* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KRANTIYOGINI BHAGINI NIVEDITA
  • Availability : Available
  • ISBN : 9789386342201
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 408
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE WORK DONE BY BHAGINI NIVEDITA IN THE FIELD OF EDUCATION, LITERATURE, ARTS AND SPIRITUALITY IS ASTOUNDING. YET, MUCH OF IT IS STILL UNVEILED. HER SUPPORT TO THE ARMED REVOLUTION IS NOW COMING TO SURFACE. SWAMI VIVEKANANDA HAD HIMSELF HAD HER TESTED BEFORE ALLOWING HER TO SHOULDER THE RESPONSIBILITY OF WORK RELATED TO FREEDOM OF COUNTRY RATHER THAN BEING STUCK AT FREEDOM OF SELF. SHE DID NOT HESITATE TO EMBRACE THE WAY OF ARMED REVOLUTION. HER LOGISTIC SUPPORT HELPED INDIANS PROFUSELY IN THE FREEDOM FIGHT.
जन्माने आयरिश असणा-या भगिनी निवेदिता यांचे मूळ नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबेल असे होते. २८ ऑक्टोबर १८६७ रोजी उत्तर आयर्लंडमधील टायरन प्रांतातील डनगॅनन या लहानशा शहरात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर देशभक्ती, परोपकार यांचेच संस्कार झाले होते. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन मार्गारेट आपले कुटुंब, घर सोडून देशाची सेवा करण्याच्या उद्देशाने भारतात आली आणि इथल्या मातीशी, समाजाशी, समाजाच्या सुखदुःखांशी एकरूप झाली. हिंदू धर्मातील आचार-विचारांचा तिच्यावर जबरदस्त प्रभाव पडला. हिंदू धर्माचे उगमस्थान असणाNया भारतावर तिचे नितांत प्रेम होते. या राष्ट्रप्रमेमाची ओळख हे पुस्तक घडवते. स्वत: इंग्रज असूनही ब्रिटिश साम्राज्याच्या अन्यायकारक राज्यपद्धतीविषयी ती नाराज होती. त्यामुळेच ‘भगिनी निवेदिता’ झालेली मार्गारेट स्वातंत्र्यलढ्याकडे ओढली गेली. भगिनी निवेदितांच्या कार्याने प्रभावित होऊन जगदीशचंद्र बसू यांनी त्यांना लेडी ऑफ लॅम्प म्हणून गौरविले. भगिनी निवेदितांनी सातत्याने स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रचार केला.भारतासाठी त्यांनी जे महान कार्य केले त्याचं यथोचित दर्शन या पुस्तकात घडतं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
MARGARET ELIZABETH NOBEL# IRELAND# BANGAL# KOLKATA# SWAMIJI# BHAGINI# BRAMHO SAMAJ# SWAMI VIVEKANAND# NIVEDITA# RELIGION# EDUCATION# SHARDAMATA# HIMALAYA# AAMARNATH# LADY OF LAMP# VAJRA# KALI THE MOTHER# JAGADISHCHANDRA BASU# BODHGAYA
Customer Reviews
  • Rating StarKausthubh Nimbarte

    जन्माने आयरिश असणा-या भगिनी निवेदिता यांचे मूळ नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबेल असे होते. २८ ऑक्टोबर १८६७ रोजी उत्तर आयर्लंडमधील टायरन प्रांतातील डनगॅनन या लहानशा शहरात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर देशभक्ती, परोपकार यांचेच संस्कार झाले होे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन मार्गारेट आपले कुटुंब, घर सोडून देशाची सेवा करण्याच्या उद्देशाने भारतात आली आणि इथल्या मातीशी, समाजाशी, समाजाच्या सुखदुःखांशी एकरूप झाली. हिंदू धर्मातील आचार-विचारांचा तिच्यावर जबरदस्त प्रभाव पडला. हिंदू धर्माचे उगमस्थान असणाNया भारतावर तिचे नितांत प्रेम होते. या राष्ट्रप्रमेमाची ओळख हे पुस्तक घडवते. स्वत: इंग्रज असूनही ब्रिटिश साम्राज्याच्या अन्यायकारक राज्यपद्धतीविषयी ती नाराज होती. त्यामुळेच‘भगिनी निवेदिता’ झालेली मार्गारेट स्वातंत्र्यलढ्याकडे ओढली गेली. भगिनी निवेदितांच्या कार्याने प्रभावित होऊन जगदीशचंद्र बसू यांनी त्यांना लेडी ऑफ लॅम्प म्हणून गौरविले. भगिनी निवेदितांनी सातत्याने स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रचार केला.भारतासाठी त्यांनी जे महान कार्य केले त्याचं यथोचित दर्शन या पुस्तकात घडतं. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA 31-08-2018

    क्रांतियोगिनी!... साहित्य, शिक्षण, कला, अध्यात्म या क्षेत्रातील एक अग्रणी आणि स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या म्हणून भगिनी निवेदिता यांची ओळख आहे. त्या जन्माने आयरिश, नागरिकत्व ब्रिटिश, पण मनाने पूर्णत: भारतीय होत्या. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस््र क्रांतीला त्यांचे असलेले पाठबळ आजवर दुर्लक्षित राहिले किंवा फारसे समोर आले नाही. मात्र त्यांच्या अन्य कार्याबरोबरच स्वातंत्र्यलढ्यातील हे योगदानही तेवढेच महत्त्वाचे असून भारतीय क्रांतिकारकांना नेहमीच त्यांचा पाठिंबा आणि सहकार्य मिळाले. अशा या अलौकिक आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट आणि कार्य मृणालिनी गडकरी यांनी ‘क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता’ या चरित्र ग्रंथातून उलगडले आहे. निवेदिता यांचे मूळ नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबल. भारतात येण्यापूर्वी त्यांचा आयर्लण्डच्या स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग होता. स्वामी विवेकानंद यांची भेट होण्यापूर्वी भगिनी निवेदिता यांनी शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, लेखक म्हणून नाव मिळवले होते. पण त्या समाधानी नव्हत्या. १८९५मध्ये स्वामी विवेकानंद यांचे लंडन येथे लेडी मार्गेसन यांच्या निवासस्थानी व्याख्यान झाले. या कार्यक्रमासाठी मार्गेसन यांनी भगिनी निवेदिता यांनाही बोलावले होते. हे व्याख्यान ऐकून त्या प्रभावित झाल्या. पुढे स्वामी विवेकानंद यांची व्याख्याने अमेरिका, न्यू यॉर्क, इंग्लड या ठिकाणी झाली. त्यांच्या प्रत्येक व्याख्यानाला भगिनी निवेदिता उपस्थित राहत होत्या. स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत असलेला हिंदू धर्म हा उदार, कर्मकांडात गुंतून न पडणारा, जातिभेदापासून दूर असलेला, अन्य कोणत्याही धर्माचा अनादर न कराणारा, प्रगतिशील आणि राष्ट्रीयतेला प्राधान्य देणारा, नवीन जरूर शिकावे, पण जुन्याला तिलांजली देऊ नये असे सांगणारा होता. फक्त तरुणांनीच नव्हे तर स्त्रियांनीही या चळवळीत सहभागी होणे त्यांना अपेक्षित होते. स्वामी विवेकानंद यांची झालेली भेट, त्यांची ऐकलेली व्याख्याने यातून निवेदिता यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली आणि त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्याला वाहून घेण्याचा, त्याच्यासाठी भारतात येण्याचा निर्णय घेतला. शंकरीप्रसाद बसू यांनी ‘निवेदिता लोकमाता’ या पाच खंडात्मक चरित्र ग्रंथात निवेदिता यांच्या क्रांतिकार्याबाबतचे ठोस पुरावे दिले आहेत. निवेदिता यांनी लिहिलेली पत्रे दोन खंडांत बसू यांनी प्रकाशित केली. या पत्रांशिवाय बसू यांना सुमारे १०० पत्रे मिळाली होती. यातील अर्धवट जळालेली किंवा फाडलेली पत्रे त्यांनी प्रकाशित केली नाहीत. मात्र त्याचा योग्य तो उपयोग बसू यांनी या चरित्रलेखनात केला ही पत्रे निवेदिता यांच्या बहिणीकडून निवेदिता यांचे फ्रेंच चरित्रकार लिझेल रेमँ यांना आणि नंतर रेमँ यांच्याकडून स्वामी अनिर्वाण यांच्यामार्फत बसू यांना मिळाली. या पत्रांच्या आधारे आणि अन्य लिखित पुराव्यावरून निवेदिता यांचे क्रांतिकारत्व सिद्ध केले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळायलाच हवे, तो भारतीयांचा मूलभूत अधिकार आहे, हे पटवून देण्यासाठी निवेदिता यांना कोणताही मार्ग वर्ज्य नव्हता. त्यांनी नेमस्तांना आणि जहालांना दोघांनाही जवळ केले. गोपळ कृष्ण गोखले यांच्याबरोबरच लोकमान्य टिळक, खापर्डे यांच्याशीही त्यांचा स्नेह होता. लोकजागृतीसाठी लेखन, व्याख्याने याचाही त्यांनी उपयोग करून घेतला. अनेक तरुणांचे त्या प्रेरणास्थान होत्या. भारताचे आत्मिक बळ वाढवून भारताला स्वावलंबी करण्यासाठी त्यांना स्वदेशीची चळवळ जशी आवश्यक वाटली तसेच क्रांतिकार्यासाठी लागणारे शिक्षणही त्यांना गरजेचे वाटत होते. अशा या क्रांतियोगिनीने दार्जिलिंग येथे अखेरचा श्वास घेतला. स्वामी विवेकानंद यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांनी माणसाची ‘माणूस’ म्हणून ओळख करून दिली तर स्वामी विवेकानंद यांनी यातून ‘माणूस’ घडवला आणि निवेदिता यांनी ‘राष्ट्र घडवायचा’ प्रयत्न यशस्वी केला. निवेदिता यांचा भारतातील कार्यकाळ खूप कमी होता. त्या १८९८ मध्ये भारतात आल्या आणि १९९१ मध्ये त्यांचे निधन झाले. भारतात आल्यानंतर स्वामी विवेकानंद आणि अन्य मान्यवर मंडळीकडून निवेदिता यांना भारतीय संस्कृती, परंपरा, साहित्य, कला, राष्ट्रप्रेम अशा विषयांवर मार्गदर्शन मिळाले. पुढे एका विशेष कार्यक्रमात स्वामी विवेकानंद यांनी त्यांचे नामकरण निवेदिता असे केले. ज्या काळात स्त्रिया घराबाहेर पडत नव्हत्या त्या काळात त्यांनी कोलकाता येथील बागबाजारसारख्या कर्मठ लोकांच्या वस्तीत भारतीय परंपरेशी आधुनिक शिक्षणाची सांगड घालून शाळा सुरू केली. त्यांची ही शाळा बंगालमधील पहिली राष्ट्रीय शाळा म्हणून ओळखली जाते. स्वदेशीची चळवळ सुरू होण्याआधी कितीतरी वर्षे ही शाळा स्थापन केली होती. भागिनी निवेदिता अर्थात मार्गारेट एलिझाबेथ नोबल यांचे बालपण, कौटुंबिक पार्श्वभूमी, १९व्या शतकातील बंगालमधील सामाजिक, राजकीय परिस्थिती, निवेदिता यांनी तयार केलेला आणि १९०६ मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनात फडकविण्यात आलेला भारताचा राष्ट्रध्वज तसेच निवेदिता यांच्या जीवनातील वेगवेगळ्या घटनांची माहिती ग्रंथातील वेगवेगळ्या प्रकरणांमधून करून देण्यात आली आहे. ग्रंथाच्या अखेरीस निवेदिता यांचा संपूर्ण जीवनपट, ठळक घडामोडी, महत्त्वाच्या व्यक्तींची नामनिर्देश सूची ही परिशिष्ट स्वरूपात देण्यात आली आहे. भगिनी निवेदिता यांच्या एकूण जीवनाचा समग्र मागोवा मृणालिनी गडकरी यांनी घेतला असून विद्यार्थी, अभ्यासक यांच्यासाठी तो महत्त्वाचा दस्तऐवज आहे. –शेखर जोशी ...Read more

  • Rating StarDivya Marathi 5-5-17

    भगिनी निवेदिताचे शिक्षण, साहित्य, कला, अध्यात्म या क्षेत्रातील कार्य क्रांतिकारक अाहे, मात्र कार्य बरेचसे ज्ञात अाहे. इतके दिवस अज्ञात हाेते ते तिचे सशस्त्र क्रांतीला असलेले सहकार्य. स्वामी विवेकानंदांनी पारखून निवडलेल्या या `सिंहिणी`ला स्वत:च्या अातमिक मुक्तीपेक्षा भारताची पारतंत्र्यातून मुक्ती महत्त्वाची वाटत हाेती अाणि त्यासाठी सनदशीर वा सशस्त्र क्रांती असा कुठलाच मार्ग तिला वर्ज्य नव्हता. तिचा `लाॅजिस्टिक सपाेर्ट` भारतीय क्रांतिकारकांना मिळाला म्हणूनच भारतीय क्रांतिकार्य प्रभावी झाल्याचे मत लेखिका मृणालिनी गडकरी यांनी पुस्तकाच्या मलपृष्ठावर मांडले अाहे. २०११ साल हे भगिनी निवेदिितेचे स्मृतिशताब्दी वर्ष हाेते. या निमित्ताने त्यांचे समग्र चरित्र मराठीत लिहिले जावे असा अाग्रह ज्ञानप्रबाेधिनीच्या संस्थापक-संचालक मंडळातील एक ज्येष्ठ सदस्य यशवंतराव लेले यांनी केल्याने हे पुस्तक पुढे अाकारास अाले. भगिनी निवेदितेला महाराष्ट्राबद्दल, विशेषत: पुण्याबद्दल अाणि त्या काळातील लाेकमान्य टिळक, नामदार गाेखले, दादासाहेब खापर्डे अशांसारख्या महाराष्ट्रातील प्रतिष्ठित व्यक्तींबद्दल अत्यंत अादर हाेता. महाराष्ट्राला तिच्याबद्दल फारशी माहिती नाही. तिची हातांच्या बाेटावर माेजता येतील एवढीच चरित्रे पूर्वी लिहिली गेलेली दिसतात. बंगाली अाणि इंग्रजी भाषेत तिच्यावर लिहिले अाहे. पण मराठीत नव्हते. निवेदिता लाेकमाता हे शंकरीप्रसाद बसूंनी चार खंडात लिहिलेले बंगाली भाषेतील चरित्र वाचल्यानंतर निवेदिताचे जीवन कळत गेले अाणि हे पुस्तक अाकार घेत गेल्याचे गडकरी सांगतात. निवेदिताचे भारतप्रेम, निष्ठा, गुरुभक्ती, त्याग अशा बाबींसह तिच्यातील शिक्षणतज्ज्ञ, क्रांतीकार्य, तीची साैदर्यदृष्टी, तिच्यातील अाई हे सगळं या पुस्तकातून सापडतं. निवेदितेचे व्यक्तिमत्व अनेकावधानी अाहे. त्यामुळेच की, काय प्रा. बसूंनी तिचे चार खंडात विस्तृत चरित्र लिहिताना, चरित्राचा नेहमीचा रूपबंध अजिबात पाळलेला नाही. असेही गडकरी म्हणतात. ...Read more

  • Rating StarDaily Sakal-Saptrang 16-4-17

    इतिहास एखाद्या विशिष्ट कालखंडात असं काही वळण घेतो, की अभ्यासकांना पुन: पुन्हा तो काळ खुणावत राहतो. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन गवसल्याची जाणीव होते. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाचा संधिकाल हे त्याचं एक उदाहरण. वेगवेगळ्या वैचारिक प्रवाहांची घुसळण सुरू ाली ती याच काळात. स्वामी विवेकानंदांनी सुरू केलेलं राष्ट्रीय-सांस्कृतिक-धार्मिक पुनर्जागरण हाही त्यातला एक ठळक प्रवाह होता. त्यांच्या कार्यात सहभागी झालेल्या एक पाश्चात्त्य विदुषीची ओघवत्या शैलीत कथन केलेली ही जीवनकहाणी. या विदुषीचं नाव मार्गारेट नोबल अर्थात भगिनी निवेदिता. उत्तर आयर्लंडमध्ये जन्मलेल्या मार्गारेटला घरातूनच देशभक्तीचं बाळकडू मिळालं होतं. आयरिश स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेलं हे घराणं होतं. मार्गारेटच्या बालपणीची विस्तृत माहिती देऊन पुढं ती भारतीय राष्ट्रीय जाणिवांशी आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांशी समरस होण्याची बीजं या वातावरणात कशी होती, याचं सूचन लेखिका करते. मार्गारेटला अध्यात्माचं आकर्षण होतं; परंतु प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर तावून-सुलाखून घेतल्याशिवाय स्वीकारत नसे. स्वामी विवेकानंदांचं अनुयायित्व स्वीकारतानादेखील अनेक विषयांवर त्यांच्याशी तिच्या चर्चा झडल्या. शंकांचं निराकरण होईपर्यंत ती स्वस्थ बसत नसे आणि एखादी गोष्ट पटली, की मात्र त्यात सर्वस्व झोकून देऊन काम करत असे. हे चरित्र वाचताना तिच्या या वैशिष्ट्याचा ठसा वाचकाच्या मनावर उमटतो. विवेकानंदांनीदेखील आपली मतं लादण्याचा प्रयत्न न करता मार्गारेटच्या वैचारिक प्रवासात मार्गदर्शकाची भूमिका कशी निभावली, हे लेखिकेनं दाखवून दिलं आहे. गुरू-शिष्यातल्या नात्याचे हे वेगवेगळे पैलू पुस्तकातून समोर येतात. विज्ञानानं माणसाच्या आयुष्यात जे क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणलं होतं, त्याचा परिचय भारतात ब्रिटिश राजवटीमुळं झाला. आधुनिक शिक्षण मिळालेल्या पहिल्या पिढीचे लोक त्यानं प्रभावित झाले नसते तरच नवल. त्यांचे डोळे दिपून गेले; पण याचा एक परिणाम असाही झाला की, भारतातल्या हजारो वर्षांच्या परंपरेविषयी काहींच्या मनात सरसकट तिटकारा निर्माण झाला. तिच्याकडं पाठ फिरवल्याशिवाय आधुनिकतेच्या प्रकाशाला सामोरं जाता येणार नाही, असं त्यांना वाटू लागलं. स्वामी विवेकानंदांना हे अजिबात मान्य नव्हतं. त्यांना या समाजाचा आत्मविश्वास पुन:स्थापित करायचा होता. भारतीय सांस्कृतिक परंपरेच्या नितळ-निखळ रूपाला उजाळा देत या समाजाची पुनर्रचना व्हायला हवी, असा त्यांचा प्रयत्न होता. तिथपर्यंत पोचण्यासाठी वाटेतील अंधश्रद्धांचा बुजबुजाट, मुरलेल्या हितसंबंधांचं शेवाळ हटवायला हवं, हे तर उघडच होतं. भारतीयांचं मनोबल खच्ची करू पाहणार्या साम्राज्यवाद्यांशीही त्यांचा झगडा होता. एका पाश्चात्त्य विदुषीनं या कार्याचं, त्यामागच्या भूमिकेचं मर्म ओळखणं, एवढंच नव्हे तर या कार्याला आजन्म वाहून घेणं, ही घटना एकमेवाद्वितीय म्हणावी लागेल. ते सारं अनोखेपण या चरित्राच्या रूपानं प्रभावीपणे मांडलं गेलं असल्यानं हे केवळ चरित्र न राहता त्या मंतरलेल्या काळाची एक झलकही त्यातून प्रतीत होते. भारतीय स्त्रियांच्या शिक्षणासाठी निवेदितांनी खूप परिश्रम घेतले. हे करताना त्यांना अनेक आव्हानांना आणि संकटांना सामोरं जावं लागलं. दुसऱ्या बाजूला वैचारिक आघाडीवरही त्यांना संघर्ष करावा लागला. त्याचं तपशीलवार वर्णन मृणालिनी गडकरी यांनी केलं आहे. त्यासाठी बंगालीसह विविध भाषांतील संदर्भस्रोत त्यांनी मिळवले. आठवणी, तत्कालीन कागदपत्रं, पत्रव्यवहार अशा अनेक साधनांचा वापर करून त्यांनी ही चरितकहाणी सिद्ध केल्यानं तिचं मोल वाढलं आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more