* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KRUSHNAYAN
  • Availability : Available
  • Translators : SUDHIR KAUTHALKAR
  • ISBN : 9788184982619
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 222
  • Language : Translated From GUJRATI to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AWESOME STORY OF GOD IN THE DISGUISE OF A HUMAN BEING: KRISHNA WAS LYING BENEATH THE HUGE TREE OF ASHWATTHA. HE HAD JUST ONE LAST QUESTION IN HIS MIND; ‘WHY IS THAT ALL THE WOMEN THINK ALIKE?’ HE HAD MANY THOUGHTS LINGERING IN HIS MIND, MANY INCIDENCES BEFORE HIS EYELIDS CLOSED GENTLY. BE IT ANY AGE, ANY ERA, ANY AGE, WOMEN ALWAYS THINK LIKEWISE. IT IS REALLY BEYOND ANYONE’S UNDERSTANDING TO FIND OUT THE CAUSE AND EFFECT OF THEIR BEHAVIOUR. WOMEN EXPERIENCE THINGS ALIKE, AGONY ALIKE, ANGER ALIKE TOO. THE WAY THEY REFLECT THEIR ANGER IS ALSO VERY TYPICAL. ALL THESE THOUGHTS MADE KRISHNA SMILE FOR A MOMENT. HE WAS SUFFERING FROM IMMENSE PAIN. HE WAS SHOT BY THE HUNTER. KRISHNA KNEW THAT THESE WERE HIS VERY FEW LAST HOURS IN THE FORM OF A HUMAN. IT WAS TIME TO LEAVE THE MORTAL BODY. HE HAD LIVED HIS LIFE FULLY, AS DESTINED. HE WAS PONDERING OVER THE MANY INCIDENCES THAT HAD TAKEN PLACE IN HIS LIFE. DURING THESE LAST FEW HOURS, HE HAD THOUGHTS OF ONLY THREE WOMEN, RADHA, RUKHMINI AND DRUAPADI. THEY WERE TIED UP TO HIM WITH A SEPARATE BOND EACH. ONE WAS HIS LOVER, ONE WAS HIS WIFE AND ONE WAS HIS FRIEND. EACH ONE HAD AN INTIMATE RELATIONSHIP WITH HIM. THEY ALL WERE UNIQUE YET COUNTERPARTS OF EACH OTHER. ONLY THEY HAD THE POWER TO CAPTIVATE KRISHNA. THEY HAD THE POWER TO MAKE HIM LINGER BEFORE LEAVING HIS MORTAL BODY. HE LINGERS AND HELPS THEM TO SET HIM FREE FROM THEIR BONDS, FOREVER…
‘‘स्त्रिया एकमेकींपेक्षा वेगळ्या का बरं नसतात....?’’ अश्वत्थाखाली बसलेल्या कृष्णाच्या मनात द्रौपदीच्या महालात घडलेली घटना डोळ्यांसमोर येऊन, अनेक विचार येत होते.... ‘‘कोणत्याही युगात, कोणत्याही वयाची स्त्री का बरं एकसारखाच विचार करते? एकसारखाच अनुभव घेते? समान बाबतीत वेदना अनुभवते? का बरं एकसारख्या गोष्टीबद्दल रागावते? राग व्यक्त करण्याची रीत पण का बरं एकसारखीच असते....?’’ कृष्णाच्या मनात प्रश्न आले आणि त्यावर तो स्वत:च हसलाही. या प्रश्नांना आता काही अर्थ होता का? आयुष्य जगून झालं होतं... ‘‘आपल्या जीवनात आलेल्या महत्त्वाच्या तीनही स्त्रिया आपल्याबद्दल का बरं एकसारख्याच संवेदना अनुभवत होत्या? का बरं एकाच पध्दतीनं दुःखी होत होत्या? आणि का एकसारख्याच तीव्रतेनं आपल्यावर प्रेम करत होत्या?...’’ खरं तर असा विचार करण्याची वेळही आता निघून गेली होती. आता होतं ते... केवळ स्मरण...! प्रत्यक्ष दृष्टीसमोर त्या स्त्रिया नव्हत्याच. तरीही त्या तिघींचे डोळे त्याच्याकडे बघत होते... आशेनं, अपेक्षेनं, उपहासानं आणि ... निखळ प्रेमानंही! तीन नद्यांचा प्रवाह मिळून त्याच्या दृष्टीसमोरुन सागराकडे जात होता. लाटांवर खाली-वर नाचणारे प्रकाश किरण जणू अस्पष्ट रेषांद्वारा त्या तिन्ही स्त्रियांचे चेहरे चितारीत होते.... प्रेयसी... पत्नी... आणि सखी... त्या तिघी जणी... खळाळणा-या प्रवाहाबरोबर वाहात जणू म्हणत होत्या... ‘‘तुझ्यात विलीन होण्यातच आमच्या जीवनाचं सार्थक आहे. तुझा खारटपणा स्वीकार्य आहे. कारण तूच आम्हाला विशालता दिलीस, अमर्याद पसरण्याचा तो अस्तित्वबोधही तूच दिलास... आमचं प्रखर तेज सामावून घेऊन आम्हाला शीतलता दिलीस तू... आमचं स्त्रीत्व स्वीकारून अखंड प्रेम दिलंस तू....’’

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KRUSHNAYAN #KRUSHNAYAN #कृष्णायन #FICTION #TRANSLATEDFROMGUJRATITOMARATHI #SUDHIRKAUTHALKAR #KAAJALOZAVAIDYA "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 25-12-2011

    काजल ओझा -वैद्य ज्येष्ठ गुजराथी लेखिका. साहित्य क्षेत्रात त्यांनी बराच लौकिक मिळविला आहे. त्यांनी `योग वियोग’, `राग-अनुराग’, मध्यबिंदू या कादंबऱ्या हातावेगळ्या केल्या आहेत. या साहित्यकृतीने साहित्यात मोलाची भर पडली आहे. प्रा. सुधीर कौठाळकर यांनीत्यांच्या `कृष्णायन’ या गुजराती कादंबरीच्या मूळ कथेला न दुखविता इमान राखून मराठीत स्वैर अनुवाद केला आहे. रामायण आणि महाभारत हे जगातील दोन महान काव्यग्रंथ. महाभारतात जे आहे ते सर्वत्र आहे व जे नाही ते अन्यत्र कोठेही नाही. या महाभारताचा नायक भगवान श्रीकृष्ण. गीतेत गुरु म्हणून तर भागवतात दैवी स्वरुपात दिसतो. हा देवावतार सर्वत्र व्यापून राहिला आहे. कुरुक्षेत्रावर कौरव-पांडवांचे घनघोर युद्ध झाले. सारे कौरव मृत्युमुखी पडले. गांधारीला शोक आवरला नाही. तिने कृष्णाला शाप दिला, `पशुच्या मरणानं मरशील तू... एकटा... असहाय, व्यथित... तुझ्या कुळाचा विनाश. स्वजन, पुत्र-पौत्र... तडफडून तडफडून मरण पावतील!’ हा शाप सत्य ठरला. कौरव पापी, पांडव पुण्यवान. पण यादव कुळही उन्मत्त झाले. मद्यपानमुळे साधू संतांची कुचेष्टा करु लागले. कृष्णाने स्वत:च्या डोळ्यांनी हे पाहिले. विनाश अटळ ठरला. कृष्ण हा एक मानव. तो एक पुरुष. पूर्ण पुरुष!! या युगंधराला मरण समाधीचे. पण ??? न येता त्याला मरण आले एका सामान्य माणसासारखं विजनात! एका अश्वत्थ वृक्षाखाली न झोपलेल्या, न बसलेल्या स्थितीत! जरा नावाच्या एका पारध्याचा बाण पायाच्या अंगठ्याला लागला. हे सारे वर्णन लेखकाने अतिशय समर्पक, रोचक व यथायोग्य शब्दात केले आहे. त्यांची भाषा प्रवाही, ओघवती आहे आणि खऱ्या अर्थाने इथूनच कादंबरीची सुरुवात होते. श्रीकृष्ण मुलगा, सवंगडी, भाऊ, वादक, प्रियकर, योद्धा, पती, राजा, राजकारणपटू वक्ता, तत्त्वज्ञ या साऱ्या भूमिकेत अपरंपार रस ओतला. शेवटी याला साऱ्यांची परमाधी साधा माणूस म्हणून मरण पत्करण्याचा योगायोग आला. मेघासारखा रिता होऊन तो गेला. कृष्णाचे तर काय राहिले फक्त जळत्या कापराचा वास! हे सारे कादंबरीकाराने परिणामकारकरित्या वर्णले आहे. कृष्णाच्या महानिर्वाण वेळी त्याच्या डोळ्यासमोर अनेक गतकालाचे प्रसंग, घटना, महान व्यक्ती उभ्या राहिल्या. त्यांच्याशी कृष्णाचा सुसंवाद झाला. तो अतिशय उत्तम साधला आहे. हीच एक भावुक कथा, दीर्घ कथा, नव्हे कादंबरीच! म्हणजेच कृष्णायन! राधा, रुक्मिणी व द्रौपदी या कृष्ण जीवनात अत्यंत प्रिय स्त्रिया. या तिघींचे चेहरे एकमेकांत मिसळून आर्द्र बनून कृष्णाच्या डोळ्यात तरळत होते. अर्जुन, उध्दव, दारुक, यशोदामाता हेही चुकले नव्हते. याचं सांत्वन कृष्णाने अतिशय सुंदर शब्दात केले आहे. हे लेखकाचे कौशल्य आहे. कादंबरीकार हा तत्त्वज्ञ, कवी, शास्त्रज्ञ यांच्याहून श्रेष्ठ असतो. कारण बाकीच्या सर्वांना मानवी जीवनाच्या एकेका अंगाचे दर्शन झालेले असते. परंतु कादंबरीकार मात्र समग्र जीवनाचा वेध घेऊ शकतो. यात कौठाळकर यशस्वी झाले आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHIKASANTVANAM
RADHIKASANTVANAM by MUDDUPALANI Rating Star
केदार मारुलकर

एक डॉक्टर काय काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या पुस्तक परिचयासाठी निवडलेल्या पुस्तकाचे लेखक (खरे तर अनुवादक) *डॉ. शंतनू अभ्यंकर.* पुण्याच्या बीजे मेडिकल मधून एमबीबीएस. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण. आयएमए तसेच इतर संघटनेत विविध पदांवर काम. अनक परिषदांमध्ये शास्त्रीय विषयावर शुद्ध मराठीत व्याख्याने. २५ वर्षाहून अधिक काळ ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा. लोकविज्ञान संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा संघटनांमध्ये काम. विज्ञान लेखक, भाषांतरकार, ब्लॉगर आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे समाजात सर्वसाधारणपणे *न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर लेखन* आणि प्रसंगी *प्रचलित समजाला तडा देणारे परखड भाष्य* करण्याची धमक. *पुस्तक परिचय* मुद्दूपलनी ही अठराव्या शतकातील राजे प्रतापसिंह यांची भोगपत्नी. अनुपम सौंदर्य, बुद्धिमत्ता, चातुर्य, शृंगारनिपुणता बहुभाषाकोविद अशी देवदासी स्त्री. राधिकासांत्वनमु हे तेलगू भाषेतील काव्य तिने रचले. परंतु नंतरच्या काळात अश्लील ठरवून त्यावर बंदी घालण्यात आली. देश स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा एकदा या काव्याला प्रकाशित होण्याचे भाग्य लाभले. गेल्याच वर्षी हे काव्य मराठीत अनुवादित करून डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी मराठी रसिकांना हा सांस्कृतिक ठेवा उपलब्ध करून दिला आहे. तंजावरच्या तत्कालीन मराठी राजवटीचं एक वेगळंच वैशिष्ट्य होतं. मराठी राजे आणि तमिळ प्रजा. या राज्याची प्रसिद्धी इतर कलांइतकीच कलावंतिणींसाठीही होती. देवदासी, देवरंडीयल, कलावती, गुडिसानी, भोगदासी, नगरशोभिनी, राजगणिका अशी, काही आज आपल्याला खळबळजनक वाटतील अशी, नावं होती. एक समृद्ध परंपरा होती. तिथे गणिकांनाही प्रतिष्ठा होती. अशीच एक गणिका-मुद्दूपलनी. तिची एक रचना म्हणजेच राधिकासांत्वनमु. तेलुगूमध्ये सांत्वन म्हणजे रुसवा काढणे. अतिशय शृंगारिक, भावनाप्रधान, बिनधास्त आणि प्रसंगी अश्लील म्हणावं असं हे काव्य. अर्थात श्लिलाश्लिलतेच्या कल्पना कालसापेक्ष असतात. राधा-कृष्ण आणि इलाची गोष्ट सांगतासांगता ती राजे राजवाड्यांच्या राज्याचीच नाही, तर स्त्रियांच्या अंत:करणाचीही दारे सताड उघडून दाखवते. मराठीमध्ये इतकं शृंगारीक काव्य लिहिलं गेलं नाही.त्यात शृंगारीक लेखन म्हणजे लिहिलंच तर पुरुषांनी लिहावं, असा अलिखित नियम. शृंगार आणि अश्लीलता याच्या सीमारेषेवर असलेलं हे काव्य एका स्त्रीने लिहावं हे म्हणूनच आगळंवेगळं ठरतं. राधा-कृष्णाच्या कथेने भल्याभल्यांना मोहात पाडले आहे. पण राधाकृष्णाची बहुतेक प्रेमकाव्ये कितीही सुंदर आणि शृंगारिक वर्णनांनी भरलेली असली तरी अखेरीस राधाकृष्णाचे मिलन म्हणजे; पुरुष आणि प्रकृतीचे मिलन, असा शोध लावून त्याला एकदम अध्यात्मिक रूप दिलं जातं. राधिका सांत्वनम् मध्ये कृष्ण आणि राधा, कृष्ण आणि या काव्यातील प्रेमत्रिकोणाचा तिसरा कोन- इला, यांचे नाते अगदी सर्वसाधारण स्त्रीपुरुषांसारखे रेखाटले आहे. आपली पार्श्वभूमी सांगून ही गणिका राधिकासांत्वनमची मुख्य कथा सुरू करते. राधा-कृष्णाच्या प्रणयलीला तर सगळ्यानाच माहीत आहेत. या काव्यातील प्रौढ राधा, तरुण कृष्णाचे आणि नुकत्याच यौवनात आलेल्या इलाचे लग्न लावून देते. कृष्ण इलेवर असा काही भाळतो की राधा रहाते बाजूला. आता राधेला पश्चात्ताप होतो. विरहाने पोळलेली राधा, कृष्णाला विनवून परत बोलवते. तो येतो. पण दुखावली गेलेली राधा त्याला फार महत्व देत नाही. त्याला राधेची आर्जवं करायला लागतात. तरीही राधा त्याला बधत नाही. मग कृष्ण आपले हुकूमी अस्त्र काढतो. आपल्या कामलीलांनी तिला घायाळ करतो, राधा पुन्हा आकृष्ट होते, दोघांचे मिलन होतं. इथे राधिकासांत्वन सुफळ संपूर्ण होतं, अशी ही काव्यरुप कथा. यातील दोन्ही नायिका अगदी मुद्दूपलनी सारख्याच आहेत. रुपगर्विता, हुशार तितक्याच हट्टी. इला नवथर तरुणी; तर राधा प्रौढ, प्रेमस्वरूप कृष्णसखी आणि दोघींचा नायक कृष्णसखा. पण सारा भर आहे तो ह्या दोन नायिकांच्या मनतरंगांवर. यातल्या दोन्ही नायिका कृष्णावर वर्चस्व गाजवणाऱ्या आहेत. प्रेमासाठी आसुसलेल्या आहेत. अनुभूती मोकळेपणानी व्यक्त करणाऱ्या आहेत. वयात येणे, विरह,असूया, प्रेम-द्वेष अशी भावनांची लपाछपी, असं बरंच काही हे काव्य उलगडून दाखवते आणि तेही एक स्त्रीच्या नजरेतून. हा नजारा थक्क करणारा आहे. हे शृंगारीक असलं तरी उत्कट आणि रसाळ काव्य आहे. या काव्याचा इंग्रजीतही अनुवाद झाला आहे. डॉ. शंतनू यांनी छंदोबद्ध भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. छंदोबद्ध असल्याशिवाय भाषांतर त्या काळातील वाटणारच नाही. मूळ छंद/वृत्त काय आहे याचा अंदाज अर्थातच इंग्लिश ओळी वाचून येत नाही. मग काही ओळी वाचायच्या, एखादी ओळ सुचेल तशी लिहायची आणि मग कारागिरी करत करत इतर ओळी जुळवायच्या; असा प्रकार करत भाषांतर केल्याचे मनोगतात लिहिले आहे. मराठीत हे सगळे काव्य लिहिताना पुणेरी भाषा वापरली असली,तरी त्यात दुर्बोधता नाही. अभंग, मंदाक्रांता, मालिनी, दिंडी, हरिभगिनी आणि लावणीसदृश ठेक्यात बसणाऱ्या काही चाली यात वापरल्या आहेत. काही ठिकाणी पद्यमय संवाद लिहिले आहेत. पुस्तक परिचय लिहिताना यातील काही ओळी उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. काव्याची सुरवातच राधेच्या बहारदार वर्णनाने होते. _थोरांनी नावाजली, गौरांगी सर्वांहुनी, शकुंतला, शुकभाषिणी, नंदाक्का राधा ही. आणि तिचे ते डोळे, नसते जर कृष्णकळे; का हरी कटाक्ष पुरे, चमकाया नयनदले?_ यानंतर षोडशा इलेचं वर्णन या शब्दांत _कृशांगा, नाजुकांगा, वेणीसंभार सोसवेना; मुखमोती दिव्य ज्योती, देवी इला, यौवना ही_ कृष्णावर भाळलेल्या इलाचे मनतरंग रेखाटताना म्हटले आहे- _लपंडावी डोळे झाकाया, फक्त मुरारी हवा इलेला. शिवशिवीचा खेळ रंगता,हिचे इशारे पळता पळता. नदीकिनारी साधून मौका, इला झोंबते हरीच्या अंगा. सदैव हरी-सह, हरीच सहचर, खेळ मिषे सुखस्पर्श अनावर. सख्यांस कौतुक सखिचे नवथर उधळून यौवन, धीट, खोडकर इला भाळली श्री कृष्णावर!_ कृष्ण आणि राधेचा प्रणय तिच्या नजरेतून सुटत नाही... _ओठ आरक्तही देता राधा, इला तुळीतसे ओष्ठ सौष्ठवा; दंतपंक्ती त्या सहज चमकता, फिके जाणी स्मित आपुले इला, शेजघरी ने कृष्णा, राधा; म्हणे ‘आले मी’, इला बाला!! मजेत हसती श्रीकृष्ण-राधा!_ राधेलाही इला मोठी होण्याची आतुरता, उत्सुकता आहेच... _कधी म्हणे विनोदे राधा, ‘ही मला सवत होई का?’ पण पाहताच इलेला, उरी उधाण ये मायेला, कुस्करी मग वारंवार, चुंबीते गोबरे गाल._ पण लग्नानंतर राधाने इलेला दिलेला संदेश आणि कृष्णाला दिलेला `दम` बहारदार आहे. इलेला संदेश _दे विश्वास अन् दे प्रोत्साहन. जाण असे तो प्रीत पुरुषोत्तम काम निपुण तो प्रेमिक उत्तम ...दे, कोमल तन, कोमल दे मन, प्रीत मनस्वी, तुझाच प्रीतम.’_ कृष्णाला `दम` _‘कठोर कांचन माझी काया, लता जणू ती, तनू कोमला, धिटाई हळू, बुजेल इला, सांभाळा तुम्ही गोपाळा!’_ काही ओळी मात्र आजही सर्वसामान्य पुरुषांनाही लागू पडतील की काय, इतक्या चपखल झाल्या आहेत. _नाही कशी मुळी लाज ;हवी मजा, वरती माज ; पुरूषांचे नीत्य काज ; बाईच्या मनीची आस कोणी ना पुसे त्यास_ चार भाग आणि ५८४ पदं असलेलं हे काव्य शृंगारीक असेलही, नव्हे आहेच. पण स्त्रीसन्मानाचा, प्रतिष्ठेचा आणि संवेदनशील मनाचा ठाव घेणारा तो एक ठेवा आहे. _इतिश्री शंतनूविरचितम् राधिका सांत्वनम् भावानुवादस्य केदारकृतपरिचयम् संपूर्णम् ...Read more

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/7120?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR06UVpU4k8DLSaBDkgmglzUuRMuX2XQ3OKxRAdL-tQo1-DZwHV7_Q3uLE4_aem_ATgHVeQrpR7vbtSsdHKWSXs5EHm0mPjS_5lEI-n3B5uorlbUPMjKGOX9doFKfROrOtk