* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KAVITA SMARANATLYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667042
  • Edition : 4
  • Publishing Year : AUGUST 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A FEW YEARS AGO, SHANTABAI WAS RUNNING A COLUMN `KAVITA SMARANATLYA` THROUGH THE MAGAZINE `ANTARNAAD`. IN THIS, SHE WAS PRESENTING THE POEMS WHICH WERE HER FAVOURITE, WHICH SHE HAD LIKED VERY MUCH, WHICH SHE HAD REMEMBERED VERY WELL. WHILE DOING SO, THE ORIGINAL POEM WAS GIVEN WITH SHANTABAI`S REVIEW ABOUT IT. THERE WERE 25 SUCH REVIEWS BY HER IN THE MAGAZINE. THIS BOOK PRESENTS THEM ALL TOGETHER FOR THE CONVENIENCE OF THE READERS. WE ALL ARE AWARE OF THE POETESS SHANTABAI. HER STUDY AND RESEARCH OF ALL THE POEMS, NEW OR OLD, HER LOVE FOR POETRY, HER CHOICE EVERYTHING ITSELF IS EXCLUSIVE. SHE READS OTHER`S POEM WITH AN OPEN MIND. SHE GRASPS THE BEAUTY WITHOUT ANY PREJUDICE. HER REVIEWS ABOUT THE POEMS SHE LIKED THE BEST THUS BECOME MASTER PIECES. THIS BOOK WILL SATISFY THE HUNGER OF THE READERS AS WELL AS THE STUDENTS STUDYING THE POETRY FORMAT IN DETAIL.
आवडलेल्या कवितांवरील शान्ताबाईचे सुंदर रसग्रहण. एक सुंदर स्वप्नरंजन....काही काळापूर्वी ‘अन्तर्नाद’ मासिकामधून ‘कविता स्मरणातल्या’ हे सदर शान्ताबाई चालवत होत्या. आपल्याला आवडलेली, स्मरणात राहिलेली कविता प्रथम संपूर्ण द्यावयाची आणि मग तिच्याबद्दलचा रसग्रहणात्मक लेख लिहायचा, असे सदराचे स्वरूप होते. असे पंचवीस लेख त्या वेळी शान्ताबार्इंनी लिहिले. ‘कविता स्मरणातल्या’ या पुस्तकातून ते इथे प्रथमच एकत्रित स्वरूपात वाचकांसमोर येत आहेत. शान्ताबार्इंचे कविताप्रेम सर्वज्ञात आहे. जुन्यानव्या कवितेचा त्यांचा व्यासंग गाढ; सर्वस्पर्शी आहे. त्या स्वत: कवयित्री आहेत; पण त्यापेक्षा त्या एक चोखंदळ, रसिक आणि काव्यप्रेमी वाचक आहेत. त्यामुळे त्यांचे हे काव्यविषयक लेख अत्यंत वाचनीय झाले आहेत. कवितेवर मन:पूर्वक प्रेम करणाऱ्या रसिकांनाच नव्हे, तर कवितालेखन करणाऱ्या कवींनाही हे लेख कुतूहलजनक वाटतील. त्यांच्या पसंतीला उतरतील, यात शंका नाही....
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 16-06-2002

    ‘व्यासंगाचे कंगोरे… खरं रसिक मन सुंदर आणि मनस्वी गोष्टींचा मागोवा घेत जातं आणि त्याच वेळेला स्वत:ला दिसलेल्या गोष्टी तितक्याच तन्मयतेनं इतरांना सांगतं. आकाशात उमटलेलं इंद्रधनुष्य जेव्हा आपण जीव भरून पाहतो आणि त्याच वेळी ‘ते बघ’ म्हणून शेजारच्याला दावतो, तेव्हा आपण खरे रसिक असतो... कविता, गीतलेखन, ललित लेखन, कथा, अनुवाद, समीक्षा, संपादन, अध्यापन अशा अनेक मार्गांनी मराठी भाषेमध्ये खोलवर मुळं रुजवलेल्या जेष्ठ साहित्यिका शांता शेळके जेव्हा एका रसिकाच्या भूमिकेत शिरतात तेव्हा ‘सुवर्णमुद्रा’ यासारख्या पुस्तकाची निर्मिती होते. मराठी साहित्यात स्वत:च्या प्रतिभेने मोलाची भर घातलेल्या शांताबाईनी मराठी रसिकांसाठी आपल्या संचिताचं हे जणू मृत्युपूर्व देणंच दिले आहे. ‘कविता स्मरणातल्या’ मध्ये शांताबार्इंनी गोविंदग्रज, लक्ष्मीबाई टिळक, यशवंत, रेंदाळकर, कुसुमाग्रज, बोरकर, अनिल, कांत आदी मान्यवर कवीसोबत, कवी म्हणून फारसे परिचित नसलेल्या अज्ञानवासी, साधुदास, श्रीनिवास पाटणकर, वि.स. खांडेकर, अनंत काणेकर, कवी माधव यासारख्या एकूण २५ कवींच्या कविताचा रसग्रहणात्मक मागोवा घेतलेला आहे. हे पुस्तक म्हणजे, ‘अंतनार्द’ मासिकासाठी लिहिलेल्या लेखमालिकेचं संकलन आहे. प्रत्येक लेखामध्ये एक संपूर्ण कविता, कवीचा साहित्यिक परिचय, तो लिहित असलेल्या काळाचं आरेखन आणि त्या कवितेचा माग घेता घेता टिपलेल्या कंगोऱ्याचं लेखिकेने ओघवत्या शैलीमध्ये वाचकाला घडवलेलं दर्शन आहे. स्वत:बरोबर वाचकालाही कवितेच्या अंतरंगात घेऊन जाण्याचा शांताबार्इंच्या विलक्षण हातोटीचा प्रत्यय हे लेख वाचताना वारंवार येतो. कवितेतील प्रतिमांचा शोध घेता घेता लेखिका त्यावर मार्मिक भाष्यही करतात. त्या एकेक ठिकाणी लिहितात. ‘पद्मा यांनी इथे ज्या प्रतिमा वापरल्या आहेत, त्या चित्रदर्शी तर आहेतच, पण त्यांच्या वास्तव रूपाबरोबर त्यांना सतत पसरत जाणारी विविध परिमाणेही लाभतात आणि त्या अधिकाधिक अर्थपूर्ण होत जातात.’ या लेखांमध्ये कवितेसोबत कवीच्या मानसिकतेचा घेतलेला वेध आहे. काही ठिकाणी कवितेच्या आशयाला समांतर जाणाऱ्या इतर कवींच्या ओळी उद्घृत केल्या आहेत, तर काही ठिकाणी कवितेनं स्वत:वर उमटवलेल्या ठशाचं दर्शनही लेखिका घडवतात. रेंदाळकरांच्या ‘अजुनी चालतोचि वाट’ या कवितेवर लिहीत असताना शांताबाई एक अर्थगर्भ स्वगतच लिहितात. ‘एकीकडे असे राबणे आणि दुसरीकडे वाढत्या वयाबरोबर त्याचे व्यर्थत्व उमगणे, असे होता होता दिवस, महिने, वर्ष ओसरत असतात. आयुष्याचीच सांजवेळ पुढ्यात येऊन ठाकते. आपण कुठून निघालो, कुठे आलो, अखेरचा मुक्काम कुठे आहे काहीच उमगेनासे होते. आयुष्य या वाटचालीतच संपून जाणार की काय असा प्रश्न पडतो.’ बी. रघुनाथांच्या ‘सांज’ या कवितेवरील संपूर्ण लेख मुळातून वाचावा असा भावोत्कट उतरला आहे. शांताबार्इंनी स्वत:मध्ये मुरवून घेतलेली कविता वाचकांपर्यंत पोहोचवताना आस्वादक समीक्षेचं लोभसवाणं रूप कविता स्मरणातल्याच्या प्रकाशनानं साकार झालं आहे हे निश्चित. -निरंजन उजगरे ...Read more

  • Rating StarDAINIK KESRI 19-11-2000

    स्मरणात राहणाऱ्या कविता… शांता शेळके यांचे काव्यप्रेम सर्वज्ञात आहे. त्या स्वत: कवयित्री आहेत; पण त्यापेक्षा त्या एक चोखंदळ, रसिक आणि काव्यप्रेमी वाचक आहेत. काही काळापूर्वी ‘अंतर्नाद’ या मासिकामधून ‘कविता स्मरणातल्या’ हे सदर शांताबाई चालवत होत्या. आल्याला आवडलेली कविता प्रथम संपूर्ण द्यावयाची आणि मग तिच्याबद्दल रसग्रहणात्मक लेख लिहायचा, असे त्यांचे स्वरूप होते. यावेळी या सदरातून लिहिलेल्या पंचवीस लेखांचा एकत्रित संग्रह ‘कविता स्मरणातल्या’ या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आला आहे. या संग्रहात रविकिरण मंडळातील कवि आणि त्यानंतरचे अनिल, कुसुमाग्रज आदि कवींच्या कविताचा या संग्रहात समावेश आहे. कवि अनिल, ग. द. माडगूळकर, कवि यशवंत, लक्ष्मीबाई टिळक, माधव ज्युलियन इत्यादी कवींच्या शांताबाईना आवडलेल्या कविता आणि त्या कवितांवरील मर्मग्राही विवेचन असा हो सुंदर काव्यप्रवास आहे. शांताबार्इंनी कवितेच्या रसग्रहणाबरोबरच त्या कवीचे व्यक्तित्वही स्पष्ट करण्यावर प्रयत्न केला असल्याने, वाचकांना कवितेचा आस्वाद घेणे अधिकच सुलभ जाते. -सिद्धार्थ केळकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more