* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KRANTISURYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980837
  • Edition : 8
  • Publishing Year : MAY 1984
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :VISHWAS PATIL COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DURING THE YEAR 1942 NANA PATIL WHO HAD ESTABLISHED QUASI GOVERNMENT IN SATARA, WAS THE BIGGEST HEADACHE FOR THE BRITISH GOVERNMENT. NANASAHEB PATIL HAD MANY QUALITIES. HE WAS A GREAT ORATOR, A VISIONARY SOCIAL WORKER, THE CAPTAIN OF THE FORWARD THINKERS, THE WARRIOR OF THE UNITED MAHARASHTRA MOVEMENT, A PIONEER OF MARXISM IN MAHARASHTRA. HE HAD A GREAT PERSONALITY. HE WAS TOTALLY SHAPED FROM THIS SOIL. HIS COMPETENCY WAS UNIQUE. SINCE CHILDHOOD, NANASAHEB WAS VERY NAUGHTY. ONCE WHEN HE WAS LOST IN A FAIR HE TOLD THE POLICEMAN THAT HIS GRANNY WAS LOST, AND WHEN FINALLY THEY WERE REUNITED HE SCOLDED HER FOR GETTING LOST IN THE FAIR. HE HAD THE GUTS TO MAKE THE PEOPLE THINK, HE QUESTIONED THEM THAT "WAS THE GOD OWNED BY "THEM`?` HE JOINED THE SATYASHODHAK MOVEMENT AND STROVE HARD FOR THE SOCIAL WELFARE. LATER ON, HE STRUGGLED FOR THE FREEDOM MOVEMENT. AFTER MARRIAGE, HE TAUGHT HIS WIFE TO READ AND WRITE. HIS CONTRIBUTION TOWARDS THE FREEDOM STRUGGLE WAS SO GREAT THAT PEOPLE ALWAYS HELPED HIM TO STAY AWAY FROM THE CLUTCHES OF THE BRITISH GOVERNMENT. THE SATARA MOVEMENT DURING THOSE DAYS CONSISTED OF MANY UNDERGROUND GROUPS; A FEW TO NAME WERE THE KISAN VEER AT SATARA, VASANT DADA AT PADMALE, BABURAO CHARANKAR AND GANPATRAO PATIL AT BILASHI, BARDE GURUJI AT VATEGAON, ETC. BUT THE QUASI-GOVERNMENT AT KUNDAL WAS THE MOST STRONG OF THEM ALL. KUNDAL WAS THE CAPITAL OF THE QUASI-GOVERNMENT THEN. AT THE SAME TIME, TODAY NOT ONLY NANASAHEB BUT HIS WORK ALSO HAS BEEN FORGOTTEN BY WE INDIANS. HE SACRIFICED HIMSELF FOR OUR FREEDOM AND WE HAVE TOTALLY NEGLECTED HIM. AFTER FREEDOM, NANASAHEB TURNED TOWARDS MARXISM BUT THAT IS NOT A REASON TO FORGET HIS SACRIFICE. LET US REMEMBER THE GREAT DEEDS BY HIM.
१९४२च्या धगधगत्या कालखंडात साताNयाच्या भूमीमध्ये "प्रतिसराकार" (पत्रीसरकार) स्थापन करून ब्रिटिशांची झोप उडवणा-या क्रांतिसिंह नाना पाटलांची ही समरगाथा.क्रांतिसिंह – एक फर्डा वक्ता, द्रष्टा समाजसेवक, डाव्या चळवळींचा सेनानी, संयुक्त महाराष्ट्राचा लढवय्या, महाराष्ट्राचा माळकरी माक्र्सवादी. त्यांचे लोभस, रांगड व्यक्तिमत्व, मातीतून आकारलेले नेतृत्व, मुलखावेगळे कर्तृत्व यांचा शोध घेणारी, कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या लेखणीतून साकारलेली ‘क्रांतिसूर्य’.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#28TH NOV #SAMBHAJI(1.SAHAKAR MAHARSHI SHANKARRAO MOHITE PATIL PURSKAR 2005 2.KAVI MADHAV PURSKAR 2006 3.AKSHARGANDH PURSKAR 2006 ) #NOT GONE WITH THE WIND #BANDA RUPAYA #KRANTISURYA #NAGKESHAR #संभाजी(१.सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील २.कवी माधव पुरस्कार २००६ ३.अक्षरगंध पुरस्कार २००६) #नॉट गॉन विथ द विंड #बंदा रुपया #क्रांतिसूर्य #नागकेशर
Customer Reviews
  • Rating Starसांजवार्ता, ११-०३-२०१०

    क्रांतिवीर नाना पाटील यांच्या जीवनावर विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या चरित्रात्मक कादंबरीच्या सुधारित आवृत्तीत इतिहासाच्या तेजस्वी घटनांचे दर्शन घडवून दिले आहे.

  • Rating Starसमाचार मैफिल, २८-०२-२०१०

    क्रांतिवीर नाना पाटील यांच्या जीवनावर विश्वास पाटील यांनी लिहिलेली ही कादंबरी उत्वंâठावर्धक तर झाली आहेच; परंतु नाना पाटलांच्या धाडसाचे आणि देशप्रेमाचे जाज्वल्य दर्शन देणारी ही ठरली आहे. विश्वास पाटील यांनी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बरोबर काम केलेलया स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलाखती तसेच त्या वेळचे अनुभव ऐकून कादंबरी लिहिल्यामुळे केवळ कल्पनेचा पाया कादंबरीत नसून वास्तवाचे भानही या लेखनास प्राप्त झाले आहे. ...Read more

  • Rating Starदैनिक देशदूत, ११ एप्रिल २०१०

    क्रांतिवीर नाना पाटील यांच्या जीवनावर विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या चरित्रात्मक कादंबरीच्या सुधारित आवृत्तीच्या वाचकांना पुन्हा एकदा इतिहासाच्या तेजस्वी घटनांचे दर्शन घडवून दिले आहे. तुरुंग आणि स्वातंत्र्याची चळवळ या दोन वाटांनी निघालेल्या नाना पाटलंच्या केवळ आगमनाने चैतन्य उभे राहत असे. त्यांच्या जीवनातील अनेक धाडसी प्रसंग या चरित्रात्मक कादंबरीत येतात. नाना पाटलांच्या धाडसाचे आणि देशप्रेमाचे जाज्वल्य दर्शन देणारी ही ठरली आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK GAOKARI 27-06-2010

    क्रांतिसूर्य नाना पाटील हे अतिशय मोठे व्यक्तिमत्त्व होते. एक फर्डा वक्ता, द्रष्टा समाजसेवक, डाव्या चळवळींचा सेनानी, संयुक्त महाराष्ट्राचा माळकरी मार्क्सवादी अशा अनेक अंगांनी महाराष्ट्र नानांना ओळखतो. त्यांचे रांगडे व्यक्तिमत्त्व याला मराठी मातीचा अस्ल गंध होता. त्यांचे नेतृत्व आकार घेण्याकामी त्यांचे कर्तृत्व होते. त्याच कर्तृत्वाचा आढावा ख्यातनाम कादंबरीकार विश्वास पाटील यांनी क्रांतिसूर्य या कादंबरीतून घेतला आहे. पाटील यांचा विशिष्ट वाचकवर्ग आहे. त्यांना पाटील यांची शैली ज्ञात आहे; पण या चरित्राच्या निमित्ताने पाटील यांच्या लेखनाचा नवा परिचय वाचकाला होतो. नाना पाटील यांच्या गगनगामी व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास ज्यांना करावयाचा आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे ठरेल. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more