांगतासांगता ती राजे राजवाड्यांच्या राज्याचीच नाही, तर स्त्रियांच्या अंत:करणाचीही दारे सताड उघडून दाखवते. मराठीमध्ये इतकं शृंगारीक काव्य लिहिलं गेलं नाही.त्यात शृंगारीक लेखन म्हणजे लिहिलंच तर पुरुषांनी लिहावं, असा अलिखित नियम. शृंगार आणि अश्लीलता याच्या सीमारेषेवर असलेलं हे काव्य एका स्त्रीने लिहावं हे म्हणूनच आगळंवेगळं ठरतं. राधा-कृष्णाच्या कथेने भल्याभल्यांना मोहात पाडले आहे. पण राधाकृष्णाची बहुतेक प्रेमकाव्ये कितीही सुंदर आणि शृंगारिक वर्णनांनी भरलेली असली तरी अखेरीस राधाकृष्णाचे मिलन म्हणजे; पुरुष आणि प्रकृतीचे मिलन, असा शोध लावून त्याला एकदम अध्यात्मिक रूप दिलं जातं. राधिका सांत्वनम् मध्ये कृष्ण आणि राधा, कृष्ण आणि या काव्यातील प्रेमत्रिकोणाचा तिसरा कोन- इला, यांचे नाते अगदी सर्वसाधारण स्त्रीपुरुषांसारखे रेखाटले आहे. आपली पार्श्वभूमी सांगून ही गणिका राधिकासांत्वनमची मुख्य कथा सुरू करते. राधा-कृष्णाच्या प्रणयलीला तर सगळ्यानाच माहीत आहेत. या काव्यातील प्रौढ राधा, तरुण कृष्णाचे आणि नुकत्याच यौवनात आलेल्या इलाचे लग्न लावून देते. कृष्ण इलेवर असा काही भाळतो की राधा रहाते बाजूला. आता राधेला पश्चात्ताप होतो. विरहाने पोळलेली राधा, कृष्णाला विनवून परत बोलवते. तो येतो. पण दुखावली गेलेली राधा त्याला फार महत्व देत नाही. त्याला राधेची आर्जवं करायला लागतात. तरीही राधा त्याला बधत नाही. मग कृष्ण आपले हुकूमी अस्त्र काढतो. आपल्या कामलीलांनी तिला घायाळ करतो, राधा पुन्हा आकृष्ट होते, दोघांचे मिलन होतं. इथे राधिकासांत्वन सुफळ संपूर्ण होतं, अशी ही काव्यरुप कथा. यातील दोन्ही नायिका अगदी मुद्दूपलनी सारख्याच आहेत. रुपगर्विता, हुशार तितक्याच हट्टी. इला नवथर तरुणी; तर राधा प्रौढ, प्रेमस्वरूप कृष्णसखी आणि दोघींचा नायक कृष्णसखा. पण सारा भर आहे तो ह्या दोन नायिकांच्या मनतरंगांवर. यातल्या दोन्ही नायिका कृष्णावर वर्चस्व गाजवणाऱ्या आहेत. प्रेमासाठी आसुसलेल्या आहेत. अनुभूती मोकळेपणानी व्यक्त करणाऱ्या आहेत. वयात येणे, विरह,असूया, प्रेम-द्वेष अशी भावनांची लपाछपी, असं बरंच काही हे काव्य उलगडून दाखवते आणि तेही एक स्त्रीच्या नजरेतून. हा नजारा थक्क करणारा आहे. हे शृंगारीक असलं तरी उत्कट आणि रसाळ काव्य आहे. या काव्याचा इंग्रजीतही अनुवाद झाला आहे. डॉ. शंतनू यांनी छंदोबद्ध भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. छंदोबद्ध असल्याशिवाय भाषांतर त्या काळातील वाटणारच नाही. मूळ छंद/वृत्त काय आहे याचा अंदाज अर्थातच इंग्लिश ओळी वाचून येत नाही. मग काही ओळी वाचायच्या, एखादी ओळ सुचेल तशी लिहायची आणि मग कारागिरी करत करत इतर ओळी जुळवायच्या; असा प्रकार करत भाषांतर केल्याचे मनोगतात लिहिले आहे. मराठीत हे सगळे काव्य लिहिताना पुणेरी भाषा वापरली असली,तरी त्यात दुर्बोधता नाही. अभंग, मंदाक्रांता, मालिनी, दिंडी, हरिभगिनी आणि लावणीसदृश ठेक्यात बसणाऱ्या काही चाली यात वापरल्या आहेत. काही ठिकाणी पद्यमय संवाद लिहिले आहेत. पुस्तक परिचय लिहिताना यातील काही ओळी उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. काव्याची सुरवातच राधेच्या बहारदार वर्णनाने होते. _थोरांनी नावाजली, गौरांगी सर्वांहुनी, शकुंतला, शुकभाषिणी, नंदाक्का राधा ही. आणि तिचे ते डोळे, नसते जर कृष्णकळे; का हरी कटाक्ष पुरे, चमकाया नयनदले?_ यानंतर षोडशा इलेचं वर्णन या शब्दांत _कृशांगा, नाजुकांगा, वेणीसंभार सोसवेना; मुखमोती दिव्य ज्योती, देवी इला, यौवना ही_ कृष्णावर भाळलेल्या इलाचे मनतरंग रेखाटताना म्हटले आहे- _लपंडावी डोळे झाकाया, फक्त मुरारी हवा इलेला. शिवशिवीचा खेळ रंगता,हिचे इशारे पळता पळता. नदीकिनारी साधून मौका, इला झोंबते हरीच्या अंगा. सदैव हरी-सह, हरीच सहचर, खेळ मिषे सुखस्पर्श अनावर. सख्यांस कौतुक सखिचे नवथर उधळून यौवन, धीट, खोडकर इला भाळली श्री कृष्णावर!_ कृष्ण आणि राधेचा प्रणय तिच्या नजरेतून सुटत नाही... _ओठ आरक्तही देता राधा, इला तुळीतसे ओष्ठ सौष्ठवा; दंतपंक्ती त्या सहज चमकता, फिके जाणी स्मित आपुले इला, शेजघरी ने कृष्णा, राधा; म्हणे ‘आले मी’, इला बाला!! मजेत हसती श्रीकृष्ण-राधा!_ राधेलाही इला मोठी होण्याची आतुरता, उत्सुकता आहेच... _कधी म्हणे विनोदे राधा, ‘ही मला सवत होई का?’ पण पाहताच इलेला, उरी उधाण ये मायेला, कुस्करी मग वारंवार, चुंबीते गोबरे गाल._ पण लग्नानंतर राधाने इलेला दिलेला संदेश आणि कृष्णाला दिलेला `दम` बहारदार आहे. इलेला संदेश _दे विश्वास अन् दे प्रोत्साहन. जाण असे तो प्रीत पुरुषोत्तम काम निपुण तो प्रेमिक उत्तम ...दे, कोमल तन, कोमल दे मन, प्रीत मनस्वी, तुझाच प्रीतम.’_ कृष्णाला `दम` _‘कठोर कांचन माझी काया, लता जणू ती, तनू कोमला, धिटाई हळू, बुजेल इला, सांभाळा तुम्ही गोपाळा!’_ काही ओळी मात्र आजही सर्वसामान्य पुरुषांनाही लागू पडतील की काय, इतक्या चपखल झाल्या आहेत. _नाही कशी मुळी लाज ;हवी मजा, वरती माज ; पुरूषांचे नीत्य काज ; बाईच्या मनीची आस कोणी ना पुसे त्यास_ चार भाग आणि ५८४ पदं असलेलं हे काव्य शृंगारीक असेलही, नव्हे आहेच. पण स्त्रीसन्मानाचा, प्रतिष्ठेचा आणि संवेदनशील मनाचा ठाव घेणारा तो एक ठेवा आहे. _इतिश्री शंतनूविरचितम् राधिका सांत्वनम् भावानुवादस्य केदारकृतपरिचयम् संपूर्णम् ...Read more

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/7120?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR06UVpU4k8DLSaBDkgmglzUuRMuX2XQ3OKxRAdL-tQo1-DZwHV7_Q3uLE4_aem_ATgHVeQrpR7vbtSsdHKWSXs5EHm0mPjS_5lEI-n3B5uorlbUPMjKGOX9doFKfROrOtk