* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KESHAVSUT : KAVYA ANI KALA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662054
  • Edition : 4
  • Publishing Year : 1956
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KESHAVSUT IS KNOWN AS THE FATHER OF MODERN MARATHI POETRY. HE USHERED A RENAISSANCE IN MARATHI POETRY BY WRITING ABOUT THEMES OF LOVE, PATRIOTISM, FREEDOM AGAINST THE CASTE SYSTEM, CELEBRATION OF SELF-EXPRESSION, AND BEAUTY. KESHAVSUT’S CONTRIBUTION TO MARATHI POETRY IS INCREDIBLE. V.S.KHANDEKAR APTLY PENNED OUT FEATURES OF HIS POETRY & HIS CONTRIBUTION IN THIS BOOK.
‘...तुमच्याआमच्या क्षणभंगुर अनुभूतीतले सौंदर्य टिपून घेण्याचे आणि त्याला चिरंजीव रूप देण्याचे सामथ्र्य केशवसुतांच्या प्रतिभेत आहे. जीवनाच्या उगमापासून मुखापर्यंत स्वैर संचार करण्याचे साहस तिने प्रकट केले आहे. विशाल मानवी संसार ज्या खोल पायावर उभारला गेला आहे, त्याचा वेध जितक्या अचूकपणे तिने घेतला आहे, तितक्याच समर्थपणे तिने त्याच्या अंतिम मूल्यांचाही आविष्कार केला आहे. हा संसार सर्व बाजूंनी काव्याने वेढला गेला आहे, एवढेच नव्हे, तर बाह्यत: खडकाळ भासणाNया त्याच्या अंतरंगातूनही काव्याचे अमृतझरे वाहत आहेत, याची जाणीव त्यांनी पदोपदी प्रकट केली आहे. केशवसुतांच्या कवितेने तुमच्याआमच्या— जगातल्या प्रत्येक माणसाच्या— किती तरी मुक्या सुखदु:खांना बोलायला लावले आहे आणि आंधळ्या प्रीतीला व पांगळ्या आकांक्षांना लीलेने आशेच्या शिखरावर चढवले आहे. माळरानावर उपेक्षित स्थितीत पडलेल्या शिलेवरला अदृश्य, पण अद्भुत लेख ती वाचते, पायांखाली तुडवल्या जाणाNया अंगणातल्या रांगोळीतले उदात्तत्व ती जाणते आणि अज्ञाताच्या पडद्यामागे लपलेल्या जीवनरहस्याचे अंधूक तरी दर्शन घडावे, म्हणून ती तडफडते. ती जितकी आत्मनिष्ठ तितकीच विश्वप्रेमी, जितकी हळवी तितकीच बंडखोर, जितकी उदास तितकीच उदात्त, जितकी करुण तितकीच कठोर आहे. ती मनुष्याच्या आत्म्याची िंकचित ओबडधोबड, पण अतिशय सजीव अशी प्रतिमा आहे...’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #केशवसुत :काव्य आणि कला
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 09-08-1998

    ‘केशवसुत : काव्य आणि कला’ या वि. स. खांडेकर संपादित पुस्तकाची पहिली आवृत्ती १९५६ साली निघाली होती. आता ही दुसरी आवृत्ती आलेली आहे. लेखक किंवा कवी जसजसा जुना होत जातो, तसतसे त्यांच्याकडे कळत नकळत तरुण वाचकांचे दुर्लक्ष होण्याचा संभव असतो. सर्वसामान्यवाचक वर्तमानकाळांत रंगलेला असतो. जुन्या अभिजात साहित्याशी त्याची ओळख नसू शकते. म्हणून जुने श्रेष्ठ साहित्य सामान्य वाचकांपर्यंत नेण्याच्या उद्देशाने खांडेकरांनी ‘आगरकर : व्यक्ती आणि विचार’ तसेच ‘वा. म. जोशी : व्यक्ती आणि विचार’ ही पुस्तके संपादित केली होती. त्यानंतरचे त्यांचे ‘केशवसुत : काव्य आणि कला’ हे तिसरे पुस्तक आहे. खांडेकरांनी केशवसुतांच्या कवितांपैकी ६५ कविता या पुस्तकात समाविष्ट केलेल्या आहेत. काही कवितांच्या सरसतेच्या दृष्टीने संक्षेप केलेला आहे. केशवसुतांनी मराठी कवितेला नवीन वळण लावताना जे विविध प्रयोग केले, त्याची कल्पना यावी म्हणून काव्य गुणांच्या दृष्टीने मध्यम असलेल्या काही कवितांचाही समावेश करण्यात आलेला आहे. खांडेकरांच्या प्रस्तावना अभ्यासपूर्ण असतात, पण विद्वज्जड नसतात. तसेच काही पुस्तकांची प्रस्तावना वाचनीय आहेत. वैशिष्ट्यपूर्णही आहेत. सर्वसामान्य वाचकाला या कवीच्या कवितेपर्यंत आपल्याला पोचवायचे आहे, याचे भान ठेवूनच खांडेकरांनी ही वेधक प्रस्तावना लिहिलेली आहे. केशवसुतांच्या कवितेची विविध अंगांनी ओळख करून देताना ज्या पद्धतीने विवेचन ते करत जातात की वाचकाला त्या त्या क्षणी मूळ कविताच वाचण्याचा मोह व्हावा. प्रस्तावनेच्या दुसऱ्या भगात केशवसुतांच्या चरित्रविषयक संदर्भाचे उल्लेख खांडेकरांनी कलेले आहेत. केशवसुतांच्या मानी स्वभावाचे त्यांच्या संसाराचे, वात्सल्य भावनेचे उल्लेख करून पुढे ते म्हणतात, ‘‘त्यांचे कवित्व हाच कलावंत या नात्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून घेण्याचा सर्वात सुलभ आणि विश्वसनीय मार्ग आहे.’’ १८८६ साली शालेय वयात लिहिलेल्या ‘कविता आणि कवी’ एकूणच मराठी कवितेला नवे वळण देणाऱ्या कवितेपासून १९०३ मध्ये लिहिलेल्या ‘प्रतिभा’ या कवितेपर्यंत केशवसुतांच्या मनाचा एकच ध्यास दिसून येतो तो म्हणजे कवितेबाबतची नवी दृष्टी. लोकांच्या पचनी पडावयास हवी. खांडेकरांनी या संबंधात अनेक कवितांची उदाहरणे देऊन हे स्पष्ट केले आहे. काव्यनिर्मिती हाच आपल्या जीवनाचा प्रधान हेतू मानणाऱ्या अस्सल कलावंताचा हा ध्यास होता. केशवसुतांच्या या ध्यासात आत्मनिष्ठा आहे. या माधवराव पटवर्धनांच्या आक्षेपालाही त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो; परंतु तो अपुरा, अर्धवट सोडल्यासारखा वाटतो. केशवसुतांची आत्मनिष्ठा, स्त्री-पुरुष प्रीतीचे चित्रण, निसर्ग कविता, सामाजिक कविता, केशवसुतांची आध्यात्मिकता, भाषाशैली, कल्पकता की कल्पनाचमत्कृती अशा विविध मुद्यांच्या अंगाने कवी केशवसुतांच्या काव्यकलेचा खांडेकरांनी वेध घेतलेला आहे. रसिकांना आणि अभ्यासकांना केवळ सहाय्य नव्हे, तर कवितेकडे पाहण्याची दृष्टी देणारे हे पुस्तक आहे. केशवसुतांच्या कवितेच्या अभ्यासकाला कवितेचे अंतरंग उलगडून दर्शविणारे हे पुस्तक निश्चितच लक्षणीय वाटावे. परिशिष्टात शब्दार्थ व टीपाही दिलेल्या आहेत. विद्यार्थीदशेतील वाचकाला अभ्यासकाला त्याची निश्चितच गरज भासते. कवितेचे वृत्त, जाती इत्यादी गोष्टींचेही उल्लेख उपयुक्त आहेत. केशवसुतांच्या आत्निष्ठ तितक्याच विश्वप्रेमी, हळव्या, तितक्या बंडखोर, उदास तितक्याच उदार करुण तितक्याच कठोर कवितेची ‘खांडेकरी मीमांसा’ हे कवितेसारखेच तितक्याच मोलाची ! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more