* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KABULIWALAR BANGALI BAHU
  • Availability : Available
  • Translators : MRUNALINI GADKARI
  • ISBN : 9788177664492
  • Edition : 3
  • Publishing Year : MARCH 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 148
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ONE WELL EDUCATED GIRL FROM A BENGALI BRAHMIN FAMILY MARRIED A FOREIGNER MUSLIM YOUTH AGAINST THE WISHES OF HER FAMILY. SHE WENT TO VISIT HER IN-LAWS STAYING IN A SMALL VILLAGE IN AFGHANISTAN WITH HIGH HOPES AND FAITH. ONCE SHE REACHED THE VILLAGE SHE REALISED THE FACT THAT THERE WERE ROADS TO ENTER THIS COUNTRY BUT NOT TO MOVE OUT OF THE COUNTRY.ALL THE PEOPLE WERE NOT BAD BUT SOME WERE MEAN, SOME WERE SELFISH. SHE WAS IMPRISONED THERE BECAUSE OF SUCH PEOPLE. SHE SUFFERED A LOT DURING THE 8 YEARS OF HER IMPRISONMENT; SHE EXPERIENCED MANY A GOOD AND BAD THINGS. THIS STORY PRESENTS THE HAIR-RAISING EXPERIENCES WHEN SHE TRIED TO RUN AWAY TO INDIA, AWAY FROM HER STAGNANT LIFE THERE, AWAY FROM THE TALIBANI FANATICS AFTER FACING THEIR OPPOSITION COURAGEOUSLY. WE SHIVER TO OUR BONES WHILE READING HER STORY.
बंगाली ब्राह्मण कुटुंबातील एका सुशिक्षित मुलींन, सर्वाचा विरोध झुगारून, एका परदेशी मुसलमान तरुणाशी लग्न केलं, आणि सासरच्या माणसांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानातील एका लहानश्या गावात ती मोठ्या विश्वासानं गेली. पण तिथं गेल्यावर तिच्या लक्षात आल कि ह्या देशात येण्यासाठी रस्ता आहे, पण जाण्यासाठी नाही. तिथली सगळीच माणस वाईट नव्हती, पण काही लबाड, स्वार्थी माणसामुळे तिला तिथे बंदी होऊन राहावा लागल. आठ वर्षाच्या ह्या बंदिवासात तिला आलेले भलेबुरे अनुभव, तिथल साकळलेले जीवन आणि तालिबानसारख्या धर्माणधाबरोबर निकराचा विरोध करून भारतात पळून येताना सोसावा लागलेला भयंकर थरार ह्यांची हि कहाणी. तिच्या जीवनाची हि करून कहाणी वाचताना आपणही गोठून जातो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #LEENASOHONI #KABULIVALYACHIBANGALIBAYAKO #MRUNALINIGADKARI #BIOGRAPHYA&TRUESTORIES#SUSHMITABANERJEE
Customer Reviews
  • Rating StarBHAUSAHEB PAWAR

    "काबुलीवाल्याची बंगाली बायको" काल हे पुस्तक वाचायला घेतले आणि पुस्तकं वाचूनच पूर्ण झाले. एका भारतीय महिलेली कहाणी आणि ती ही अफगाणिस्तान सारखा देशामधील खेड्यातील. बंगाल मधील हिंदू कुटुंबातील एक सुशिक्षित मुलींनी सर्वांचा विरोध झुगारून एका परदेश अफगाणिस्तान मधील तरुणाशी लग्न केलं. सासरच्या माणसांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानमधील एका छोट्याशा गावात मोठ्या विश्वासाने ती तिकडे गेली आणि साधारण आठ वर्ष बंदिवासात तिला अफगाणिस्तानमध्ये राहावे लागले. तिला आलेले अनेक बरे भुरे अनुभव या पुस्तकांमध्ये सांगितले आहेत. अफगाणिस्तानतील जीवन, शेती पद्धती, जीवनमान कसे आहे.तालिबान परिस्थितीत हे सर्व या पुस्तकात सांगितलेला आहे आणि आठ वर्षानंतर परत सुस्मिता बॅनर्जी ( भारतात आलेले आहे दोन-तीन वेळेस पळून जाण्याचा प्रयत्न भारतात येण्यासाठी केलेले प्रयत्न या पुस्तकात दिलेले आहेत. ...Read more

  • Rating StarSamir Chavan

    बंगाली ब्राह्मण कुटुंबातील एका सुशिक्षित मुलींन, सर्वाचा विरोध झुगारून, एका परदेशी मुसलमान तरुणाशी लग्न केलं, आणि सासरच्या माणसांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानातील एका लहानश्या गावात ती मोठ्या विश्वासानं गेली. पण तिथं गेल्यावर तिच्या लक्षात आल कि ह्या देात येण्यासाठी रस्ता आहे, पण जाण्यासाठी नाही. तिथली सगळीच माणस वाईट नव्हती, पण काही लबाड, स्वार्थी माणसामुळे तिला तिथे बंदी होऊन राहावा लागल. आठ वर्षाच्या ह्या बंदिवासात तिला आलेले भलेबुरे अनुभव, तिथल साकळलेले जीवन आणि तालिबानसारख्या धर्माणधाबरोबर निकराचा विरोध करून भारतात पळून येताना सोसावा लागलेला भयंकर थरार ह्यांची हि कहाणी. तिच्या जीवनाची हि करून कहाणी वाचताना आपणही गोठून जातो. ...Read more

  • Rating Starसंदीप रामचंद्र चव्हाण

    घरातील सर्वाचा विरोध झुगारून २ जुलै १९८८ साली बंगाली कुटुंबातील एका सुशिक्षित हिंदू मुलीने एका अफगाणी मुसलमान तरुणाशी लग्न केलं. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या माणसांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानातील एका लहानश्या गावात ती नवऱ्याबरोबर मोठ्या विश्वासानंगेली. त्यानंतर थोड्या अवधीतच तिला काहीही पूर्वकल्पना न देता तिचा नवरा तिला अफगाणिस्तानातच सोडून भारतात आला. त्यावेळी तिच्या लक्षात आले की या देशात येण्यासाठीचा मार्ग आहे, पण बाहेर जाण्यासाठीचा नाही. सासरच्या लोकांना भेटायला म्हणून गेलेली ती तरुणी संपूर्ण देशच जणू तुरुंग असलेल्या अफगाणिस्तानात जवळपास आठ वर्षे अडकून पडते. या बंदिवासात तिला अनेक भलेबुरे अनुभव येतात. अफगाणिस्तानातील स्त्रियांचे यातनामय जीवन, अंधारात चाचपडणाऱ्या लहानग्यांचे बालपण, मोठ्या कुटुंबातील गुंतागुंतीचे नातेसंबंध इत्यादी गोष्टी तिला समजतात. तिथल्या आठ वर्षाच्या काळात तिने अनेक हालअपेष्टा, शारीरिक मानसिक छळ सोसला तरीही तिची भारतात परत जाण्याची तीव्र आकांक्षा मात्र कमी झाली नाही. भारतात पळून जाण्याचा फसलेला तिचा पहिला प्रयत्न आणि तरीही हार न मानता जीव धोक्यात घालून पुन्हा पळून जाण्याचा केलेला प्रयत्न यातून तिच्या धैर्याची कल्पना येते. भारतात पळून जाताना शत्रू समजलेल्या (पाकिस्तानी) लोकांनी तीला केलेली मदत आणि पाकिस्तानातील आपल्या (भारतीय) लोकांनी तिला दिलेली मानहानीकारक वागणूक तिच्यासह वाचकालाही अस्वस्थ करते. तालिबानसारख्या धर्मांधाबरोबर निकराचा विरोध करून भारतात पळून येताना सोसावा लागलेला भयंकर थरार अनुभवलेल्या सुश्मिता बॅनर्जी यांच्या जीवनचरित्रातील एक संघर्षपूर्ण भाग म्हणजे `काबुलीवाल्याची बंगाली बायको` हे पुस्तक होय. त्याकाळी अनेक बंगाली मुली लग्न करून अफगाणिस्तान गेल्याने तिथे अडकून पडल्या होत्या असे या आत्मचरित्रातून समजते. सध्या लव्ह जिहादबद्दल देशात खूप चर्चा आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर तीस-पस्तीस वर्षांपूर्वीही हा प्रकार चालू होता याची खात्री पटते. शिवाय अफगाणिस्तानातील विदारक स्त्री-जीवनाच्या सत्याचे दर्शनही घडते!! अफगाणिस्तानातील स्त्रियांच्या हक्कासाठी चळवळ उभारण्याचा प्रयत्न केल्यामुळे तालिबानने ५ सप्टेंबर २०१३ रोजी अफगाणिस्तानातील राहत्या घराबाहेर सुश्मिता बॅनर्जी यांची हत्या केली. या पुस्तकात फक्त अफगाणिस्तानातून भारतात पलायन करण्यापर्यंतच्या घडामोडींचा उल्लेख आहे. भारतात परत आल्यानंतर काय होते? त्या पुन्हा अफगाणिस्तान का जातात? परक्या देशात सोडून गेलेल्या नवऱ्याबरोबर पुन्हा त्या का जुळवून घेतात? इत्यादी माहिती या पुस्तकात नसल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. ~संदीप रामचंद्र चव्हाण ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 02-05-2004

    सुस्मिता बॅनर्जी यांच्या ‘काबुलीवाला बंगाली बरू’ या बंगाली पुस्तकाचा मृणालिनी गडकरी यांनी अनुवाद केला आहे. या पुस्तकात लेखिकेने आपल्या आयुष्यातील काही घटना मांडल्या आहेत. एका अर्थाने हा तिच्या चारित्र्याचा काही अशं आहे. बंगालमधील या हिंदू ब्राह्मण कुुंबातील तरुणीने अफगाणिस्तानातील मुसलमान तरुणाशी विवाह केला. पतीप्रेमापोटी लेखिका सासरच्यांना भेटायला अफगाणिस्तानात गेली. पण तिथे तिची अवस्था तुरुंगातील कैद्याप्रमाणे झाली. हिंदुस्थानातील सुशिक्षित तरुणीची मानसिकता आणि आधुनिक जगापासून खूप दूर असलेल्या असंस्कृत अशिक्षित माणसांमधील संघर्षाची ही कहाणी आहे. आठ वर्षे कैद्याप्रमाणे काढून शेवटी तालिबान्यांना शौर्याने तोंड देऊन ती हिंदुस्थानात परतली. धर्माला जीवनात आणि समाजात श्रेष्ठ स्थान आहे या विचारावर लेखिकेचा विश्वास आहे. पण धर्माच्या नावाखाली पराकोटीची बिर्भत्सता आणि दहशत निर्माण करणाऱ्या निर्विकारपणे माणसांची हत्या करणाऱ्याचे खरे रूप समाजासमोर यावे या हेतूने तिने हे अनुभव लिहिले आहेत. पुस्तक वाचताना तिच्या अपार मनोधैर्याने वाचक थक्क होतो. वागणूक तिथे मिळाली त्या परिस्थितीत सर्वसामान्य स्त्री जगूच शकली नसती. परत येण्याची गोष्टच सोडा. असामान्य धैर्याने मिळेल ते सहकार्य घेत खऱ्याखोट्याचा आधार घेत घेत ती अखेर हिंदुस्थानात येऊन पोहोचते. या कथानकाचा ‘एस्केप फ्रॉम तालिबान’ हा चित्रपट यापूर्वीच येऊन गेला आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more