* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KEVAL MAITRISATHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980394
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :UMESH KADAM BIRTHDAY OFFER
    UMESH KADAM COMBO SET- 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EXPERIENCES GATHERED IN THE COURSE OF THE JOURNEY OF LIFE ARE A TREASURE. MEMORIES OF PEOPLE MET IN THE COURSE OF THIS JOURNEY KEEP LINGERING IN THE MIND REGARDLESS OF THEIR CAST OR CREED, NATIONALITY AND RELIGION. YOU ENCOUNTER IN THIS JOURNEY SOME UNBELIEVABLY UNIQUE PERSONALITIES WHOM YOU NEVER DREAMT TO MEET AND THEY OCCUPY A CORNER IN YOUR HEART, SO MUCH SO, THAT THEY LEAVE AN INDELIBLE IMPRINT ON YOUR MIND. YOU KEEP REMINISCING ABOUT THEM FOR THE REST OF YOUR LIFE. BECAUSE, UNKNOWINGLY YOU HAVE ALREADY BEGAN A UNIQUE FRIENDSHIP WITH THEM…EVERLASTING AND NEVER DIMINISHING…
आयुष्याच्या प्रवासात अनुभवांची शिदोरी हेच माणसाचं मोठं वैभव असतं. माणूस कोणत्याही जाती-जमातीचा, कोणत्याही पदावर काम करणारा असो; त्याचे अनुभव, आठवणी मनात रेंगाळत राहतात. काही खास व्यक्तिमत्त्वं आयुष्यात भेटतील असं स्वप्नातही वाटत नसताना अशा व्यक्ती अचानक समोर येऊन उभ्या राहतात आणि आपल्या जीवनाचा एक कोपरा व्यापून टाकतात. ण सांगता येणारे; पण आयुष्याचे रंग उजळवून टाकणारे असे काही बंध. त्या क्षणांचा सुगंध मनात दरवळत राहतो आणि त्यातूनच फुलून येते एक आगळीवेगळी मैत्री...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KEVALMAITRISATHI #KEVALMAITRISATHI #केवळमैत्रीसाठी #SHORTSTORIES #MARATHI #UMESHKADAM #उमेशकदम "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK NAVSHAKTI 25 -10 -2009

    ‘केवळ मैत्रीसाठी’ हा कथासंग्रह असून यामध्ये उमेश कदम यांनी त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मित्रांच्या कथा रेखाटल्या आहेत. उमेश कदम हे ज्येष्ठ कादंबरीकार बाबा कदम यांचे चिरंजीव, वडिलांकडूनच लेखनाचा वारसा त्यांना लाभला. उच्चशिक्षणासाठी त्यांनी परदेश प्वास केला, नंतरच्या काळातही सातत्याने परदेश प्रवास करण्याचे प्रसंग त्यांच्यावर आले. १९९८ पासून ते आंतरराष्ट्रीयरेड क्रॉससाठी युद्धविषयक कायद्याचे विभागीय कायदा सल्लागार म्हणून काम पाहतात. या प्रवासात त्यांना विविध देशांमध्ये नाना प्रकारच्या व्यक्ती भेटल्या. यापैकी अनेकजण त्यांचे जिवलग मित्र बनले. अशा मित्रांच्या कथा त्यांनी ‘केवळ मैत्रीसाठी’ या पुस्तकातून मांडल्या आहेत. अलंकारिक भाषेचा वापर न करता साध्या सोप्या शब्दांत मांडलेल्या या कथा आपल्याशा वाटतात. १६० पृष्ठांच्या या पुस्तकात २४ मित्र आणि त्यांचे वेगवेगळे अनुभव वाचायला मिळतात. ...Read more

  • Rating StarDAINIK DESHDOOT 11-4-2010

    मुशाफिरीत उमगला माणूस फिरत राहण्याने माणूस अनुभवसमृद्ध होतो. उमेश कदम यांनी स्वतःचं अनुभव विश्व मराठी वाचकांसमोर सढळ हाताने खुलं केलंय. उमेश कदम शिक्षणाच्या, नोकरीच्या निमित्ताने निरनिराळया देशांमधून फिरले. त्यावेळेस त्यांना भेटलेली माणसं, त्यांचीपरिस्थिती यांची परस्पर संगती लावली. लोकांच्या मनाचा ठाव घेतला आणि त्यातून या कथा जन्माला आल्या. पर्यटनस्थळ तर कुणीही बघतं, परंतु ज्या देशात लेखक गेले त्या देशात तळागाळातून फिरस्ती केली. स्थानिक बाजार, वृत्तपत्रे, स्थानिक कर्मचारी यांचा त्यांना मदत झाली. माणूस वाचणारा लेखक म्हणून उमेश कदमांचा ‘केवळ मैत्रीसाठी’ हा कथासंग्रह मनास आल्हाद आनंद देऊन जातो. नेपाळ, फुकेत, लंडन, क्वालंलपूर, इथिओपिया, सिंगापूर, लाओस, उझबेकिस्तान इथे आलेल्या कार्यानुभवांचे आणि छोट्या-मोठ्या व्यक्तिगत प्रसंगांचे वर्णन या पुस्तकात आहे. हे पुस्तक एकाग्रतेने वाचायला हवं कारण प्रसंगांचे वर्णन या संदर्भामुळेच जिवंत होते. देश-विदेशात माणूसपणाच्या भावना एकसारख्याच आहेत. परदेशात व्हिएन्तीयेनमध्ये वियेंगविलेच्या आईने स्वादिष्ट कसे कसे खाऊ घातले आणि गावाकडच्या कौसल्याकाकी आणि बबनची आठवण कशी आली याचे सुंदर वर्णन आहे. परदेशात कठीण प्रसंग आल्यावर आपल्या देशातल्या माणसाचे भेटणे, मदत मिळणे, त्यातून निभावून जाणे याची जाणीव परांजपे काकू या गोष्टीतून मिळते. हीच या कथासंग्रहाचा ताकद ठरलीय. प्रत्येक कथेतून नकळत एक संदेश दिला गेलाय. अतिशय प्रामाणिकपणे आणि सुसंगत, रसाळ भाषेतील केवळ मैत्रीसाठी हे पुस्तक वाचकांचा आनंद द्विगुणीत करेल यात शंकाच नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more